Story

pacifist, mahatma gandhi, mohandas karamchand gandhi, spiritual leader, nonviolence, resistance, equality, racial segregation, mahatma gandhi, mahatma gandhi, mahatma gandhi, mahatma gandhi, mahatma gandhi

मोहनदास ते महात्मा गांधी

मोहनदास ते महात्मा गांधी – भारतीय इतिहासाच्या गोष्टी २३ मोहनदास करमचंद गांधीलहानपणी अगदी साधा मुलगा होते.ते जरासे अबोलच होते.पण काहीही चुकीचं घडतांना दिसलंकी ते अस्वस्थ व्हायचे.त्यांना खोटं आवडत नसे.सत्य म्हणजे, खरं ते बोलणं.सत्य म्हणजे, बरोबर ते करणं.त्यांना एक प्रश्न पडायचा.‘सत्याच्या बाजूने’ कसं उभं राहायचं ?त्यासाठी त्यांनी वकिलीचं,कायद्याचं शिक्षण घेतलं. दक्षिण आफ्रिकेत त्यांना रेल्वेच्या डब्यातून खाली उतरवण्यात आलं.ते गोरे नव्हते, काळे होते.हा अन्याय त्यांना मान्य नव्हता.त्यांनी विरोध केला.त्या दिवशी त्यांना स्वतःची ओळख पटली.हिंसाही नाही. आणि सहकार्यही नाही. भारतामध्ये परत आल्यावरगांधीजींनी भारतयात्रा केली.लोक कसे जगतात हे त्यांनी पाहिलं.पदयात्रेमधे ते एकटे चालायला लागले.“एकला चलो रे” हा त्यांचा मंत्र होता.हळूहळू त्यांच्यामागे लोक जोडले गेले.हजारो, लाखो लोक त्यांचे अनुयायी झाले.त्यांनी चरख्यावर सूत कातले.स्वदेशीचा मंत्र दिला.दुष्ट इंग्रजाशी असहकार आंदोलन पुकारले. इंग्रजांनी मिठावर कर लादला होता.गांधीजींनी दांडीयात्रा काढली.मीठाचा सत्याग्रह केला.गांधीजींनी एक चिमूटभर मीठ काय उचललं, संपूर्ण ब्रिटिश साम्राज्य हादरलं.देश जागा झाला.गांधीजींनी निशस्त्र क्रांती केली. लोक त्यांना महात्मा गांधी म्हणू लागले.महात्मा म्हणजे महान आत्मा.गांधीजी धार्मिक होते.त्यांचा देवावर विश्वास होता.रामावर विश्वास होता.त्यांचे शेवटचे शब्द होते —“हे राम.” त्यांची शिकवण होती,“जग चांगलं करायचं असेलतर आधी स्वतः चांगले व्हा.” महात्मा गांधी की जयभारतमाता की जय.जय हिंद – विद्यावाचस्पति डॉ. अनिल मोकाशी (बालरोगतज्ञ)एमबीबीएस, एमडी, डीसीएच, एफआयएपी,पीएचडी (मुलांची वाढ व विकास)

मोहनदास ते महात्मा गांधी Read Post »

स्वातंत्र्यवीर सावरकर – वीर सावरकर

स्वातंत्र्यवीर सावरकर. वीर सावरकर भीतीवर मात करून जो लढतो, तोच खरा वीर.सावरकरांनी इंग्रज राजवटीला थेट आव्हान दिलं.छळ सहन केला, हाल सोसले,पण कधीच झुकले नाहीत.अंदमानच्या सेल्युलर जेलमध्येत्यांना काळ्या पाण्याची जन्मठेप झाली.तरीही त्यांचा विचार बदलला नाही.म्हणूनच त्यांना “वीर सावरकर” म्हणतात. त्यांचं संपूर्ण आयुष्यस्वातंत्र्यासाठी समर्पित होतं.म्हणून ते स्वातंत्र्यवीर होते. सावरकरांच्या कविता देशप्रेमाच्या होत्या.अंदमानच्या तुरुंगात,भारतापासून दूर असताना,त्यांचं मन खूप व्याकुळ झालं.आईपासून दूर गेल्यावर बाळ रडतं,तसं त्यांचं मन तळमळत होतं.म्हणून ते समुद्राला विनंती करतात —“मला माझ्या मातृभूमीकडे परत घेऊन चल.” हाच भाव आहे“ने मजसी ने परत मातृभूमिला” या कवितेत. “जयोस्तुते श्रीमहन्मंगले”ही भारतमातेची स्तुती आहे.गुलाम देशाला धैर्य देण्यासाठीआणि स्वाभिमान जागा करण्यासाठीही कविता रचली गेली. “हे हिंदु नृसिंहा प्रभो शिवाजी राजा”या कवितेत सावरकरशिवाजी महाराजांची आठवण करून देतात.शिवाजी महाराजांनीहिंदवी स्वराज्य उभं केलं.हिंदवी स्वराज्य म्हणजे —या मातीचं,आपल्या लोकांचं,आणि परकीय सत्तेपासून स्वतंत्र असलेलं राज्य.या कवितेत सावरकरफक्त शिवाजी महाराजांना हाक देत नाहीत.ते आपल्या आतल्या धैर्याला जागं करतात.कारण प्रत्येक भारतीयाच्या मनातएक छोटा शिवाजी आहे.आपली माती, आपले लोक, आपलं धैर्य —हेच हिंदवी स्वराज्य! सावरकर हेप्रखर हिंदुत्ववादीआणि तेजस्वी राष्ट्रभक्त होते.सूर्यासारखे —तेजस्वी, तळपते, ऊर्जावान, मार्ग दाखवणारे. स्वातंत्र्यवीर सावरकर — की जय!भारत माता — की जय!जय हिंद! – विद्यावाचस्पति डॉ. अनिल मोकाशी (बालरोगतज्ञ)एमबीबीएस, एमडी, डीसीएच, एफआयएपी,पीएचडी (मुलांची वाढ व विकास)

स्वातंत्र्यवीर सावरकर – वीर सावरकर Read Post »

बाळ गंगाधर टिळक ते लोकमान्य टिळक

 बाळ गंगाधर टिळक ते लोकमान्य टिळक – भारतीय इतिहासाच्या गोष्टी २१ बाळ गंगाधर टिळक पुण्याचे होते. पुणे हे शिक्षणाचे माहेरघर म्हणून ओळखले जाते. लहानपणी टिळक खूप हुशार होते. प्रश्न विचारायचे. चौकस बुद्धी. हा त्यांचा गुण होता.शाळेत त्यांना गणित आणि इतिहास विषय आवडायचा.टिळकांनी कायद्याचे शिक्षण घेतले. पण पैसे कमावण्यासाठी वकिली व्यवसाय केला नाही.कायद्याचं ज्ञान त्यांनी लोकांना न्याय मिळावा म्हणून वापरलं. त्यांना प्रश्न पडायचा, आपला देश गुलाम का आहे?त्या काळात इंग्रज राज्य करत होते.सामान्य माणूस दुःखी होता.शेतकरी, कामगार यांच्यासाठी कोणी बोलत नव्हते. टिळकांच्या लक्षात आले. हीच वेळ आहे आवाज उठवण्याची.“मी गप्प बसणार नाही,” असं त्यांनी ठरवलं. त्यांनी केसरी वर्तमानपत्र सुरू केलं. निर्भयपणे खरं लिहिलं.त्यांचा आवाज भारतभर पोचला. लोक जागे होऊ लागले.लोकमान्य टिळक काँग्रेसचे अध्यक्ष झाले.स्वातंत्र्यलढ्याला खरी सुरुवात झाली.टिळकांनी त्या विचारांना धाडस आणि लढ्याची दिशा दिली.टिळकांनंतर गांधीजी, नेहरू, सुभाषचंद्र बोस यांनी लढा पुढे नेला. पण पहिला बुलंद आवाज लोकमान्य टिळकांचाच होता.गणपती उत्सव, शिवजयंतीमुळे लोक एकत्र आले. लोकमान्य टिळकांचे घोषवाक्य होते. “स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच!” – विद्यावाचस्पति डॉ. अनिल मोकाशी (बालरोगतज्ञ)एमबीबीएस, एमडी, डीसीएच, एफआयएपी,पीएचडी (मुलांची वाढ व विकास)

बाळ गंगाधर टिळक ते लोकमान्य टिळक Read Post »

swami vivekananda

नरेंद्रनाथ दत्त कसा झाला स्वामी विवेकानंद?

“नरेंद्रनाथ दत्त कसा झाला स्वामी विवेकानंद?” – भारतीय इतिहासाच्या गोष्टी १७ स्वामी विवेकानंद भारतीय इतिहासाचा एक चमकता तारा होते.‘उठा, जागे व्हा’ — ‘उत्तिष्ठ, जाग्रत’ अशी हाक देऊन त्यांनी देशाला धैर्य दिलं.त्यांनी भारताचं नाव जगभर उजळवलं.त्यांनी शिकवलं—देव आकाशात नाही… देव आपल्या मनातल्या उजेडात आहे.आज मी त्यांची गोष्ट सांगतोय… आणि माझ्या मनात एक ज्योत पेटली.ही बघा—मी मेणबत्ती पेटवली.ही आहे आजच्या गोष्टीची ज्योत.आता या ज्योतितून तुमच्या हातातल्या उदबत्त्या पेटवू या.तुम्ही माझ्यामागून गोष्ट म्हणाल, आणि ही ज्योत तुमच्या मनातही उजळेल.याला म्हणतात—‘ज्योत से ज्योत जगाते चलो’.मनातली ज्योत म्हणजे प्रेरणा. दैवी प्रकाश. देवाचा अंश. कोलकात्यातील सिमुलिया स्ट्रीट…इथे राहत होता एक चुणचुणीत, हसतमुख, खोडकर मुलगा—नरेंद्रनाथ दत्त.खेळात, अभ्यासात, गाण्यात—तो सगळीकडे हुशार.पण त्याची एक खास सवय—सतत प्रश्न!“देव कुठे आहे?”“माणसांनी चांगलं का वागावं?”आई भुवनेश्वरी म्हणायची,“बाळा, तुझ्या मनात प्रकाश असेल तर जगातील अंधार निघून जातो.” एके दिवशी नरेंद्रने आपल्या गुरूंना—रामकृष्ण परमहंसांना विचारलं,“तुम्ही देव पाहिलात का?”रामकृष्ण म्हणाले,“हो, पाहिलाय. प्रत्येक माणसात देव आहे.तू तुझी शक्ती इतरांच्या भल्यासाठी वापर, तुला देव दिसेल.” एकदा एका मुलाला कुत्र्याचं पिल्लू सापडलं.नरेंद्रने त्याला परत आईकडे पोचवलं.विवेकानंद म्हणाले,“एखादा जीव वाचवतो तेव्हा—आपल्या हृदयात देव जागा होतो.” शिकागोमध्ये जागतिक धर्मसंसद भरली होती.जगभरातील विद्वान आपापल्या धर्माची स्तुती करत होते.विवेकानंद उभे राहिले आणि म्हणाले—“माझ्या अमेरिकेतील बंधू आणि भगिनींनो!”क्षणभर शांतता… आणि मग गडगडाट!जगाला पहिल्यांदा कळलं—भारतात दुसऱ्या धर्मातील लोकही बंधू-भगिनी असतात. स्वामी विवेकानंदांनी शिकवलं—देव आपल्या मनातल्या उजेडात आहे. – विद्यावाचस्पति डॉ. अनिल मोकाशी (बालरोगतज्ञ)एमबीबीएस, एमडी, डीसीएच, एफआयएपी,पीएचडी (मुलांची वाढ व विकास)

नरेंद्रनाथ दत्त कसा झाला स्वामी विवेकानंद? Read Post »

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर

भारतीय इतिहासाच्या गोष्टी १६ – पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर अहिल्यानगर, म्हणजे जुन्या अहमदनगर जिल्ह्यातील, चोंडी या गावात, जन्माला आली एक मुलगी. अहिल्या तिचं नाव. हुशार. चुणचुणित. एकदा आपल्या, दहा-बारा मैत्रिणींसोबत, ती नदीकाठी, खेळत होती. अचानक लांबून, खूप धुरळा, उडलेला दिसला. धुळीचे लोट, आकाशात उठले. सगळ्या मुली, घाबरल्या. सैन्य आले, सैन्य आले, मोगलांचे सैन्य आले. असं ओरडत, घाबऱ्या घुबऱ्या, सगळ्या जणी, आपापल्या घरी, सुरक्षित स्थळी, पळून गेल्या. पण तिथे नदीकाठी, एक शिवलिंग होते. त्या जागी, पूर्वी एक मोठे, शिवमंदिर होते. मोगलांनी, सगळी मंदिरे, सगळ्या धर्मशाळा, सगळे रस्ते उद्ध्वस्त केले होते. छोट्या अहिल्याने ठरवले, हे शिवलिंग, कसेही करून, वाचवायचेच. ती एकटीच, त्या शिवलिंगाचे, रक्षण करण्यासाठी, थांबली. खरं तर ते सैन्य, शिवाजी महाराजांचे, इंदोरचे सेनापती, मल्हारराव होळकर, यांचे होते. मल्हाररावांना, या मुलीला, एकटीला बघून आश्चर्यच वाटले. कोण आहे बरं, ही मुलगी. एकटीच, का थांबली आहे. त्यांनी जवळ जाऊन, चौकशी केली. अहिल्याने, बाणेदारपणे सांगितले, मी शिवलिंगाचे, रक्षण करत आहे. मल्हारराव होळकरांनी, अहिल्येच्या वडिलांना भेटून, त्यांच्याकडे, आपला मुलगा खंडेराव, याच्याशी लग्नासाठी, मागणी घातली. अहिल्येच्या मनात, तिची आई सीताबाई, हिचे चांगले विचार, रुजलेले होते. मल्हाररावांना, अशीच धैर्यवान, सून हवी होती. आणि चोंडीची अहिल्या, राणी अहिल्यादेवी होळकर झाली. मल्हाररावांनी, व खंडेरावांनी, अहिल्येला, राज्यकारभाराचे धडे दिले. काही दुर्दैवी घटनांमुळे, अचानकच, संपूर्ण राज्याची जबाबदारी, त्यांच्यावर आली. त्यांनी ती, अत्यंत हुशारीनी, आणि कुशलतेनी, सांभाळली. अहिल्यादेवी यांनी, काशी विश्वनाथ, सोमनाथ, महाकाल, यांसारखी अनेक देवस्थाने, पुन्हा बांधली. भक्तीच्या मार्गाने, भारत जोडला. प्रवाशांसाठी रस्ते, घाट, विहिरी, धर्मशाळा बांधल्या. यात्रेला सुरक्षित, आणि सुखकर बनवले. पर्यटन फुलवले. त्यांनी स्त्रिया, विधवा, यांना मदत,, आणि आदर दिला. गरीब, शेतकरी,—सर्वांसाठी समान, न्याय दिला. समतेचा संदेश दिला. “राजा मोठा नाही… न्याय मोठा!” हे सांगितले. म्हणून तर अजितदादांनी, बारामतीच्या मेडिकल कॉलेजचे नाव,“पुण्यश्लोक, अहिल्यादेवी, होळकर, मेडिकल कॉलेज” ठेवले आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर की, जयभारत माता की, जयजय हिंद. – विद्यावाचस्पति डॉ. अनिल मोकाशी (बालरोगतज्ञ)एमबीबीएस, एमडी, डीसीएच, एफआयएपी,पीएचडी (मुलांची वाढ व विकास)

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर Read Post »

Lakshmibai - The Rani of Jhansi

“मेरी झाँसी नहीं दूँगी!”

भारतीय इतिहासाच्या गोष्टी. – “मेरी झाँसी नहीं दूँगी!” मी मणिकर्णिका मोरोपंत तांबे.लहानपणीच तलवार, घोडेस्वारी, धनुष्य—सगळं शिकले.माझं लग्न १३ व्या वर्षी, झाशीचे राजा गंगाधरराव नवलकर यांच्याशी झालं.राणी झाल्यावरचं नाव: लक्ष्मीबाई. मी मुलगा दत्तक घेतला — दामोदरराव.एक दिवस इंग्रज म्हणाले,“तुमचा वारस नाही, झाशी आम्हाला द्या.”मी ठामपणे उत्तर दिलं:“मेरी झाँसी नहीं दूँगी!” झाशी माझं घर… माझा अभिमान.मी सैन्य तयार केलं — लहान मुलांना, स्त्रियांनाही लढायला शिकवलं.घोड्यावर बसून दोन तलवारांनी मी रणांगण गाजवलं. 1857 च्या भारताच्या पहिल्या स्वातंत्र्य युद्धात मी शेवटपर्यंत झुंज दिली — हा युद्ध ब्रिटिशांच्या अन्यायाविरुद्धचा एक भव्य उठाव होता. झाशीच्या या संघर्षाचा इतिहास आजही जिवंत आहे — झांसीमध्ये राणी महाल आहे, जिथे मी राहत होतो, आणि तो महाल आता संग्रहालय आहे. झाशीची राणी म्हणजे धैर्य, आत्मसन्मान आणि स्वातंत्र्याची मूर्ती. खूब लड़ी मर्दानी,वो तो झाँसी वाली रानी थी”— सुभद्रा कुमारी चौहानसिंहासन हिल उठे,राजवंशों ने भृकुटी तानी थी,बूढ़े भारत में आईफिर से नयी जवानी थी।गुमी हुई आज़ादी कीकीमत सबने पहचानी थी,दूर फिरंगी को करने कीसबने मन में ठानी थी।चमक उठी सन सत्तावन में,चमक उठी सन सत्तावन में,यह तलवार पुरानी थी,खूब लड़ी मर्दानी,वो तो झांसी वाली रानी थी।खूब लड़ी मर्दानी,वो तो झांसी वाली रानी थी।खूब लड़ी मर्दानी,वो तो झांसी वाली रानी थी! झांसी की रानी की जयभारतमाता की जयजय हिंद – विद्यावाचस्पति डॉ. अनिल मोकाशी (बालरोगतज्ञ)एमबीबीएस, एमडी, डीसीएच, एफआयएपी,पीएचडी (मुलांची वाढ व विकास)

“मेरी झाँसी नहीं दूँगी!” Read Post »

मी शिवाजीराजे भोसले बोलतोय…

मुलांनो, मी शिवाजीराजे भोसले बोलतोय… – मी सांगतोय स्वराज्य निर्मितीची गोष्ट. मुलांनो, मी शिवाजीराजे भोसले बोलतोय.माझं बालपण झालं शिवनेरी किल्ल्यावर.माझी आई जिजाऊ, रोज मला गोष्टी सांगायची — रामाची, कृष्णाची, भीमाची!त्या गोष्टींनी माझ्या मनात एक विचार पक्का झाला —“आपलं राज्य आपणच उभं करायचं!”तेव्हा जुलमी आक्रमक मोगल बादशहा, सुभेदार लोकांवर अन्याय करत होते.गावं जळत होती, माणसं घाबरलेली होती.मी ठरवलं — हा अन्याय थांबवायचाच!लहानपणीच मी घोड्यावर बसायला शिकलो, तलवार फिरवायला शिकलो.डोंगरावर चढायचो, मावळ्यांबरोबर खेळायचो — पण मनात एकच जिद्द होती.थोडा मोठा झालो, तेव्हा मी तोरणा किल्ला जिंकला.लोक म्हणाले, “हा बाळराजा मोठा राजा होणार आहे!”मी राजगडावर राजधानी बसवली.माझे मावळे — तानाजी, बाजी, नेताजी, येसाजी — हे माझे हात होते.आम्ही किल्ल्यांवर स्वराज्याचा झेंडा फडकवला.प्रतापगडावर अफझलखान आला.मी म्हटलं — “ आई भवानी, मी धर्मासाठी तलवार उचलतोय.”त्या दिवशी आमचा विजय झाला.तेव्हा सह्याद्रीच्या डोंगर दर्यांमध्ये एकच वाक्य घुमलं —“हर हर महादेव! जय भवानी! जय शिवाजी!”त्या आवाजात भीती नाही, स्वाभिमान होता!लोकांच्या मनात उमटलं — “हा आपला राजा आहे!”मुलांनो, आज मी सिंहासनावर नाही,पण मी स्वराज्याचं स्वप्न बघितलं, पूर्ण केलं आणि भारताला स्वराज्य शिकवलं. माझं स्वराज्य आजही तुमच्या मनात जगतंय.जेव्हा तुम्ही प्रामाणिकपणे, धैर्याने, इतरांसाठी काम करता,तेव्हा माझं नाव पुन्हा घुमतं — “जय भवानी! जय शिवाजी!” – विद्यावाचस्पति डॉ. अनिल मोकाशी (बालरोगतज्ञ)एमबीबीएस, एमडी, डीसीएच, एफआयएपी,पीएचडी (मुलांची वाढ व विकास)

मी शिवाजीराजे भोसले बोलतोय… Read Post »

BKK Staff

मी आणि माझी शाळा

मी आणि माझी शाळा. शाळा म्हणजे फक्त एक इमारत, चार भिंती, जमीन, साहित्य, लाईट, पाणी, शासनमान्यता, अनुदान नाही. संस्था माणसांनीच बनते. आज आपल्या शाळेत जवळजवळ 60 जण काम करत आहेत, 500 मुले शिकत आहेत. त्यांचे कुटुंबीय धरले. तर दैनंदिन जीवनात शाळेशी हजाराहून जास्त माणसांचा संबंध येतो. शाळा ही एक जिवंत समाजव्यवस्था आहे. Ecosystem, परिसंस्था आहे. आपलं काम शिक्षण सेवा क्षेत्रात मोडतं. हे सर्विस इंडस्ट्री. मानवी विकास हा आपल्या कर्तव्याचा गाभा. म्हणून विद्यार्थी केंद्रितता महत्वाची ठरते. आधी विद्यार्थी, मग पालक,मग स्टाफ, आणि मग व्यवस्थापन, संस्थाचालक. ही खरी सेवा साखळी आहे. उलटी साखळी नाही चालत नाही. संस्थेची यशस्वी वाटचाल ही फक्त बांधकाम, भौतिक सुविधा, परवाने, अभ्यासक्रम यावर अवलंबून नसते. ती अवलंबून असते — संघभावनेवर. विश्वासावर. संवादावर. आणि सुस्पष्ट कार्यपद्धतीवर. नियम, नियमावली, कार्यपद्धती या शब्दांकडे सूचना” म्हणून न पाहता “सहकार्याची चौकट” म्हणून पाहणं आवश्यक आहे. कधीकधी नियम बंधनकारक वाटतात. बदल समजून घेतला, तर तोच बदल सुरक्षेचा आधार ठरतो. उदा. कागदोपत्री पुरावा, फोटो, मंथली रिपोर्ट. संस्थेच्या वाटचालीत स्थळ काळ वेळेप्रमाणे नवीन निर्णय, नवीन कार्यपद्धती स्वीकाराव्या लागतात. आधी छान चाललं होतं ना? मग बदल कशाला?” असं वाटतं. बदल नेहमीच जड जातात. पण तो हिताचा बदल आवश्यकही असतो. बदलाची मानसिक तयारी असावी. आजचा विद्यार्थी, आजचा पालक, आजचा समाज – या सगळ्यात सतत बदल घडतोय.आपण जुन्या चौकटीत अडकून राहिलो, तर प्रगती खुंटणार. म्हणूनच कार्यपद्धतीचे नियम, बदल दडपण आणण्यासाठी नसतात. स्पष्टता, पारदर्शकता, समन्वय आणि सुधारणेसाठी असतात. संस्था उभी राहते जमिनीवर, इमारतीवर, पण चालते, टिकते ती आपापसातल्या संबंधावर, नात्यांवर. नियमांची चौकट ही आपली सगळ्यांची सामूहिक जबाबदारी आहे. धन्यवाद! – विद्यावाचस्पति डॉ. अनिल मोकाशी (बालरोगतज्ञ)एमबीबीएस, एमडी, डीसीएच, एफआयएपी,पीएचडी (मुलांची वाढ व विकास)

मी आणि माझी शाळा Read Post »

हर्षवर्धन, ह्युएनत्संग आणि बुद्ध सर्किट पर्यटन.

हर्षवर्धन, ह्युएनत्संग आणि बुद्ध सर्किट पर्यटन. एक होता राजा – हर्षवर्धन. विद्वान, शांत, उदार राजा.त्याचं साम्राज्य अफाट होतं. पण ते त्यानी तलवारीने नाही, तर ज्ञान, धर्म आणि प्रेमानी जिंकलं होतं. राजा कविता करायचा, विचारवंतांचा सल्ला ऐकायचा,तो शिवभक्त होता. तो गौतम बुद्धाचाही चाहता होता.सगळ्या धर्मांचा आदर करणारा – असा हा सम्राट! त्याच काळात चीनमधून ह्युएनत्संग नावाचा एक बौद्ध भिक्षू भारतात आला.पायात चप्पल नाही, खांद्यावर झोळी…वाळवंटं पार केली, डोंगर चढला – कारण त्याला पाहायचा होता बुद्धाचा देश! जिथे गौतम बुद्ध जन्मला. वावरला. त्याला समजलं, भारतामधला धर्म पुस्तकी नाही. धर्म लोकांच्या मनात, रोजच्या जीवनात आहे. इथले लोक धर्म जगतात. नम्रतेनं, प्रेमानं! ह्युएनत्संगने हर्षवर्धनला भेट दिली.राजाने प्रयाग आणि कनोज येथे मोठ्या धर्मसभा भरवल्या.हजारो बौद्ध, जैन, सनातन विचारवंत एकत्र बसले.“धर्म म्हणजे भांडण नाही, तो सहवास आहे!” – हे शिकवलं गेलं. ह्युएनत्संग भारावून गेला.भारताच्या विकसित संस्कृतीचं त्यानी “सी-यू-की” या त्याच्या पुस्तकात वर्णन केलं आहे.त्याच्यामुळे भारतीय संस्कृतीची ओळख जगभर पोचली. आजही तोच विचार पुढे चालतो आहे.भारत सरकारने ‘बुद्ध सर्किट’ नावाचा एक सुंदर पर्यटन मार्ग तयार केला आहे.गौतम बुद्धाच्या जीवनाशी संबंधित स्थळं एकमेकांशी जोडली आहेत –लुंबिनी, बोधगया, सारनाथ, कुशीनगर… हजारो लोक त्या पवित्र जागांवर जातात. नतमस्तक होतात.बुद्धाच्या पावलांवर पाऊल ठेवतात. भारताचा अनुभव घेतात. “इतिहासाची वाट चालणारे हे पाय… उद्याच्या पर्यटनामुळे संपन्न झालेल्या भारताचं रूपडं बदलत आहेत.” – विद्यावाचस्पति डॉ. अनिल मोकाशी (बालरोगतज्ञ)एमबीबीएस, एमडी, डीसीएच, एफआयएपी,पीएचडी (मुलांची वाढ व विकास)

हर्षवर्धन, ह्युएनत्संग आणि बुद्ध सर्किट पर्यटन. Read Post »

Vikram Vetal

विक्रम वेताळ गोष्टीतला आणि खरा राजा विक्रमादित्य

विक्रम वेताळ गोष्टीतला आणि खरा राजा विक्रमादित्य मुलांनो, मी आता काही प्रश्न विचारणार आहे. तुम्ही सगळ्यांनी मोठ्याने, एका शब्दात उत्तर द्यायचं आहे. तयार? तहान लागते तेव्हा काय पिता? – पाणी! विहिरीत काय असतं? – पाणी. समुद्रात काय असतं? – पाणी. नदीत काय असतं? – पाणी. पावसातून काय पडतं? – पाणी. बर्फ वितळला की त्याचं काय होतं? – पाणी. किती छान! कुठलाही प्रश्न विचारला, तर तुमचं उत्तर एकच – पाणी. आता मला सांगा. साखर चवीला कशी लागते? – गोडमीठ चवीला कसे लागते? – खारट. मिरची चवीला कशी लागते? – तिखट. लिंबू चवीला कसे लागते? – आंबट. आवळा चवीला कसा लागतो? – तुरटम्हणा – तुरट! चपाती कशाची करतात? गव्हाची. भाकरी कशाची करतात? ज्वारीची-बाजरीचीभात कशाचा करतात? तांदळाचा. वरण कशाचं करतात? डाळीचं. बघितलं का. प्रश्न विचारला, की विचार करावा लागतो. विचार केला की उत्तर मिळतं. उत्तर मिळालं की आपण हुशार, संशोधक होतो. विक्रम-वेताळाच्या गोष्टीतला विक्रम पौराणिक आहे. म्हणजे गोष्टीतला. एकदा राजा विक्रम, वेताळाला खांद्यावर घेऊन चालला होता. वेताळ रोज एक गोष्ट सांगायचा, आणि शेवटी एक प्रश्न विचारायचा. दोन राजे जंगलातून चालले होते. समोर एक आदिवासी मुलगी डोक्यावर लाकडांची मोळी घेऊन चालली होती.अचानक समोर आला एक उपाशी वाघ! पहिल्या राजाने तलवारीचे सपासप वार करून वाघ ठार मारला. दुसऱ्याने त्या मुलीला उचलून सुरक्षित ठिकाणी नेले.आणि तिला तिच्या घरी, आई वडिलांकडे पोचवले. ती निघाली एक हरवलेली राजकन्या! वेताळाने विचारलं. तिने लग्न कोणाशी करावं? वाघाशी लढणाऱ्या शूरवीराशी, की तिला सुरक्षित ठेवणाऱ्या आधारवडाशी? राजा विक्रम म्हणाला –“शौर्य महत्त्वाचं, पण माणुसकी त्याहून मोठी. आधार देणारा राजा श्रेष्ठ!” वेताळ हसला. उत्तर बरोबर होतं. आणि वेताळ नेहमीप्रमाणे पुन्हा वडाच्या झाडावर उलटा लोंबकळू लागला हे झालं गोष्टीतलं. पण इतिहासातही एक विक्रमादित्य होऊन गेला. सम्राट चंद्रगुप्त विक्रमादित्य! छत्रपती शिवरायांच्या १५०० वर्षे आधीचा राजा. त्याच्या दरबारात होती नवरत्ने. विद्वान, गायक, साहित्यिक, विचारवंत. त्याने सुराज्य दिलं. आणि आजच्या भारतीय संस्कृतीची मुहूर्तमेढ रोवली. एकदा एका गरीब शेतकऱ्याची गाय चोरीला गेली. शेजारी म्हणाला, “ही गाय माझी आहे. “प्रकरण गेलं राजाकडे. राजाने दोघांनाही गायीसमोर उभं केलं आणि गायीला हाक मारून बोलवायला सांगितलं. गाय सरळ गेली शेतकऱ्याकडे. त्याच्या अंगाला डोकं घासू लागली. प्रेम दाखवू लागली. राजा म्हणाला –”गायीला फसवता येत नाही. तिला सत्य कळतं.” राजानी गाय दिली शेतकऱ्याला. आणि दंड केला शेजाऱ्याला. हेच खरं न्यायाचे राज्य! राजा विक्रमादित्याने भारतीय संस्कृतीची पायाभरणी केली. जय हिंद!जय महाराष्ट्र! भारतमाताकी जय! – विद्यावाचस्पति डॉ. अनिल मोकाशी (बालरोगतज्ञ)एमबीबीएस, एमडी, डीसीएच, एफआयएपी,पीएचडी (मुलांची वाढ व विकास)

विक्रम वेताळ गोष्टीतला आणि खरा राजा विक्रमादित्य Read Post »

Chakradhar Swami

जात ही मनात असते, रक्तात नसते

जात ही मनात असते, रक्तात नसते” – श्रीचक्रधर स्वामी भारतात सगळीकडे सुलतानी राजवटी होत्या. समाजात जातीपातीचं विष जाणूनबुजून पेरलेलं होतं. समाज पिचलेला होता आणि शासक मस्तवाल झाले होते. अशा काळया कालखंडात शिवाजी महाराजांच्या सुमारे ३५० वर्षे आधी श्रीचक्रधर स्वामी, गुजरातहून महाराष्ट्रात आले. त्यांनी विखुरलेला समाज एकसंघ करण्यासाठी महाराष्ट्रभर भ्रमंती केली.‘सर्व जीव समान’ असा संदेश देऊन प्रत्येक माणसात असलेल्या देवाची जाणीव करून दिली. एका गावात, एका सकाळी, मंदिराच्या पायऱ्यांवर श्रीचक्रधर स्वामी शांत बसले होते. ते बसले की सकाळही शांत होत असते. तेवढ्यात काही लहान मुले धावत आली. स्वामींच्या भोवताली गोल रिंगण करून बसली. कुणी टिवल्या बावल्या करत होतं. कुणी खोड्या करत होतं. कुणी गोळ्या चघळत होतं. त्यातला एक धिटूकला मुलगा पुढे आला. आणि म्हणाला. “स्वामी तुम्ही कोणत्या जातीचे?” स्वामी थोडं हसले. म्हणाले, “माझी जात? अहो मलाच माहित नाही! मी फक्त माणूस आहे. आणि तू? तू कोण आहेस?” मुलगा थोडा गोंधळला… पण मग त्याचा चेहरा उजळला. “मी पण माणूस! तुम्ही पण माणूस, मी पण माणूस! ” तो म्हणाला. स्वामी हसले, म्हणाले –“जात ही मनात असते, रक्तात नाही. मन स्वच्छ ठेवलं, तर देव आपल्या जवळ येतो!” मुलांना पटलं. मुलांच्या मनातली जात गेली. त्यांच्यातली माणुसकी जागी झाली. त्यांनी आपापल्या घरी जाऊन सांगितलं. “जात ही मनात असते, रक्तात नसते”. सगळ्या गावाला ते पटलं. शाळेच्या फळ्यावर दुसऱ्या दिवशी सुविचार लिहिला गेला. “जात ही मनात असते, रक्तात नसते. मुलांना जातीद्वेष शिकवू नका!” ही गोष्ट सगळीकडे पसरली,ती शाळा आदर्श शाळा झाली. ते गाव आदर्श गाव झालं. श्रीचक्रधर स्वामींवरील‘लीळाचरित्र’ हे पहिलं मराठी पुस्तक ठरलं. त्यांनी उच्च –नीच, जाती–पातीच्या भिंती पाडल्या. माणूसकीचं राज्य महाराष्ट्रात आणलं. जात मनात असते, रक्तात नाही. मुलांना जातीद्वेष शिकवू नाही. सर्व जीव एक समान,नसावा द्वेष, नसावा मान!प्रत्येकात देव पाहावा,महानुभाव पंथ घडवावा श्रीचक्रधरस्वामींचा सांगावा! जय श्रीचक्रधरस्वामी.जय शिवाजी.जय महाराष्ट्र.जय हिंद.भारत माता की जय – विद्यावाचस्पति डॉ. अनिल मोकाशी (बालरोगतज्ञ)एमबीबीएस, एमडी, डीसीएच, एफआयएपी,पीएचडी (मुलांची वाढ व विकास)

जात ही मनात असते, रक्तात नसते Read Post »

Samrat Ashoka

सम्राट अशोक : युद्धाकडून बुध्दाकडे नेणारा धर्मराज.

सम्राट अशोक : युद्धाकडून बुध्दाकडे नेणारा धर्मराज. २३०० वर्षांपूर्वी मौर्य घराण्यात एक राजा झाला. अशोक. लहानपणी अशोक खूप हट्टी, चिडखोर, आक्रस्ताळा, धटिंगट, दांडगट आणि रागीट होता. त्याचे खेळ म्हणजे युद्ध, तलवार. सम्राटाचा मुलगा असल्यामुळे मोठा झाल्यावर तो वंशपरंपरागत, आपोआप, सम्राट झाला. संपूर्ण भारतावर त्याचं राज्य होतं. पण एक राज्य उरलं होतं – कलिंग. मोठा समुद्रकिनारा, सुजलाम सुफलाम जमीन. कष्टाळू माणसे. कलिंग म्हणजे आजच्या भारताचा ओरिसा. अशोकाने ठरवलं – “कलिंग जिंकलंच पाहिजे! “त्यानी एक भीषण युद्ध छेडलं. कलिंग युद्ध. तलवारी, कापाकापी, धनुष्यबाण, रक्त, मृत्यू… सर्वत्र हाहाकार! लाखो लोक मारले गेले, घरं जळाली, कुटुंबं उध्वस्त झाली. वाताहात झाली. राजा अशोक विजय साजरा करायला वाजत गाजत युद्धभूमीवर गेला… पण तिथे फटाके नव्हते. तिथे होते रक्ताचे थारोळे. आणि रडणारे लोक. सगळीकडे मृतदेह, आरडाओरडा, रडारड, आक्रोश आणि दुःखाचे डोंगर. युद्ध जिंकलं… पण अशोकाला समाधान नव्हतं. मनात आनंद नव्हता. काहीतरी चुकतंय असं त्याला आतून वाटत होतं. तेवढ्यात एक लहानगी मुलगी, रक्ताने माखलेल्या आपल्या मरण पावलेल्या वडिलांच्याकलेवराला घट्ट मिठी मारून हमसून हमसून रडत होती. ते हृदय द्रावक दृश्य बघून अशोकाचं काळीज हेलावून गेलं. त्याला प्रश्न पडला. “मी हे काय केलं? का केलं? कशासाठी केलं? या युद्धातून मला काय मिळालं?” त्या क्षणी अशोकाच्या मनात मोठ्ठा बदल झाला. चूक काय आणि बरोबर काय, हे त्याला बरोबर उमगलं. त्याला बोध झाला. अशोकाला उपरती झाली. अचानक त्याच्या मनात गौतम बुद्धांच्या बोधिसत्वाची आणि त्यांना झालेल्या बोधाची आठवण आली. त्याला मार्ग सापडला. बौद्ध धर्माचा. गौतम बुद्धांचा शांतीमार्ग, करुणा आणि नीतीने भरलेला.” त्यानी ठरवलं. ही वेळ युद्धाची नाही… बुद्धाची आहे! त्याने तलवार बाजूला ठेवली. बौद्ध धर्म, माणुसकी, सहिष्णुता – हे त्याचं नवं शस्त्र झालं. आधी तो स्वतःला देशाचा आणि जनतेचा मालक समजत होता. आता त्यानी देशाचा आणि जनतेचा सेवक बनायचे ठरवले. त्याने सर्व लोकांना प्रेमाने वागवायला सुरुवात केली. गरीब, आजारी, वृद्ध – सगळ्यांची तो काळजी घेत असे. प्रजेसाठी रस्ते, विहिरी, रुग्णालयं, धर्मशाळा बांधली. शिलालेखांमधून त्याने सांगितलं दयेमधेच खरी ताकद असते. त्याने गौतम बुद्धांचा संदेश श्रीलंका, भूतान, नेपाळ, म्यानमार, अफगाणिस्तान, जगभर पोचवला. आणि तो झाला भारतीय इतिहासातला पहिला धर्मराज. धर्माचे रक्षण करणारा. आपले शिवाजी महाराज देखील म्हणायचे “देव धर्म आणि देशासाठी, प्राण वेचलं आम्ही”. सम्राट अशोक म्हणायचा “लोकांना तलवारीच्या जोरावर नाही प्रेमाच्या जोरावर जिंकायचे असते” उत्तर प्रदेश राज्यात, वाराणसी जिल्ह्यात, वाराणसी म्हणजे पूर्वीचे “काशी”. सारनाथ या गावात गौतम बुद्धांनी पहिलं धर्मचक्र प्रवर्तन (धम्मचक्र प्रवर्तन) केलं होतं. प्रवर्तन केलं. म्हणजे त्यांनी धर्मशिक्षण सुरू केलं. गौतम बुद्धांच्या उपदेशामुळे समाजात परिवर्तन घडलं. परिवर्तन घडलं म्हणजे लोकांच्या विचारात आणि जीवनशैलीत बदल झाला. सम्राट अशोकाने तिथे एक मोठा सिंहस्तंभ बांधला. आजही तो उभा आहे. त्या सिंहस्तंभावरचं अशोक चक्र आपल्या राष्ट्रध्वजावर, तिरंग्यावर आहे. ते आपल्या भारतीय संस्कृतीचं प्रतीक आहे. आपल्या परंपरेचं प्रतीक आहे. म्हणूनच “सम्राट अशोक: युद्धाकडून बुद्धाकडे नेणारा धर्मराज” ठरला. जय महाराष्ट्रजय हिंदभारत माता की जय – विद्यावाचस्पति डॉ. अनिल मोकाशी (बालरोगतज्ञ)एमबीबीएस, एमडी, डीसीएच, एफआयएपी,पीएचडी (मुलांची वाढ व विकास)

सम्राट अशोक : युद्धाकडून बुध्दाकडे नेणारा धर्मराज. Read Post »

Scroll to Top