Story

Indira Gandhi

इंदिरा गांधी – खंबीर नेतृत्व

अलाहाबादमध्ये एका मुलीचा जन्म झाला. तिचं नाव — इंदिरा. कवी रवींद्रनाथ टागोरांनी तिला प्रेमाने दिलेलं नाव — प्रियदर्शिनी. त्यांचे वडील पंडित जवाहरलाल नेहरू आणि आई कमला नेहरू. घरात सतत स्वातंत्र्यलढ्याच्या चर्चा, देशाच्या चिंता आणि राष्ट्रकारणाचं वातावरण असायचं. लहान इंदिरा शांतपणे या गोष्टी ऐकत राहायच्या. नकळत देशप्रेम त्यांच्या मनात रुजत गेलं. मोठ्या झाल्यावर त्यांचा विवाह फिरोज गांधी यांच्याशी झाला. त्यांना दोन मुलं — राजीव आणि संजय. कुटुंब सांभाळत असतानाच त्यांचा सार्वजनिक जीवनाशी संपर्क कायम राहिला. हीच प्रियदर्शिनी पुढे जाऊन भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान बनल्या. त्यांच्या नेतृत्वाच्या काळात देश अनेक अडचणींना सामोरा जात होता — सीमावाद, अंतर्गत तणाव, आर्थिक अडचणी. अशा परिस्थितीत त्यांनी निर्णयक्षमता आणि धैर्य दाखवलं. दबाव असूनही त्यांनी आपली भूमिका ठामपणे मांडली. त्यांच्या विचारांच्या केंद्रस्थानी एकच ध्येय होतं —भारत एकसंघ आणि सक्षम राहिला पाहिजे. त्यांच्या कार्यकाळात काही महत्त्वाचे निर्णय झाले.१४ मोठ्या बँकांचे राष्ट्रीयीकरण करण्यात आले, ज्यामुळे सामान्य नागरिक आणि ग्रामीण भागातील लोकांपर्यंत बँकिंग सुविधा पोहोचल्या. संस्थानिकांना दिल्या जाणाऱ्या मानधनाची (प्रिव्ही पर्स) व्यवस्था रद्द करण्यात आली. कृषी क्षेत्रात हरितक्रांतीला चालना मिळाली आणि अन्नधान्य उत्पादन वाढलं. देश हळूहळू अन्नधान्याच्या बाबतीत स्वावलंबनाकडे वाटचाल करू लागला. उद्योग, विज्ञान, अवकाश संशोधन आणि अणुऊर्जा या क्षेत्रांतही प्रगतीसाठी प्रयत्न झाले. त्यांच्या काळात पोखरण येथे भारताची पहिली अणुचाचणी पार पडली. त्यांच्या कणखर नेतृत्वामुळे लोक त्यांना “आयर्न लेडी” म्हणू लागले. ३१ ऑक्टोबर १९८४ रोजी त्यांच्या सुरक्षा रक्षकांनीच त्यांच्यावर गोळ्या झाडल्या आणि त्यात त्यांचा मृत्यू झाला. हा प्रसंग देशासाठी अत्यंत धक्कादायक होता. इंदिरा गांधी आज आपल्यात नसल्या, तरी त्यांच्या नेतृत्वाचा आणि कार्याचा प्रभाव भारतीय राजकारण आणि इतिहासात कायम स्मरणात राहतो. भारत माता की जय!जय हिंद! – विद्यावाचस्पति डॉ. अनिल मोकाशी (बालरोगतज्ञ)एमबीबीएस, एमडी, डीसीएच, एफआयएपी,पीएचडी (मुलांची वाढ व विकास)

इंदिरा गांधी – खंबीर नेतृत्व Read Post »

चाचा नेहरू

चाचा नेहरू.भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू चाचा नेहरू हसरे हसरे,लहान मुलांचे मित्र खरे.गुलाब पुष्प घेती हाती,मुलांवरती प्रेम करती. स्वातंत्र्यासाठी इंग्रजांशी लढले,देशासाठी तनमनाने झटले.जेलमध्येही स्वप्नं पहिली,उज्वल भारत उभारणी केली शाळा कॉलेजे उभी राहिली,आधुनिक विज्ञानवाट दाखवली.धरणे, कालवे, वीजनिर्मितीशेती, सिंचन देशाला पुढे नेती. आखल्या पंचवार्षिक योजना,नियोजनबद्ध नवभारत रचना.मुलं जेंव्हा विचार शिकतात,तेच देशाला घडवीत जातात. अखंड भारताची फाळणी झालीस्त्री, पुरुष मुले निर्वासित झालीनेहरू चाचांनी छावणी उभारलीपालकत्व स्वीकारत मिठी दिली. लोकशाहीची मंगल दीपमाला,भारतमाता मंदिर संसदेलाजनगणमन, वंदे मातरम नारानेहरूंनी घातला पाया सारा. लोकशाही हीच खरी वाटघटनेने दिली मताची साथकर्तव्य आम्ही निभावू सारेहक्क मिळवू आमचे सारे चाचा नेहरू की जयपंडित जवाहरलाल नेहरू की जयभारत माता की जयजय हिंद.

चाचा नेहरू Read Post »

Netaji Subhash Chandra Bose

नेताजी सुभाषचंद्र बोस : धगधगती ज्वाला, अमर विचार

नेताजी सुभाषचंद्र बोस हे भारताच्या स्वातंत्र्यलढ्यातील एक असामान्य, धगधगते आणि निर्भय व्यक्तिमत्त्व होते. ते केवळ एक नेते नव्हते, तर स्वातंत्र्यासाठी सर्वस्व अर्पण करणारी ज्वाला होते. त्यांच्या जीवनाचा प्रत्येक क्षण देशासाठी समर्पित होता. नेताजी म्हणायचे —“तुम मुझे खून दो, मैं तुम्हें आज़ादी दूँगा.”ही घोषणा केवळ शब्द नव्हते, तर लाखो भारतीयांच्या मनात पेटलेली क्रांतीची मशाल होती. आज आपण अभिमानाने देतो ती “जय हिंद” ही घोषणा भारताला नेताजी सुभाषचंद्र बोस यांनीच दिली. ही घोषणा देशप्रेम, एकता आणि स्वातंत्र्याची भावना जागवणारी ठरली. त्या काळात भारत इंग्रजांच्या गुलामगिरीत होता. अन्याय, शोषण आणि परकीय सत्तेविरुद्ध उठाव करण्यासाठी नेताजींनी केवळ भाषणांवर भर दिला नाही, तर प्रत्यक्ष कृतीचा मार्ग स्वीकारला. भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी त्यांनी एक सशक्त लष्करी संघटना उभी केली — आझाद हिंद सेना. ही सेना केवळ बंदुकींनी नव्हे, तर देशप्रेमाने सज्ज होती. आझाद हिंद सेनेचे सैनिक सुभाषचंद्र बोस यांना आदराने आणि प्रेमाने “नेताजी” म्हणू लागले. हा किताब जनतेने दिलेला होता — त्यांच्या त्यागामुळे, शौर्यामुळे आणि नेतृत्वामुळे. नेताजींनी स्वतःच्या सुख-सोयींपेक्षा देशाला नेहमीच मोठं मानलं. त्यांनी आयुष्यभर “मी” पेक्षा “भारत” निवडला. स्वातंत्र्यलढ्याच्या सुरुवातीला सुभाषचंद्र बोस महात्मा गांधींच्या नेतृत्वाखालील चळवळीत सक्रिय होते. ते काँग्रेसचे अध्यक्षही झाले. विशेष म्हणजे, महात्मा गांधींना “राष्ट्रपिता” असे संबोधणारे ते पहिले नेते होते. पण पुढे विचारांमध्ये मतभेद निर्माण झाले.सुभाषबाबूंना वाटत होतं की स्वातंत्र्य सशस्त्र क्रांतीशिवाय शक्य नाही,तर गांधीजी निशस्त्र, अहिंसक मार्गावर ठाम होते. हे मतभेद असूनही नेताजींच्या मनात गांधीजींबद्दल नेहमीच आदर होता. यानंतर नेताजींनी भारताबाहेर जाऊन, जपानच्या मदतीने आझाद हिंद सेनेची पुनर्रचना केली आणि ब्रिटिश सत्तेविरुद्ध थेट लढा उभारला. १९४३ साली नेताजींनी अंदमान–निकोबार बेटांवरील पोर्ट ब्लेअर येथेभारताचा तिरंगा झेंडा फडकवलाआणि त्या बेटांना “शहीद” आणि “स्वराज” अशी नावे दिली.हा भारताच्या स्वातंत्र्यलढ्यातील एक ऐतिहासिक क्षण होता. दुर्दैवाने, १९४५ साली एका विमान अपघातात नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे निधन झाल्याचे अधिकृत मत आहे. मात्र त्यांच्या मृत्यूबाबत आजही अनेक प्रश्न आणि चर्चा आहेत. नेताजी गेले,पण त्यांचा विचार, त्याग आणि देशप्रेम अमर आहे.ते आजही प्रत्येक भारतीयाला धैर्य, आत्मसन्मान आणि स्वातंत्र्याची किंमत शिकवतात. नेताजी सुभाषचंद्र बोस की जय!भारत माता की जय!जय हिंद! – विद्यावाचस्पति डॉ. अनिल मोकाशी (बालरोगतज्ञ)एमबीबीएस, एमडी, डीसीएच, एफआयएपी,पीएचडी (मुलांची वाढ व विकास)

नेताजी सुभाषचंद्र बोस : धगधगती ज्वाला, अमर विचार Read Post »

B.R. Ambedkar

डॉ. बाबासाहेब आंबेडकर : विचार, कार्य आणि योगदान

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना भारत रत्न या भारताच्या सर्वोच्च राष्ट्रीय पुरस्काराने गौरवण्यात आले आहे.हा पुरस्कार देशासाठी अत्यंत महत्त्वाचं आणि दूरगामी योगदान देणाऱ्या व्यक्तींनाच दिला जातो. म्हणजेच, देशाकडून मिळणारा सर्वात मोठा सन्मान. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भारताच्या जडणघडणीत मोलाची भूमिका बजावली. त्यांनी भारताचं संविधान लिहिलं, म्हणजेच भारत देश कसा चालेल, नागरिकांचे हक्क आणि कर्तव्ये काय असतील, याचं नियमपुस्तक तयार केलं.या संविधानामधून त्यांनी समानतेचा पाया मजबूत केला आणि कायद्याच्या दृष्टीने सर्व नागरिक समान आहेत, हे ठामपणे मांडलं. त्यांचं काम केवळ कायद्यापुरतं मर्यादित नव्हतं. समाजात जे दुर्बल, वंचित आणि उपेक्षित होते, त्यांना न्याय आणि सन्मानाचं स्थान मिळावं, यासाठी त्यांनी आयुष्यभर प्रयत्न केले. म्हणूनच संपूर्ण भारताने त्यांना एक महान राष्ट्रपुरुष म्हणून सन्मान दिला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मुलांना आणि तरुणांना नेहमी शिक्षणाचं महत्त्व सांगायचे.ते म्हणायचे —“शिका.”कारण शिक्षणामुळे माणूस आत्मनिर्भर बनतो आणि कुणीही त्याला कमी लेखू शकत नाही. त्यांचा ठाम विश्वास होता की —“सगळी माणसं समान आहेत.”कोणी जन्माने मोठा नसतो, कोणी लहान नसतो. ते हेही सांगायचे —“अन्याय सहन करू नका.”पण त्याचबरोबर स्वतःकडूनही कुणावर अन्याय होऊ देऊ नका. त्यांच्या मते —“एकत्र राहिलात तर ताकद वाढते.”संघटित समाज अन्यायाविरुद्ध उभा राहू शकतो. आणि शेवटी ते नेहमी अधोरेखित करायचे —“ज्ञान माणसाला माणूस बनवतं.”ज्ञानाशिवाय व्यक्ती अपुरी राहते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतातील अन्यायकारक जातीव्यवस्थेविरुद्ध संघर्ष केला. मागास आणि वंचित समाजघटकांना मिळवून देण्यासाठी त्यांनी कायदेशीर आणि सामाजिक पातळीवर प्रयत्न केले. मुलांनो,आज तुम्ही शाळेत मोकळेपणाने शिक्षण घेत असाल,पाणी प्यायला कुणाची परवानगी लागत नसेल,आणि सन्मानाने जगण्याचा अधिकार उपभोगत असाल —तर त्यामागे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा आणि कार्याचा मोठा वाटा आहे. म्हणूनच भारतीय इतिहासातडॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचं योगदानअत्यंत महत्त्वाचं आणि प्रेरणादायी मानलं जातं. – विद्यावाचस्पति डॉ. अनिल मोकाशी (बालरोगतज्ञ)एमबीबीएस, एमडी, डीसीएच, एफआयएपी,पीएचडी (मुलांची वाढ व विकास)

डॉ. बाबासाहेब आंबेडकर : विचार, कार्य आणि योगदान Read Post »

Sardar Vallabhbhai Patel

भारत जोडणारे सरदार वल्लभभाई पटेल

भारतीय इतिहासाच्या गोष्टी – भारत जोडणारे सरदार वल्लभभाई पटेल. इंग्रजांच्या राज्यात भारतात ५६० पेक्षा जास्त छोटी-छोटी संस्थाने होती. प्रत्येकाचा वेगळा राजा, वेगळा नियम. कुणाचा पायपोस कुणात नव्हता. एकी नव्हती, सगळे एकमेकांचे वैरी होते.इंग्रज राज्यकर्त्यांनी याचाच फायदा घेतला. भारत स्वतंत्र झाल्यावर, एक मजबूत देश घडवायचा होता. तेव्हा वल्लभभाई पटेल कणखरपणे उभे राहिले. “सगळे एकत्र झाले, तरच भारत मजबूत होईल,” हे त्यांनी ओळखलं. कधी प्रेमाने, कधी समजावून, त्यांनी सगळी संस्थाने भारतामध्ये विलीन केली.म्हणूनच आज आपण म्हणतो— एक भारत, एक देश! लोक त्यांना “लोह पुरुष” म्हणायचे,कारण त्यांचं मन खूप मजबूत होतं. त्यांचा भव्य लोखंडाचा पुतळा—Statue of Unity, वडोदरा (पूर्वीचं बडोदा) इथे उभा आहे. बारडोलीच्या सत्याग्रहात शेतकऱ्यांचे ठाम नेतृत्व केल्यामुळे वल्लभभाई पटेलांना लोकांनी प्रेमाने “सरदार” ही उपाधी दिली. हा ठामपणा त्यांच्यात लहानपणापासूनच होता. शाळेत असताना, काही दांडगट मुलं किडमिडीत मुलांना छळत होते. ते बिचारे घाबरून सहन करत होते. तर काही जण अन्याय दिसून सुद्धा दुर्लक्ष करत होते. वल्लभभाई पुढे आले आणि ठामपणे म्हणाले, “हे चुकीचं आहे. हे चालणार नाही.” त्या एका वाक्याने सगळे वठणीवर आले —छळणारे, छळ सहन करणारे आणि दुर्लक्ष करणारे सगळेच चुकीचे असतात. हा कणखरपणा पुढे भारताला एकत्र ठेवणाऱ्यासरदार वल्लभभाई पटेलांमध्ये त्यांच्या लहानपणीच दिसला. ते म्हणायचे “एकीमध्येच देशाची शक्ती असते.” सरदार वल्लभभाई पटेल की जयभारत माता की जयजय हिंद – विद्यावाचस्पति डॉ. अनिल मोकाशी (बालरोगतज्ञ)एमबीबीएस, एमडी, डीसीएच, एफआयएपी,पीएचडी (मुलांची वाढ व विकास)

भारत जोडणारे सरदार वल्लभभाई पटेल Read Post »

pacifist, mahatma gandhi, mohandas karamchand gandhi, spiritual leader, nonviolence, resistance, equality, racial segregation, mahatma gandhi, mahatma gandhi, mahatma gandhi, mahatma gandhi, mahatma gandhi

मोहनदास ते महात्मा गांधी

मोहनदास ते महात्मा गांधी – भारतीय इतिहासाच्या गोष्टी २३ मोहनदास करमचंद गांधीलहानपणी अगदी साधा मुलगा होते.ते जरासे अबोलच होते.पण काहीही चुकीचं घडतांना दिसलंकी ते अस्वस्थ व्हायचे.त्यांना खोटं आवडत नसे.सत्य म्हणजे, खरं ते बोलणं.सत्य म्हणजे, बरोबर ते करणं.त्यांना एक प्रश्न पडायचा.‘सत्याच्या बाजूने’ कसं उभं राहायचं ?त्यासाठी त्यांनी वकिलीचं,कायद्याचं शिक्षण घेतलं. दक्षिण आफ्रिकेत त्यांना रेल्वेच्या डब्यातून खाली उतरवण्यात आलं.ते गोरे नव्हते, काळे होते.हा अन्याय त्यांना मान्य नव्हता.त्यांनी विरोध केला.त्या दिवशी त्यांना स्वतःची ओळख पटली.हिंसाही नाही. आणि सहकार्यही नाही. भारतामध्ये परत आल्यावरगांधीजींनी भारतयात्रा केली.लोक कसे जगतात हे त्यांनी पाहिलं.पदयात्रेमधे ते एकटे चालायला लागले.“एकला चलो रे” हा त्यांचा मंत्र होता.हळूहळू त्यांच्यामागे लोक जोडले गेले.हजारो, लाखो लोक त्यांचे अनुयायी झाले.त्यांनी चरख्यावर सूत कातले.स्वदेशीचा मंत्र दिला.दुष्ट इंग्रजाशी असहकार आंदोलन पुकारले. इंग्रजांनी मिठावर कर लादला होता.गांधीजींनी दांडीयात्रा काढली.मीठाचा सत्याग्रह केला.गांधीजींनी एक चिमूटभर मीठ काय उचललं, संपूर्ण ब्रिटिश साम्राज्य हादरलं.देश जागा झाला.गांधीजींनी निशस्त्र क्रांती केली. लोक त्यांना महात्मा गांधी म्हणू लागले.महात्मा म्हणजे महान आत्मा.गांधीजी धार्मिक होते.त्यांचा देवावर विश्वास होता.रामावर विश्वास होता.त्यांचे शेवटचे शब्द होते —“हे राम.” त्यांची शिकवण होती,“जग चांगलं करायचं असेलतर आधी स्वतः चांगले व्हा.” महात्मा गांधी की जयभारतमाता की जय.जय हिंद – विद्यावाचस्पति डॉ. अनिल मोकाशी (बालरोगतज्ञ)एमबीबीएस, एमडी, डीसीएच, एफआयएपी,पीएचडी (मुलांची वाढ व विकास)

मोहनदास ते महात्मा गांधी Read Post »

स्वातंत्र्यवीर सावरकर – वीर सावरकर

स्वातंत्र्यवीर सावरकर. वीर सावरकर भीतीवर मात करून जो लढतो, तोच खरा वीर.सावरकरांनी इंग्रज राजवटीला थेट आव्हान दिलं.छळ सहन केला, हाल सोसले,पण कधीच झुकले नाहीत.अंदमानच्या सेल्युलर जेलमध्येत्यांना काळ्या पाण्याची जन्मठेप झाली.तरीही त्यांचा विचार बदलला नाही.म्हणूनच त्यांना “वीर सावरकर” म्हणतात. त्यांचं संपूर्ण आयुष्यस्वातंत्र्यासाठी समर्पित होतं.म्हणून ते स्वातंत्र्यवीर होते. सावरकरांच्या कविता देशप्रेमाच्या होत्या.अंदमानच्या तुरुंगात,भारतापासून दूर असताना,त्यांचं मन खूप व्याकुळ झालं.आईपासून दूर गेल्यावर बाळ रडतं,तसं त्यांचं मन तळमळत होतं.म्हणून ते समुद्राला विनंती करतात —“मला माझ्या मातृभूमीकडे परत घेऊन चल.” हाच भाव आहे“ने मजसी ने परत मातृभूमिला” या कवितेत. “जयोस्तुते श्रीमहन्मंगले”ही भारतमातेची स्तुती आहे.गुलाम देशाला धैर्य देण्यासाठीआणि स्वाभिमान जागा करण्यासाठीही कविता रचली गेली. “हे हिंदु नृसिंहा प्रभो शिवाजी राजा”या कवितेत सावरकरशिवाजी महाराजांची आठवण करून देतात.शिवाजी महाराजांनीहिंदवी स्वराज्य उभं केलं.हिंदवी स्वराज्य म्हणजे —या मातीचं,आपल्या लोकांचं,आणि परकीय सत्तेपासून स्वतंत्र असलेलं राज्य.या कवितेत सावरकरफक्त शिवाजी महाराजांना हाक देत नाहीत.ते आपल्या आतल्या धैर्याला जागं करतात.कारण प्रत्येक भारतीयाच्या मनातएक छोटा शिवाजी आहे.आपली माती, आपले लोक, आपलं धैर्य —हेच हिंदवी स्वराज्य! सावरकर हेप्रखर हिंदुत्ववादीआणि तेजस्वी राष्ट्रभक्त होते.सूर्यासारखे —तेजस्वी, तळपते, ऊर्जावान, मार्ग दाखवणारे. स्वातंत्र्यवीर सावरकर — की जय!भारत माता — की जय!जय हिंद! – विद्यावाचस्पति डॉ. अनिल मोकाशी (बालरोगतज्ञ)एमबीबीएस, एमडी, डीसीएच, एफआयएपी,पीएचडी (मुलांची वाढ व विकास)

स्वातंत्र्यवीर सावरकर – वीर सावरकर Read Post »

बाळ गंगाधर टिळक ते लोकमान्य टिळक

 बाळ गंगाधर टिळक ते लोकमान्य टिळक – भारतीय इतिहासाच्या गोष्टी २१ बाळ गंगाधर टिळक पुण्याचे होते. पुणे हे शिक्षणाचे माहेरघर म्हणून ओळखले जाते. लहानपणी टिळक खूप हुशार होते. प्रश्न विचारायचे. चौकस बुद्धी. हा त्यांचा गुण होता.शाळेत त्यांना गणित आणि इतिहास विषय आवडायचा.टिळकांनी कायद्याचे शिक्षण घेतले. पण पैसे कमावण्यासाठी वकिली व्यवसाय केला नाही.कायद्याचं ज्ञान त्यांनी लोकांना न्याय मिळावा म्हणून वापरलं. त्यांना प्रश्न पडायचा, आपला देश गुलाम का आहे?त्या काळात इंग्रज राज्य करत होते.सामान्य माणूस दुःखी होता.शेतकरी, कामगार यांच्यासाठी कोणी बोलत नव्हते. टिळकांच्या लक्षात आले. हीच वेळ आहे आवाज उठवण्याची.“मी गप्प बसणार नाही,” असं त्यांनी ठरवलं. त्यांनी केसरी वर्तमानपत्र सुरू केलं. निर्भयपणे खरं लिहिलं.त्यांचा आवाज भारतभर पोचला. लोक जागे होऊ लागले.लोकमान्य टिळक काँग्रेसचे अध्यक्ष झाले.स्वातंत्र्यलढ्याला खरी सुरुवात झाली.टिळकांनी त्या विचारांना धाडस आणि लढ्याची दिशा दिली.टिळकांनंतर गांधीजी, नेहरू, सुभाषचंद्र बोस यांनी लढा पुढे नेला. पण पहिला बुलंद आवाज लोकमान्य टिळकांचाच होता.गणपती उत्सव, शिवजयंतीमुळे लोक एकत्र आले. लोकमान्य टिळकांचे घोषवाक्य होते. “स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच!” – विद्यावाचस्पति डॉ. अनिल मोकाशी (बालरोगतज्ञ)एमबीबीएस, एमडी, डीसीएच, एफआयएपी,पीएचडी (मुलांची वाढ व विकास)

बाळ गंगाधर टिळक ते लोकमान्य टिळक Read Post »

swami vivekananda

नरेंद्रनाथ दत्त कसा झाला स्वामी विवेकानंद?

“नरेंद्रनाथ दत्त कसा झाला स्वामी विवेकानंद?” – भारतीय इतिहासाच्या गोष्टी १७ स्वामी विवेकानंद भारतीय इतिहासाचा एक चमकता तारा होते.‘उठा, जागे व्हा’ — ‘उत्तिष्ठ, जाग्रत’ अशी हाक देऊन त्यांनी देशाला धैर्य दिलं.त्यांनी भारताचं नाव जगभर उजळवलं.त्यांनी शिकवलं—देव आकाशात नाही… देव आपल्या मनातल्या उजेडात आहे.आज मी त्यांची गोष्ट सांगतोय… आणि माझ्या मनात एक ज्योत पेटली.ही बघा—मी मेणबत्ती पेटवली.ही आहे आजच्या गोष्टीची ज्योत.आता या ज्योतितून तुमच्या हातातल्या उदबत्त्या पेटवू या.तुम्ही माझ्यामागून गोष्ट म्हणाल, आणि ही ज्योत तुमच्या मनातही उजळेल.याला म्हणतात—‘ज्योत से ज्योत जगाते चलो’.मनातली ज्योत म्हणजे प्रेरणा. दैवी प्रकाश. देवाचा अंश. कोलकात्यातील सिमुलिया स्ट्रीट…इथे राहत होता एक चुणचुणीत, हसतमुख, खोडकर मुलगा—नरेंद्रनाथ दत्त.खेळात, अभ्यासात, गाण्यात—तो सगळीकडे हुशार.पण त्याची एक खास सवय—सतत प्रश्न!“देव कुठे आहे?”“माणसांनी चांगलं का वागावं?”आई भुवनेश्वरी म्हणायची,“बाळा, तुझ्या मनात प्रकाश असेल तर जगातील अंधार निघून जातो.” एके दिवशी नरेंद्रने आपल्या गुरूंना—रामकृष्ण परमहंसांना विचारलं,“तुम्ही देव पाहिलात का?”रामकृष्ण म्हणाले,“हो, पाहिलाय. प्रत्येक माणसात देव आहे.तू तुझी शक्ती इतरांच्या भल्यासाठी वापर, तुला देव दिसेल.” एकदा एका मुलाला कुत्र्याचं पिल्लू सापडलं.नरेंद्रने त्याला परत आईकडे पोचवलं.विवेकानंद म्हणाले,“एखादा जीव वाचवतो तेव्हा—आपल्या हृदयात देव जागा होतो.” शिकागोमध्ये जागतिक धर्मसंसद भरली होती.जगभरातील विद्वान आपापल्या धर्माची स्तुती करत होते.विवेकानंद उभे राहिले आणि म्हणाले—“माझ्या अमेरिकेतील बंधू आणि भगिनींनो!”क्षणभर शांतता… आणि मग गडगडाट!जगाला पहिल्यांदा कळलं—भारतात दुसऱ्या धर्मातील लोकही बंधू-भगिनी असतात. स्वामी विवेकानंदांनी शिकवलं—देव आपल्या मनातल्या उजेडात आहे. – विद्यावाचस्पति डॉ. अनिल मोकाशी (बालरोगतज्ञ)एमबीबीएस, एमडी, डीसीएच, एफआयएपी,पीएचडी (मुलांची वाढ व विकास)

नरेंद्रनाथ दत्त कसा झाला स्वामी विवेकानंद? Read Post »

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर

भारतीय इतिहासाच्या गोष्टी १६ – पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर अहिल्यानगर, म्हणजे जुन्या अहमदनगर जिल्ह्यातील, चोंडी या गावात, जन्माला आली एक मुलगी. अहिल्या तिचं नाव. हुशार. चुणचुणित. एकदा आपल्या, दहा-बारा मैत्रिणींसोबत, ती नदीकाठी, खेळत होती. अचानक लांबून, खूप धुरळा, उडलेला दिसला. धुळीचे लोट, आकाशात उठले. सगळ्या मुली, घाबरल्या. सैन्य आले, सैन्य आले, मोगलांचे सैन्य आले. असं ओरडत, घाबऱ्या घुबऱ्या, सगळ्या जणी, आपापल्या घरी, सुरक्षित स्थळी, पळून गेल्या. पण तिथे नदीकाठी, एक शिवलिंग होते. त्या जागी, पूर्वी एक मोठे, शिवमंदिर होते. मोगलांनी, सगळी मंदिरे, सगळ्या धर्मशाळा, सगळे रस्ते उद्ध्वस्त केले होते. छोट्या अहिल्याने ठरवले, हे शिवलिंग, कसेही करून, वाचवायचेच. ती एकटीच, त्या शिवलिंगाचे, रक्षण करण्यासाठी, थांबली. खरं तर ते सैन्य, शिवाजी महाराजांचे, इंदोरचे सेनापती, मल्हारराव होळकर, यांचे होते. मल्हाररावांना, या मुलीला, एकटीला बघून आश्चर्यच वाटले. कोण आहे बरं, ही मुलगी. एकटीच, का थांबली आहे. त्यांनी जवळ जाऊन, चौकशी केली. अहिल्याने, बाणेदारपणे सांगितले, मी शिवलिंगाचे, रक्षण करत आहे. मल्हारराव होळकरांनी, अहिल्येच्या वडिलांना भेटून, त्यांच्याकडे, आपला मुलगा खंडेराव, याच्याशी लग्नासाठी, मागणी घातली. अहिल्येच्या मनात, तिची आई सीताबाई, हिचे चांगले विचार, रुजलेले होते. मल्हाररावांना, अशीच धैर्यवान, सून हवी होती. आणि चोंडीची अहिल्या, राणी अहिल्यादेवी होळकर झाली. मल्हाररावांनी, व खंडेरावांनी, अहिल्येला, राज्यकारभाराचे धडे दिले. काही दुर्दैवी घटनांमुळे, अचानकच, संपूर्ण राज्याची जबाबदारी, त्यांच्यावर आली. त्यांनी ती, अत्यंत हुशारीनी, आणि कुशलतेनी, सांभाळली. अहिल्यादेवी यांनी, काशी विश्वनाथ, सोमनाथ, महाकाल, यांसारखी अनेक देवस्थाने, पुन्हा बांधली. भक्तीच्या मार्गाने, भारत जोडला. प्रवाशांसाठी रस्ते, घाट, विहिरी, धर्मशाळा बांधल्या. यात्रेला सुरक्षित, आणि सुखकर बनवले. पर्यटन फुलवले. त्यांनी स्त्रिया, विधवा, यांना मदत,, आणि आदर दिला. गरीब, शेतकरी,—सर्वांसाठी समान, न्याय दिला. समतेचा संदेश दिला. “राजा मोठा नाही… न्याय मोठा!” हे सांगितले. म्हणून तर अजितदादांनी, बारामतीच्या मेडिकल कॉलेजचे नाव,“पुण्यश्लोक, अहिल्यादेवी, होळकर, मेडिकल कॉलेज” ठेवले आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर की, जयभारत माता की, जयजय हिंद. – विद्यावाचस्पति डॉ. अनिल मोकाशी (बालरोगतज्ञ)एमबीबीएस, एमडी, डीसीएच, एफआयएपी,पीएचडी (मुलांची वाढ व विकास)

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर Read Post »

Lakshmibai - The Rani of Jhansi

“मेरी झाँसी नहीं दूँगी!”

भारतीय इतिहासाच्या गोष्टी. – “मेरी झाँसी नहीं दूँगी!” मी मणिकर्णिका मोरोपंत तांबे.लहानपणीच तलवार, घोडेस्वारी, धनुष्य—सगळं शिकले.माझं लग्न १३ व्या वर्षी, झाशीचे राजा गंगाधरराव नवलकर यांच्याशी झालं.राणी झाल्यावरचं नाव: लक्ष्मीबाई. मी मुलगा दत्तक घेतला — दामोदरराव.एक दिवस इंग्रज म्हणाले,“तुमचा वारस नाही, झाशी आम्हाला द्या.”मी ठामपणे उत्तर दिलं:“मेरी झाँसी नहीं दूँगी!” झाशी माझं घर… माझा अभिमान.मी सैन्य तयार केलं — लहान मुलांना, स्त्रियांनाही लढायला शिकवलं.घोड्यावर बसून दोन तलवारांनी मी रणांगण गाजवलं. 1857 च्या भारताच्या पहिल्या स्वातंत्र्य युद्धात मी शेवटपर्यंत झुंज दिली — हा युद्ध ब्रिटिशांच्या अन्यायाविरुद्धचा एक भव्य उठाव होता. झाशीच्या या संघर्षाचा इतिहास आजही जिवंत आहे — झांसीमध्ये राणी महाल आहे, जिथे मी राहत होतो, आणि तो महाल आता संग्रहालय आहे. झाशीची राणी म्हणजे धैर्य, आत्मसन्मान आणि स्वातंत्र्याची मूर्ती. खूब लड़ी मर्दानी,वो तो झाँसी वाली रानी थी”— सुभद्रा कुमारी चौहानसिंहासन हिल उठे,राजवंशों ने भृकुटी तानी थी,बूढ़े भारत में आईफिर से नयी जवानी थी।गुमी हुई आज़ादी कीकीमत सबने पहचानी थी,दूर फिरंगी को करने कीसबने मन में ठानी थी।चमक उठी सन सत्तावन में,चमक उठी सन सत्तावन में,यह तलवार पुरानी थी,खूब लड़ी मर्दानी,वो तो झांसी वाली रानी थी।खूब लड़ी मर्दानी,वो तो झांसी वाली रानी थी।खूब लड़ी मर्दानी,वो तो झांसी वाली रानी थी! झांसी की रानी की जयभारतमाता की जयजय हिंद – विद्यावाचस्पति डॉ. अनिल मोकाशी (बालरोगतज्ञ)एमबीबीएस, एमडी, डीसीएच, एफआयएपी,पीएचडी (मुलांची वाढ व विकास)

“मेरी झाँसी नहीं दूँगी!” Read Post »

मी शिवाजीराजे भोसले बोलतोय…

मुलांनो, मी शिवाजीराजे भोसले बोलतोय… – मी सांगतोय स्वराज्य निर्मितीची गोष्ट. मुलांनो, मी शिवाजीराजे भोसले बोलतोय.माझं बालपण झालं शिवनेरी किल्ल्यावर.माझी आई जिजाऊ, रोज मला गोष्टी सांगायची — रामाची, कृष्णाची, भीमाची!त्या गोष्टींनी माझ्या मनात एक विचार पक्का झाला —“आपलं राज्य आपणच उभं करायचं!”तेव्हा जुलमी आक्रमक मोगल बादशहा, सुभेदार लोकांवर अन्याय करत होते.गावं जळत होती, माणसं घाबरलेली होती.मी ठरवलं — हा अन्याय थांबवायचाच!लहानपणीच मी घोड्यावर बसायला शिकलो, तलवार फिरवायला शिकलो.डोंगरावर चढायचो, मावळ्यांबरोबर खेळायचो — पण मनात एकच जिद्द होती.थोडा मोठा झालो, तेव्हा मी तोरणा किल्ला जिंकला.लोक म्हणाले, “हा बाळराजा मोठा राजा होणार आहे!”मी राजगडावर राजधानी बसवली.माझे मावळे — तानाजी, बाजी, नेताजी, येसाजी — हे माझे हात होते.आम्ही किल्ल्यांवर स्वराज्याचा झेंडा फडकवला.प्रतापगडावर अफझलखान आला.मी म्हटलं — “ आई भवानी, मी धर्मासाठी तलवार उचलतोय.”त्या दिवशी आमचा विजय झाला.तेव्हा सह्याद्रीच्या डोंगर दर्यांमध्ये एकच वाक्य घुमलं —“हर हर महादेव! जय भवानी! जय शिवाजी!”त्या आवाजात भीती नाही, स्वाभिमान होता!लोकांच्या मनात उमटलं — “हा आपला राजा आहे!”मुलांनो, आज मी सिंहासनावर नाही,पण मी स्वराज्याचं स्वप्न बघितलं, पूर्ण केलं आणि भारताला स्वराज्य शिकवलं. माझं स्वराज्य आजही तुमच्या मनात जगतंय.जेव्हा तुम्ही प्रामाणिकपणे, धैर्याने, इतरांसाठी काम करता,तेव्हा माझं नाव पुन्हा घुमतं — “जय भवानी! जय शिवाजी!” – विद्यावाचस्पति डॉ. अनिल मोकाशी (बालरोगतज्ञ)एमबीबीएस, एमडी, डीसीएच, एफआयएपी,पीएचडी (मुलांची वाढ व विकास)

मी शिवाजीराजे भोसले बोलतोय… Read Post »

Scroll to Top