रामायणाच्या गोष्टी

Dr. Anil Mokashi telling stories to children

रामायणाच्या गोष्टी 42 – लंकेत बिभीषणाचे सुराज्य

श्रीराम श्रीराम श्रीराम ! रामसेना जिंकली. राक्षससेना हरली. युद्ध संपले. लंकेत शांती पसरली. रावणाचा पराभव झाल्यामुळे बिभीषण आणि रावणाची पत्नी मंदोदरी यांना अतिशय दुःख झाले. रामांनी तिचे सांत्वन केले. “रावण मोठा पराक्रमी होता पण त्याच्या अहंकारामुळे त्याचा विनाश झाला.” मंदोदरीने रामाच्या शांतीप्रिय स्वभावाची प्रशंसा केली आणि बिभीषणाला चांगले राज्यकारभार करण्याचा सल्ला दिला. बिभीषण रामाला म्हणाला “आपण जिंकलात. आता लंका तुमची झाली. लंका नगरीत चला आणि राज्यकारभार हाती घ्या.” पण राम म्हणाले नाही बिभीषण. आम्ही वनवासी आहोत. आम्ही केवळ सीतेला सोडवण्यासाठी आलो. राज्यसत्ता आमची इच्छा नाही. रामांनी लक्ष्मण आणि सुग्रीवाला सांगितले, “बिभीषणाचा राज्याभिषेक करा. लंकेत सुराज्य आणा.” मोठ्या उत्साहात बिभीषणाचा राज्याभिषेक करण्यात आला. वानरसेनेने आनंदोत्सव साजरा केला. लंकेच्या जनतेनेही बिभीषणाला राजा म्हणून आनंदाने स्वीकारले. राम सीतेला आणायला निघाले. हनुमान त्यांच्या सोबत होते. सीतेची प्रतीक्षा संपणार, ही बातमी ऐकून सगळे आनंदी झाले. लंकेत आता नवीन युगाची सुरुवात झाली. न्याय, शांती आणि सुव्यवस्थेचा प्रकाश पसरला. बिभीषणाच्या सुराज्याने लंकेला नवीन दिशा दिली. प्रभू श्री रामचंद्र की जयप्रभू श्री रामचंद्र की जयप्रभू श्री रामचंद्र की जय – विद्यावाचस्पति डॉ. अनिल मोकाशी (बालरोगतज्ञ)एमबीबीएस, एमडी, डीसीएच, एफआयएपी,पीएचडी (मुलांची वाढ व विकास)

रामायणाच्या गोष्टी 42 – लंकेत बिभीषणाचे सुराज्य Read Post »

Dr. Anil Mokashi telling stories to children

रामायणाच्या गोष्टी 41 – रावणाचा निर्णायक अंत

श्रीराम श्रीराम श्रीराम ! लंकेच्या सुवर्ण सिंहासनावर मस्तवालपणे विळखा घालून बसलेला रावण मनातून अस्वस्थ होता. अयोध्येचे लाखों सैनिक आणि वानरसेना आक्रमण करून आली होती. रामनामाच्या प्रेरणेची शक्तीची त्याला पूर्ण कल्पना आली होती. पण तरीही तो फुशारक्या मारत होता. पोरकट वक्तव्ये करत फिरत होता. युद्धात आपण हरू शकतो ही कल्पनाच त्याच्या अहंकाराला सहन होत नव्हती. पण रामाची तयारी नियोजनबद्ध शिस्तीत होती. राम रावण युद्ध सात दिवस चालले. आकाश बाणांनी भरून गेले. जमिनीवर तलवारींच्या ठिणग्या पडत होत्या. रावणाचे धनुष्य तुटले रथ कोसळला हत्तीही कोलमडले. रामाने त्याचे हात उडवले तरी नवे हात उगवत होते. डोके उडवले. तरी नवीन डोके उगवे. रामाला समजेना. असे का होते आहे. लक्ष्मणाने गुपित उलगडलं “रावणाच्या बेंबीमध्ये अमृतकुंभ आहे. त्यातल्या प्रत्येक थेंबातून रावणाचे पुनर्निर्माण होईल. तो अमृतकुंभ फुटेपर्यंत रावण अमर राहील!” रामाचा नेमका बाण रावणाच्या बेंबीवर आदळला. अमृतकुंभ फुटला ! एका क्षणात रावणाचा देह जमिनीवर कोसळला. सिंहासारखा गरजणारा राक्षस शांत झाला. रावणराज्याचा निर्णायक अंत झाला. रामाविरुद्ध निकराची लढाई लढणाऱ्या रावणाचेही, शेवटचे शब्द होते – “हे राम!” दोन्ही सैन्यांनी शस्त्रे खाली ठेवली. रामाने मिळवलेला विजय फक्त युद्धाचा नव्हता. तो विजय सत्याचा धर्माचा आणि अनीतीविरुद्ध संघर्षाचा होता. राम आणि लक्ष्मणाने जयजयकारात लंकेत प्रवेश केला. सीता त्यांच्या प्रतीक्षेत होती. आता अयोध्येचा मार्ग खुला झाला होता ! प्रभू श्री रामचंद्र की जयप्रभू श्री रामचंद्र की जयप्रभू श्री रामचंद्र की जय – विद्यावाचस्पति डॉ. अनिल मोकाशी (बालरोगतज्ञ)एमबीबीएस, एमडी, डीसीएच, एफआयएपी,पीएचडी (मुलांची वाढ व विकास)

रामायणाच्या गोष्टी 41 – रावणाचा निर्णायक अंत Read Post »

Dr. Anil Mokashi telling stories to children

रामायणाच्या गोष्टी 40 – संजीवनी आणायला, मारुतीने पर्वत उचलला

श्रीराम श्रीराम श्रीराम ! मेघनादानी लक्ष्मणाला शक्तीबाण मारला. लक्ष्मण बेशुद्ध पडला. शुद्धीवर न आल्यास मरेल लक्ष्मण. म्हणाले वैद्य सुषेण. हिमालयाच्या द्रोणागिरी पर्वतावर. संजीवनी बूटी रामबाण उपाय या संकटावर. हनुमान वेगाने निघाला. हिमालयाच्या दिशेने झेपावला. अशा विस्तीर्ण रानी वनी. नेमकी ती कोणती संजीवनी. ओळखता येईना मारुतीला. वेळ नको दवडायला. लक्ष्मणाचा जीव लागलाय टांगणीला. उचलला अख्ख्या द्रोणागिरीला. हनुमान लंकेत परत आला. वैद्यांनी संजीवनी दिली लक्ष्मणाला. पुनर्जन्मच मिळाला लक्ष्मणाला. हनुमानाचा पराक्रम, भक्ती, तत्परता, अडचणींवर मात, करण्याची जिद्द आणि संकटसमयी धैर्य. यामुळे लक्ष्मणाचा जीव वाचला. दिसू लागला विजय. वानर सैन्य गर्जले – पवनपुत्र, हनुमान की जय. प्रभू श्री रामचंद्र की जयप्रभू श्री रामचंद्र की जयप्रभू श्री रामचंद्र की जय – विद्यावाचस्पति डॉ. अनिल मोकाशी (बालरोगतज्ञ)एमबीबीएस, एमडी, डीसीएच, एफआयएपी,पीएचडी (मुलांची वाढ व विकास)

रामायणाच्या गोष्टी 40 – संजीवनी आणायला, मारुतीने पर्वत उचलला Read Post »

Dr. Anil Mokashi telling stories to children

रामायणाच्या गोष्टी 39 – झोपलेल्या कुंभकर्णाला जागा केला

श्रीराम श्रीराम श्रीराम ! रामाची सेना पुढे सरसावली. रावणाची सेना मागे हटली. रावण चिंतेत पडला. काय करावे सुचेनाच. “भाऊ कुंभकर्णाला उठवू या” त्याने ठरवले. कुंभकर्ण सहा महिने झोपायचा. कुंभ पर्वतासारखा वाटायचा. उठवायचं कसं हा प्रश्न मोठा! राक्षसांनी ढोल ताशे वाजवले. छाताडावर हत्ती नाचवले. नाकात तिखट पाणी ओतले. तेव्हा कुठे महाशय जागचे हलले! कुंभकर्ण उठला डोळे चोळला, आणि विचारले—”खायला काय आहे?” गाडाभर भात लाडवांची रास शेकडो रेडे आणि बोकड खास! तो एका दमात सगळं फस्त करतो. ढेकर देतो—ढगांचा गडगडाट वाटावा अशी! रावण म्हणतो “भावा युद्धात मदत कर. रामाचा शेवट कर!” कुंभकर्ण सत्याचा पुजारी. तो म्हणतो “सीता परत कर.प्रश्न सुटेल. युद्ध हवेच कशाला?” पण रावणाने पुढे केले मद्य आणि मांस. कुंभकर्ण लगेचच झाला लढायला तयार! तो गर्जला अजस्त्र देह हलला बघूनच वानरवृंद बेशुद्ध पडला! कुंभकर्णाला ठाऊक होतं हे युद्ध अन्यायाचं आहे. रावण शेवटी हरतोच हे त्याला कळत होतं. पण भावाचं कर्तव्य, म्हणून तो रामसेनेशी लढला. कुंभकर्णाचा शेवट जवळ आला. “श्रीरामाच्या हातूनच, मृत्यू यावा,” हीच होती कुंभकर्णाची शेवटची इच्छा! “प्रभू श्रीरामचंद्र की जय!”“प्रभू श्रीरामचंद्र की जय!”“प्रभू श्रीरामचंद्र की जय!” – विद्यावाचस्पति डॉ. अनिल मोकाशी (बालरोगतज्ञ)एमबीबीएस, एमडी, डीसीएच, एफआयएपी,पीएचडी (मुलांची वाढ व विकास)

रामायणाच्या गोष्टी 39 – झोपलेल्या कुंभकर्णाला जागा केला Read Post »

Dr. Anil Mokashi telling stories to children

रामायणाच्या गोष्टी 38 – इंद्रजीताच्या सर्पास्त्राचा फास आणि गरुडाची महाशक्ती

श्रीराम श्रीराम श्रीराम ! इंद्रजीत रावणाचा बलाढ्य सेनापती. तो अदृश्य होऊ शकत होता. अदृश्य होऊन त्याने वानरांवर बाणांचा वर्षाव केला. कित्येक वानर ठार झाले. इंद्रजीताने राम-लक्ष्मणावर सर्पास्त्र सोडले. असंख्य सापांनी त्यांना घट्ट विळखे घातले. गळ्याभोवती फास आवळले. राम-लक्ष्मण बेशुद्ध झाले. इंद्रजीताने विजयाचा जल्लोष केला. तेवढ्यात गरुडराज आला! सापांचा परम शत्रू! गरुडराज दिसताच सारे साप घाबरले. राम-लक्ष्मणांना सोडून ते सैरावैरा पळाले. राम-लक्ष्मण शुद्धीवर आले. वानरसेना जल्लोषात गर्जली. नवा उत्साह घेऊन राक्षसांवर तुटून पडली. घनघोर युद्ध पेटले. रावणाची सेना मागे हटू लागली. रामाचा विजय जवळ येत होता! “प्रभू श्रीरामचंद्र की जय!”“प्रभू श्रीरामचंद्र की जय!”“प्रभू श्रीरामचंद्र की जय!” – विद्यावाचस्पति डॉ. अनिल मोकाशी (बालरोगतज्ञ)एमबीबीएस, एमडी, डीसीएच, एफआयएपी,पीएचडी (मुलांची वाढ व विकास)

रामायणाच्या गोष्टी 38 – इंद्रजीताच्या सर्पास्त्राचा फास आणि गरुडाची महाशक्ती Read Post »

Dr. Anil Mokashi telling stories to children

रामायणाच्या गोष्टी 37 – लंकेत राम-रावण युद्धाचा ज्वर चढला

रावणाची राणी मंदोदरी म्हणाली “रामाशी वैर म्हणजे विनाश!” रावण कुजकटपणे म्हणाला. रामाच्या पराक्रमाच्या फक्त अफवा आहेत. त्या लहान सहान मुलांना कच्च्या-बच्चांना सांगायच्या कपोल कल्पित कथा आहेत. हे जंगलात राहणारे फळे कंदमुळे खाणारे माकडांसोबत फिरणारे भगवे कपडे घालणारे भिक मागून जगणारे माझ्यासारख्या सर्व शक्तिमान राजाशी कसे काय लढणार. त्याला विश्वासच नव्हता की रामही कधी जिंकू शकतो. राक्षसी शक्ती अमर आहे, विध्वंसातच विजय आहे! असेच त्याला वाटत होते. मंदोदरीचा सल्ला फेटाळून रावण युद्धाला निघाला. युद्ध सुरू झाले. श्रीरामांनी हुकूम दिला “आक्रमण करा!” वानरांनी शंखनाद केला. रणदुंदुभी वाजल्या. “प्रभू श्रीरामचंद्र की जय!” अशा जयघोषात वानर लंकेत घुसले. राक्षसांकडे संहारक शस्त्रे होती. वानरांनी प्रचंड दगडफेक केली वृक्ष उचलून भिरकावले. लंकेचा अभेद्य तट ढासळला! राक्षसांनी मायावी गरम राखेचा पाऊस वानर सैन्यावर पाडला. सगळीकडे अंधार दाटला पण रामाने अग्निबाण सोडला. तेजस्वी प्रकाशात, वानरांनी पुन्हा जोरदार हल्ला केला. राम-लक्ष्मणाच्या बाणांचा वर्षाव सुरू झाला. अस्वल सैन्यही मदतीला धावले. राक्षस गडगडत पडले किंकाळ्या फोडू लागले. वानर सेना वरचढ ठरली. लंकेत रामाच्या विजयाचा बिगुल वाजू लागला. प्रभू श्रीरामचंद्र की जय!प्रभू श्रीरामचंद्र की जय!प्रभू श्रीरामचंद्र की जय! – विद्यावाचस्पति डॉ. अनिल मोकाशी (बालरोगतज्ञ)एमबीबीएस, एमडी, डीसीएच, एफआयएपी,पीएचडी (मुलांची वाढ व विकास)

रामायणाच्या गोष्टी 37 – लंकेत राम-रावण युद्धाचा ज्वर चढला Read Post »

Dr. Anil Mokashi telling stories to children

रामायणाच्या गोष्टी 36 – अंगदाची शिष्टाई

श्रीराम श्रीराम श्रीराम ! सीता मातेला परत आणायचं होतं. युद्धाशिवाय दुसरा मार्ग नव्हता. पण युद्ध म्हणजे विनाश ! श्रीरामांना हे टाळायचं होतं. त्यांनी अंगदाला दूत म्हणून पाठवलं. अंगद हुशार, शूर आणि चतुर होता. तो निर्भयपणे रावणाच्या दरबारात गेला. शेपटीचे आसन करून बसला. त्याने रावणाला रामाचा निरोप दिला—”राज्य नको, सोन्याची लंका नको. फक्त सीतेला परत दे. आम्ही शांततेत निघून जाऊ.” अंगदाने समजावलं विनवण्या केल्या. पण रावण अहंकारी होता. तो खदाखदा हसत म्हणाला—”मी सीतेला माझ्या ताकदीवर आणलं. मी तुझ्यासारख्या तुच्छ माकडाचं का ऐकू!” रावणाचा अहंकार अंगदाच्या लक्षात आला. अंगदाने आपला एक पाय पुढे केला. तो म्हणाला—”हा पाय कुणीही हलवून दाखवावा!” संपूर्ण दरबार हसू लागला. सर्वांनी प्रयत्न केला. पण अंगदाचा पाय जागचा हलला नाही. शेवटी रावणाने स्वतः प्रयत्न केला. त्याने अंगदाचा पाय धरला. अंगद हसत म्हणाला. “सर्व शक्तिमान सुवर्णलंकेचा राजा रावण एका माकडाचे पाय धरतोय ? धरायचेच असतील तर श्रीरामांचे पाय धर! ते तुला माफ करतील.” पण रावणाने श्रीरामाचा प्रस्ताव धुडकावला. अंगद निराश झाला. “विनाशकाले विपरीत बुद्धी! मी युद्ध टाळायचा प्रयत्न केला.पण तुला युद्धच हवंय! श्रीराम तुझी इच्छा पूर्ण करतील!” अंगदाची शिष्टाई निष्प्रभ ठरल्याचे ऐकून वानरसेना भडकली. त्यांच्या “पवनपुत्र हनुमान की जय, जय श्रीराम” गर्जनांनी लंका हादरू लागली! प्रभू श्रीरामचंद्र की जय!प्रभू श्रीरामचंद्र की जय!प्रभू श्रीरामचंद्र की जय! – विद्यावाचस्पति डॉ. अनिल मोकाशी (बालरोगतज्ञ)एमबीबीएस, एमडी, डीसीएच, एफआयएपी,पीएचडी (मुलांची वाढ व विकास)

रामायणाच्या गोष्टी 36 – अंगदाची शिष्टाई Read Post »

Dr. Anil Mokashi telling stories to children

रामायणाच्या गोष्टी 35 – रावणाचे कपट कारस्थान

श्रीराम श्रीराम श्रीराम ! रामाची सेना लंकेला पोचली. सर्व बाजूंनी लंकेला घेरले. वानरांच्या आरोळ्या. जय श्रीराम नारे आकाश दणाणून टाकत होते. रावण काळजीत पडला. त्याने दोन राक्षसांना हेर म्हणून पाठवले. मायावी शक्तीने रूप बदलून अस्वल आणि म्हातारे माकड बनुन आले. सैनिकांची माहिती गोळा करू लागले. कोणालाच शंका आली नाही. पण बिभीषणाने त्यांना ओळखले! वानरांनी त्यांना पकडले. रामासमोर उभे केले. हेर घाबरले माफी मागू लागले. श्रीरामांनी त्यांना क्षमा केली. परत जाऊन इथे काय काय पाहिले ते रावणाला सांगा. हेर रावणाकडे गेले. “रामाची सेना अपराजेय आहे,” असे त्यांनी सांगितले. रावण चडफडत महालात गेला. त्याने एक, नवीन कपट कारस्थान आखले. मायावी जादूने त्याने रामासारखे एक शीर तयार केले. ते सीतेपुढे ठेवले. आणि म्हणाला “रामाचा वध झाला. आता तरी माझी राणी हो!” सीता म्हणाली. “श्रीराम अजिंक्य आहेत. तुझे हे कारस्थान मला फसवू शकत नाही !”रावण खजिल झाला. निराश होऊन निघून गेला. प्रभू श्रीरामचंद्र की जय!प्रभू श्रीरामचंद्र की जय!प्रभू श्रीरामचंद्र की जय! – विद्यावाचस्पति डॉ. अनिल मोकाशी (बालरोगतज्ञ)एमबीबीएस, एमडी, डीसीएच, एफआयएपी,पीएचडी (मुलांची वाढ व विकास)

रामायणाच्या गोष्टी 35 – रावणाचे कपट कारस्थान Read Post »

रामायणाच्या गोष्टी 34 – रामसेतू आणि खारीचा वाटा

रामसेतू बांधायला, लाखो वानर, झपाटल्यासारखे, काम करत होते. मोठमोठे दगड उचलून, समुद्रात टाकत होते. नल-नील त्यांना, मार्गदर्शन, करत होते. किनाऱ्यावर एक, लहानशी खार, हे सगळं, बघत होती. एवढ्या मोठ्या कामात, आपणही मदत, करू शकतो का, असा विचार, तिच्या मनात आला. तिला एक, युक्ती सुचली. ती वाळूत, गडाबडा लोळली. तिच्या अंगाला, वाळू चिकटली. मग ती, पुलावर जाऊन, अंग झटकू लागली. दगडांच्या खाचांमध्ये, ती वाळू, जाऊ लागली. छोट्याशा खारीचं, हे छोटेसे काम! पण तिच्या दृष्टीने, ते खूप, मोठं होतं. सेवा, मनापासून, करायची असते. ती कधीच, मोठी-छोटी नसते. श्रीराम, सगळं पाहत होते. त्यांना खारीचं, श्रमदान भावलं. त्यांनी प्रेमाने, तिला उचललं. तिच्या अंगावरून, हात फिरवला. तेव्हापासून, खारीच्या अंगावर, सोनेरी पट्टे आले, असं म्हणतात. श्रीरामांच्या स्पर्शाने, तिचं जीवन, धन्य झालं! सगळ्यांनी मिळून, सहा दिवसांत, रामसेतू , तयार केला. आता फक्त, श्रीरामांच्या आज्ञेची, वाट होती. वानरसेना, लंकेवर स्वारीसाठी, सज्ज होती! प्रभू श्री रामचंद्र की जयप्रभू श्री रामचंद्र की जयप्रभू श्री रामचंद्र की जय

रामायणाच्या गोष्टी 34 – रामसेतू आणि खारीचा वाटा Read Post »

Dr. Anil Mokashi telling stories to children

रामायणाच्या गोष्टी 33 – रामसेतू

श्रीराम श्रीराम श्रीराम ! रामसेतू : सागरी पूल. सेतू बांधा रे सागरी. सेतू बांधा रे सागरी, सेतू बांधा रे सागरी! वानर सेना आली रे लंकेसाठी निघाली रे. श्रीरामांनी मुहूर्त पाहिला शिवलिंगाची स्थापना केली. रामेश्वर हे स्थान पवित्र तीर्थ म्हणून प्रसिद्ध झाली! नल-नील दोघे भाऊ पूल बांधती चातुर्याने. शिळा-वृक्ष गोळा करती सागरात टाकती युक्तीने! पण ते दगड बुडाले सर्व जण चिंतेत पडाले. हनुमानाने युक्ती सांगितली श्रीराम नाव कोरू लागले! शिळा सगळ्या तरंगू लागल्या रामाचा सेतू वाढू लागला. लंकेकडे वाट निघाली सारी वानरसेना आनंदली! आजही सेतू दिसतो इतिहास-विज्ञान सांगतो. प्रवाळ-वाळूची निसर्ग निर्मिती सागरात पूल दिसतो ! तामिळनाडूच्या रामेश्वरमला जोडी श्रीलंकेच्या मन्नारला ४८ किलोमीटर अंतराला सिता मातेच्या मुक्तीला. रामसेतू उभारतांना हनुमानाची वानर सेना गर्जे बांधा रे सागरी सेतू बांधा रे सागरी पवनपुत्र हनुमानकी जय सियावर रामचंद्र की जय प्रभू श्री रामचंद्र की जय प्रभू श्री रामचंद्र की जय – विद्यावाचस्पति डॉ. अनिल मोकाशी (बालरोगतज्ञ)एमबीबीएस, एमडी, डीसीएच, एफआयएपी,पीएचडी (मुलांची वाढ व विकास)

रामायणाच्या गोष्टी 33 – रामसेतू Read Post »

Children & Stories

रामायणाच्या गोष्टी 32 – वानरसेना स्वारीला, निघाली लंकेला!

श्रीराम श्रीराम श्रीराम ! श्रीरामानी हनुमानाला लंकेची बित्तमबातमी विचारली. स्वारी करायला कोणता मार्ग कमी धोक्याचा आहे. रक्षणासाठी किती सैन्यबळ आहे. लंके भोवती किती कोट आहेत. हल्ला करायला, कोणता मार्ग सोयीचा आहे. राक्षस नागरिकांचे रावणाविषयी काय मत आहे. हनुमानानी हेराच्या नजरेनी लंकेतील अनेक बारकावे टिपले होते. श्रीरामानी सुग्रीवाला विचारले. एवढा मोठा समुद्र ओलांडून आपले वानर सैन्य लंकेपर्यंत कसे पोचेल. सुग्रीव म्हणाला. काळजी करू नका. आपण सागरावर सेतू उभारू, पूल उभारू त्याचं नाव रामसेतू ठेवू. आणि या रामसेतूवरून आपले कोट्यावधी वानर सैन्य लंकेत घुसवू. वानर सेनापतींनीभराभर हुकूम सोडले. विस्कळीत वानर सैन्य दाही दिशातून गोळा झाले. पाहता पाहता ते सैन्य एखाद्या सागराप्रमाणे पसरले. लाटांप्रमाणे उसळणाऱ्या वानर सेनेच्या समोर महाप्रतापी श्रीराम आपल्या तेजस्वी पावलांनी चालत होते. वानर सैन्यात विलक्षण उत्साह संचारला होता. जय श्रीराम जय श्रीराम असे नारे दिले जात होते. दुष्ट राक्षस शक्तींना हरवून रामराज्य उभारण्यासाठी विशाल वानर सेना लंके कडे निघाली होती. जय श्रीराम, या एका ना-याने अनेक राक्षस भयभीत झाले. पण चारी दिशातून जय श्रीराम नाऱ्यानी आकाश दणाणले. वाटेत काही राक्षसांची राज्ये होती. जय श्रीराम या नाऱ्याचा अनेकांना, राग येऊ लागला. जय श्रीराम हा नारा ऐकून त्यांच्या तळपायाची आग मस्तकाला जाई. एवढी प्रचंड मोठी वानर सेना अंगावर येतांना पाहून काही चोरांना वाटले की ही कुठल्या तरी भयंकर आजाराची साथ आहे. पण सीतामातेचे कपटाने अपहरण केल्याचा राग संपूर्ण भारतवर्षात होता. जनतेचे श्रीरामांना समर्थन होते. सारे वानरसैन्य, अतिशय शिस्तीत सागर तीरावर आले. समोरचा अथांग सागर ओलांडून सगळ्यांना पलीकडे जायचे होते. रामसेतू कोण व कसा बांधणार हाच यक्ष प्रश्न होता. म्हणजे खूप मोठा प्रश्न होता. वानर सेना स्वारीला, निघाली लंकेला! प्रभू श्री रामचंद्र की जयप्रभू श्री रामचंद्र की जयप्रभू श्री रामचंद्र की जय – विद्यावाचस्पति डॉ. अनिल मोकाशी (बालरोगतज्ञ)एमबीबीएस, एमडी, डीसीएच, एफआयएपी,पीएचडी (मुलांची वाढ व विकास)

रामायणाच्या गोष्टी 32 – वानरसेना स्वारीला, निघाली लंकेला! Read Post »

Children & Stories

रामायणाच्या गोष्टी 31- लंका दहन करून हनुमानाची रामभेट

श्रीराम श्रीराम श्रीराम ! लंकेत सीतेला भेटून, रावणाला धडा शिकवून, लंका दहन करून हनुमान आकाश मार्गे उडत उडत परत आला. तो जसा वानर सेनेसमोर आला, तसे सगळे वानर आनंदाने उड्या मारू लागले. “जय हनुमान! जय श्रीराम!” असा जयघोष झाला. हनुमान लगेच रामाकडे गेला आणि त्याला सगळी कहाणी सांगितली—सीतेच्या धैर्याची, रावणाच्या क्रूरतेची आणि लंकेच्या विध्वंसाची. रावणाच्या राज्याची. त्याच्या सामर्थ्याची. त्याच्या सैन्याची. सगळ्या गुप्त बातम्या हनुमानाने श्रीरामांना सांगितल्या. सीतेने हनुमानाला दिलेले सोन्याचे कंगण बघून श्रीरामाला धीर आला. सीता सुखरूप असल्याची ती खूण होती. हनुमानाने रामाला एक विनंती केली, “मला सदैव तुमच्या सेवेत राहायचं आहे!” राम प्रसन्न झाले आणि त्यांनी हनुमानाला प्रेमाने आशीर्वाद दिला. आणि तथास्तु म्हटले. आता वेळ आली होती मोठ्या निर्णयाची! राम, लक्ष्मण, सुग्रीव आणि हनुमानाने ठरवलं—संपूर्ण वानरसेनेसह लंकेवर चढाई करायची, सीतेला परत आणायचं! ते वानर सेनेची जमवाजमव करायच्या तयारीला लागले. प्रभू श्री रामचंद्र की जयप्रभू श्री रामचंद्र की जयप्रभू श्री रामचंद्र की जय – विद्यावाचस्पति डॉ. अनिल मोकाशी (बालरोगतज्ञ)एमबीबीएस, एमडी, डीसीएच, एफआयएपी,पीएचडी (मुलांची वाढ व विकास)

रामायणाच्या गोष्टी 31- लंका दहन करून हनुमानाची रामभेट Read Post »

Scroll to Top