Dr. Anil Mokashi

Pediatrist

Pediatric one liners

Pediatricians, doctors and paramedical health providers need simple short messages. This is an attempt to reach child care service providers. Transfer of child care technology to masses is our aim and objective. That is our mission. You type any topic in search and you will get up to date carry home messages on that topic. – Dr. Anil Mokashi (Pediatrician)MBBS, MD, DCH, FIAP, PhD(Child Growth and Development)

Pediatric one liners Read Post »

Silhouette of a mother lifting her child at a sunset beach, capturing warmth and love.

मोठी होतात मुलं, तशी आई मोठी व्हावी

“मोठी होतात मुलं, तशी आई मोठी व्हावी”.आईनी मोठं व्हावं ? आईनी कसं मोठं व्हावं ? आज मातृदिना निमित्त सांगताहेत. डॉ. अनिल मोकाशी. “एकटी एकटी घाबरलीस ना” गाण्यात चिंटू म्हणतो, ‘मोठी होतात मुलं, आई मोठी होत नाही’. ते गाण्यात गोड वाटतं. पण प्रत्यक्षात मुलांबरोबर आईलाही मोठं व्हावंच लागतं. “मोठी होतात मुलं, तशी आई मोठी व्हावी”. हे त्रिकालाबाधित सत्य आहे. लहान बाळाची, शाळेतल्या मुलाची, वयात येणा-या मुलांची, तरुण मुलांची, मोठा माणूस झाल्यानंतर, आईला वयाप्रमाणे वेगळे वागावेच लागते. ही बदलाची प्रक्रिया सुरळीत ठेवणे, यात तर खरं आईचं कौशल्य आहे. बाळाच्या पहिल्या श्वासापासून आईच्या  शेवटच्या श्वासापर्यंत हे ‘आईपण’ अव्याहत अबाधित रहातं. आईचं दूध, बाल संगोपन, याही पलीकडे, त्याला घडवणं हे आईच्या जन्मभराच्या साथीनेच होतं. जिजाउंनी छत्रपती शिवाजी घडवले, हीराबेन यांनी साधेपणात, शिस्तीत नरेंद्र मोदी घडवले. काळ कुठलाही असो, ‘संस्कार’ देणे, जीवनाला उद्दिष्ट देणे, क्षमता देणे, हे आईचेच कर्तव्य असते. आई होणं नैसर्गिक असलं तरी ‘बालपणाचे विज्ञान’  आणी ‘आईपणाची कला’ शिकायलाच हवी. मूल वाढतं, परिस्थितीही सतत बदलते. आजच्या आईला ‘श्यामची आई’ होऊन कसे चालेल? १. नवजात बाळ १०० % पूर्ण आईवर अवलंबून असतं. आई किंवा आईसारखी दुसरी कुणीतरी, २४ तास, ड्युटीवर हवीच. तिच्या नुसत्या असण्याने, दिसण्याने, नजरेने, स्पर्शाने, आवाजाने, वासाने, हाताळण्याने बाळाला जग सापडतं. आईची सोबत बाळाला भावना शिकवते. आईच्या हातात आपण सुरक्षित आहोत हे त्याला समजते. हे काम तिला शिकूनच घ्यावे लागते. २. दुडू दुडू चालण्याच्या वयात बाळाचं कुतूहल जागं होतं. घरातले शिक्षण चालू होते. मुलं चालतात, बोलतात, ऐकतात, पहातात, अनुकरण करतात. प्रश्न विचारतात. आई मुलाचा आरसा बनते. त्याला चालू द्यावे, पळू द्यावे, चढू द्यावे, बोलू द्यावे. स्वतःच्या हाताने खाऊ द्यावे. भरवू नये. लहान बाळ मोठं करण्याची हौस भागली नाही म्हणून त्याला मोठं होऊच द्यायचं नाही. असं करून कसं चालेल. त्याचं त्याला समजू दे, ‘आता आपण मोठं झालो आहे’. आणि आता आपल्याला मोठ्या मुलांसारखं वागायला हवे. लहान बाळासारखं वागून चालणार नाही. दुस-या वाढदिवसाला बाळ आईपासून सुटं व्हायला हवं. लळालोंबा नको. हे काम तिला शिकून घ्यावेच लागते. ३. शालेय वयात घराबाहेरील जगात प्रवेश होतो. घराबाहेरचे शिक्षण चालू होते. शाळा, मित्र, शिक्षक, पुस्तकं, बाहेरचं, त्याचं स्वतःचं, जग निर्माण होतं. आणि तो त्याच्या स्वतःच्या जगात शिकू लागतो. शिवाजी रायगडावर, द-याखो-यात घडतो. पु. लं. देशपांडे बटाटयाच्या चाळीत घडतो. आर.के. नारायणन मालगुडीतच घडतो. पण या सगळ्या घडण्याला आईची साथ आवश्यक असते. साथ. आधार. मार्गदर्शन. हे चांगल्या सवयी लावण्याचं वय आहे. सवयी काय, लावाल तशा लागतात. चांगल्या लावल्या, चांगल्या लागतात. वाईट लावल्या वाईट लागतात. वेळेचं भान शिकवावं लागतं. वेळापत्रक फक्त शाळेचंच नसतं. घरचंही वेळापत्रक असतं. आणि आईने ते पाळायची सवय लावावी लागते. ‘मेरी मर्जी’ नही चलेगी. हे कधीतरी स्पष्टपणे सांगावं लागतं. मुलांची वाढ, मानसिक, भावनिक, बौद्धिक, शैक्षणिक विकास, आहार, लसीकरण, आजारात काळजी या गोष्टी तिला शिकून घ्याव्याच लागतात. ४. किशोरवयात मुलाची स्वतःची ओळख निर्माण व्हायला लागते. आयुष्याचा हा टप्पा सगळ्यात खडतर, सगळ्यात महत्त्वाचा असतो. शरीर, भावना, विचार, मैत्री — सारं काही ढवळून निघतं. या काळात आईनी हुकूमशहा बनून कसे चालेल? तिला संवाद साधण्याची कला आत्मसात करावी लागेल. मुलाच्या कलाकलाने घेऊन, त्याला बोलते करणे महत्वाचे असते. तुम्ही त्याला बोलायला शिकवलत, आता त्याचं ऐकायला शिका. सूर तक्रारीचा, हटकायचा नको, समजावण्याचा हवा. मोठं होणं म्हणजे जबाबदार होणं. स्वतःची स्वतः, कुटुंबाची, शेजार पाजारची, समाजाची, टप्प्या टप्प्याने वाढती जबाबदारी शिकवायला हवी. त्याच्यावर जबाबदारी टाकायला हवी. त्याच्यावर विश्वास आहे हे दाखवायला हवे. थोडं मोकळंही सोडायला हवं. पतंगाच्या मांजाला किती ढील द्यायची आणी किती ओढ द्यायची याचं तारतम्य शिकायला हवं. कला आहे ती. ५. तरुणपणाचे पंख फुटल्यावर. तो आपली वाट चालणारच ना? लक्ष ठेवावे. गरज असेल तेंव्हा साथ द्यावी. आधार द्यावा. धीर द्यावा. व्यसने, वाईट संगत अशा धोक्यांची जाणीव करून द्यावी. दिवस पाळीचे मित्र मैत्रिणी त्याचे त्यानी निवडावे. मात्र रात्रपाळीचे मित्र मैत्रिणी चालणार नाहीत. या कौटुंबिक मर्यादा, लक्ष॒मणरेषा आखून द्यायला हव्या. त्या निक्षून पाळायला लावाव्या. आपले मत मांडावे. पण हस्तक्षेप टाळावा. तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार. मी आहे तुझ्या पाठीशी. असा पवित्रा असावा. हे सगळे या वयाच्या आईला शिकून घ्यावे लागेल. ६. मध्यमवय आणि वृद्धावस्थेतील  मुलाच्या आईला जरा लवचिक भूमिका घ्यावी लागणार. मुलाला मुलं असतील. तरी त्याच्या आईचाही रोल असतोच ना?  मूक निरीक्षक व्हावे. संयम बाळगावा. अनुभव अवश्य सांगावा. पण अंमलाचा आग्रह नसावा. हेही शिकून घ्यायला हवे. असा असतो आईचा रोल, काळाच्या ओघात बदलणारा. फुलपाखराच्या जशा अंडी, अळी, कोष आणी फुलपाखरू अशा अवस्था असतात, तशा मानवी जीवनाच्या देखील वयानुसार अवस्था असतात. कोणत्याही अवस्थेत प्रेम असतं तसंच राहतं, पण त्याची अभिव्यक्ती मात्र बदलायला हवी. आई कोणतीच परिपूर्ण नसते. पण नेहमीच साथीला असते. प्रत्येक युगात, प्रत्येक घरात, आणि प्रत्येक मुलाच्या मनात, आईसारखं दुसरं कोणीच नसतं. म्हणून तर मी म्हणतो, मोठी होतात मुलं, तशी आई मोठी व्हावी. बेस्ट लक. मदर्स डे च्या शुभेच्छा. – विद्यावाचस्पति डॉ. अनिल मोकाशी (बालरोगतज्ञ)एमबीबीएस, एमडी, डीसीएच, एफआयएपी,पीएचडी (मुलांची वाढ व विकास)

मोठी होतात मुलं, तशी आई मोठी व्हावी Read Post »

School report card

School Progress Card – शाळेच्या प्रगती पुस्तकाचा अर्थ

It’s school result season. Annual progress cards are coming home. Both parents and teachers must learn to interpret them correctly. This is not just about marks — it’s about understanding the child. Scientific evaluation helps families take timely, appropriate action. शाळांचे निकाल लागण्याचे दिवस आहेत. प्रगती पुस्तके घरी येऊ लागली आहेत. पालक आणि शिक्षकांनी या प्रगती पुस्तकांचा योग्य अर्थ समजावून घ्यायला हवा. हे फक्त मिळालेल्या गुणांचेच नाही, तर मुलाच्या सर्वांगीण विकासाचे परीक्षण आहे. असे वैज्ञानिक मूल्यांकन केल्याने योग्य वेळी योग्य उपाययोजना करता येतात. Always above 80% in all subjects. Indicates Cognitive excellence. Indicates strong memory, attention span, and a well-rounded cognitive profile. He will learn anyway. He will learn well. He will learn independently. सर्वच विषयांमध्ये सातत्याने उच्च गुण मिळणे. नेहमीच सर्व विषयात ८० % वर.बौद्धिक क्षमता दाखवते. स्मरणशक्ती, लक्ष केंद्रित करण्याची क्षमता आणि समतोल बौद्धिक विकास होतो आहे असे दाखवते. कसाही शिकेल. छान शिकेल. स्वतःहून शिकेल. Indicates Language Skills. Shows verbal intelligence, reading strength, and creativity. Difficulty in abstract reasoning or numerical logic. He needs further understanding efforts and study. भाषिक क्षमता चांगली आहे. कल्पकता आहे. पण अमूर्त, अस्तित्वात नसलेल्या संकल्पना व गणितामध्ये अडचणी आहेत. या क्षेत्रात अभ्यास, प्रयत्नाची व समज येण्याची गरज आहे. वाचून लिहून शिकेल. Sensory-Motor (five senses and movements) are good. & Spatial Skills are good. Reflects strengths in coordination, visual intelligence, and fine motor skills. he understands picture language better. Bring books with lot of pictures. Bring audio books. He will learn better by hearing and seeing. संवेदी-मोटर (पंचेंद्रिये व हालचाली) छान आहेत. जागा, अवकाश याची समज चांगली आहे. सुक्ष्म हालचाली, सौंदर्यदृष्टी व दृश्य समज छान आहेत. याला चित्रांची भाषा जास्त चांगली समजते. सचित्र पुस्तके वापरा.ओडीओ पुस्तके वापरा. तो ऐकून शिकेल. बघून शिकेल. Indicates emotional status. His behavior and discipline needs attention. May suggest emotional ups and downs, home stress, or variable motivation.The child may prefer doing nothing, rather than risk being scolded for mistakes. भावनिक स्थिती जरा अस्थिर असेल. वर्तणूक, शिस्त याकडे लक्ष द्यायला हवे. भावनिक उलथापालथ, घरचा, शाळेचा, बाहेरचा ताणतणाव. काहीही कृती करायची इच्छाच नसणे. काहीतरी करून बोलणी खाण्यापेक्षा काहीच करायचे नाही. म्हणजे कुणी बारीक सारीक चुकांसाठी रागावण्याचा प्रश्नच उरत नाही. The difficulty may lie within the child.Learning difficulties. Reading, writing difficulties. Indicates learning disability, attention deficit, or a mismatch in teaching style. If I can not learn the way you teach, teach me the way I learn. समस्या मुलात असण्याची शक्यता जास्त. शिकण्यात अडचणी. वाचन दोष. लेखन दोष. शिक्षण शैलीतील विसंगती, विचलित होणे. तुम्ही शिकवता, ते मला समजत नसेल, तर मला समजेल, असं तुम्ही शिकवा ना. He may have Practical Intelligence. Shows real-world understanding and communication skills. May struggle with rote memory or time pressure. A tortoise is not expected to run with a hare. He will learn better by doing things. Vocational education suits him. त्याला प्रात्यक्षिक बुध्दी चांगली असेल. व्यवहारज्ञान व संवादकौशल्य चांगले, पण पाठांतर व वेळेचे गणित जुळवण्यात अडचण असू शकते. कासवाने सशाच्या गतीने कसे पळावे? तो “करून शिकणारा”” मुलगा असेल. त्याला “व्यवसाय शिक्षण” जास्त उपयुक्त ठरेल. He may have good Social & Emotional Intelligence. Indicates leadership, empathy, and peer acceptance. Watch for future team-based strengths. Team games suit him. He may have many friends. His company needs to be observed. त्याची सामाजिक कौशल्ये व भावनिक बुद्धिमत्ता चांगली असू शकते. नेतृत्व, सहवेदना (empathy) आणि मित्रांशी, सहकार्यांशी जुळवून घेणार. सांघिक खेळ जास्त उपयुक्त ठरतील. भरपूर मित्र असणार. संगत चांगली असण्याकडे लक्ष ठेवायला हवे. Problem may be with “Executive Functioning”. That means “Thoughtful action skills”.Indicates difficulty in task planning, sequencing, or self-monitoring. May need structured support. “विचारपूर्वक वागण्याची क्षमता” (कार्यकारी कौशल्ये) कमी असू शकते. कामाचे नियोजन, कामाचे टप्पे, पायर्या, क्रम ठरवता न येणे. कामाचे स्वतःचे मूल्यमापन यामध्ये अडचण असू शकते. That means he has “Growth Potential”. Shows brain adaptability, new motivation, or successful teaching match, good teacher, good friend. Something good is happening in his life. That is helping him learn better. Find it out. It is important. त्याच्यात पुढे जाण्याची क्षमता आहे. मेंदूची लवचिकता, नवीन प्रेरणा किंवा योग्य अध्यापन शैली, चांगला शिक्षक, चांगला मित्र. त्याच्या आयुष्यात काहीतरी चांगले घडते आहे. त्यामुळे तो चांगला शिकत आहे. शोधून काढा. महत्वाचे आहे ते. He has a problem of Under stimulation. So he has Missed Potential. Boring, educational environment. Problem may be in school, family or society. Could indicate lack of challenge, low expectations, or hidden giftedness. चेतनारहित, निर्जीव, कंटाळवाणे शैक्षणिक वातावरण. शाळेत, घरात, समाजात काहीतरी गडबड आहे. त्याच्या क्षमतेला संधीच मिळाली नाही. आव्हानाची कमतरता, स्व-अपेक्षा कमी किंवा दडलेली हुशारी सुचवते. A child’s progress card is not just a report — it’s a window into his learning journey. Let’s read it with care, compassion, and curiosity. Best luck. प्रगती पुस्तक म्हणजे फक्त गुणांचे तक्ते नाहीत — ते मुलाच्या शैक्षणिक प्रवासाची झलक आहेत. त्यामुळे त्याचा अर्थ समजून, प्रेमाने व विचारपूर्वक मार्ग काढू या. शुभेच्छा. – Dr. Anil Mokashi (Pediatrician)MBBS, MD, DCH, FIAP, PhD(Child Growth and Development)

School Progress Card – शाळेच्या प्रगती पुस्तकाचा अर्थ Read Post »

Vaccination

Is the Vaccine Safe? लस सुरक्षित आहे का?

Ask only those who truly know. Vaccines prevent serious infectious diseases. Vaccination is the best, scientific way to build immunity. Some people worry about side effects. Some resist or refuse vaccines. Many trust government vaccines but doubt optional ones.Remember: Optional does not mean unimportant or unnecessary. Decide based on: What protects your child best, and What you can afford. Parents need up-to-date, accurate information. Trust your pediatrician and scientific bodies like the Indian Academy of Pediatrics. Do not rely on rumors, neighborhood advice, or half-knowledge. Vaccines undergo strict testing for safety and effectiveness. Vaccines are life-saving gifts of science. They create a strong shield against dangerous microbes. Protect your child.Trust science. Choose vaccination. हा प्रश्न फक्त माहीतगारालाच विचारा. सध्या अनेक आया शाळेमध्ये जेई लस देऊन घेऊ का असा प्रश्न विचारतात. जरूर देऊन घ्या असे स्पष्ट सांगितले तरी काही लोकांच्या मनात शंका राहतातच. त्याची उत्तर असे आहे. आजार परवडला कि लस ? खर तर लस परवडते. टाळता येण्याजोगा प्रत्येक आजार टाळायलाच हवा. लसी गंभीर संसर्गजन्य रोग टाळतात. लसीकरण हा प्रतिकारक शक्ती वाढवण्याचा सर्वोत्तम, वैज्ञानिक पुराव्यानिशी सिद्ध झालेला मार्ग आहे. काही लोकांना लसींच्या दुष्परिणामांची काळजी वाटते. काहीजण घाबरून, किंवा विनाकारणही, हट्टीपणाने विरोध करतात. लस घ्यायला स्पष्ट नकार देतात. बरेच जण सरकारी लसींवर विश्वास ठेवतात. पण सरकार न देणाऱ्या ऐच्छिक लसींवर शंका घेतात. ऐच्छिक लसी अनावश्यक नाहीत. आपल्या बाळाच्या हिताचा निर्णय घ्यावा. आपल्याला परवडते की नाही हे बघावे. परवडत असूनही पटले नाही म्हणून टाळू नये. तो मुलावर अन्याय आहे. सरकार पूर्ण देशाला फुकट द्यायला परवडेल एवढ्याच लसी देते. सगळ्या लसी देत नाही. सरकारचे निर्णय देशहिताच्या दृष्टीने घेतलेले असतात. एकेका बाळाच्या हिताच्या दृष्टीने नाही. सरकार देत नसेल त्या लसी खाजगीतून घ्या. मूल तुमचे खाजगी आहे. सरकारी नाही. माहितगाराच्या सल्ल्याने लसिकरणाचा निर्णय घ्या. सरकारी आरोग्य कर्मचारी माहितगार नसतात. सर्व नर्सेस, सर्व डॉक्टर माहितगार नसतात. सर्व आज्या, शेजारिणी माहितगार नसतात. पालकांना अद्ययावत, अचूक माहिती असणे गरजेचे आहे. तुमच्या बालरोगतज्ञांवर आणि इंडियन अकादमी ऑफ पेडियाट्रिक्स सारख्या वैज्ञानिक संस्थांवर विश्वास ठेवा. अफवा, ऐकीव बातम्यावर विश्वास ठेवू नका. शेजारीण, वडीलधारे प्रेमाचे असतील पण माहितगार नसतात. लसी सुरक्षित आहेत की नाही, परिणामकारक आहेत की नाही हे तपासण्यासाठी लसींच्या कठोर चाचण्या घेतल्या जातात. लस ही विज्ञानाची जीवरक्षक देणगी आहे. आधुनिक लसी ही विज्ञानाची फळे आहेत. लसी म्हणजे धोकादायक सूक्ष्म जंतूंविरुद्ध लढाईसाठी एक मजबूत संरक्षक ढाल आहे. विश्वास विज्ञानावर ठेवा. लसीकरण निवडा. – Dr. Anil Mokashi (Pediatrician)MBBS, MD, DCH, FIAP, PhD(Child Growth and Development)

Is the Vaccine Safe? लस सुरक्षित आहे का? Read Post »

Indian Thali

The Power of a Pinch: Micronutrients and Child’s Immunity

Micronutrients and Immunity. We eat macronutrients with our hands—rice, chapati, dal, curry.We eat micronutrients with a pinch—chutneys, koshimbir, pickles.Our body needs only small amounts of micronutrients, so they are called “micro” nutrients. But their impact is not small—especially when it comes to immunity. Understanding the link between micronutrients and immunity makes a big difference. Parents who know this have healthy children. Those who don’t, often have sick ones.That’s why the right knowledge matters. If you want the right information, go to someone who knows. But the expert can’t visit every home—you must seek the knowledge yourself. The expert isn’t in need. You are. Your child’s health and nutrition are your responsibility. Good nutrition leads to good immunity. Malnourished children fall sick often—cough, cold, fever again and again. Each viral infection triggers the body to build new immunity, specific to that virus.As children grow older, they fall sick less often because their immune system gets stronger. But with every infection, immunity temporarily drops. If the child falls sick too often, their overall immunity stays low. This creates a vicious cycle:Malnutrition causes infection, infection worsens malnutrition.Fever, cough, cold, vomiting, diarrhoea—once these symptoms are gone, we say the illness is over.But that doesn’t mean the child has fully recovered. Only when the child gains back the weight lost during illness can we say the child is well. Parents and doctors must understand the difference between illness recovery and child’s recovery.The convalescence phase—the recovery period—is often ignored.During recovery: Feed small meals more often – hunger is low, but the body’s needs are high. Add more oil, ghee, butter – these give more calories in less volume. Keep one extra meal daily until the lost weight is regained. The most scientific and effective way to boost immunity is vaccination. Vaccines help the body produce measurable immunity (antibodies). Every vaccine-preventable disease must be prevented. Which is cheaper—getting the disease or taking the vaccine? Obviously, the vaccine is cheaper and safer. Vaccines exist for measles, mumps, rubella, chickenpox, rotavirus, polio, DPT, pneumococcal, Japanese encephalitis, hepatitis A & B, typhoid, meningococcal, and flu.Take the flu vaccine every year—it protects against that year’s strain, as decided by WHO. COVID-19 taught us to trust vaccines and science. Even children from well-fed families can be micronutrient deficient.They may not look undernourished but may still be stunted or frequently ill. This happens because their diet is not balanced. A balanced meal includes: Rice + Dal + Chapati + Vegetables + Sprouted Pulses + Fruits + Curd. Farmers buy micronutrients for their crops to grow better, but forget their own children need them too. They often just don’t know! Micronutrient deficiency is a silent but major health issue. Fruits and vegetables are the body’s natural disease-fighting foods. They are protective foods. They are rich in vitamins and minerals. Choose varied vegetables and fruits—different types, different colors—this ensures a mix of all micronutrients. For strong immunity, Vitamin A, Vitamin C and Zinc are especially important.Taking extra vitamins doesn’t give more immunity. But a deficiency definitely reduces immunity! Cooking and Nutrient Loss Cooking reduces the availability of nutrients in vegetables:Whole & raw: 100%Chopped: 80%Stir-fried: 60%Boiled: 40%Deep-fried: 20% Fruits:Whole fruit: First-class (fiber-rich)Fruit juice: Second-class (no fiber)Packaged fruit drink: Third-class (just sugar, water, flavor, color)Bring Back the Tradition of Chutneys and Koshimbiris. Chutneys made from sesame, peanuts, flaxseeds, karale, dry fruits are rich in micronutrients. Just like iodized salt or fluoridated toothpaste, chutneys too can be fortified with micronutrients.Koshimbir, raitas were once a part of daily meals. That was our tradition.Now, they’re only served during festivals or for guests. We must bring back these traditions—for the sake of our children’s health and immunity. Time for a Movement Mothers, wake up! Be Micronutrient Aware. Teach your children healthy food habits. It’s your responsibility—and yours alone. Best wishes. – Dr. Anil Mokashi (Pediatrician)MBBS, MD, DCH, FIAP, PhD(Child Growth and Development)

The Power of a Pinch: Micronutrients and Child’s Immunity Read Post »

Good Senior Couple

गोष्ट आम्हा दोघांची

जगावेगळ्या माणसाची आणि जगावेगळ्या लेखकाची ओळखसुद्धा जगाववेगळीच असायला हवी. नाही का? मी स्वतःबद्दल प्रथमपुरुषी प्रथमवचनी ओळख लिहायची असे ठरवले. म्हणून ही “लेखकाची ओळख : माझी गोष्ट, आमची गोष्ट”. अशी काही स्वलिखित पुस्तकात, स्वतःची गोष्ट लिहिण्याची प्रथा नाही. पण माझ्यासारखे आयुष्य जगण्याची तरी कुठे प्रथा आहे? मी जरा वेगळा, वेगळा, वेगळाच, (चौकट राजा) आहे, हे मला अगदी लवकरच, लहानपणीच समजलं होतं. मी माझं वेगळेपण ओळखल्यामुळे व जपल्यामुळेच माझी कारकीर्द घडली. यालाच इंग्लिश मध्ये ‘करिअर’ म्हणतात. करिअर म्हणजे शिक्षण किंवा व्यवसाय नाही. करिअर म्हणजे कारकीर्द. तुम्ही आयुष॒यात जे काही करता, ती कारकीर्द. कुणाचीही कारकीर्द १/३ स्वतः व्यक्तीवर, १/३ कुटुंबावर, आणि १/३ समाजावर, मित्र, शाळा, कॉलेज, सहकारी किंवा परिस्थितीवर अवलंबून असते. वयानुरूप आणि अनुभवानुरूप स्वतःचा विकास होत जातो. क्षमता वाढत जातात. आणि तुम्ही जास्त चांगलं काम करू लागता. बुद्धिमत्ता (आय क्यू) वाढत नाही. पण कामगिरी चांगली होत जाते. कौटुंबिक आणि सामाजिक परिस्थिती काळानुसार आणि वेळेनुसार बदलती राहत असल्यामुळे प्रत्येक व्यक्तीच्या कारकीर्दीला अनेक वळणे मिळत असतात. नव्या संधी व नव्या दिशा निर्माण होतात. हे काळा बरोबर स्वतःला आणि आपल्या आजूबाजूच्या परिस्थितीला पालटण्याचे गणित मला फार चांगले जमले. मी 100 % बारामतीकर. आमची डॉक्टरकीची तिसरी पिढी. आता आमची चौथी पिढी सुद्धा डॉक्टर झालेली आहे. 75 वर्षाची वैद्यकीय व्यवसायाची परंपरा. माझे शिक्षण बारामतीत. लेखन, वाचन भाषण, नाटक, अभ्यास यात कायम पुढे. एमबीबीएस नागपूरला गव्हर्नमेंट मेडिकल मधे, डीसीएच सायन हॉस्पिटल मधे, एमडी, एफसीपीएस वाडिया चिल्ड्रन मधे. फेलो इंडियन अकॅडमी ऑफ पेडिॲट्रिक्स मुंबईमध्ये आणि पीएचडी पेडिॲट्रिक्स बालविकास व वाढ क्षेत्रात पुणे विद्यापीठात, बीजे मेडिकल, ससूनमधे. हे माझं शिक्षण. भरपूर ओपीडी. भरपूर इन डोअर. मस्त व्यवसाय. माझी पत्नी डॉक्टर माधुरी, सोलापूरची एमबीबीएस. डिलिव्हरी सिझर, बिझी. आणि माझ्यासारखा जगावेगळा माणूस आयुष्यभर सांभाळला. मुलगा गौतम ऑटोमोबाईल इंजिनियर. आमच्या बाल कल्याण केंद्र मतिमंद, मूकबधिर, पूर्व प्राथमिक, प्राथमिक शाळेमध्ये मॅनेजर म्हणून काम करतो. माझी सून अंकिता आमच्याच की मूकबधिर शाळेमध्ये शिक्षिका. माझा नातू समिहन (१०), व नात कनक (२) हे दोन घटक आमचा वर्तमानकाळ व्यापून, भविष्यकाळातील कारकीर्द घडवत आहेत. अॅपटीट्युड टेस्ट, कल चाचण्या, आय क्यू टेस्ट म्हणजे कंपास पेटीतील सहा इंची पट्टीने १० एकर जमीन मोजण्यासारखं आहे. मला स्वतःला नाटकाची आवड. मी स्वतःला नाटकवाला मानतो. डॉक्टर झालो नसतो तर ॲक्टरच झालो असतो. अगणित नाटकात कामे केली. कॉलेज, विद्यापीठ, राज्य नाट्य महोत्सव, नाट्य साधना. विविध स्पर्धांमध्ये अनेक बक्षिसे. आम्ही नाटक घेऊन इंग्लंड अमेरिका कॅनडा प्रवास केला. गणेशोत्सवात, खेडोपाडी, साखर कारखान्यांवर, इरिगेशन कॉलनी मधे अनेक प्रयोग. मस्त मित्र परिवार. फुल एन्जॉय. पण एके दिवशी उपरती झाली. मला अमाप आनंद मिळायचा. पण कुटुंबाचा आणि समाजाचा त्यात काहीच फायदा होत नव्हता. जगाची लाईफस्टाईल वेगळी आणि नाटकवाल्यांची लाईफस्टाईल वेगळी. मॅच होईना. माझ्या आयुष्याच्या ध्येय धोरणात नाटक काही बसेना. माझं प्रथम कर्तव्य समोर येणाऱ्या आईच्या बाळाला सेवा देण्याचं आहे. त्यामुळे ठरवून जड अंतःकरणाने संपूर्ण नाट्यसंन्यास घेतला. नंतर सुरू झालं भाषणांचं युग. दुसरी तिसरीत असतांनाच आमचे दिक्षित गुरुजी नगरपरिषदेच्या सर्व शाळातून “बघा कसा घडाघडा सकाळ वाचतोय ते” असे सांगत फिरवून आणायचे. मग भाषणे, कथाकथन, नाट्यवाचन, वादविवाद स्पर्धा. माझी ओरेटरी जी बहरली ती आजयागायत पुरते आहे. मेडिकल असोसिएशन, महिला मंडळे, गणेशोत्सव, शाळा कॉलेजच्या स्नेहसंमेलनात, राज्यभर, देशभर, हजारो भाषणे. पंधरा-वीस वर्षे चालले ते प्रकरण. मजा आली. धमाल एन्जॉय केलं. पण समाजाचं त्यानी काय भलं होतंय, मोजमाप करता येईना. माझ्या मलाच नोंदीही करता येईनात. माझा बायोडाटा मात्र अधिकाधिक इम्प्रेसिव होत गेला. पण बायोडाटा मोठा करणे हे माझे आयुष्याचे उद्दिष्ट नव्हतेच. आणि एके दिवशी वेळेचा फार अपव्यय होतो या कारणास्तव मी भाषणे बंद केली. लेखनाचं क्षेत्र मात्र फार लाभी ठरलं. जर्नल, वर्तमानपत्रे, साप्ताहिके, मासिके, विशेष पुरवण्या शेकडो लेख छापून आले. येताहेत. अनेक लेख, विज्ञान कथा, पुस्तके. अनेक प्रकाशन संस्थांनी ती छापली. माझ्या प्रसिद्ध झालेल्या लेखनाची नुसती यादी द्यायची तरी दोन पाने लागतील. म्हणून मी त्या यादीला आणि मला मिळालेल्या असंख्य पुरस्कारांना संपूर्ण फाटा देतो.व्यवसाय सुरु करण्यापूर्वी डॉ.किरण शहा या माझ्या मित्राने “तुला किती उत्पन्न अपेक्षित आहे” असा प्रश्न विचारला. पहिल्याच महिन्यात अपेक्षेच्या पाचपट उत्पन्न झाले. त्यामुळे पैसे कमविण्यासाठी व्यवसाय कधी करावाच लागला नाही . व्यवसाय करत गेलो पैसे मिळत गेले . काका काकू (फॅमिली ॲडॉप्शन मुळे आई-वडील) डॉक्टर असल्याने व्यवसायाच्या पहिल्या दिवशीच हॉस्पिटल , कार , बंगला हजर होते . आई वडिलांनी सांगितले नाव कमव पैसे आपोआप मिळतील. मी व्यवसाय सुरू केला त्यावेळी (1978) तज्ञ सल्लागार ही संकल्पनाच समाजात नव्हती. इंजेक्शन नाही औषध नाही, मग पैसे कशाचे द्यायचे? असा प्रश्न असायचा. बिन इंजेक्शनचा व्यवसाय करायला फार मोठे धैर्य लागले. अगदी ‘एकला चालो रे’ किंवा महात्मा गांधींच्या ‘माझे सत्याचे प्रयोग’ सारखे. आणि तो घेतला वसा मी आजवर (74) सोडला नाही. बारामतीच्या शंभर किलोमीटर परिसरात, पुणे सातारा नगर सोलापूर या चार जिल्ह्यांच्या मधल्या टापूत पंधरा वर्षे मी एकटाच बालरोग तज्ञ होतो. फुल मोनोपली. वैद्यकीय सत्ता. प्रवासाच्या सोयी नव्हत्या. अंधश्रद्धा, बाहेरचं, देवाचं, अशा अनेक अडचणी होत्या. समाज प्रबोधन हे वैद्यकीय सेवेपेक्षा जास्त महत्त्वाचं होतं. खेडोपाडी लोकांच्या सोयीसाठी विजिट करावी लागे. जी पी डॉक्टरांना देखील बालरोग तज्ञाची गरज समजून सांगावी लागे. तुम्ही सेप्ट्रान देता, आम्हीही सेप्ट्रान देतो. मग तुमची गरज काय? असा प्रश्न होता. पंधरा-वीस वर्षे ‘आठवडी बाजार करणारा’ देशातील मी एकमेव बालरोगतज्ञ असावा. खेडोपाडच्या आठवडी बाजारात, एखाद्या दवाखान्यात जाऊन, पेशंट बघायचे. ज्या गावात नवीन बालरोग तज्ञ येईल, त्याच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमात, ‘गावाची गरज भागली’ असे जाहीर करून विजिट बंद करायची. ही मोडस ऑपरंडी. त्यातही समाजसेवेपेक्षा व्यावसायिक दृष्टिकोनच जास्त होता. नामांकित, मानांकित होता येतं. हज्जारो ट्युबेकटोमी ऑपरेशनला असिस्ट करणारा बालरोगतज्ञ म्हणून माझा जागतिक विक्रम असेल. आधीची वीस वर्षं आईबरोबर, नंतरची वीस वर्षं बायकोबरोबर ! कौटुंबिक जबाबदारी. एकदा कौटुंबिक चर्चेत पुण्याचे डॉक्टर डी. बी. शिरोळे इतके ग्रेट का आहेत. त्यांच्यात असं काय स्पेशल आहे की सगळं जग त्यांचा आदर करतं, असा विषय निघाला. माझं असेसमेंट होतं, त्यांनी समाजाला गरज असताना, शेकडो बालरोगतज्ञ निर्माण करून, समाजाला दिले. ते नुसते व्यावसायिक होऊन पैसे गोळा करत बसले नाहीत. ते शिक्षक झाले. यातच त्यांच्या ग्रेटपणाचे रहस्य आहे. यावर माझ्या भावाचे उत्तर होतं “तुला कोणी सांगितलं तू शिक्षक होऊ नकोस म्हणून. तू शिक्षक हो.” आता बारामतीत राहून वैद्यकीय व आरोग्य क्षेत्रात शिक्षक होण्याचा मार्गच नव्हता. पण “जर्नल ऑफ रुरल पेडिॲट्रिक्स” काढून मी तो मार्ग शोधला. माझं जर्नल अमर्याद यशस्वी झालं. खेडोपाडी, राज्यभर, भारतभर, जगभर मला ओळख मिळाली. माझे विद्यार्थी निर्माण झाले बालआरोग्यक्षेत्रात बारामतीत मी अनेक गोष्टी पहिल्यांदा सुरू केल्या. लहान मुलांचा ईसीजी, इईजी, ऑडिओमेट्री, नवजात बालकांसाठी एनआयसीयु, अशा अनेक गोष्टी निर्माण केल्या. त्यातच नवजात बाळाला कृत्रिम श्वास देणारे रिस्पिरेटर मशीन मी बारामतीत संशोधन करून बनवले. त्याचे ऑफिशियल सरकारी पेटंट मिळाले. देशभर हजार एक मशीन विकली. पण धंदा व्यवसाय करणे हे माझे आयुष्याचे उद्दिष्ट नसल्याने

गोष्ट आम्हा दोघांची Read Post »

Dr. Anil Mokashi telling stories to children

रामायणाच्या गोष्टी 54 – सनातन चिरंतन

“रामायण सनातन चिरंतन” सीतेचे पुत्र कुशलव जुळे भाऊरामाचे चरित्र लागले गाऊवनात वाढले तरी ज्ञानी झालेत्यांनी रामकथेला घरोघरी नेले.. वाल्मिकी ऋषींनी शब्द दिलेचौसष्ट कला गायन वादन दिलेलव-कुशांच्या सुरात झंकारलेरामायण अखंड वाहत राहिले.. ग.दि.माडगूळकरांनी लिहिलेसुधीर फडके यांनी गायलेगीत रामायण अमर झालेसमाजमनावर कोरले गेले… मालिका झाल्या सिनेमे झालेकथा कीर्तन प्रवचन झालेभारतीय संस्कार जगभर गेलेमानवी जीवन समृद्ध झाले… राम राज्य कुटुंब न्याय-धर्मत्याग धैर्य नीतीनियम सत्कर्मश्रीरामांस लवकुशांनी ऐकवलेरामायण राष्ट्रीय वारसा बनले. अरबी फारसी तिबेटी बर्मी चीनीफ्रेंच इंग्रजी लॅटिन ग्रीक जपानीगुजराती तमिळ तेलुगू संस्कृतकानडी हिंदी बंगाली व मराठीत. चीन तिबेट म्यानमार कंबोडियालंका नेपाळ भूतान मलेशियारामायणाने जोडला धागा एकत्रदुसऱ्यासाठी जगणे राम-चरित्र.. मानवाचा कसा असावा आचाररामायणाने दिला दिव्य विचारनीतिमान रामाचा मार्गच भलाम्हणून अहंकारी रावण संपवला. सीतेच्या अथांग सोशिकतेलाहनुमानाच्या चिरंजीव भक्तीलाभरताच्या बंधुप्रेम व निष्ठेलालक्ष्मणाची सावली साथीलानाते संबंधांना उजाळा दिला.. रामायण घडले तो भू नकाशाउदयास आणी अखंड भारतवर्षाजनकपूर पंचवटी लंका अयोध्यादंडकारण्य मिथिला किष्किंधा.. लव-कुशांनी श्रीरामांच्या साठीकेले अमर संस्कार परंपरेसाठीरामकथा गेली लाखोंच्या ओठीश्रद्धेने गाईल त्याची किर्ती मोठी. रामायण कधी संपणार नाहीरामायण कधी थांबणार नाहीसत्य सरळ मार्गानी चालणारपुण्यवान रामायण पुढे नेणार.. प्रभू श्रीरामचंद्र की जयप्रभू श्री रामचंद्र की जयप्रभू श्री रामचंद्र की जय – विद्यावाचस्पति डॉ. अनिल मोकाशी (बालरोगतज्ञ)एमबीबीएस, एमडी, डीसीएच, एफआयएपी,पीएचडी (मुलांची वाढ व विकास)

रामायणाच्या गोष्टी 54 – सनातन चिरंतन Read Post »

Dr. Anil Mokashi telling stories to children

रामायणाच्या गोष्टी 53 – रामाचा अवतार संपला…

श्रीराम श्रीराम श्रीराम ! सीता पृथ्वीमातेच्या कुशीत गेली. श्रीरामांना खूप दुःख झालं. तरी त्यांनी कर्तव्य बुद्धीने रामराज्य चालवलं. लव आणि कुश यांना वेगवेगळी राज्यं दिली. दोघांचा राज्याभिषेक केला. पण त्यांचं मन कशातच रमेना. आता त्यांचं अवतार कार्य संपलं होतं. त्यांनी मनापासून प्रार्थना केली. ती ब्रह्मदेवापर्यंत पोचली. एक दिवस एक तपस्वी रामांना भेटायला आला. तो काळ होता! तपस्व्याच्या रूपात आला होता. त्याला रामाशी एकांतात बोलायचं होतं. तो म्हणाला –”आपलं बोलणं कोणीही ऐकू नये. जो ऐकेल त्याचा मृत्यू निश्चित!” रामाने लक्ष्मणाला आज्ञा दिली “कोणालाही आत येऊ देऊ नकोस!” इतक्यात दुर्वास मुनी आले. ते फार रागीट होते. ते ओरडले “रामाला भेटायचं आहे! मला आत सोड!” लक्ष्मण म्हणाला “तुम्ही थांबा! श्रीरामांची आज्ञा आहे” दुर्वास मुनी रागावले “मला आत सोडले नाहीस, तर अयोध्या भस्मसात करीन अयोध्या बेचिराख करीन अयोध्येची राखरांगोळी करीन!”लक्ष्मणाला प्रश्न पडला.” नियम पाळू? की अयोध्या वाचवू?” लक्ष्मणाला माहीत होतं. पुढे धोका आहे. नियम मोडला तर मृत्यू . “लक्ष्मणाचा हा निर्णय आयुष्याचा शेवटचा निर्णय ठरणार होता. पण अयोध्येला वाचवण्यासाठी तो स्वतःचा बळी द्यायला तयार झाला!” त्यानी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता दुर्वास मुनींना आत सोडलं. राम आणि तपस्वी यांचा एकांत भंग झाला! लक्ष्मण शांतपणे यमुनेच्या तीरावर गेला. आणि त्याने जलसमाधी घेतली. पवित्र यमुना नदीच्या विशाल पात्रात प्रवेश केला. “रामाच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले. अश्वमेध यज्ञ जिंकला, पण सावलीसारखी साथ देणारा निस्वार्थ भाऊ हरपला!” तपस्व्याच्या रूपात आलेल्या काळाने रामाला सांगितलं. ” तू भगवान विष्णूचा मानवी अवतार आहेस. पृथ्वीवर वाईट लोक जास्त प्रबळ झाले आहेत. चांगल्या लोकांना जगणे कठीण झाले आहे. रामाचा अवतार घे. आणि पृथ्वीवर मानवी जीवन सुलभ होईल, लोक सुखाने समाधानाने, सरळ मार्गाने जगू शकतील अशी व्यवस्था कर.” रामावतारातील रावण संहाराचं कार्य संपल होतं. पृथ्वी राक्षसमुक्त आणि भयमुक्त झाली होती. ब्रह्मदेवाने रामावतार संपवून वैकुंठात परत यायचा आदेश दिला होता!” श्रीरामांनी आपल्या अवतार कार्याची समाप्ती केली. शरयू नदीत प्रवेश केला. आणि इहलोकाची यात्रा संपवून वैकुंठाला गेले. श्रीरामांचा दिव्य अवतार संपला. श्री रामायणाची इतीश्री झाली.आकाशातून पुष्पवृष्टी झाली. देव, ऋषी, आणि चराचर सृष्टीने जयघोष केला! प्रभू श्री रामचंद्र की जय.प्रभू श्री रामचंद्र की जयप्रभू श्री रामचंद्र की जय. – विद्यावाचस्पति डॉ. अनिल मोकाशी (बालरोगतज्ञ)एमबीबीएस, एमडी, डीसीएच, एफआयएपी,पीएचडी (मुलांची वाढ व विकास)

रामायणाच्या गोष्टी 53 – रामाचा अवतार संपला… Read Post »

Dr. Anil Mokashi telling stories to children

रामायणाच्या गोष्टी 52 – सीता धरतीमातेच्या कुशीत

श्रीराम श्रीराम श्रीराम ! रामाने, सीतेला स्वीकारले. पण एक, अट टाकली. सीतेने परत, जनतेसमोर , अग्निपरीक्षा द्यावी. आपली पवित्रता, सिद्ध करावी. लंकेत तिने आधीच अग्निपरीक्षा दिली होती. पण अयोध्येच्या काही मूठभर लोकांचा त्यावर विश्वास नव्हता. ते म्हणत. वर्षभर रावणाच्या ताब्यात असलेली सीता शुद्ध कशी. या प्रश्नाचे उत्तर रामा जवळ नव्हते. राजाला उत्तर देणं आवश्यक होतं. राज्यात आणि आजू बाजूला दुष्ट राक्षसी प्रवृत्ती घातपाती कारवाया दंगली करत होत्या. राजावर प्रजेच्या रक्षणाची जबाबदारी होती. पत्नीला न्याय देण्यासाठी राज्य सोडता येणार नव्हते. त्यानी निर्णय घेतला. राष्ट्र प्रथम. रामाला दुःख झालं. पण कर्तव्याला प्राधान्य देत त्याने अग्निदिव्याची अट घातली.सीता त्यातून सुखरूप निष्कलंक बाहेर पडेल याची त्याला खात्री होती. पण नियतीच्या मनात वेगळेच होते. सीतेने पृथ्वीमातेला विनंती केली. ‘मी निःकलंक असेन तर मला आपल्या कुशीत घे’ त्या क्षणी पृथ्वी दुभंगली तेजस्वी प्रकाश पसरला आणि भूमातेने सीतेला आपल्या कुशीत घेतलं. लव-कुश आईला वाचवायला धावत गेले, पण तोपर्यंत सीता अदृश्य झाली होती. राम, दुःखाने कोसळला.जमिनीला पडलेल्या भेगा मिटल्या होत्या. सीता पृथ्वीमध्ये विलीन झाली होती. सीतेचा अध्याय संपला होता. आता आदर्श पत्नी आदर्श पतिव्रता आदर्श राणी आदर्श माता सीतामाता पृथ्वीवर कधीही कोणालाही दिसणार नव्हती. हे कटू सत्य स्वीकारून सर्वांना पुढचं आयुष्य जगावं लागलं. जगायला आधार एकच उरला होता. प्रभू श्री रामचंद्र की जयप्रभू श्री रामचंद्र की जयप्रभू श्री रामचंद्र की जय. – विद्यावाचस्पति डॉ. अनिल मोकाशी (बालरोगतज्ञ)एमबीबीएस, एमडी, डीसीएच, एफआयएपी,पीएचडी (मुलांची वाढ व विकास)

रामायणाच्या गोष्टी 52 – सीता धरतीमातेच्या कुशीत Read Post »

Dr. Anil Mokashi telling stories to children

रामायणाच्या गोष्टी 51 – लवकुश मोठे झाले

श्रीराम श्रीराम श्रीराम ! लवकुश रामाच्या सैन्याशी लढतच होते. श्रीरामांना प्रश्न पडला “इतकी शूर मुलं कोण आहेत?” वाल्मिकी ऋषींनी लवकुशांना आज्ञा दिली.“रामाशी युद्ध, थांबवा! आणि आता यापुढे रामाचं गुणगान करा. मी शिकवलेलं रामायण गा! श्री रामांचं चरित्र त्यांनाच ऐकवा. पण दान घेऊ नका इनाम घेऊ नका!” गुरुजींची आज्ञा ऐकून लवकुश नरमले. त्यांना कळलं – “आपल्याला गुरुजींचं ऐकावंच लागेल.” ते समंजसपणे आपले वागणे, बदलायला तयार झाले. सीता दोघांना बाजूला घेऊन म्हणाली “पती म्हणून त्यांचं प्रेम खरं होतं. राजा म्हणून त्यांनी कर्तव्य केलं. प्रजेच्या भल्यासाठी त्यांना मोठा त्याग करावा लागला.” आईचे ऐकून लवकुश बदलले. धनुष्यबाण खाली ठेवले. युद्धाचा वेष बदलला. आश्रमाचा भगवा वेष परिधान केला. रामायण गाण्यासाठी परत आले. रामायणाच्या गोष्टी सांगता-सांगताच ते स्वतः आतून आमूलाग्र बदलले. ते समंजस झाले. ते जबाबदार झाले. ते मोठे झाले. ते तरुण झाले. त्यांचे तेजस्वी रामायण गायन ऐकून सगळे मंत्रमुग्ध झाले.श्रीरामही अतिशय खुश झाले. वाल्मिकी ऋषींनी सांगितले “श्रीरामा, हे दोघे तुझेच पुत्र आहेत!” लवकुशांनी श्रीरामांची अनवधानानी म्हणजे अजाणते पणी युद्ध केले म्हणून क्षमा मागितली. त्यांचे पाय धरले.त्यांचे आशीर्वाद मागितले. श्रीरामांनी त्यांना कडकडून मिठी मारली. त्यांच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले. संपूर्ण आश्रम आनंदात न्हाऊन गेला. महर्षींनी सीतेलाही बोलावले आणि रामाला सांगितले “ही शुद्ध आहे पवित्र आहे. माझी आज्ञा म्हणून तू हिचा स्वीकार कर.” श्रीराम म्हणाले, “हो! मी संपूर्ण जनतेसमोर भर दरबारात हिचा स्वीकार करायला तयार आहे. लवकुशांनाही अयोध्येत घेऊन जाईन. पण… अजूनही पण होताच!” संपूर्ण आश्रमात आवाज घुमला. प्रभू श्रीरामचंद्र की जय!प्रभू श्रीरामचंद्र की जय!प्रभू श्रीरामचंद्र की जय! – विद्यावाचस्पति डॉ. अनिल मोकाशी (बालरोगतज्ञ)एमबीबीएस, एमडी, डीसीएच, एफआयएपी,पीएचडी (मुलांची वाढ व विकास)

रामायणाच्या गोष्टी 51 – लवकुश मोठे झाले Read Post »

Dr. Anil Mokashi telling stories to children

रामायणाच्या गोष्टी 50 – रामाचा अश्वमेध

श्रीराम श्रीराम श्रीराम ! सीता वनात गेली. अयोध्येवर सृष्टी रुसली. पावसाचा थेंब नाही. नदी-नाले सुकले. शेतं करपून गेली. धान्य पिकलं नाही. प्रजेची उपासमार झाली. तहानलेली जनावरं वणवण भटकत होती. पक्षी तडफडत होते. सगळीकडे दु:ख आणि हाहाकार माजला होता. हे बघून, राम अस्वस्थ झाले. प्रजेचं दु:ख त्यांना, सहन होईना.गुरु वशिष्ठांनी सांगितले. सृष्टीच्या कोपावर एकच उपाय.“अश्वमेध यज्ञ”. रामांनी तयारी सुरू केली. शुभ्र पांढरा घोडा निवडला. त्याच्या गळ्यात सोन्याची पाटी लटकवली —”जो या घोड्याला अडवेल त्याला रामाशी युद्ध करावं लागेल!”घोडा गावोगाव धावत सुटला. अनेक राजांनी रामाची सत्ता मान्य केली. घोडा वाल्मिकी आश्रमाजवळ पोचला. लव कुश खेळत होते. त्यांनी इतका उमदा इतका सुंदर इतका पांढरा शुभ्र घोडा कधीच पाहिला नव्हता. तो त्यांना खूप आवडला. घोड्याला पकडून त्यांनी एका झाडाला बांधून ठेवले. घोड्याच्या गळ्यातली पाटी वाचली. दोघंही थबकले. “हा तर रामाचा घोडा!” लव म्हणाला. “त्याच रामाचा ज्यांनी आपल्या निरपराध आईला जंगलात सोडलं!” “आपल्या आईवर अन्याय करणाऱ्या राजाचा अश्वमेध आपण अडवायचाच!” कुश ठामपणे म्हणाला. थोड्याच वेळात रामाची सेना आली. सेनापतीने हुकूम दिला, “घोडा सोडा!””नाही!” लव-कुश ठामपणे म्हणाले. युद्ध सुरू झालं. लव-कुश लहान असले तरी शूर आणि पराक्रमी होते. त्यांनी रामाची बलाढ्य सेना पराभूत केली. लक्ष्मण स्वतः युद्धासाठी आले. पण लव-कुशांनी त्यांनाही हरवलं.शेवटी राम स्वतः आश्रमात आले. त्यांनी या लहान मुलांचं धैर्य पाहिलं. त्यांना आश्चर्य वाटलं. पण इतक्यात गुरु वशिष्ठ पुढे आले. त्यांनी आपले शिष्य लव कुश यांना आदेश दिला “युद्ध थांबवा!” त्याक्षणी लव कुश थांबले. गुरूची आज्ञा पाळली. सगळीकडे शांतता पसरली. रामाच्या सेनेला घाबरून नाही. गुरूची आज्ञा म्हणून ते थांबले. राम त्या शूर मुलांकडे बघतच राहिले. त्यांना प्रश्न पडला. कुणाची असतील बरे इतकी तेजस्वी शहाणी आणि आज्ञाधारक मुले? प्रभू श्री रामचंद्र की जयप्रभू श्री रामचंद्र की जयप्रभू श्री रामचंद्र की जय – विद्यावाचस्पति डॉ. अनिल मोकाशी (बालरोगतज्ञ)एमबीबीएस, एमडी, डीसीएच, एफआयएपी,पीएचडी (मुलांची वाढ व विकास)

रामायणाच्या गोष्टी 50 – रामाचा अश्वमेध Read Post »

Dr. Anil Mokashi telling stories to children

रामायणाच्या गोष्टी 49 – लव-कुशांचे बालपण

श्रीराम श्रीराम श्रीराम ! श्रीरामांची आज्ञा. म्हणून लक्ष्मणाने सीतेला वनात सोडलं. सीतेनी त्याला सांगितलं” या वनात एकटी जाणं माझ्या नशिबात आहे, पण रामांचा वारसा माझ्या पोटात वाढतोय.” दुःख होऊ नये म्हणून ही बातमी कर्तव्यकठोर रामाला त्याने कधीच सांगितली नाही. भागीरथी नदीच्या तीरावर वाल्मिकी ऋषींना सीता एकटी सापडली. त्यांनी सन्मानाने तिला आश्रमात आसरा दिला. सुरक्षेच्या दृष्टीने तिचे नाव “वैदेही” ठेवले. तिला मायेचं पांघरूण मिळालं. गर्भारपणी, चांगला नैसर्गिक, आहार, विहार, विचार आणि, गर्भसंस्कार, मिळाले. नऊ महिन्यांनी दोन तेजस्वी बाळांचा जन्म झाला. लव आणि कुश! त्यांच्या बाल लीलांनी सगळे आनंदले. त्यांचं बालपण आनंदी होतं. म्हणून मोठेपणी ते यशस्वी झाले. वाल्मिकी ऋषींनी त्यांना प्रेम दिलं. संस्कार दिले. शिक्षण दिलं. भारतीय गुरुकुल शिक्षण परंपरे प्रमाणे 6 शास्त्रं आणि 64 कला, शिकवल्या. पारंगत केलं. कुणाशी कसं वागायचं. समाजाचे नितीनियम शिकवले. त्यांच्या जीवनाला एक शिस्त लावली. लव ला धनुर्विद्या आवडायची. दिवस संपला तरी सराव चालूच. कुश ला संगीत आवडे. त्याच्या स्वरांनी संध्याकाळी आश्रम भारून जायचा. लव आणि कुश ८-१० वर्षांचे झाले. त्यांची मुंज झाली. अल्लड बालपण संपून अनेक गोष्टी शिकण्याची विद्यार्थीदशा सुरू झाली. ते चौकस, हुशार, उत्साही, आनंदी, समंजस, तेजस्वी, आत्मविश्वासू आणि प्रेमळ झाले. त्यांना बघून कौतुकाने कुणीही म्हणायचे, “मुलं असावी तर अशी. आदर्श” वाल्मिकी ऋषींनी लिहिलेली रामकथा तर मुलांची तोंड पाठ होती. आवडती होती. आश्रमात त्यांची ओळख फक्त “वैदेही”चे, गुणी सुपुत्र अशीच होती. अजूनही रामकथेचं सत्य त्यांच्या आयुष्याशी जोडलं गेलं नव्हतं. ते क्षण लवकरच येणार होते. प्रभू श्री रामचंद्र की जयप्रभू श्री रामचंद्र की जयप्रभू श्री रामचंद्र की जय – विद्यावाचस्पति डॉ. अनिल मोकाशी (बालरोगतज्ञ)एमबीबीएस, एमडी, डीसीएच, एफआयएपी,पीएचडी (मुलांची वाढ व विकास)

रामायणाच्या गोष्टी 49 – लव-कुशांचे बालपण Read Post »

Scroll to Top