रामायणाच्या गोष्टी 54 – सनातन चिरंतन
“रामायण सनातन चिरंतन” सीतेचे पुत्र कुशलव जुळे भाऊरामाचे चरित्र लागले गाऊवनात वाढले तरी ज्ञानी झालेत्यांनी रामकथेला घरोघरी नेले.. वाल्मिकी ऋषींनी शब्द दिलेचौसष्ट कला गायन वादन दिलेलव-कुशांच्या सुरात झंकारलेरामायण अखंड वाहत राहिले.. ग.दि.माडगूळकरांनी लिहिलेसुधीर फडके यांनी गायलेगीत रामायण अमर झालेसमाजमनावर कोरले गेले… मालिका झाल्या सिनेमे झालेकथा कीर्तन प्रवचन झालेभारतीय संस्कार जगभर गेलेमानवी जीवन समृद्ध झाले… राम राज्य कुटुंब न्याय-धर्मत्याग धैर्य नीतीनियम सत्कर्मश्रीरामांस लवकुशांनी ऐकवलेरामायण राष्ट्रीय वारसा बनले. अरबी फारसी तिबेटी बर्मी चीनीफ्रेंच इंग्रजी लॅटिन ग्रीक जपानीगुजराती तमिळ तेलुगू संस्कृतकानडी हिंदी बंगाली व मराठीत. चीन तिबेट म्यानमार कंबोडियालंका नेपाळ भूतान मलेशियारामायणाने जोडला धागा एकत्रदुसऱ्यासाठी जगणे राम-चरित्र.. मानवाचा कसा असावा आचाररामायणाने दिला दिव्य विचारनीतिमान रामाचा मार्गच भलाम्हणून अहंकारी रावण संपवला. सीतेच्या अथांग सोशिकतेलाहनुमानाच्या चिरंजीव भक्तीलाभरताच्या बंधुप्रेम व निष्ठेलालक्ष्मणाची सावली साथीलानाते संबंधांना उजाळा दिला.. रामायण घडले तो भू नकाशाउदयास आणी अखंड भारतवर्षाजनकपूर पंचवटी लंका अयोध्यादंडकारण्य मिथिला किष्किंधा.. लव-कुशांनी श्रीरामांच्या साठीकेले अमर संस्कार परंपरेसाठीरामकथा गेली लाखोंच्या ओठीश्रद्धेने गाईल त्याची किर्ती मोठी. रामायण कधी संपणार नाहीरामायण कधी थांबणार नाहीसत्य सरळ मार्गानी चालणारपुण्यवान रामायण पुढे नेणार.. प्रभू श्रीरामचंद्र की जयप्रभू श्री रामचंद्र की जयप्रभू श्री रामचंद्र की जय – विद्यावाचस्पति डॉ. अनिल मोकाशी (बालरोगतज्ञ)एमबीबीएस, एमडी, डीसीएच, एफआयएपी,पीएचडी (मुलांची वाढ व विकास)








