Dr. Anil Mokashi

swami vivekananda

नरेंद्रनाथ दत्त कसा झाला स्वामी विवेकानंद?

“नरेंद्रनाथ दत्त कसा झाला स्वामी विवेकानंद?” – भारतीय इतिहासाच्या गोष्टी १७ स्वामी विवेकानंद भारतीय इतिहासाचा एक चमकता तारा होते.‘उठा, जागे व्हा’ — ‘उत्तिष्ठ, जाग्रत’ अशी हाक देऊन त्यांनी देशाला धैर्य दिलं.त्यांनी भारताचं नाव जगभर उजळवलं.त्यांनी शिकवलं—देव आकाशात नाही… देव आपल्या मनातल्या उजेडात आहे.आज मी त्यांची गोष्ट सांगतोय… आणि माझ्या मनात एक ज्योत पेटली.ही बघा—मी मेणबत्ती पेटवली.ही आहे आजच्या गोष्टीची ज्योत.आता या ज्योतितून तुमच्या हातातल्या उदबत्त्या पेटवू या.तुम्ही माझ्यामागून गोष्ट म्हणाल, आणि ही ज्योत तुमच्या मनातही उजळेल.याला म्हणतात—‘ज्योत से ज्योत जगाते चलो’.मनातली ज्योत म्हणजे प्रेरणा. दैवी प्रकाश. देवाचा अंश. कोलकात्यातील सिमुलिया स्ट्रीट…इथे राहत होता एक चुणचुणीत, हसतमुख, खोडकर मुलगा—नरेंद्रनाथ दत्त.खेळात, अभ्यासात, गाण्यात—तो सगळीकडे हुशार.पण त्याची एक खास सवय—सतत प्रश्न!“देव कुठे आहे?”“माणसांनी चांगलं का वागावं?”आई भुवनेश्वरी म्हणायची,“बाळा, तुझ्या मनात प्रकाश असेल तर जगातील अंधार निघून जातो.” एके दिवशी नरेंद्रने आपल्या गुरूंना—रामकृष्ण परमहंसांना विचारलं,“तुम्ही देव पाहिलात का?”रामकृष्ण म्हणाले,“हो, पाहिलाय. प्रत्येक माणसात देव आहे.तू तुझी शक्ती इतरांच्या भल्यासाठी वापर, तुला देव दिसेल.” एकदा एका मुलाला कुत्र्याचं पिल्लू सापडलं.नरेंद्रने त्याला परत आईकडे पोचवलं.विवेकानंद म्हणाले,“एखादा जीव वाचवतो तेव्हा—आपल्या हृदयात देव जागा होतो.” शिकागोमध्ये जागतिक धर्मसंसद भरली होती.जगभरातील विद्वान आपापल्या धर्माची स्तुती करत होते.विवेकानंद उभे राहिले आणि म्हणाले—“माझ्या अमेरिकेतील बंधू आणि भगिनींनो!”क्षणभर शांतता… आणि मग गडगडाट!जगाला पहिल्यांदा कळलं—भारतात दुसऱ्या धर्मातील लोकही बंधू-भगिनी असतात. स्वामी विवेकानंदांनी शिकवलं—देव आपल्या मनातल्या उजेडात आहे. – विद्यावाचस्पति डॉ. अनिल मोकाशी (बालरोगतज्ञ)एमबीबीएस, एमडी, डीसीएच, एफआयएपी,पीएचडी (मुलांची वाढ व विकास)

नरेंद्रनाथ दत्त कसा झाला स्वामी विवेकानंद? Read Post »

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर

भारतीय इतिहासाच्या गोष्टी १६ – पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर अहिल्यानगर, म्हणजे जुन्या अहमदनगर जिल्ह्यातील, चोंडी या गावात, जन्माला आली एक मुलगी. अहिल्या तिचं नाव. हुशार. चुणचुणित. एकदा आपल्या, दहा-बारा मैत्रिणींसोबत, ती नदीकाठी, खेळत होती. अचानक लांबून, खूप धुरळा, उडलेला दिसला. धुळीचे लोट, आकाशात उठले. सगळ्या मुली, घाबरल्या. सैन्य आले, सैन्य आले, मोगलांचे सैन्य आले. असं ओरडत, घाबऱ्या घुबऱ्या, सगळ्या जणी, आपापल्या घरी, सुरक्षित स्थळी, पळून गेल्या. पण तिथे नदीकाठी, एक शिवलिंग होते. त्या जागी, पूर्वी एक मोठे, शिवमंदिर होते. मोगलांनी, सगळी मंदिरे, सगळ्या धर्मशाळा, सगळे रस्ते उद्ध्वस्त केले होते. छोट्या अहिल्याने ठरवले, हे शिवलिंग, कसेही करून, वाचवायचेच. ती एकटीच, त्या शिवलिंगाचे, रक्षण करण्यासाठी, थांबली. खरं तर ते सैन्य, शिवाजी महाराजांचे, इंदोरचे सेनापती, मल्हारराव होळकर, यांचे होते. मल्हाररावांना, या मुलीला, एकटीला बघून आश्चर्यच वाटले. कोण आहे बरं, ही मुलगी. एकटीच, का थांबली आहे. त्यांनी जवळ जाऊन, चौकशी केली. अहिल्याने, बाणेदारपणे सांगितले, मी शिवलिंगाचे, रक्षण करत आहे. मल्हारराव होळकरांनी, अहिल्येच्या वडिलांना भेटून, त्यांच्याकडे, आपला मुलगा खंडेराव, याच्याशी लग्नासाठी, मागणी घातली. अहिल्येच्या मनात, तिची आई सीताबाई, हिचे चांगले विचार, रुजलेले होते. मल्हाररावांना, अशीच धैर्यवान, सून हवी होती. आणि चोंडीची अहिल्या, राणी अहिल्यादेवी होळकर झाली. मल्हाररावांनी, व खंडेरावांनी, अहिल्येला, राज्यकारभाराचे धडे दिले. काही दुर्दैवी घटनांमुळे, अचानकच, संपूर्ण राज्याची जबाबदारी, त्यांच्यावर आली. त्यांनी ती, अत्यंत हुशारीनी, आणि कुशलतेनी, सांभाळली. अहिल्यादेवी यांनी, काशी विश्वनाथ, सोमनाथ, महाकाल, यांसारखी अनेक देवस्थाने, पुन्हा बांधली. भक्तीच्या मार्गाने, भारत जोडला. प्रवाशांसाठी रस्ते, घाट, विहिरी, धर्मशाळा बांधल्या. यात्रेला सुरक्षित, आणि सुखकर बनवले. पर्यटन फुलवले. त्यांनी स्त्रिया, विधवा, यांना मदत,, आणि आदर दिला. गरीब, शेतकरी,—सर्वांसाठी समान, न्याय दिला. समतेचा संदेश दिला. “राजा मोठा नाही… न्याय मोठा!” हे सांगितले. म्हणून तर अजितदादांनी, बारामतीच्या मेडिकल कॉलेजचे नाव,“पुण्यश्लोक, अहिल्यादेवी, होळकर, मेडिकल कॉलेज” ठेवले आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर की, जयभारत माता की, जयजय हिंद. – विद्यावाचस्पति डॉ. अनिल मोकाशी (बालरोगतज्ञ)एमबीबीएस, एमडी, डीसीएच, एफआयएपी,पीएचडी (मुलांची वाढ व विकास)

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर Read Post »

Lakshmibai - The Rani of Jhansi

“मेरी झाँसी नहीं दूँगी!”

भारतीय इतिहासाच्या गोष्टी. – “मेरी झाँसी नहीं दूँगी!” मी मणिकर्णिका मोरोपंत तांबे.लहानपणीच तलवार, घोडेस्वारी, धनुष्य—सगळं शिकले.माझं लग्न १३ व्या वर्षी, झाशीचे राजा गंगाधरराव नवलकर यांच्याशी झालं.राणी झाल्यावरचं नाव: लक्ष्मीबाई. मी मुलगा दत्तक घेतला — दामोदरराव.एक दिवस इंग्रज म्हणाले,“तुमचा वारस नाही, झाशी आम्हाला द्या.”मी ठामपणे उत्तर दिलं:“मेरी झाँसी नहीं दूँगी!” झाशी माझं घर… माझा अभिमान.मी सैन्य तयार केलं — लहान मुलांना, स्त्रियांनाही लढायला शिकवलं.घोड्यावर बसून दोन तलवारांनी मी रणांगण गाजवलं. 1857 च्या भारताच्या पहिल्या स्वातंत्र्य युद्धात मी शेवटपर्यंत झुंज दिली — हा युद्ध ब्रिटिशांच्या अन्यायाविरुद्धचा एक भव्य उठाव होता. झाशीच्या या संघर्षाचा इतिहास आजही जिवंत आहे — झांसीमध्ये राणी महाल आहे, जिथे मी राहत होतो, आणि तो महाल आता संग्रहालय आहे. झाशीची राणी म्हणजे धैर्य, आत्मसन्मान आणि स्वातंत्र्याची मूर्ती. खूब लड़ी मर्दानी,वो तो झाँसी वाली रानी थी”— सुभद्रा कुमारी चौहानसिंहासन हिल उठे,राजवंशों ने भृकुटी तानी थी,बूढ़े भारत में आईफिर से नयी जवानी थी।गुमी हुई आज़ादी कीकीमत सबने पहचानी थी,दूर फिरंगी को करने कीसबने मन में ठानी थी।चमक उठी सन सत्तावन में,चमक उठी सन सत्तावन में,यह तलवार पुरानी थी,खूब लड़ी मर्दानी,वो तो झांसी वाली रानी थी।खूब लड़ी मर्दानी,वो तो झांसी वाली रानी थी।खूब लड़ी मर्दानी,वो तो झांसी वाली रानी थी! झांसी की रानी की जयभारतमाता की जयजय हिंद – विद्यावाचस्पति डॉ. अनिल मोकाशी (बालरोगतज्ञ)एमबीबीएस, एमडी, डीसीएच, एफआयएपी,पीएचडी (मुलांची वाढ व विकास)

“मेरी झाँसी नहीं दूँगी!” Read Post »

मी शिवाजीराजे भोसले बोलतोय…

मुलांनो, मी शिवाजीराजे भोसले बोलतोय… – मी सांगतोय स्वराज्य निर्मितीची गोष्ट. मुलांनो, मी शिवाजीराजे भोसले बोलतोय.माझं बालपण झालं शिवनेरी किल्ल्यावर.माझी आई जिजाऊ, रोज मला गोष्टी सांगायची — रामाची, कृष्णाची, भीमाची!त्या गोष्टींनी माझ्या मनात एक विचार पक्का झाला —“आपलं राज्य आपणच उभं करायचं!”तेव्हा जुलमी आक्रमक मोगल बादशहा, सुभेदार लोकांवर अन्याय करत होते.गावं जळत होती, माणसं घाबरलेली होती.मी ठरवलं — हा अन्याय थांबवायचाच!लहानपणीच मी घोड्यावर बसायला शिकलो, तलवार फिरवायला शिकलो.डोंगरावर चढायचो, मावळ्यांबरोबर खेळायचो — पण मनात एकच जिद्द होती.थोडा मोठा झालो, तेव्हा मी तोरणा किल्ला जिंकला.लोक म्हणाले, “हा बाळराजा मोठा राजा होणार आहे!”मी राजगडावर राजधानी बसवली.माझे मावळे — तानाजी, बाजी, नेताजी, येसाजी — हे माझे हात होते.आम्ही किल्ल्यांवर स्वराज्याचा झेंडा फडकवला.प्रतापगडावर अफझलखान आला.मी म्हटलं — “ आई भवानी, मी धर्मासाठी तलवार उचलतोय.”त्या दिवशी आमचा विजय झाला.तेव्हा सह्याद्रीच्या डोंगर दर्यांमध्ये एकच वाक्य घुमलं —“हर हर महादेव! जय भवानी! जय शिवाजी!”त्या आवाजात भीती नाही, स्वाभिमान होता!लोकांच्या मनात उमटलं — “हा आपला राजा आहे!”मुलांनो, आज मी सिंहासनावर नाही,पण मी स्वराज्याचं स्वप्न बघितलं, पूर्ण केलं आणि भारताला स्वराज्य शिकवलं. माझं स्वराज्य आजही तुमच्या मनात जगतंय.जेव्हा तुम्ही प्रामाणिकपणे, धैर्याने, इतरांसाठी काम करता,तेव्हा माझं नाव पुन्हा घुमतं — “जय भवानी! जय शिवाजी!” – विद्यावाचस्पति डॉ. अनिल मोकाशी (बालरोगतज्ञ)एमबीबीएस, एमडी, डीसीएच, एफआयएपी,पीएचडी (मुलांची वाढ व विकास)

मी शिवाजीराजे भोसले बोलतोय… Read Post »

बाल कल्याण केंद्राचा ऐतिहासिक टप्पा

बाल कल्याण केंद्राचा ऐतिहासिक टप्पा : RCI मान्यताप्राप्त CRE प्रशिक्षण कार्यक्रम यशस्वी कार्यक्रमाचा आढावा बाल कल्याण केंद्राच्या इतिहासात कालचा दिवस एक महत्त्वाचा आणि अभिमानास्पद ठरला.आमच्या संस्थेत प्रथमच रिहॅबिलिटेशन कौन्सिल ऑफ इंडिया (RCI) मान्यताप्राप्तकंटिन्यूइंग रिहॅबिलिटेशन एज्युकेशन (CRE) या तीन दिवसांच्या ऑफलाइन प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. ही घटना आमच्यासाठी केवळ कार्यक्रम नव्हती—तर ती संस्थेच्या विकासातील एक ऐतिहासिक पाऊल होते. ३०–३५ वर्षांचे स्वप्न साकार दिव्यांग क्षेत्रात कार्यरत असलेल्या बाल कल्याण केंद्राला RCI शी जोडणे हे माझे अनेक वर्षांपासूनचे मोठे स्वप्न होते.भूतकाळात RCI ने अनेकदा संपर्क साधला; पण व्यस्ततेमुळे मला संवाद पुढे नेणे शक्य झाले नाही. आणि हा टप्पा लांबला. या वर्षी, आमचे मूकबधिर शाळेचे, तरुण उत्साही पूर्ण वेळ वाचातज्ञ सौरभ मुळीक यांनी घेतलेल्या दृढ पुढाकारामुळे हे स्वप्न प्रत्यक्षात उतरले. महाराष्ट्रभरातून आलेल्या तज्ञांची उपस्थिती या CRE कार्यक्रमासाठी खालील विविध क्षेत्रांतील व्यावसायिकांनी बारामती येथे हजेरी लावली: एकूण जवळपास 50 कार्यरत व्यावसायिक तीन दिवस प्रशिक्षणासाठी उपस्थित होते. माझा वैयक्तिक समाधानाचा क्षण. “दिव्यांग क्षेत्रात को-करिक्युलर एज्युकेशन” या विषयावर मला तब्बल दोन तास व्याख्यान देण्याची संधी मिळाली.मी व्यवसायाने बालविकास तज्ञ असून, डिसेबल्ड मुलांच्या विकासात माझे ज्ञान व अनुभव उपयोगी पडावे म्हणून संस्थेच्या माध्यमातून शाळा सुरु केली. जरी शाळा अनेक दशके चालू असली तरीअशा दर्जेदार, समर्पित आणि ज्ञान मिळवायला उत्सुक श्रोत्यांसमोर बोलण्याची संधी प्रथमच मिळाली.हा अनुभव माझ्यासाठी अत्यंत आनंददायी ठरला. या एका कार्यक्रमामुळे बाल कल्याण केंद्राचे नाव महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचले — ही आमच्यासाठी मोठी उपलब्धी आहे. भावी वाटचाल : CRE कार्यक्रमांचा नियमित विस्तार अशा प्रकारचे CRE कार्यक्रम आपण वारंवार आयोजित करावेत,कारण शैक्षणिक व सामाजिक काम ही दीर्घकालीन गुंतवणूक असते. आंब्याचे रोप लावल्यानंतर लगेच फळे येत नाहीत;त्याला पाठपुरावा,वेळ, जपणूक आणि सातत्य लागते. त्याचप्रमाणे,आजचे कार्य ताबडतोब नफा किंवा परतावा देईल अशी अपेक्षा न ठेवता, निरपेक्ष वृत्तीने काम चालू ठेवणे महत्त्वाचे आहे. काही वर्षांत हा वृक्ष आणखी विशाल होईल.त्याची छाया महाराष्ट्रा पलिकडे भारतभर पसरत जाईल.असा मला ठाम विश्वास आहे. संस्थेच्या भविष्यातील प्रत्येक उपक्रमासाठी माझ्या मनःपूर्वक शुभेच्छा आणि संपूर्ण सहकार्य. Historical milestone of Bal Kalyan Kendra, Baramati: RCI accredited CRE training program successful Program Review Yesterday was an important and proud day in the history ofBal Kalyan Kendra, Baramati. For the first time in our organization, a three-day offline training program on Continuing Rehabilitation Education (CRE) accredited by the Rehabilitation Council of India (RCI) was organized. This event was not just a program for us—it was a historic step in the development of the organization. A dream of 30–35 years realized It was my big dream for many years to connect the Bal Kalyan Kendra, Baramati, which is working in the field of disability, with RCI.RCI contacted me many times in the past; but due to busy schedule, I was not able to take the dialogue further. And this phase was delayed. This year, this dream became a reality due to the strong initiative taken by Mr. Saurabh Mulik. Our hearing impaired school’s, young and dynamic full timer speech therapist. Experts from all over Maharashtra attended and addressed the CRE program The following professionals from various fields attended the CRE program in Baramati: My personal moment of satisfaction. I got the opportunity to give a two hour lecture on the topic of “Co-Curricular Education in the Field of disability ”. I am a child development expert by profession, and started the school through the organization to make my knowledge and experience useful in the development of disabled children. Although the school has been running for decades, this was the first time I got the opportunity to speak in front of such a quality, dedicated and knowledge seeker, experienced audience. I enjoyed the experience. This one program has made the name of the Bal Kalyan Kendra, Baramati, known to every corner of Maharashtra — this is a great achievement for us. Future path: Regular expansion of CRE programs We should organize such CRE programs frequently, Because educational and social work is a long-term investment. Mango saplings do not bear fruit immediately after planting; It requires follow-up, time, care, perseverance and consistency. Similarly, It is important to continue working with an unbiased attitude, without expecting that today’s work will yield immediate profit or returns. In a few years, this tree will become even bigger. Its shadow will spread beyond Maharashtra and across India. I firmly believe that. Best wishes My heartfelt wishes and full cooperation for every future initiative of the organization. 13/11/2025. – Dr. Anil Mokashi (Pediatrician)MBBS, MD, DCH, FIAP, PhD(Child Growth and Development)

बाल कल्याण केंद्राचा ऐतिहासिक टप्पा Read Post »

A mother and daughter embrace and point at the sunset in a grassy field.

Mother, You and Your Child

A Journey of Changing CareFor Mother’s Day and Beyond From the very first breath your child takes, you become a mother—not just in body, but in mind, in soul, in every heartbeat. And from that moment until your last breath, you remain one. Mothering is not just feeding and protecting. It is caring and guiding. It is learning how to let go just enough—at the right time, in the right way. At this stage, your child needs you for everything—nourishment, sleep, warmth, and love. Your touch, your voice, even your scent is their world. Mothering here means total presence. Your baby doesn’t understand language yet, but understands comfort, rhythm, and consistency. This is when your child begins to explore. They walk, talk, question. You are still their anchor, but you are also their mirror. They imitate you, test limits. Here, mothering is about setting gentle boundaries and encouraging curiosity. Let them try, fall, and get up—under your watchful eye. Now the world begins to enter your child’s life—teachers, friends, books. Mothering shifts. You’re no longer the only voice, but still the most trusted one. Teach routines, values, health habits, emotional control. Support learning, but don’t overdo it. Allow space to grow socially and intellectually. Here comes the storm of change—physical, emotional, social. This is when parenting becomes hardest and most important. Your child wants freedom, yet secretly still needs safety. Don’t just control—connect. Talk less, listen more. Trust them gradually. Discuss, don’t dictate. Give independence, but draw clear lines of responsibility. This is where the foundations of lifelong resilience are built. Your child starts stepping out—career, relationships, choices. You worry. But this is the time to shift from protector to advisor. You have prepared them. Now let them try. Be a strong, quiet presence in the background—available, but not intrusive. By now, your child may have become a parent. You’re still a mother, but your role is wise and light-handed. Let them find their own way. Offer experience without imposing. You have not stepped back; you have grown forward. The Golden Thread: Care That Changes with Time What remains constant is love. What must change is the way it is shown. Overprotection delays growth. Too much distance creates fear. The art of mothering lies in knowing when to hold and when to let go. You are not just raising a child—you are shaping a person who must learn how to live, grow, adapt, and thrive in the world. Celebrate yourself this Mother’s Day. Not for being perfect, but for being present. Not for always knowing the answer, but for always being there to help find it. Becoming a mother may be natural — but understanding the science of childhood is not automatic.No mother is born with complete knowledge or expertise.She learns, adjusts, makes mistakes, and relearns — because the child keeps changing, and so does life. Raising a child isn’t only about love and instinct; it includes a thoughtful understanding of the child’s body, mind, health, prevention, and disease management.A wise mother knows when to seek timely help from professionals who understand child development better — not because she’s weak, but because she’s responsible. To grow as the child grows, the mother too must keep learning — not only new skills, but new perspectives. – Dr. Anil Mokashi (Pediatrician)MBBS, MD, DCH, FIAP, PhD(Child Growth and Development)

Mother, You and Your Child Read Post »

Maharana Pratap

महाराणा प्रताप – स्वाभिमानासाठी झुंजणारा राजा

भारतीय इतिहासाच्या गोष्टी – महाराणा प्रताप: स्वाभिमानासाठी झुंजणारा राजा. महाराणा प्रतापसिंह सिसोदिया! मेवाडचा पराक्रमी राजा! शिवाजी महाराजांच्या शंभर वर्षे आधी महाराणा प्रताप होऊन गेले. महाराणा प्रताप यांनी अकबराशी संघर्ष केला. शिवाजी महाराजांनी अकबराचा नातू औरंगजेब याच्याशी संघर्ष केला. राणा प्रतापाने स्वाभिमानाची ज्योत पेटवली, आणि शिवाजी महाराजांनी त्या ज्योतीला स्वराज्याचं रूप दिलं. महाराणा प्रताप याच राज्य अरावलीच्या डोंगररांगांमध्ये हिरवाईनी, किल्ल्यांनी, आणि शूर लोकांनी भरलेलं होतं. दिल्लीचा बादशहा अकबर सगळं भारतभर आपलं साम्राज्य पसरवत होता. अकबर म्हणाला, “राणा, माझा मांडलिक हो, माझ्या दरबारात येऊन कुर्नीसात कर.” पण स्वाभिमानी राणा प्रतापने ठाम उत्तर दिलं –“मी माझ्या मातृभूमीचा राजा आहे. मी कोणाचा गुलाम होऊ शकत नाही!” अकबर मोठी फौज घेऊन आला. हल्दीघाटीचं युद्ध झालं! राणा प्रतापाच्या घोड्याचं नाव होतं चेतक. पांढरा शुभ्र, उमदा. राणा प्रतापाच्या तलवारी सारखा लखलखीत. शत्रूही घाबरायचे! पण लढाई असमान होती. राणाला जंगलात माघार घ्यावी लागली. तो हारला नाही! जंगलात, पर्वतावर, झोपडीत राहून त्याने पुन्हा सेना तयार केली. आपल्या प्रजेला वाचवलं. आपल्या मातीचा अभिमान जपला. तो सोन्याच्या थाळीत जेवला नाही. त्यानी बांबूच्या वाटीतून मुलांसोबत भाकरी खाल्ली. तो स्वाभिमानाचा राजा होता! जिंकणं म्हणजे नेहमी सिंहासन मिळवणं नाही. जिंकणं म्हणजे मनातला स्वाभिमान न गमावणं! राणा प्रताप यांनी भारताला “स्वराज्य” आणि “संघर्ष” शिकवला. “राणा का प्रताप अमर है, स्वाभिमान की ज्योति प्रखर है।” महाराणा ना होते, महाराणा ना होते, ना होता हिंदुस्तान, अगर महाराणा ना होते. ना होता हिंदुस्तान, अगर महाराणा ना होते. महाराणा प्रताप की जय.जय महाराष्ट्र.जय हिंद.भारत माता की जय. – Dr. Anil Mokashi (Pediatrician)MBBS, MD, DCH, FIAP, PhD(Child Growth and Development)

महाराणा प्रताप – स्वाभिमानासाठी झुंजणारा राजा Read Post »

Mom taking care about sick child

बाळाचा ताप-सर्दी-खोकला आणि आई

बाळाचा ताप-सर्दी-खोकला आणि आई बाळ आजारी पडले तर घरातील पहिली डॉक्टर आईच की! बाळाला ताप-सर्दी-खोकला झाला की पहिला प्रश्न येतो, आता काय करायचं? काळजी करण्यासारखं आहे की नाही, हे ठरवायचं कुणी. अर्थातच, आईनी. आईला जर वाटलं — “थोडं काळजी सारखं वाटतंय”, तर तिनं कुटुंबाला सांगायचं, आणि कुटुंबानं डॉक्टरकडे न्यायचं. हीच आपली कौटुंबिक मॅनेजमेंट साखळी. म्हणूनच, बाळाची पहिली जबाबदारी आईवरच असते. आणि त्यामुळे बाळाची आईला “माहितगार” होणे आवश्यक आहे. त्यासाठी महिन्यातून एकदा माहितगार बालरोगतज्ञाच्या संपर्कात, येणे आवश्यक आहे. सर्दी-खोकला (कॉमन कोल्ड) प्रत्येक माणसाच्या आयुष्यात हजार एक वेळा सर्दी-खोकला होतो. तो व्हायरसमुळे होतो. दरवेळी नवीन व्हायरस, म्हणजे नवी सर्दी. शरीर त्या व्हायरसशी लढतं, आणि त्याविरुद्ध प्रतिकारशक्ती तयार करतं. नवजात बाळाला सगळेच व्हायरस नवीन असतात. म्हणून पहिल्या वर्षी 10–12 वेळा सर्दी-खोकला होणं अगदी नॉर्मल आहे. मोठ्या मुलांना वर्षातून ५–६ वेळा, तरुणांना ३–४ वेळा, आणि वय वाढत जाईल तसं हे प्रमाण कमी होतं. सर्दी कशी होते आणि पसरते. सर्दी खोकला श्वासाने आणि स्पर्शाने पसरतो. कुटुंबात, शाळेत, प्रवासात, गर्दीत. म्हणूनच “मास्क वापरा, साथ टाळा.” कोरोना काळात आपण सगळ्यांनी मास्क वापरून आपले जीव वाचवले. अनेक आप्त स्वकीय जवळचे प्रेमाचे लोक देवा घरी गेले. पण अजूनही समाजाचे डोळे उघडले नाहीत. आजही सर्दी झाली तर कुणीही मास्क लावत नाही. अगदी डॉक्टर सुद्धा. मास्क लावण्याची प्रथाच, प्रचलित झाली नाही. खरे तर, बिनमास्कचे घर नको, बिनमास्कचा खिसा नको. हे आपले ब्रीदवाक्य व्हायला पाहिजे. सर्दी झाली की त्याला पहिला प्रतिसाद म्हणजे “मास्क वापरा” हा असायला हवा. घरात डिस्पोजेबल मास्कचा साठा हवा. डॉक्टर, शिक्षक, पालक — सगळ्यांनी ही मास्क संस्कृती रुजवायला हवी. ते त्यांचे सामाजिक कर्तव्य आहे. फळे, दही, थंड, खाल्ल्याने सर्दी होते हे खरे नाही. खोटे आहे. हा गैरसमज आहे! तो शेजारणीचा सल्ला आहे. किती पिढ्या आपण तो ऐकणार आहोत? कधीतरी डॉक्टरचे ऐका. विज्ञानाचे ऐका. सर्दी खाण्या-पिण्याने होत नाही. फळं, दूध, दही बंद करण्याची गरज नाही. उलट अन्नपाणी तोडल्याने बाळाचं नुकसानच होतं. बाळ उशिरा बरं होतं. सर्दीची लागण झाल्यावर शरीरात काय घडतं? व्हायरस शरीरात शिरतात आणि वेगाने वाढतात. दर 20 मिनिटांनी त्यांची संख्या दुप्पट होते! म्हणजे एका दिवसात कोट्यवधी व्हायरस शरीरात वाढतात. मग साधं संक्रमण “आक्रमणात” बदलतं. ही खरी लढाई आहे. आक्रमक व्हायरस विरुद्ध आपल्या प्रतिकारशक्तीची सेना. युद्धभूमी बाळाचे शरीर. काळजी सारखी सर्दी आहे की नाही, कसे ओळखावे. बाळ ताप-सर्दी-खोकल्यातही खेळतंय, खातंय, टवटवीत दिसतंय? तर विशेष काळजी नाही. पण बाळ गळून गेले आहे, निस्तेज आहे, बॅटरी डाउन झाली आहे, खात नाही, लघवी कमी होते, दम लागतोय, श्वास फास्ट आहे, बरगड्या आत खेचतायत. हा धोक्याचा इशारा आहे. बाळ झोपलं असताना एका मिनिटात 40 पेक्षा जास्त श्वास घेत असेल — डॉक्टरकडे जा. 60 पेक्षा जास्त — आजच दाखवा. 80 पेक्षा जास्त — आत्ताच हॉस्पिटलमध्ये न्या. श्वास घेताना नाकपुड्या हलत असतील, नखे किंवा ओठ निळसर दिसत असतील — जीवाचा धोका आहे. तात्काळ वैद्यकीय मदत घ्या. आजारी बाळाचे अन्न तोडणे पाप आहे. नेहमीचा आहार, खाणं-पिणं चालू ठेवा. द्रव पदार्थ भरपूर द्या. पाणी पाजा. आईचं दूध ओढता येत नसेल तर पिळून चमच्याने पाजा. थोडं थोडं, जास्त वेळा खाऊ घाला. श्वास मार्गाचे आजार आणि घरगुती उपचार घसा धरला तर मिठाच्या पाण्याच्या गुळण्या करा. कान ओला असेल तर कोरडा करा — औषधापेक्षा उपयोगी. मध, तुळस, आलं, लिंबू – हे घरगुती उपचार सुरक्षित असतात. औषध म्हणजे दुधारी शस्त्र सर्दी-खोकला बहुतेक वेळा आपोआप बरा होतो. निसर्गच त्याला बरे करतो औषधे क्वचितच लागतात. गरज नसताना दिलेल्या चुकीच्या धोकादायक औषधापेक्षा औषध न दिलेले जास्त चांगले. अँटीबायोटिकने व्हायरल सर्दी बरी होत नाही. पण आपल्या नेहमीच्या विश्वासाच्या डॉक्टरांनी दिल्यास त्यांच्या सल्ल्याने पूर्ण कोर्स घ्यावा. सर्दी होऊ नये म्हणून. सहा महिने फक्त आईचं दूध. पौष्टिक चौरस आहार ✅सरकारी + खाजगी, सर्व लसी वेळेवर ✅अ जीवनसत्वाचे डोस ✅मास्क आणि स्वच्छतेची सवय. बाळाच्या ताप-सर्दी-खोकल्यात आई म्हणजे पहिली डॉक्टर, पहिली नर्स, पहिली काळजीवाहक. माहिती हीच शक्ती. आई माहितगार झाली की घर सुरक्षित होतं. “मास्क वापरा, साथ टाळा.” बाळाची काळजी घ्या — पण घाबरू नका. निसर्ग, प्रतिकारशक्ती आणि आत्मविश्वास असलेली आई हीच खरी औषधं. – विद्यावाचस्पति डॉ. अनिल मोकाशी (बालरोगतज्ञ)एमबीबीएस, एमडी, डीसीएच, एफआयएपी,पीएचडी (मुलांची वाढ व विकास)

बाळाचा ताप-सर्दी-खोकला आणि आई Read Post »

Scabies in Child

Scabies (खरुज): A Family Skin Infection You Shouldn’t Ignore

Scabies Is caused by insects mites. Mites burrow tunnels into the skin. They lay eggs, leave poop : excreta, inside the tunnels. Allergy to mite, eggs or poop causes small itchy bumps and blisters. What to do. Scabies is a disease of family. Treating one child may not solve the problem. —————————— खरुज करणाऱ्या किड्यांना माइट्स असे म्हणतात. खरुज लहान मोठ्या कोणालाही होऊ शकते. रोज स्वच्छ आंघोळ करणाऱ्यांनाही खरूज होऊ शकते. खरजेचे किडे कातडी मध्ये स्वतःसाठी बोगदे खोदतात. अंडी घालतात, शी करतात. बोगद्यांच्या आतील किडे, अंडी किंवा शी च्या ऍलर्जीमुळे लहान खाज सुटते. कातडीवर पुरळ येते. फोड येतात. १. खाज सुटणे. (ही एक संवेदना sensation आहे) रात्री वाढते.२. पुरळ, कातडीच्या वर उठून दिसणारे.३. लांब, दोरीसारखे, एकमेकांना जोडलेले, किंवा वळणावळणाचे. लालसर.४. जाड, खवले, ओरखडे असलेली कातडी.(खाजवून ओरखडे येणे ही एक कृती action आहे)५. लहान मुले चिडचिड करतात. किरकिर करतात, रडतात.६. शरीराच्या कोणत्याही भागावर खरजेचे पुरळ येऊ शकतात.७. हातांवर (बोटांमधील खोबणी)८. मनगट, कोपर, हाताखाली. काखेत.९. कंबर, जांघेत.१०. मुलांचे डोके, चेहरा, मान, तळहात, तळपाय.११. खरुज हा संपूर्ण कुटुंबाचा आजार आहे. तो संसर्गजन्य आहे. एकमेकांचा एकमेकांना लागतो. स्पर्श, कपडे, अंथरुण पांघरूण , शाळेत, मोठ्या एकत्र कुटुंबात तो पसरतो. आईने काय करावे. १. माइट्स किड्यांवर उपयुक्त क्रीम किंवा लोशन. (सुरक्षिततेसाठी लोशन लहान मुलांचे हात पोचणार नाहीत असे उंचावर ठेवा) फक्त डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच औषध घ्या. डॉक्टर बेंझिल बेंझोएट किंवा परमेथ्रिन मलम किंवा क्रीम देऊ शकतात. २. औषध लावण्यापूर्वी मुलाच्या अंगावरील सर्व कपडे काढून मुलाला उघडे करणे आवश्यक आहे. संपूर्ण अंगाला लावा (मानेखाली, पायाच्या नखापर्यंत, मागून पुढून). रोज रात्री झोपण्याआधी. (८ ते १० तास त्वचेच्या संपर्कात). सकाळी आंघोळ घाला. स्वच्छ कपडे घाला. इस्त्री केली तर फारच छान. कपडे निर्जंतुक होतात. किडे व त्यांची अंडी देखील मरतात. सलग ३ दिवस औषध लावा. ३. नखे कापून बोटांच्या टोकांवर औषध लावा. ४. खरूज म्हणजे स्केबीज चे निदान बरोबर असेल तर २४ तासांनंतर नवीन पुरळ यायला नको. ५. गरज पडल्यास पंधरा दिवसांनी परत एकदा औषध लावावी लागते. गरज पडल्यास असे तीन वेळा लावता येते. ६. कधीकधी खाज कमी करण्यासाठी औषध द्यावे लागते. ७. खरुज टाळण्यासाठी, कुटुंबातील सदस्यांना, जवळच्या मित्रांना लक्षणे नसली तरीही त्वचेचे औषध लावा. कपडे गरम पाण्यात शक्यतो उकळत्या पाण्यात धुवा, उन्हात वाळवा. इस्त्री करा. त्यामुळे खरुज आजार निर्माण करणारे किडे, माइट्स, त्यांची अंडी मरतात. ८. पू, सूज, जिवाणू bacteria संसर्ग असल्यास, डॉक्टर अँटीबायोटिक्स देऊ शकतात. खरुज हा कुटुंबाचा आजार आहे.फक्त एखाद्या मुलावर उपचार करून प्रश्न सुटणार नाही. – Dr. Anil Mokashi (Pediatrician)MBBS, MD, DCH, FIAP, PhD(Child Growth and Development)

Scabies (खरुज): A Family Skin Infection You Shouldn’t Ignore Read Post »

आईबाबांनो, भांडा पण जरा जपून. मुलं शिकताहेत !

आई वडोलांचे भांडण ही मुलांची जागतिक समस्या आहे. भांडण बघतांना मुलांच्या रक्तात कॉर्टिसॉल नावाचे तणाव निर्माण करणारे इंद्रीयकियाप्रवर्तक (हारमोन) वाढते. मुलाला असुरक्षित वाटू लागते. वादविवाद, शिव्याशाप, धक्काबुक्की, मारहाण, फेकाफेकी अशा घटना वारंवार घडल्यास त्यांच्या मनावर, शिक्षणावर गंभीर व कायमस्वरूपी परिणाम होतो. आईवडीलांच्या भांडणात मुलं काळजीनी घेरली जातात. घाबरतात, भेदरतात. त्यांना वाटतं त्यांच्या मुळेच भांडण होत आहेत. त्यांच्यात अपराधीपणाची भावना निर्माण होते. आईवडील विभक्त होतील, घटस्फोट घेतील अशी त्यांना भिती वाटते. या तणावाखाली ती शाळेपेक्षा भांडणावरच आपलं लक्ष केंद्रीत करतात. वर्ग पुढे जातो. ती अभ्यासाात मागे पडतात. एकाग्रता कमी होते. अवधान काळ कमी होतो. त्यांची वर्तणूक बदलते. एकलकोंडी होतात. हसत नाहीत. कशात रस घेत नाहीत. हरवतात. चिडचिड, उलट बोलणे, उध्दटपणा, बेफिकीर वृत्ती, कुठेही दुखणे, अस्वस्थता, नैराश्य, नखे खाणे, गादी ओली करणे, बोबडेपणा, शाळा बुडविणे, आक्रमकता, इतरांशी न पटणे अशा पायरी पायरीने गंभीर मानसिक समस्या येवू लागतात. मुलांच्या शैक्षणिक पिछेहाटीसाठी, वर्तणूक समस्यांसाठी मुलांना दोष देण्याआधी त्यात कौटूंबिक भांडणाचा भाग किती याचा विचार करायला हवा. आई वडिलांनी भांडतांना स्वतःवर मर्यादा घालून घ्यायला हव्या. त्या पाळायला हव्या. भांडणप्रसंगी काय करावे:शांत रहावे. एक ते दहा आकडे म्हणून रागावर ताबा मिळवावा.राग शांत झाल्यावर समस्येवर चर्चा करावी.मोजून मापून, स्पष्टपणे योग्य शब्दात बोलावे.माफी मागायला व माफ करायला शिकावे.सहसंमतिने मधूनच ‘पाणी’, ‘चहा’, ‘इतर’ यासाठी ‘भांडणविश्रांती’ घ्यावी. भांडणप्रसंगी काय करू नये:मारहाण, धक्काबुक्की, धमकावणे नको.शिवीगाळ, निंदानालस्ती, सात पिढयांचा उध्दार नको.निघून जावू नये. त्यानी प्रश्न सुटत नाही.किंचाळून खेकसून बालणे नको. जाहीर भांडण नको.मुलांना भांडणात ओढायला नको.फक्त वयस्कांचे ‘लैंगिक’, ‘पैसे’, ‘सासुरवाडी’ असे विषय मुलांसमोर नको.जुन्या चुका, जुने मुददे उकरून उकरून भांडण नको. थोडीशी नोकझोक, वादविवाद हवेच. तो संसाराचाच एक भाग असतो. अगदी बंद दाराआड कुजबुजत भांडायची काही गरज नाही. आपल्या रागाला कुणाशी तरी बोलून वाट मोकळी करून देणं आवश्यक असतं. कुटूंबियांनी आपल्या भावना एकमेकांजवळ व्यक्त करायला हव्या. रागाच्या भरात बोललेलं सगळचं खरं नसतं हे मुलांना सांगायला हवे. कितीही भांडले तरी आईवडील एकमेकांवर प्रेम करतात हे त्यांना समजायला हवे. मुलांनी आई वडीलांना भांडतांना बघितल्यावर जुळवून घेतानाही बघायला हवे. त्यातून ते तडजोड किती जीवनावश्यक आहे, जुळवून कसे घ्यावे हे धडे शिकतील. पण भांडणं वारंवार, जास्त काळ चालणारी, जास्त तीव्रतेची होवू लागली तर सल्ला घ्यावा. दोघांचाही विश्वास असेल अशा वडीलधा-यांचा किंवा मानसशास्त्रज्ञाचा सल्ला घ्यावा. त्यातच संपूर्ण कुटूंबाचं हित आहे. भांडणाचं मूळ कारण शोधण्याचा प्रयत्न करावा. आर्थिक समस्या, दारूचं हाताबाहेर गेलेलं व्यसन, जुगार, पावित्रयाबद्दल शंका असे प्रश्न समुपदेशनातून उघड होतात व त्यांचे निवारण करता येते. म्हणून म्हणतो, आईबाबांनो, भांडा पण जरा जपून, तुमची मुलं बघताहेत, ऐकताहेत, शिकताहेत. – विद्यावाचस्पति डॉ. अनिल मोकाशी (बालरोगतज्ञ)एमबीबीएस, एमडी, डीसीएच, एफआयएपी,पीएचडी (मुलांची वाढ व विकास)

आईबाबांनो, भांडा पण जरा जपून. मुलं शिकताहेत ! Read Post »

संत तुकाराम म्हणजे भक्ती

संत तुकाराम म्हणजे भक्ती. भारतीय इतिहासाच्या गोष्टी. देहूचे संत तुकाराम म्हणजे भक्ती. संत तुकाराम म्हणजे अभंग. तुकारामाची पालखी. पालखी मार्ग. भक्तीचा मार्ग. पंढरपूरची वारी. चालत चालत. अभंग गात. जे का रंजले गांजलेत्यांसी म्हणे जो आपुलेतोची साधू ओळखावादेव तेथेची जाणावा. लहानपण देगा देवातोची मुंगी साखरेचा रवा.लहान वयातच देवावर प्रेम करायला सुरुवात करा. ऐरावत रत्न थोरत्यासी अंकुशाचा मारजया अंगी मोठेपणतया यातना कठीण मोले घातले रडायानाही आसू नाही मायाऐसा भक्तीवेड कायरंग बेगडीचा न्यारा पांढऱ्या शुभ्र कापसाच्या फुलावर कुठलाच मळकट रंग नसतो. भक्तीचं वेड असलेल्या माणसाचं मन साफ आणि सुंदर असतं. पांडुरंग पांडुरंगपांडुरंग पांडुरंगपांडुरंग पांडुरंगपांडुरंग पांडुरंग बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठलकरावा विठ्ठल, जिवभावे. बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठलबोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठलबोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठलबोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल विठ्ठल-विठ्ठल, विठ्ठल-विठ्ठलविठ्ठल-विठ्ठल, विठ्ठल-विठ्ठलविठ्ठल-विठ्ठल, विठ्ठल-विठ्ठलविठ्ठल-विठ्ठल, विठ्ठल-विठ्ठल संत तुकाराम महाराज की जयपंढरीनाथ महाराज की जयएकनाथ महाराज की जयनामदेव महाराज की जयज्ञानेश्वर महाराज की जय जय महाराष्ट्रजय हिंदभारतमाता की जय – विद्यावाचस्पति डॉ. अनिल मोकाशी (बालरोगतज्ञ)एमबीबीएस, एमडी, डीसीएच, एफआयएपी,पीएचडी (मुलांची वाढ व विकास)

संत तुकाराम म्हणजे भक्ती Read Post »

Caring for Children with Different Needs

A child who is difficult to raise or educate is sometimes called a problem child. Many children do not develop or learn like others. They are different. They are special. They have special needs. “Special” does not necessarily mean abnormal. There are many special children around. SPECIAL CHILDREN The list is unending. It is a community pediatric problem. The causes of such difficulties are classified according to etiological factors: A pediatrician is the first contact person in case of any childhood problem, health or otherwise. He is supposed to identify and institute remedial measures. Calling any problem multidisciplinary is sometimes counterproductive. When everybody is responsible, in fact nobody is responsible. Here comes the role of child advocacy. Family and community connections with schools are many times the answer to educational needs of children with difficulties. SPECIAL PROBLEMS Formal education is designed for typical children, in typical families, in a typical community. Special needs children in formal school get the label of scholastic backwardness. “If he cannot learn the way we teach, we should teach the way he can learn.” That is the guiding principle of special schools. We need to identify the cause of “Red Lines in School Progress Card” and institute remedial measures. Special education in essence is remedial education. It is individualized education. Because of difficulties faced by special children, a formal school cannot cope with their needs. They need a special school. It is not enough to identify the branch as ‘special education’, or to call the teachers ‘special education graduates’. Special facilities with special syllabus and special curriculum need to be evolved. SPECIAL SCHOOL There are few schools for children with mental retardation and hearing impairment. Still fewer for the blind. There are hardly any facilities for slow learners, dyslexics, autistics. In many places these special children are grouped with children having intellectual disability. The flaw lies in government rules. Government wants to report all special children as mild intellectually disabled. Special schools need special teachers, smaller classes, capacity-building curriculum, developmental atmosphere (not just academic), audio-visual aids, do-it-yourself mode of learning, multisensory teaching programs (our specialty). A child needs 4 hours academic & 2 hours developmental syllabus. Extracurricular activities should be considered curricular activities. What he can do is more important than what he knows. Teach them doing things. Developmental syllabus promotes action. OPEN EDUCATION AND NIOS Open education is adjustable to the needs of an individual special child. It is non-competitive. The rat race for marks is eliminated. So are extra tuitions, extra homework, frustration, and resulting humiliation. With the help of open education a special child can enjoy learning. National Institute of Open Schooling (NIOS) has given us this opportunity to bring smiles on the faces of special children and their parents. NIOS is a statutory body established by the Human Resource Ministry of Government of India. It is like CBSE or SSC board. It is established for children who cannot attend formal school. Special children also cannot attend formal school. They do not like ‘this school’; the school does not like ‘this child’. Both struggle with each other. Best of the schools wait for a second-time failure and hand over the school leaving certificate. What happens to the child is none of their business. It is not their fault. They are not equipped to handle the child. NIOS Open Basic Education offers 3rd, 5th, 8th standard courses. Examination is conducted locally by our school. The 10th and 12th examinations are conducted by NIOS at national level. NIOS has special schemes for handicapped and disadvantaged children. They have vocational subjects in academic curriculum. That is the revolution. Students have the freedom to choose their subjects. They can pass 10th & 12th without Math, Science, and English. 60 percent of children fail in S.S.C. / H.S.C. All of them fail in these three subjects only. A small businessman, trader, service provider, electrician, plumber, building contractor, hotel owner, farmer, sportsman, singer, photographer needs to pass 12th but need not get stuck with Mathematics, Physics, Chemistry, and English. But he needs to be a graduate. Open education has opened the gates for him. Home science teaches adequate science. Subjects like typing, word processing, business studies are useful for life. Five subjects option, credit accumulation facility, direct registration facility – all are novel, extremely useful concepts. The disability sector needs to revise its orientation and fit their curricula in NIOS format. At Baramati we have done just that. – Dr. Anil Mokashi (Pediatrician)MBBS, MD, DCH, FIAP, PhD(Child Growth and Development)

Caring for Children with Different Needs Read Post »

Scroll to Top