Dr. Anil Mokashi

B.R. Ambedkar

डॉ. बाबासाहेब आंबेडकर : विचार, कार्य आणि योगदान

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना भारत रत्न या भारताच्या सर्वोच्च राष्ट्रीय पुरस्काराने गौरवण्यात आले आहे.हा पुरस्कार देशासाठी अत्यंत महत्त्वाचं आणि दूरगामी योगदान देणाऱ्या व्यक्तींनाच दिला जातो. म्हणजेच, देशाकडून मिळणारा सर्वात मोठा सन्मान. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भारताच्या जडणघडणीत मोलाची भूमिका बजावली. त्यांनी भारताचं संविधान लिहिलं, म्हणजेच भारत देश कसा चालेल, नागरिकांचे हक्क आणि कर्तव्ये काय असतील, याचं नियमपुस्तक तयार केलं.या संविधानामधून त्यांनी समानतेचा पाया मजबूत केला आणि कायद्याच्या दृष्टीने सर्व नागरिक समान आहेत, हे ठामपणे मांडलं. त्यांचं काम केवळ कायद्यापुरतं मर्यादित नव्हतं. समाजात जे दुर्बल, वंचित आणि उपेक्षित होते, त्यांना न्याय आणि सन्मानाचं स्थान मिळावं, यासाठी त्यांनी आयुष्यभर प्रयत्न केले. म्हणूनच संपूर्ण भारताने त्यांना एक महान राष्ट्रपुरुष म्हणून सन्मान दिला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मुलांना आणि तरुणांना नेहमी शिक्षणाचं महत्त्व सांगायचे.ते म्हणायचे —“शिका.”कारण शिक्षणामुळे माणूस आत्मनिर्भर बनतो आणि कुणीही त्याला कमी लेखू शकत नाही. त्यांचा ठाम विश्वास होता की —“सगळी माणसं समान आहेत.”कोणी जन्माने मोठा नसतो, कोणी लहान नसतो. ते हेही सांगायचे —“अन्याय सहन करू नका.”पण त्याचबरोबर स्वतःकडूनही कुणावर अन्याय होऊ देऊ नका. त्यांच्या मते —“एकत्र राहिलात तर ताकद वाढते.”संघटित समाज अन्यायाविरुद्ध उभा राहू शकतो. आणि शेवटी ते नेहमी अधोरेखित करायचे —“ज्ञान माणसाला माणूस बनवतं.”ज्ञानाशिवाय व्यक्ती अपुरी राहते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतातील अन्यायकारक जातीव्यवस्थेविरुद्ध संघर्ष केला. मागास आणि वंचित समाजघटकांना मिळवून देण्यासाठी त्यांनी कायदेशीर आणि सामाजिक पातळीवर प्रयत्न केले. मुलांनो,आज तुम्ही शाळेत मोकळेपणाने शिक्षण घेत असाल,पाणी प्यायला कुणाची परवानगी लागत नसेल,आणि सन्मानाने जगण्याचा अधिकार उपभोगत असाल —तर त्यामागे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा आणि कार्याचा मोठा वाटा आहे. म्हणूनच भारतीय इतिहासातडॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचं योगदानअत्यंत महत्त्वाचं आणि प्रेरणादायी मानलं जातं. – विद्यावाचस्पति डॉ. अनिल मोकाशी (बालरोगतज्ञ)एमबीबीएस, एमडी, डीसीएच, एफआयएपी,पीएचडी (मुलांची वाढ व विकास)

डॉ. बाबासाहेब आंबेडकर : विचार, कार्य आणि योगदान Read Post »

Sardar Vallabhbhai Patel

भारत जोडणारे सरदार वल्लभभाई पटेल

भारतीय इतिहासाच्या गोष्टी – भारत जोडणारे सरदार वल्लभभाई पटेल. इंग्रजांच्या राज्यात भारतात ५६० पेक्षा जास्त छोटी-छोटी संस्थाने होती. प्रत्येकाचा वेगळा राजा, वेगळा नियम. कुणाचा पायपोस कुणात नव्हता. एकी नव्हती, सगळे एकमेकांचे वैरी होते.इंग्रज राज्यकर्त्यांनी याचाच फायदा घेतला. भारत स्वतंत्र झाल्यावर, एक मजबूत देश घडवायचा होता. तेव्हा वल्लभभाई पटेल कणखरपणे उभे राहिले. “सगळे एकत्र झाले, तरच भारत मजबूत होईल,” हे त्यांनी ओळखलं. कधी प्रेमाने, कधी समजावून, त्यांनी सगळी संस्थाने भारतामध्ये विलीन केली.म्हणूनच आज आपण म्हणतो— एक भारत, एक देश! लोक त्यांना “लोह पुरुष” म्हणायचे,कारण त्यांचं मन खूप मजबूत होतं. त्यांचा भव्य लोखंडाचा पुतळा—Statue of Unity, वडोदरा (पूर्वीचं बडोदा) इथे उभा आहे. बारडोलीच्या सत्याग्रहात शेतकऱ्यांचे ठाम नेतृत्व केल्यामुळे वल्लभभाई पटेलांना लोकांनी प्रेमाने “सरदार” ही उपाधी दिली. हा ठामपणा त्यांच्यात लहानपणापासूनच होता. शाळेत असताना, काही दांडगट मुलं किडमिडीत मुलांना छळत होते. ते बिचारे घाबरून सहन करत होते. तर काही जण अन्याय दिसून सुद्धा दुर्लक्ष करत होते. वल्लभभाई पुढे आले आणि ठामपणे म्हणाले, “हे चुकीचं आहे. हे चालणार नाही.” त्या एका वाक्याने सगळे वठणीवर आले —छळणारे, छळ सहन करणारे आणि दुर्लक्ष करणारे सगळेच चुकीचे असतात. हा कणखरपणा पुढे भारताला एकत्र ठेवणाऱ्यासरदार वल्लभभाई पटेलांमध्ये त्यांच्या लहानपणीच दिसला. ते म्हणायचे “एकीमध्येच देशाची शक्ती असते.” सरदार वल्लभभाई पटेल की जयभारत माता की जयजय हिंद – विद्यावाचस्पति डॉ. अनिल मोकाशी (बालरोगतज्ञ)एमबीबीएस, एमडी, डीसीएच, एफआयएपी,पीएचडी (मुलांची वाढ व विकास)

भारत जोडणारे सरदार वल्लभभाई पटेल Read Post »

A father encourages his baby to take first steps on a sunny day in a park, barefoot on green grass.

Walking Is Biology and Physics, Not a Calendar

मुलं चालायला शिकतात वयानुसार नाही, तर शरीर तयार झाल्यावर. “चालायचं वय आलं” म्हणून मुलं चालायला लागत नाहीत.मुलांचं शरीर स्वतःचं वजन पेलायला तयार झालं,की मुलं चालायला लागतात. चालण्यासाठी मुलांच्या शरीराला लागते: हे सगळे घटक सहसा ठराविक वजनावर एकत्र येतात,वयावर नाही.अनेक मुलं सुमारे ८ किलो वजन झाल्यावर चालायला लागतात. ही जादू नाही.हे भौतिकशास्त्र + जीवशास्त्र यांचं गणित जुळणं आहे. म्हणूनच: विकसनात्मक टप्पे (developmental milestones)हे मार्गदर्शक आहेत, आदेश नाहीत.ते लोकसंख्येसाठी उपयुक्त असतात,पण प्रत्येक मूल चालतंते शरीर तयार झाल्यावर —डेव्हलपमेंटल चार्ट पाहून नाही. Children learn to walk not according to age, but when the body is ready. Children do not start walking because the “walking age” has arrived.They start walking when their body becomes ready to carry its own weight. For walking, the child’s body needs: All these factors usually come together at a certain body weight, not at a certain age.Many children start walking when they reach around 8 kg body weight. This is not magic.This is the matching of physics and biology. That is why: Developmental milestones are guidelines, not rules.They are useful for population-level assessment,but each child walks when the body is ready,not when a developmental chart says so. – विद्यावाचस्पति डॉ. अनिल मोकाशी (बालरोगतज्ञ)एमबीबीएस, एमडी, डीसीएच, एफआयएपी,पीएचडी (मुलांची वाढ व विकास)

Walking Is Biology and Physics, Not a Calendar Read Post »

Father and son posing playfully on a wooden dock by the water, enjoying a day outdoors.

२१व्या शतकातील पालकत्व आणि बालविकास : एक महत्त्वपूर्ण दृष्टिकोन

आजच्या डिजिटल युगात पालकत्व बदलत आहे आणि त्या बदलाचा वेग अत्यंत जलद आहे. इंटरनेटमुळे माहिती सहज उपलब्ध झाली असली, तरी योग्य आणि शास्त्रीय माहिती ओळखणं मात्र अधिक कठीण झालं आहे. अनेक पालक प्रेम, काळजी आणि अनुभव यांच्या आधारे मुलांना वाढवत असले तरी बालविकासाची खरी शास्त्रीय बाजू समजून घेणं आता अत्यावश्यक बनलं आहे. पालकांनी घेतलेले निर्णय मुलांच्या शारीरिक, मानसिक आणि भावनिक विकासावर थेट परिणाम करतात. त्यामुळे चुकीची माहिती, चुकीच्या सवयी किंवा गैरसमज यांचा परिणाम लहानपणीच होऊ शकतो. याच पार्श्वभूमीवर डॉ. अनिल मोकाशी यांनी पालकांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण मार्गदर्शन लिहिले आहे. हे मार्गदर्शन प्रत्येक पालकाने वाचावं, समजून घ्यावं आणि आपल्या दैनंदिन पालकत्वात लागू करावं. २१व्या शतकातील पालकांनी बालपणाचं शास्त्र समजून घ्यायलाच हवं. 1) आजचं पालकत्व पूर्वीसारखं राहिलेलं नाही.2) माहितीचा मारा वाढलाय, पण योग्य माहिती कमी आहे.3) प्रेम, काळजी आणि सामान्य माहिती पुरेशी राहत नाही.4) सुशिक्षित पालकांनाही अनेकदा “आपल्याला काय माहीत नाही” हे लक्षात येत नाही.5) म्हणूनच माहितीपूर्ण निर्णय घेणं आज अत्यावश्यक झालं आहे.6) मूल म्हणजे मोठ्या माणसाची छोटी प्रतिकृती नसते.7) फुलपाखराच्या जशा अंडे, अळी, कोश आणि फुलपाखरू अशा विकासाच्या अवस्था असतात,8) तशाच माणसाच्या गर्भावस्था, नवजात, शैशव, शालेय वय, किशोरावस्था, प्रौढावस्था अशा अवस्था असतात.9) प्रत्येक टप्प्यावर शरीराची रचना बदलते.10) शरीराचं कार्य, मनोवस्था, आहार आणि गरजा बदलतात.11) प्रत्येक टप्प्यावर वेगळ्या समस्या आणि वेगळे आजार दिसतात.12) हा फरक समजून न घेतला तर चांगले निर्णय चुकू शकतात.13) डॉक्टर फक्त आजारपणात लागतो असं नाही.14) बालरोगतज्ज्ञ म्हणजे बालपणाचं शास्त्र जाणणारा माणूस.15) तो काय सामान्य आहे, काय नाही, हे ओळखायला मदत करतो.16) शेजारी किंवा आजीपेक्षा डॉक्टराकडे जास्त शास्त्रीय माहिती असते.17) योग्य माहिती असलेले पालक योग्य वेळी योग्य निर्णय घेतात.18) ते घाबरत नाहीत, उगाच प्रयोग करत नाहीत.19) ते मुलाच्या वाढीत अडथळा न होता आधार बनतात.20) आणि म्हणूनच २१व्या शतकातील पालकांनीबालपणाचं शास्त्र समजून घ्यायलाच हवं. 21st-century parents must understand the science of childhood. 1) Parenting today is not the same as it was earlier.2) There is an overload of information, but very little right information.3) Love, care, and general knowledge are no longer enough.4) Even educated parents often do not realise what they do not know.5) Therefore, informed decision-making has become essential today.6) A child is not a miniature adult.7) Just as a butterfly has stages—egg, larva, pupa, and butterfly,8) human beings also have stages—fetus, newborn, infancy, school age, adolescence, and adulthood.9) At every stage, the structure of the body changes.10) Body functions, mental state, diet, and needs also change.11) Each stage has its own problems and illnesses.12) If these differences are not understood, wrong decisions are likely to be made.13) A doctor is not needed only during illness.14) A pediatrician is a person who understands the science of childhood.15) He helps parents recognise what is normal and what is not.16) A doctor has more scientific knowledge than a neighbour or even a grandmother.17) Well-informed parents take the right decisions at the right time.18) They do not panic or experiment unnecessarily.19) They support their child’s growth instead of becoming an obstacle.20) That is why 21st-century parents must understand the science of childhood. – विद्यावाचस्पति डॉ. अनिल मोकाशी (बालरोगतज्ञ)एमबीबीएस, एमडी, डीसीएच, एफआयएपी,पीएचडी (मुलांची वाढ व विकास)

२१व्या शतकातील पालकत्व आणि बालविकास : एक महत्त्वपूर्ण दृष्टिकोन Read Post »

pacifist, mahatma gandhi, mohandas karamchand gandhi, spiritual leader, nonviolence, resistance, equality, racial segregation, mahatma gandhi, mahatma gandhi, mahatma gandhi, mahatma gandhi, mahatma gandhi

मोहनदास ते महात्मा गांधी

मोहनदास ते महात्मा गांधी – भारतीय इतिहासाच्या गोष्टी २३ मोहनदास करमचंद गांधीलहानपणी अगदी साधा मुलगा होते.ते जरासे अबोलच होते.पण काहीही चुकीचं घडतांना दिसलंकी ते अस्वस्थ व्हायचे.त्यांना खोटं आवडत नसे.सत्य म्हणजे, खरं ते बोलणं.सत्य म्हणजे, बरोबर ते करणं.त्यांना एक प्रश्न पडायचा.‘सत्याच्या बाजूने’ कसं उभं राहायचं ?त्यासाठी त्यांनी वकिलीचं,कायद्याचं शिक्षण घेतलं. दक्षिण आफ्रिकेत त्यांना रेल्वेच्या डब्यातून खाली उतरवण्यात आलं.ते गोरे नव्हते, काळे होते.हा अन्याय त्यांना मान्य नव्हता.त्यांनी विरोध केला.त्या दिवशी त्यांना स्वतःची ओळख पटली.हिंसाही नाही. आणि सहकार्यही नाही. भारतामध्ये परत आल्यावरगांधीजींनी भारतयात्रा केली.लोक कसे जगतात हे त्यांनी पाहिलं.पदयात्रेमधे ते एकटे चालायला लागले.“एकला चलो रे” हा त्यांचा मंत्र होता.हळूहळू त्यांच्यामागे लोक जोडले गेले.हजारो, लाखो लोक त्यांचे अनुयायी झाले.त्यांनी चरख्यावर सूत कातले.स्वदेशीचा मंत्र दिला.दुष्ट इंग्रजाशी असहकार आंदोलन पुकारले. इंग्रजांनी मिठावर कर लादला होता.गांधीजींनी दांडीयात्रा काढली.मीठाचा सत्याग्रह केला.गांधीजींनी एक चिमूटभर मीठ काय उचललं, संपूर्ण ब्रिटिश साम्राज्य हादरलं.देश जागा झाला.गांधीजींनी निशस्त्र क्रांती केली. लोक त्यांना महात्मा गांधी म्हणू लागले.महात्मा म्हणजे महान आत्मा.गांधीजी धार्मिक होते.त्यांचा देवावर विश्वास होता.रामावर विश्वास होता.त्यांचे शेवटचे शब्द होते —“हे राम.” त्यांची शिकवण होती,“जग चांगलं करायचं असेलतर आधी स्वतः चांगले व्हा.” महात्मा गांधी की जयभारतमाता की जय.जय हिंद – विद्यावाचस्पति डॉ. अनिल मोकाशी (बालरोगतज्ञ)एमबीबीएस, एमडी, डीसीएच, एफआयएपी,पीएचडी (मुलांची वाढ व विकास)

मोहनदास ते महात्मा गांधी Read Post »

स्वातंत्र्यवीर सावरकर – वीर सावरकर

स्वातंत्र्यवीर सावरकर. वीर सावरकर भीतीवर मात करून जो लढतो, तोच खरा वीर.सावरकरांनी इंग्रज राजवटीला थेट आव्हान दिलं.छळ सहन केला, हाल सोसले,पण कधीच झुकले नाहीत.अंदमानच्या सेल्युलर जेलमध्येत्यांना काळ्या पाण्याची जन्मठेप झाली.तरीही त्यांचा विचार बदलला नाही.म्हणूनच त्यांना “वीर सावरकर” म्हणतात. त्यांचं संपूर्ण आयुष्यस्वातंत्र्यासाठी समर्पित होतं.म्हणून ते स्वातंत्र्यवीर होते. सावरकरांच्या कविता देशप्रेमाच्या होत्या.अंदमानच्या तुरुंगात,भारतापासून दूर असताना,त्यांचं मन खूप व्याकुळ झालं.आईपासून दूर गेल्यावर बाळ रडतं,तसं त्यांचं मन तळमळत होतं.म्हणून ते समुद्राला विनंती करतात —“मला माझ्या मातृभूमीकडे परत घेऊन चल.” हाच भाव आहे“ने मजसी ने परत मातृभूमिला” या कवितेत. “जयोस्तुते श्रीमहन्मंगले”ही भारतमातेची स्तुती आहे.गुलाम देशाला धैर्य देण्यासाठीआणि स्वाभिमान जागा करण्यासाठीही कविता रचली गेली. “हे हिंदु नृसिंहा प्रभो शिवाजी राजा”या कवितेत सावरकरशिवाजी महाराजांची आठवण करून देतात.शिवाजी महाराजांनीहिंदवी स्वराज्य उभं केलं.हिंदवी स्वराज्य म्हणजे —या मातीचं,आपल्या लोकांचं,आणि परकीय सत्तेपासून स्वतंत्र असलेलं राज्य.या कवितेत सावरकरफक्त शिवाजी महाराजांना हाक देत नाहीत.ते आपल्या आतल्या धैर्याला जागं करतात.कारण प्रत्येक भारतीयाच्या मनातएक छोटा शिवाजी आहे.आपली माती, आपले लोक, आपलं धैर्य —हेच हिंदवी स्वराज्य! सावरकर हेप्रखर हिंदुत्ववादीआणि तेजस्वी राष्ट्रभक्त होते.सूर्यासारखे —तेजस्वी, तळपते, ऊर्जावान, मार्ग दाखवणारे. स्वातंत्र्यवीर सावरकर — की जय!भारत माता — की जय!जय हिंद! – विद्यावाचस्पति डॉ. अनिल मोकाशी (बालरोगतज्ञ)एमबीबीएस, एमडी, डीसीएच, एफआयएपी,पीएचडी (मुलांची वाढ व विकास)

स्वातंत्र्यवीर सावरकर – वीर सावरकर Read Post »

बाळ गंगाधर टिळक ते लोकमान्य टिळक

 बाळ गंगाधर टिळक ते लोकमान्य टिळक – भारतीय इतिहासाच्या गोष्टी २१ बाळ गंगाधर टिळक पुण्याचे होते. पुणे हे शिक्षणाचे माहेरघर म्हणून ओळखले जाते. लहानपणी टिळक खूप हुशार होते. प्रश्न विचारायचे. चौकस बुद्धी. हा त्यांचा गुण होता.शाळेत त्यांना गणित आणि इतिहास विषय आवडायचा.टिळकांनी कायद्याचे शिक्षण घेतले. पण पैसे कमावण्यासाठी वकिली व्यवसाय केला नाही.कायद्याचं ज्ञान त्यांनी लोकांना न्याय मिळावा म्हणून वापरलं. त्यांना प्रश्न पडायचा, आपला देश गुलाम का आहे?त्या काळात इंग्रज राज्य करत होते.सामान्य माणूस दुःखी होता.शेतकरी, कामगार यांच्यासाठी कोणी बोलत नव्हते. टिळकांच्या लक्षात आले. हीच वेळ आहे आवाज उठवण्याची.“मी गप्प बसणार नाही,” असं त्यांनी ठरवलं. त्यांनी केसरी वर्तमानपत्र सुरू केलं. निर्भयपणे खरं लिहिलं.त्यांचा आवाज भारतभर पोचला. लोक जागे होऊ लागले.लोकमान्य टिळक काँग्रेसचे अध्यक्ष झाले.स्वातंत्र्यलढ्याला खरी सुरुवात झाली.टिळकांनी त्या विचारांना धाडस आणि लढ्याची दिशा दिली.टिळकांनंतर गांधीजी, नेहरू, सुभाषचंद्र बोस यांनी लढा पुढे नेला. पण पहिला बुलंद आवाज लोकमान्य टिळकांचाच होता.गणपती उत्सव, शिवजयंतीमुळे लोक एकत्र आले. लोकमान्य टिळकांचे घोषवाक्य होते. “स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच!” – विद्यावाचस्पति डॉ. अनिल मोकाशी (बालरोगतज्ञ)एमबीबीएस, एमडी, डीसीएच, एफआयएपी,पीएचडी (मुलांची वाढ व विकास)

बाळ गंगाधर टिळक ते लोकमान्य टिळक Read Post »

swami vivekananda

नरेंद्रनाथ दत्त कसा झाला स्वामी विवेकानंद?

“नरेंद्रनाथ दत्त कसा झाला स्वामी विवेकानंद?” – भारतीय इतिहासाच्या गोष्टी १७ स्वामी विवेकानंद भारतीय इतिहासाचा एक चमकता तारा होते.‘उठा, जागे व्हा’ — ‘उत्तिष्ठ, जाग्रत’ अशी हाक देऊन त्यांनी देशाला धैर्य दिलं.त्यांनी भारताचं नाव जगभर उजळवलं.त्यांनी शिकवलं—देव आकाशात नाही… देव आपल्या मनातल्या उजेडात आहे.आज मी त्यांची गोष्ट सांगतोय… आणि माझ्या मनात एक ज्योत पेटली.ही बघा—मी मेणबत्ती पेटवली.ही आहे आजच्या गोष्टीची ज्योत.आता या ज्योतितून तुमच्या हातातल्या उदबत्त्या पेटवू या.तुम्ही माझ्यामागून गोष्ट म्हणाल, आणि ही ज्योत तुमच्या मनातही उजळेल.याला म्हणतात—‘ज्योत से ज्योत जगाते चलो’.मनातली ज्योत म्हणजे प्रेरणा. दैवी प्रकाश. देवाचा अंश. कोलकात्यातील सिमुलिया स्ट्रीट…इथे राहत होता एक चुणचुणीत, हसतमुख, खोडकर मुलगा—नरेंद्रनाथ दत्त.खेळात, अभ्यासात, गाण्यात—तो सगळीकडे हुशार.पण त्याची एक खास सवय—सतत प्रश्न!“देव कुठे आहे?”“माणसांनी चांगलं का वागावं?”आई भुवनेश्वरी म्हणायची,“बाळा, तुझ्या मनात प्रकाश असेल तर जगातील अंधार निघून जातो.” एके दिवशी नरेंद्रने आपल्या गुरूंना—रामकृष्ण परमहंसांना विचारलं,“तुम्ही देव पाहिलात का?”रामकृष्ण म्हणाले,“हो, पाहिलाय. प्रत्येक माणसात देव आहे.तू तुझी शक्ती इतरांच्या भल्यासाठी वापर, तुला देव दिसेल.” एकदा एका मुलाला कुत्र्याचं पिल्लू सापडलं.नरेंद्रने त्याला परत आईकडे पोचवलं.विवेकानंद म्हणाले,“एखादा जीव वाचवतो तेव्हा—आपल्या हृदयात देव जागा होतो.” शिकागोमध्ये जागतिक धर्मसंसद भरली होती.जगभरातील विद्वान आपापल्या धर्माची स्तुती करत होते.विवेकानंद उभे राहिले आणि म्हणाले—“माझ्या अमेरिकेतील बंधू आणि भगिनींनो!”क्षणभर शांतता… आणि मग गडगडाट!जगाला पहिल्यांदा कळलं—भारतात दुसऱ्या धर्मातील लोकही बंधू-भगिनी असतात. स्वामी विवेकानंदांनी शिकवलं—देव आपल्या मनातल्या उजेडात आहे. – विद्यावाचस्पति डॉ. अनिल मोकाशी (बालरोगतज्ञ)एमबीबीएस, एमडी, डीसीएच, एफआयएपी,पीएचडी (मुलांची वाढ व विकास)

नरेंद्रनाथ दत्त कसा झाला स्वामी विवेकानंद? Read Post »

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर

भारतीय इतिहासाच्या गोष्टी १६ – पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर अहिल्यानगर, म्हणजे जुन्या अहमदनगर जिल्ह्यातील, चोंडी या गावात, जन्माला आली एक मुलगी. अहिल्या तिचं नाव. हुशार. चुणचुणित. एकदा आपल्या, दहा-बारा मैत्रिणींसोबत, ती नदीकाठी, खेळत होती. अचानक लांबून, खूप धुरळा, उडलेला दिसला. धुळीचे लोट, आकाशात उठले. सगळ्या मुली, घाबरल्या. सैन्य आले, सैन्य आले, मोगलांचे सैन्य आले. असं ओरडत, घाबऱ्या घुबऱ्या, सगळ्या जणी, आपापल्या घरी, सुरक्षित स्थळी, पळून गेल्या. पण तिथे नदीकाठी, एक शिवलिंग होते. त्या जागी, पूर्वी एक मोठे, शिवमंदिर होते. मोगलांनी, सगळी मंदिरे, सगळ्या धर्मशाळा, सगळे रस्ते उद्ध्वस्त केले होते. छोट्या अहिल्याने ठरवले, हे शिवलिंग, कसेही करून, वाचवायचेच. ती एकटीच, त्या शिवलिंगाचे, रक्षण करण्यासाठी, थांबली. खरं तर ते सैन्य, शिवाजी महाराजांचे, इंदोरचे सेनापती, मल्हारराव होळकर, यांचे होते. मल्हाररावांना, या मुलीला, एकटीला बघून आश्चर्यच वाटले. कोण आहे बरं, ही मुलगी. एकटीच, का थांबली आहे. त्यांनी जवळ जाऊन, चौकशी केली. अहिल्याने, बाणेदारपणे सांगितले, मी शिवलिंगाचे, रक्षण करत आहे. मल्हारराव होळकरांनी, अहिल्येच्या वडिलांना भेटून, त्यांच्याकडे, आपला मुलगा खंडेराव, याच्याशी लग्नासाठी, मागणी घातली. अहिल्येच्या मनात, तिची आई सीताबाई, हिचे चांगले विचार, रुजलेले होते. मल्हाररावांना, अशीच धैर्यवान, सून हवी होती. आणि चोंडीची अहिल्या, राणी अहिल्यादेवी होळकर झाली. मल्हाररावांनी, व खंडेरावांनी, अहिल्येला, राज्यकारभाराचे धडे दिले. काही दुर्दैवी घटनांमुळे, अचानकच, संपूर्ण राज्याची जबाबदारी, त्यांच्यावर आली. त्यांनी ती, अत्यंत हुशारीनी, आणि कुशलतेनी, सांभाळली. अहिल्यादेवी यांनी, काशी विश्वनाथ, सोमनाथ, महाकाल, यांसारखी अनेक देवस्थाने, पुन्हा बांधली. भक्तीच्या मार्गाने, भारत जोडला. प्रवाशांसाठी रस्ते, घाट, विहिरी, धर्मशाळा बांधल्या. यात्रेला सुरक्षित, आणि सुखकर बनवले. पर्यटन फुलवले. त्यांनी स्त्रिया, विधवा, यांना मदत,, आणि आदर दिला. गरीब, शेतकरी,—सर्वांसाठी समान, न्याय दिला. समतेचा संदेश दिला. “राजा मोठा नाही… न्याय मोठा!” हे सांगितले. म्हणून तर अजितदादांनी, बारामतीच्या मेडिकल कॉलेजचे नाव,“पुण्यश्लोक, अहिल्यादेवी, होळकर, मेडिकल कॉलेज” ठेवले आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर की, जयभारत माता की, जयजय हिंद. – विद्यावाचस्पति डॉ. अनिल मोकाशी (बालरोगतज्ञ)एमबीबीएस, एमडी, डीसीएच, एफआयएपी,पीएचडी (मुलांची वाढ व विकास)

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर Read Post »

Lakshmibai - The Rani of Jhansi

“मेरी झाँसी नहीं दूँगी!”

भारतीय इतिहासाच्या गोष्टी. – “मेरी झाँसी नहीं दूँगी!” मी मणिकर्णिका मोरोपंत तांबे.लहानपणीच तलवार, घोडेस्वारी, धनुष्य—सगळं शिकले.माझं लग्न १३ व्या वर्षी, झाशीचे राजा गंगाधरराव नवलकर यांच्याशी झालं.राणी झाल्यावरचं नाव: लक्ष्मीबाई. मी मुलगा दत्तक घेतला — दामोदरराव.एक दिवस इंग्रज म्हणाले,“तुमचा वारस नाही, झाशी आम्हाला द्या.”मी ठामपणे उत्तर दिलं:“मेरी झाँसी नहीं दूँगी!” झाशी माझं घर… माझा अभिमान.मी सैन्य तयार केलं — लहान मुलांना, स्त्रियांनाही लढायला शिकवलं.घोड्यावर बसून दोन तलवारांनी मी रणांगण गाजवलं. 1857 च्या भारताच्या पहिल्या स्वातंत्र्य युद्धात मी शेवटपर्यंत झुंज दिली — हा युद्ध ब्रिटिशांच्या अन्यायाविरुद्धचा एक भव्य उठाव होता. झाशीच्या या संघर्षाचा इतिहास आजही जिवंत आहे — झांसीमध्ये राणी महाल आहे, जिथे मी राहत होतो, आणि तो महाल आता संग्रहालय आहे. झाशीची राणी म्हणजे धैर्य, आत्मसन्मान आणि स्वातंत्र्याची मूर्ती. खूब लड़ी मर्दानी,वो तो झाँसी वाली रानी थी”— सुभद्रा कुमारी चौहानसिंहासन हिल उठे,राजवंशों ने भृकुटी तानी थी,बूढ़े भारत में आईफिर से नयी जवानी थी।गुमी हुई आज़ादी कीकीमत सबने पहचानी थी,दूर फिरंगी को करने कीसबने मन में ठानी थी।चमक उठी सन सत्तावन में,चमक उठी सन सत्तावन में,यह तलवार पुरानी थी,खूब लड़ी मर्दानी,वो तो झांसी वाली रानी थी।खूब लड़ी मर्दानी,वो तो झांसी वाली रानी थी।खूब लड़ी मर्दानी,वो तो झांसी वाली रानी थी! झांसी की रानी की जयभारतमाता की जयजय हिंद – विद्यावाचस्पति डॉ. अनिल मोकाशी (बालरोगतज्ञ)एमबीबीएस, एमडी, डीसीएच, एफआयएपी,पीएचडी (मुलांची वाढ व विकास)

“मेरी झाँसी नहीं दूँगी!” Read Post »

मी शिवाजीराजे भोसले बोलतोय…

मुलांनो, मी शिवाजीराजे भोसले बोलतोय… – मी सांगतोय स्वराज्य निर्मितीची गोष्ट. मुलांनो, मी शिवाजीराजे भोसले बोलतोय.माझं बालपण झालं शिवनेरी किल्ल्यावर.माझी आई जिजाऊ, रोज मला गोष्टी सांगायची — रामाची, कृष्णाची, भीमाची!त्या गोष्टींनी माझ्या मनात एक विचार पक्का झाला —“आपलं राज्य आपणच उभं करायचं!”तेव्हा जुलमी आक्रमक मोगल बादशहा, सुभेदार लोकांवर अन्याय करत होते.गावं जळत होती, माणसं घाबरलेली होती.मी ठरवलं — हा अन्याय थांबवायचाच!लहानपणीच मी घोड्यावर बसायला शिकलो, तलवार फिरवायला शिकलो.डोंगरावर चढायचो, मावळ्यांबरोबर खेळायचो — पण मनात एकच जिद्द होती.थोडा मोठा झालो, तेव्हा मी तोरणा किल्ला जिंकला.लोक म्हणाले, “हा बाळराजा मोठा राजा होणार आहे!”मी राजगडावर राजधानी बसवली.माझे मावळे — तानाजी, बाजी, नेताजी, येसाजी — हे माझे हात होते.आम्ही किल्ल्यांवर स्वराज्याचा झेंडा फडकवला.प्रतापगडावर अफझलखान आला.मी म्हटलं — “ आई भवानी, मी धर्मासाठी तलवार उचलतोय.”त्या दिवशी आमचा विजय झाला.तेव्हा सह्याद्रीच्या डोंगर दर्यांमध्ये एकच वाक्य घुमलं —“हर हर महादेव! जय भवानी! जय शिवाजी!”त्या आवाजात भीती नाही, स्वाभिमान होता!लोकांच्या मनात उमटलं — “हा आपला राजा आहे!”मुलांनो, आज मी सिंहासनावर नाही,पण मी स्वराज्याचं स्वप्न बघितलं, पूर्ण केलं आणि भारताला स्वराज्य शिकवलं. माझं स्वराज्य आजही तुमच्या मनात जगतंय.जेव्हा तुम्ही प्रामाणिकपणे, धैर्याने, इतरांसाठी काम करता,तेव्हा माझं नाव पुन्हा घुमतं — “जय भवानी! जय शिवाजी!” – विद्यावाचस्पति डॉ. अनिल मोकाशी (बालरोगतज्ञ)एमबीबीएस, एमडी, डीसीएच, एफआयएपी,पीएचडी (मुलांची वाढ व विकास)

मी शिवाजीराजे भोसले बोलतोय… Read Post »

बाल कल्याण केंद्राचा ऐतिहासिक टप्पा

बाल कल्याण केंद्राचा ऐतिहासिक टप्पा : RCI मान्यताप्राप्त CRE प्रशिक्षण कार्यक्रम यशस्वी कार्यक्रमाचा आढावा बाल कल्याण केंद्राच्या इतिहासात कालचा दिवस एक महत्त्वाचा आणि अभिमानास्पद ठरला.आमच्या संस्थेत प्रथमच रिहॅबिलिटेशन कौन्सिल ऑफ इंडिया (RCI) मान्यताप्राप्तकंटिन्यूइंग रिहॅबिलिटेशन एज्युकेशन (CRE) या तीन दिवसांच्या ऑफलाइन प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. ही घटना आमच्यासाठी केवळ कार्यक्रम नव्हती—तर ती संस्थेच्या विकासातील एक ऐतिहासिक पाऊल होते. ३०–३५ वर्षांचे स्वप्न साकार दिव्यांग क्षेत्रात कार्यरत असलेल्या बाल कल्याण केंद्राला RCI शी जोडणे हे माझे अनेक वर्षांपासूनचे मोठे स्वप्न होते.भूतकाळात RCI ने अनेकदा संपर्क साधला; पण व्यस्ततेमुळे मला संवाद पुढे नेणे शक्य झाले नाही. आणि हा टप्पा लांबला. या वर्षी, आमचे मूकबधिर शाळेचे, तरुण उत्साही पूर्ण वेळ वाचातज्ञ सौरभ मुळीक यांनी घेतलेल्या दृढ पुढाकारामुळे हे स्वप्न प्रत्यक्षात उतरले. महाराष्ट्रभरातून आलेल्या तज्ञांची उपस्थिती या CRE कार्यक्रमासाठी खालील विविध क्षेत्रांतील व्यावसायिकांनी बारामती येथे हजेरी लावली: एकूण जवळपास 50 कार्यरत व्यावसायिक तीन दिवस प्रशिक्षणासाठी उपस्थित होते. माझा वैयक्तिक समाधानाचा क्षण. “दिव्यांग क्षेत्रात को-करिक्युलर एज्युकेशन” या विषयावर मला तब्बल दोन तास व्याख्यान देण्याची संधी मिळाली.मी व्यवसायाने बालविकास तज्ञ असून, डिसेबल्ड मुलांच्या विकासात माझे ज्ञान व अनुभव उपयोगी पडावे म्हणून संस्थेच्या माध्यमातून शाळा सुरु केली. जरी शाळा अनेक दशके चालू असली तरीअशा दर्जेदार, समर्पित आणि ज्ञान मिळवायला उत्सुक श्रोत्यांसमोर बोलण्याची संधी प्रथमच मिळाली.हा अनुभव माझ्यासाठी अत्यंत आनंददायी ठरला. या एका कार्यक्रमामुळे बाल कल्याण केंद्राचे नाव महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचले — ही आमच्यासाठी मोठी उपलब्धी आहे. भावी वाटचाल : CRE कार्यक्रमांचा नियमित विस्तार अशा प्रकारचे CRE कार्यक्रम आपण वारंवार आयोजित करावेत,कारण शैक्षणिक व सामाजिक काम ही दीर्घकालीन गुंतवणूक असते. आंब्याचे रोप लावल्यानंतर लगेच फळे येत नाहीत;त्याला पाठपुरावा,वेळ, जपणूक आणि सातत्य लागते. त्याचप्रमाणे,आजचे कार्य ताबडतोब नफा किंवा परतावा देईल अशी अपेक्षा न ठेवता, निरपेक्ष वृत्तीने काम चालू ठेवणे महत्त्वाचे आहे. काही वर्षांत हा वृक्ष आणखी विशाल होईल.त्याची छाया महाराष्ट्रा पलिकडे भारतभर पसरत जाईल.असा मला ठाम विश्वास आहे. संस्थेच्या भविष्यातील प्रत्येक उपक्रमासाठी माझ्या मनःपूर्वक शुभेच्छा आणि संपूर्ण सहकार्य. Historical milestone of Bal Kalyan Kendra, Baramati: RCI accredited CRE training program successful Program Review Yesterday was an important and proud day in the history ofBal Kalyan Kendra, Baramati. For the first time in our organization, a three-day offline training program on Continuing Rehabilitation Education (CRE) accredited by the Rehabilitation Council of India (RCI) was organized. This event was not just a program for us—it was a historic step in the development of the organization. A dream of 30–35 years realized It was my big dream for many years to connect the Bal Kalyan Kendra, Baramati, which is working in the field of disability, with RCI.RCI contacted me many times in the past; but due to busy schedule, I was not able to take the dialogue further. And this phase was delayed. This year, this dream became a reality due to the strong initiative taken by Mr. Saurabh Mulik. Our hearing impaired school’s, young and dynamic full timer speech therapist. Experts from all over Maharashtra attended and addressed the CRE program The following professionals from various fields attended the CRE program in Baramati: My personal moment of satisfaction. I got the opportunity to give a two hour lecture on the topic of “Co-Curricular Education in the Field of disability ”. I am a child development expert by profession, and started the school through the organization to make my knowledge and experience useful in the development of disabled children. Although the school has been running for decades, this was the first time I got the opportunity to speak in front of such a quality, dedicated and knowledge seeker, experienced audience. I enjoyed the experience. This one program has made the name of the Bal Kalyan Kendra, Baramati, known to every corner of Maharashtra — this is a great achievement for us. Future path: Regular expansion of CRE programs We should organize such CRE programs frequently, Because educational and social work is a long-term investment. Mango saplings do not bear fruit immediately after planting; It requires follow-up, time, care, perseverance and consistency. Similarly, It is important to continue working with an unbiased attitude, without expecting that today’s work will yield immediate profit or returns. In a few years, this tree will become even bigger. Its shadow will spread beyond Maharashtra and across India. I firmly believe that. Best wishes My heartfelt wishes and full cooperation for every future initiative of the organization. 13/11/2025. – Dr. Anil Mokashi (Pediatrician)MBBS, MD, DCH, FIAP, PhD(Child Growth and Development)

बाल कल्याण केंद्राचा ऐतिहासिक टप्पा Read Post »

Scroll to Top