Dr. Anil Mokashi

A child in a red bow tie enjoys a healthy meal with vegetables indoors.

चांगल्या बाल आहाराचे सहा नियम

(Six Rules of Good Infant Nutrition) बालकाचा पहिला आहार हा त्याच्या आयुष्यभराच्या आरोग्याची पायाभरणी करतो. योग्य वेळी योग्य आहार मिळाला तर बाळाची वाढ, मेंदूचा विकास आणि रोगप्रतिकारशक्ती उत्तम राहते. बालरोगतज्ज्ञ म्हणून माझ्या अनुभवातून सांगतो – चांगल्या बाल आहाराचे काही साधे पण अत्यंत महत्त्वाचे नियम आहेत. १. पहिले सहा महिने – फक्त आईचे दूध बाळाला जन्मानंतर पहिले सहा महिने फक्त आईचे दूध द्यावे.या काळात पाणी, मध, गोड पाणी किंवा इतर कोणतेही अन्न देण्याची गरज नसते. आईचे दूध हेच बाळासाठी संपूर्ण आणि सर्वोत्तम अन्न आहे. २. सहाव्या महिन्यापासून खीर सुरू करा सहा महिने पूर्ण झाल्यावर बाळाला पूरक आहार (Complementary feeding) सुरू करावा. खीर देताना काही गोष्टी लक्षात ठेवा: खिरीत साधारणतः: चमचा वाकडा केल्यानंतर खीर वाहून जाऊ नये इतकी घट्ट असावी. पातळ अन्न – पातळ बाळ.घट्ट अन्न – घट्ट बाळ. ३. खिरीत प्रथिने (Protein) घाला बाळाच्या वाढीसाठी प्रथिने अत्यंत आवश्यक असतात. खिरीत खालील पदार्थ मिसळू शकता: घरी जे काही प्रोटीनयुक्त अन्न शिजवलेले असेल ते वाटून किंवा कुस्करून खिरीत मिसळा. आहारात मिश्रण आणि बदल असणे महत्त्वाचे आहे. ४. भाज्या आणि फळे घाला खिरीत बदल करून भाज्या आणि फळे घालावीत. यामुळे बाळाला: मिळतात आणि आहार संतुलित होतो. ५. दिवसातून चार वेळा पूरक आहार सहा महिन्यांनंतर बाळाला दिवसातून चार वेळा खीर द्यावी. वेळा साधारणतः: या व्यतिरिक्त इतर वेळी आईचे दूध द्यावे. ६. आजारी बाळाचे अन्न तोडू नका बाळ आजारी असताना अनेकदा अन्न कमी केले जाते.हे चुकीचे आहे. आजारी बाळाला अन्न देत राहणे आवश्यक आहे. अन्न बंद केल्यास: सातूचे पीठ – एक पौष्टिक पारंपरिक आहार (Sattu Flour – A Traditional Nutritious Food) सातू म्हणजे विविध धान्ये आणि कडधान्यांचे पौष्टिक मिश्रण. सातू बनवण्यासाठी सात घटक १. जवस२. गहू३. तांदूळ४. मका५. हरभरा६. मुग७. मटकी बनवण्याची पद्धत चव वाढवण्यासाठी: घालू शकता. हे सातूचे पीठ ६ महिन्यांच्या बाळापासून १०० वर्षांपर्यंत सर्वांसाठी पौष्टिक आहार आहे. जगातील सर्व आयांनी चांगल्या बाल आहाराचे हे नियम पाळले तर कुपोषण मोठ्या प्रमाणात कमी होऊ शकते. बाळाच्या आईने कोणते नियम मोडले आहेत हे समजून घेऊन त्या चुका सुधारण्यास डॉक्टरांनी मदत करावी.म्हणजे बाळाचे वजन वाढू लागते आणि आरोग्य सुधारते. – विद्यावाचस्पति डॉ. अनिल मोकाशी (बालरोगतज्ञ)एमबीबीएस, एमडी, डीसीएच, एफआयएपी,पीएचडी (मुलांची वाढ व विकास)

चांगल्या बाल आहाराचे सहा नियम Read Post »

Dr. Anil Mokashi telling stories to children

भारत एक सोने की चिडिया थी, हम फिर बनायेंगे

भारतीय इतिहासाच्या गोष्टी – “भारत एक एक सोने की चिडिया थी, हम फिर बनायेंगे.” एक गाव होते छोटेसे.बारामतीसारखे आपलेसे. देवांश नावाचा मुलगा.तिसरीत शिकणारा. त्याला गोष्टी आवडायच्या.भारतीय इतिहासाच्या गोष्टी. एक दिवस त्याला प्रश्न पडला.इतिहास शिकायचा कशाला? तो सरांकडे गेला.सर म्हणाले, “भारत सोने की चिडिया होता.”“लोक शिस्तीत जगत.”“काम प्रामाणिक करत.”“शेती, व्यापार फुलले.”“जगभरातून विद्यार्थी मूल्य शिक्षणासाठी उच्च शिक्षणासाठी भारतात येत.”“पण आपण ढिले पडलो.”“भांडणं वाढली.”आपण एकमेकांपासून दूर गेलो.”“परकीय आक्रमकराज्य करू लागले.”“देश गुलाम झाला.” देवांश शांत ऐकत होता.त्यांनी विचारलं,“आता काय करायचं?”सर म्हणाले, “स्वतः बदलायचं.”“खोटं बोलायचं नाही.”“नियम पाळायचे.”“देशाची मालमत्ता जपायची.”“चुकीला साथ द्यायची नाही.”“स्वतः चांगले व्हायचे.”“समाज आपोआप चांगला होईल.”“समाज चांगला झाला की,”“देश पुन्हा सोने बनेल.” देवांशने मुठ आवळली.सगळी मुले उभी राहिली.आवाज घुमला — “नन्हे मुन्ने बच्चे तेरी मुट्ठी में क्या है?मुट्ठी में है तक़दीर हमारी.हमने किस्मत को बस में किया है.” देवांश हसत होता.त्याच्या मुठीत भविष्य होते.“भारत माझा देश आहे.”“मी त्याचा जबाबदार नागरिक आहे.” भारत माता की जयजय हिंद – विद्यावाचस्पति डॉ. अनिल मोकाशी (बालरोगतज्ञ)एमबीबीएस, एमडी, डीसीएच, एफआयएपी,पीएचडी (मुलांची वाढ व विकास)

भारत एक सोने की चिडिया थी, हम फिर बनायेंगे Read Post »

Congenital Hearing Loss

Congenital Hearing Loss: कानाबरोबर शरीरातील इतर संकेतही ओळखा

Most common co-morbidities of congenital hearing impairment Clinically, when we see a child with congenital hearing impairment, we should almost automatically think — “What else should I actively look for?” Here are the 5 most common co-morbidities you’ll encounter in practice: 1️⃣ Speech and Language DelayThis is the most universal and predictable co-morbidity.Expressive language delayReceptive language difficultiesArticulation disordersEven mild bilateral loss can significantly affect phonological development if not identified early.Early amplification + auditory-verbal therapy changes the trajectory dramatically. 2️⃣ Developmental Delay (Global or Specific) Especially in syndromic cases or children with:Congenital infectionsHypoxic injuryGenetic syndromesMotor delay may coexist, particularly in children with vestibular dysfunction (inner ear involvement). 3️⃣ Visual ProblemsVery important and often under-screened. Refractive errorsRetinitis pigmentosa (e.g., in Usher syndrome)Structural eye anomaliesBecause hearing-impaired children rely heavily on visual input, even minor visual defects become functionally significant. 4️⃣ Cardiac AnomaliesSeen in syndromic conditions like:Jervell and Lange-Nielsen syndrome (long QT + deafness)CHARGE syndromeDown syndromeAn ECG is not a luxury in bilateral congenital SNHL — it’s prudent. 5️⃣ Thyroid and Metabolic DisordersParticularly:Pendred syndrome (hearing loss + thyroid dysfunction)Iodine metabolism defectsSome inborn errors of metabolismThyroid screening is often overlooked in rural setups.Bonus (Very Common in NICU Graduates)Cerebral palsyAutism spectrum disorderLearning disordersNot rare in children with risk factors like prematurity, hyperbilirubinemia, or perinatal asphyxia. A Practical Pediatric Take-HomeWhen you diagnose congenital hearing impairment, think in 3 directions simultaneously: SCREENING CHECKLISTFor Special Teachers in Hearing-Impaired Schoolsश्रवणदोष असलेल्या मुलांच्या शाळेतील विशेष शिक्षकांसाठी तपासणी यादी (If repeatedly observed, inform parents and advise medical review.)(वारंवार दिसल्यास पालकांना कळवा व वैद्यकीय तपासणी सुचवा.) 1) VISION CONCERNS | दृष्टीसंबंधी अडचणी 2) SPEECH & COMMUNICATION | भाषा व संवाद 3) DEVELOPMENT & LEARNING | विकास व शिक्षण 4) BALANCE & MOTOR SKILLS | समतोल व हालचाल कौशल्य 5) CARDIAC WARNING SIGNS | हृदयासंबंधी लक्षणे 6) GROWTH & THYROID CONCERNS | वाढ व थायरॉईड संदर्भातील अडचणी URGENT REFERRAL NEEDED | तात्काळ डॉक्टरांकडे पाठवा Note for Teachers:If something feels unusual for this child, trust your observation and inform parents and authorities. शिक्षकांसाठी सूचना:मुलामध्ये काही वेगळे किंवा असामान्य वाटल्यास, आपल्या निरीक्षणावर विश्वास ठेवा आणि पालकांना व वरिष्ठाना कळवा. – विद्यावाचस्पति डॉ. अनिल मोकाशी (बालरोगतज्ञ)एमबीबीएस, एमडी, डीसीएच, एफआयएपी,पीएचडी (मुलांची वाढ व विकास)

Congenital Hearing Loss: कानाबरोबर शरीरातील इतर संकेतही ओळखा Read Post »

man & child

“लहान मूल” ही “मोठ्या माणसा”ची छोटी प्रतिकृती नसते!

हे बालपणाच्या विज्ञानाचं मूलभूत तत्व आहे.गर्भधारणेच्या पहिल्या दिवसापासून ते मुलगा “पुरुष” आणि मुलगी “स्त्री” होईपर्यंत, हा विचार लागू राहतो.बालपणाच्या प्रत्येक टप्प्यात हे समजून घेणं फार महत्त्वाचं असतं.बालरोगतज्ज्ञांना हे चांगलंच माहीत असतं. पण त्यातील काही गोष्टी पालकांना आणि कुटुंबालाही समजायला हव्यात.मुलांची जबाबदारी घेताना, प्रत्येक टप्प्यात त्यांच्या गरजा, शरीर, मन आणि विकास समजून घेणं आवश्यक असतं. १. शरीररचना आणि कार्यातील फरक (Anatomy and Physiology) २. औषधोपचारातील फरक (Pharmacology) ३. विकासाचे टप्पे (Developmental Stages) जसं फुलपाखराला अंड्यापासून फुलपाखरूपर्यंत टप्पे असतात,तसं माणसाच्या जीवनातही विकासाचे टप्पे असतात: गर्भावस्था०-९ महिनेशरीर व मेंदूची प्राथमिक घडण नवजात०–२८ दिवसश्वसन, तापमान नियंत्रण, स्तनपानशैशव१ महिना – २ वर्षेवेगाने शारीरिक वाढ, भाषा विकास शालेयपूर्व२ – ५ वर्षेहालचाली, सवयी, भावबंध शालेय वय६ – १२ वर्षेबौद्धिक, सामाजिक वाढ किशोरावस्था१२ – १८ वर्षेलैंगिक परिपक्वता, स्व-ओळख तारुण्य व वृद्धावस्थापुढे…जबाबदाऱ्या, मानसिक समतोल ४. मानसिक आणि सामाजिक गरजा जागरूक पालकत्वासाठी टिप: “आजारी पडलं की डॉक्टर” हे जुने धोरण आता पुरेसं नाही.“मुलासाठी डॉक्टर” हेच नव्या काळाचं योग्य धोरण! शुभेच्छा – जागरूक पालकत्व, निरोगी बालपण! – विद्यावाचस्पति डॉ. अनिल मोकाशी (बालरोगतज्ञ)एमबीबीएस, एमडी, डीसीएच, एफआयएपी,पीएचडी (मुलांची वाढ व विकास)

“लहान मूल” ही “मोठ्या माणसा”ची छोटी प्रतिकृती नसते! Read Post »

beach, yoga, sunset, silhouette, person, yoga pose, shore, seashore, sea, ocean, meditate, meditation, pose, balance, calm, nature, tranquil

योगशास्त्र शिक्षणाची नवी दिशा — बारामतीत बी.ए. (योग) व एम.ए. (योग) अभ्यासक्रम उपलब्ध

रोजगाराच्या विविध संधी उपलब्ध महाराष्ट्र शासन व विद्यापीठ अनुदान परिषदेच्या (UGC) मान्यताप्राप्त कविकुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठाशी संलग्न बारामतीतील पहिल्या योग महाविद्यालयात शैक्षणिक वर्षापासून योगशास्त्र विषयातील बी.ए. (योग) आणि एम.ए. (योग) हे अभ्यासक्रम सुरू होत आहेत. हे अभ्यासक्रम जीवनविद्या योग आयुर्वेद फाउंडेशन आणि इन्स्टिट्यूट ऑफ रूरल पेडियाट्रिक (बाल कल्याण केंद्र), बारामती यांच्या वतीने राबविले जाणार आहेत. आजच्या धकाधकीच्या जीवनात आरोग्य टिकवण्यासाठी आणि निरामय जीवन जगण्यासाठी योगसाधनेची नितांत आवश्यकता आहे. योगशास्त्राचा उपयोग केवळ शारीरिक स्तरावर मर्यादित नसून तो मानसिक आणि अध्यात्मिक स्तरावरही अत्यंत महत्त्वाचा आहे. त्यामुळे योगशास्त्राचा सर्वांगीण आणि सखोल अभ्यास होणे गरजेचे आहे. याच उद्देशाने हे अभ्यासक्रम सुरू करण्यात येत आहेत, अशी माहिती डॉ. अनिल मोकाशी यांनी दिली. आज संपूर्ण जग योगशास्त्राकडे एका चिकित्साशास्त्राच्या दृष्टिकोनातून पाहू लागले आहे. त्यामुळे भारतीय योगशास्त्राची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. भारतीय संस्कृती, तत्त्वज्ञान आणि शास्त्रांविषयी पाश्चात्त्य देशांमध्ये विशेष कुतूहल आहे. या पार्श्वभूमीवर योगविद्या, वेदशास्त्र आणि संस्कृत विषयांचे सखोल ज्ञान असलेल्या तज्ज्ञांची गरज वाढत आहे आणि ही गरज भविष्यात अधिकच वाढणार आहे. योगशास्त्र हे केवळ आसनांपुरते मर्यादित नाही; यापलीकडे योगाचा व्यापक आणि खोल आशय आहे. बारामतीसारख्या ग्रामीण भागात आंतरराष्ट्रीय दर्जाचे योगशिक्षण उपलब्ध व्हावे आणि त्यातून सक्षम योगशिक्षक तयार होऊन त्यांनी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर कार्य करावे, या उद्देशाने हे योग महाविद्यालय सुरू करण्यात आले आहे, अशी माहिती योगाचार्य डॉ. निलेश महाजन यांनी दिली. हे अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर विद्यार्थ्यांना विविध हॉस्पिटल्स, आरोग्य केंद्रे, जिम, वेलनेस सेंटर्स तसेच पंचतारांकित हॉटेल्समध्ये योगशिक्षक म्हणून संधी उपलब्ध होऊ शकते. याशिवाय स्वतःचा योगवर्ग किंवा योगा स्टुडिओ सुरू करण्याचीही संधी आहे. केंद्र सरकारच्या नव्या शैक्षणिक धोरणामध्ये योग विषयाचा समावेश होण्याची शक्यता आहे. त्यामुळे भविष्यात शाळा आणि महाविद्यालयांमध्ये योगअध्यापक म्हणूनही नियुक्तीच्या संधी उपलब्ध होऊ शकतात. योगशास्त्र हे एक स्वतंत्र चिकित्सा शास्त्र म्हणून पुढे येत असल्याने आरोग्य क्षेत्रात कार्य व संशोधन करण्यासाठीही मोठा वाव आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे. भारत सरकारतर्फे योगशास्त्राच्या प्रचार व प्रसारासाठी विविध योजना राबविल्या जात आहेत. त्यामुळे योगशास्त्राच्या प्रसाराला मोठी गती मिळाली आहे. योगशास्त्र या विषयामध्ये शैक्षणिक प्रगतीसोबतच स्वतःचा व्यवसाय उभारण्याची संधीही उपलब्ध आहे. त्यामुळे पारंपरिक पदवी किंवा पदव्युत्तर शिक्षणामध्ये बी.ए. (योग) व एम.ए. (योग) हे अभ्यासक्रम लाभदायक ठरू शकतात. प्रवेशासाठी पात्रता अशी माहिती योगतज्ज्ञ डॉ. भक्ती महाजन यांनी दिली.

योगशास्त्र शिक्षणाची नवी दिशा — बारामतीत बी.ए. (योग) व एम.ए. (योग) अभ्यासक्रम उपलब्ध Read Post »

Indira Gandhi

इंदिरा गांधी – खंबीर नेतृत्व

अलाहाबादमध्ये एका मुलीचा जन्म झाला. तिचं नाव — इंदिरा. कवी रवींद्रनाथ टागोरांनी तिला प्रेमाने दिलेलं नाव — प्रियदर्शिनी. त्यांचे वडील पंडित जवाहरलाल नेहरू आणि आई कमला नेहरू. घरात सतत स्वातंत्र्यलढ्याच्या चर्चा, देशाच्या चिंता आणि राष्ट्रकारणाचं वातावरण असायचं. लहान इंदिरा शांतपणे या गोष्टी ऐकत राहायच्या. नकळत देशप्रेम त्यांच्या मनात रुजत गेलं. मोठ्या झाल्यावर त्यांचा विवाह फिरोज गांधी यांच्याशी झाला. त्यांना दोन मुलं — राजीव आणि संजय. कुटुंब सांभाळत असतानाच त्यांचा सार्वजनिक जीवनाशी संपर्क कायम राहिला. हीच प्रियदर्शिनी पुढे जाऊन भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान बनल्या. त्यांच्या नेतृत्वाच्या काळात देश अनेक अडचणींना सामोरा जात होता — सीमावाद, अंतर्गत तणाव, आर्थिक अडचणी. अशा परिस्थितीत त्यांनी निर्णयक्षमता आणि धैर्य दाखवलं. दबाव असूनही त्यांनी आपली भूमिका ठामपणे मांडली. त्यांच्या विचारांच्या केंद्रस्थानी एकच ध्येय होतं —भारत एकसंघ आणि सक्षम राहिला पाहिजे. त्यांच्या कार्यकाळात काही महत्त्वाचे निर्णय झाले.१४ मोठ्या बँकांचे राष्ट्रीयीकरण करण्यात आले, ज्यामुळे सामान्य नागरिक आणि ग्रामीण भागातील लोकांपर्यंत बँकिंग सुविधा पोहोचल्या. संस्थानिकांना दिल्या जाणाऱ्या मानधनाची (प्रिव्ही पर्स) व्यवस्था रद्द करण्यात आली. कृषी क्षेत्रात हरितक्रांतीला चालना मिळाली आणि अन्नधान्य उत्पादन वाढलं. देश हळूहळू अन्नधान्याच्या बाबतीत स्वावलंबनाकडे वाटचाल करू लागला. उद्योग, विज्ञान, अवकाश संशोधन आणि अणुऊर्जा या क्षेत्रांतही प्रगतीसाठी प्रयत्न झाले. त्यांच्या काळात पोखरण येथे भारताची पहिली अणुचाचणी पार पडली. त्यांच्या कणखर नेतृत्वामुळे लोक त्यांना “आयर्न लेडी” म्हणू लागले. ३१ ऑक्टोबर १९८४ रोजी त्यांच्या सुरक्षा रक्षकांनीच त्यांच्यावर गोळ्या झाडल्या आणि त्यात त्यांचा मृत्यू झाला. हा प्रसंग देशासाठी अत्यंत धक्कादायक होता. इंदिरा गांधी आज आपल्यात नसल्या, तरी त्यांच्या नेतृत्वाचा आणि कार्याचा प्रभाव भारतीय राजकारण आणि इतिहासात कायम स्मरणात राहतो. भारत माता की जय!जय हिंद! – विद्यावाचस्पति डॉ. अनिल मोकाशी (बालरोगतज्ञ)एमबीबीएस, एमडी, डीसीएच, एफआयएपी,पीएचडी (मुलांची वाढ व विकास)

इंदिरा गांधी – खंबीर नेतृत्व Read Post »

वेडा बहिरा तानाजी आणि शहाणी बहिरी सुनिता

वेडा बहिरा तानाजी आणि शहाणी बहिरी सुनिता 

तानाजी आणि सुनिता — दोघेही बारा वर्षांचे, ग्रामीण शेतकरी कुटुंबातील, आमच्या मूकबधिर शाळेतील विद्यार्थी. पण दोघांत साम्य इतकंच. तानाजी सगळ्यांचा नावडता, तर सुनिता सगळ्यांची आवडती. एके दिवशी शाळेत खेळताना भांडण झाले. झोंबाझोंबी झाली. तानाजीने सुनिताचा हात खूप जोरात पिरगळला. सुनिता रडू लागली; तिचा हात हलत नव्हता. बाईंनी तानाजीला दोन धपाटे दिले आणि दोघांच्याही आई-वडिलांना शाळेत बोलावले. नेहमीप्रमाणे वाद, आरोप-प्रत्यारोप सुरू झाले. तानाजीच्या वडिलांचा संयम सुटला. प्रकरण माझ्यापर्यंत आले. डॉक्टर म्हणून आणि संस्थेचा अध्यक्ष म्हणून मी लक्ष घातले. त्यांचे म्हणणे होते —“बाईंनी मुलांकडे लक्ष द्यायला हवं होतं. मुलांच्या भांडणात मध्ये पडून तानाजीला न्याय द्यायला हवा होता. सगळे त्याला बाजूला सारतात, त्याच्याशी वाईट वागतात. सुनिता सगळ्यांची लाडकी आहे. शिक्षक पक्षपात करतात. अशा शिक्षकांना शाळेतून काढून टाकायला पाहिजे.” सुनिताचा हात फक्त मुरगळला होता; फ्रॅक्चर किंवा डिसलोकेशन नव्हतं. म्हणजे प्रश्न वैद्यकीय नव्हता — सामाजिक होता. मी दोघांच्याही केस हिस्टरी पाहायचं ठरवलं. पालकांना “लक्ष घालून प्रश्न सोडवीन” असं सांगून घरी पाठवलं. तानाजी : “वेडा बहिरा” म्हणून वाढलेलं बालपण तानाजी पूर्ण बहिरा आहे हे त्याच्या आई-वडिलांना तो चार वर्षांचा होईपर्यंत समजलंच नाही. तो हट्टी आहे, आळशी आहे, ढ आहे असंच ते समजत राहिले. पहिल्या वर्षापर्यंत तो छान होता. दीड वर्षाचा झाल्यावर चालायला-खेळायला लागला. घरात त्याची लहान बहीण लता आली. सुरुवातीला सगळं सुरळीत होतं. लता हसू लागली, आईला प्रतिसाद देऊ लागली. आई तिच्याशी बोलू लागली, खेळू लागली. तानाजी मात्र कोपऱ्यात एकटाच बसू लागला. आई आपल्याकडे दुर्लक्ष करते, असा त्याला राग येऊ लागला. एकदा त्याने दोन वर्षांच्या लताचा हात जोराने पिरगळला. लता रडू लागली; तानाजी मात्र हसू लागला. आई घाबरली. तिने त्याला “वेडा” समजायला सुरुवात केली. आई-वडिलांचे धपाटे सुरू झाले. एकदा पाणवठ्यावर शेजाऱ्यांनी विचारलं, “तुझा तानाजी बहिरा आहे का? अजून बोलत नाही.” आईने रागाने नकार दिला. दूर उभ्या तानाजीला तिने हातवारे करून बोलावलं. तो तिच्याकडे आला. आईला वाटलं — तो ऐकतो. पण प्रत्यक्षात तो हातवाऱ्यांवर प्रतिक्रिया देत होता. लता अंगणवाडीत जाऊ लागली. मित्र-मैत्रिणी, गाणी, खेळ, नाच — तिचं जग रंगत होतं. तानाजी मात्र एकटाच. हळूहळू तो चिडका, आक्रस्ताळा आणि भांडखोर झाला. कुणी त्याला खेळायला घ्यायला तयार नसे. बाजारातील प्रसंग एकदा आईसोबत बाजारात गेल्यावर त्याने नकळत दुकानातील आंबा उचलला आणि खायला लागला. दुकानदाराने “चोर” म्हणून मारायला सुरुवात केली. आईनेही भर बाजारात त्याला मारलं. तो जमिनीवर लोळू लागला, ओरडू लागला. शेवटी आई नरमली. “आणखी एक आंबा घेते, पण घरी चल,” म्हणाली.चुकीच्या वागणुकीला नकळत बक्षीस मिळालं. संध्याकाळी वडिलांना कळल्यावर त्यांनी त्याला मारलं आणि ओरडले —“चार शब्द बोलायला कधी शिकणार? मूर्ख आहेस, नालायक आहेस!” तानाजीला शब्द समजत नव्हते; पण एक गोष्ट समजली — कोणीच मला आवडत नाही. तो घराबाहेर पळून गेला. तासन्‌तास भटकत राहिला. हळूहळू घराबाहेर राहण्याची त्याला सवय लागली. वळणबिंदू शेवटी आई त्याला मूकबधिर शाळेत घेऊन आली. श्रवणचाचणीत तो बहिरा असल्याचं स्पष्ट झालं. पण स्वभाव आड येत होता. तो सगळ्यांशी भांडायचा. त्याचे वडील म्हणाले — “शाळेतून काढून टाका. गोट्या खेळत बसेल दिवसभर.” माझ्या लक्षात आलं — गोट्या खेळणं हीच त्याची क्षमता आहे.मी शाळेत गोट्यांच्या स्पर्धा घेतल्या. तानाजी पहिला आला. मग पतंग, कबड्डी, खो-खो, मलखांब — सर्व खेळांत तो पुढे राहिला. जिल्हास्तरीय स्पर्धेतही त्याला बक्षीस मिळालं. बक्षीस घेताना त्याच्या वडिलांच्या डोळ्यांत पाणी होतं. त्यात “धन्यवाद” होता. त्याचा फोटो वर्तमानपत्रात छापून आला. कुटुंबाला ओळख मिळाली. तानाजीचा आत्मविश्वास वाढला.आता तो “वेडा बहिरा तानाजी” राहिला नव्हता. सुनिता : योग्य वेळी मिळालेली साथ सुनिता दहा महिन्यांची असताना तिचा सात वर्षांचा भाऊ लक्ष्मणाने लक्षात आणलं की ती आवाजाला प्रतिसाद देत नाही. घरच्यांनी तपासणी केली. पुनर्वसन केंद्रात श्रवणचाचणी झाली — ती बहिरी असल्याचं निश्चित झालं. केंद्रात पालकांना मार्गदर्शन मिळालं. घरात सांकेतिक भाषा वापरायला सुरुवात झाली. खुणांसोबत शब्दही बोलले जाऊ लागले. हळूहळू तिला ओठांच्या हालचालींवरून शब्द ओळखता येऊ लागले. पाचव्या वर्षी ती काही शब्द ओठवाचनाने आणि शेकडो शब्द सांकेतिक भाषेत समजू लागली. ती आनंदी, सक्रिय, हुशार होती. मी तिची बुद्धिमत्ता चाचणी घेतली — आय.क्यू. १२१. सामाजिक कौशल्येही उत्तम. आम्ही बहुसंवेदी (multi-sensory) शिक्षणपद्धती वापरली — दृष्टी, स्पर्श, वास, चव यांच्या माध्यमातून जगाची माहिती दिली. आज ती शाळेतील सर्वांत हुशार विद्यार्थिनी आहे — अभ्यास, वाचन, हस्ताक्षर, चित्रकला, नृत्य, खेळ सगळ्यात पुढे. योग्य संधी मिळाली तर ती डॉक्टर किंवा नर्स होऊ शकते. पालकांसाठी काही सूचना ही कथा आपल्याला एक साधा पण महत्त्वाचा धडा देते —अपंगत्वापेक्षा मोठी समस्या म्हणजे गैरसमज, दुर्लक्ष आणि चुकीची वागणूक.आणि योग्य वेळी मिळालेली समजूत, प्रेम आणि संधी एखाद्या मुलाचं संपूर्ण आयुष्य बदलू शकते. – विद्यावाचस्पति डॉ. अनिल मोकाशी (बालरोगतज्ञ)एमबीबीएस, एमडी, डीसीएच, एफआयएपी,पीएचडी (मुलांची वाढ व विकास)

वेडा बहिरा तानाजी आणि शहाणी बहिरी सुनिता  Read Post »

चाचा नेहरू

चाचा नेहरू.भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू चाचा नेहरू हसरे हसरे,लहान मुलांचे मित्र खरे.गुलाब पुष्प घेती हाती,मुलांवरती प्रेम करती. स्वातंत्र्यासाठी इंग्रजांशी लढले,देशासाठी तनमनाने झटले.जेलमध्येही स्वप्नं पहिली,उज्वल भारत उभारणी केली शाळा कॉलेजे उभी राहिली,आधुनिक विज्ञानवाट दाखवली.धरणे, कालवे, वीजनिर्मितीशेती, सिंचन देशाला पुढे नेती. आखल्या पंचवार्षिक योजना,नियोजनबद्ध नवभारत रचना.मुलं जेंव्हा विचार शिकतात,तेच देशाला घडवीत जातात. अखंड भारताची फाळणी झालीस्त्री, पुरुष मुले निर्वासित झालीनेहरू चाचांनी छावणी उभारलीपालकत्व स्वीकारत मिठी दिली. लोकशाहीची मंगल दीपमाला,भारतमाता मंदिर संसदेलाजनगणमन, वंदे मातरम नारानेहरूंनी घातला पाया सारा. लोकशाही हीच खरी वाटघटनेने दिली मताची साथकर्तव्य आम्ही निभावू सारेहक्क मिळवू आमचे सारे चाचा नेहरू की जयपंडित जवाहरलाल नेहरू की जयभारत माता की जयजय हिंद.

चाचा नेहरू Read Post »

Netaji Subhash Chandra Bose

नेताजी सुभाषचंद्र बोस : धगधगती ज्वाला, अमर विचार

नेताजी सुभाषचंद्र बोस हे भारताच्या स्वातंत्र्यलढ्यातील एक असामान्य, धगधगते आणि निर्भय व्यक्तिमत्त्व होते. ते केवळ एक नेते नव्हते, तर स्वातंत्र्यासाठी सर्वस्व अर्पण करणारी ज्वाला होते. त्यांच्या जीवनाचा प्रत्येक क्षण देशासाठी समर्पित होता. नेताजी म्हणायचे —“तुम मुझे खून दो, मैं तुम्हें आज़ादी दूँगा.”ही घोषणा केवळ शब्द नव्हते, तर लाखो भारतीयांच्या मनात पेटलेली क्रांतीची मशाल होती. आज आपण अभिमानाने देतो ती “जय हिंद” ही घोषणा भारताला नेताजी सुभाषचंद्र बोस यांनीच दिली. ही घोषणा देशप्रेम, एकता आणि स्वातंत्र्याची भावना जागवणारी ठरली. त्या काळात भारत इंग्रजांच्या गुलामगिरीत होता. अन्याय, शोषण आणि परकीय सत्तेविरुद्ध उठाव करण्यासाठी नेताजींनी केवळ भाषणांवर भर दिला नाही, तर प्रत्यक्ष कृतीचा मार्ग स्वीकारला. भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी त्यांनी एक सशक्त लष्करी संघटना उभी केली — आझाद हिंद सेना. ही सेना केवळ बंदुकींनी नव्हे, तर देशप्रेमाने सज्ज होती. आझाद हिंद सेनेचे सैनिक सुभाषचंद्र बोस यांना आदराने आणि प्रेमाने “नेताजी” म्हणू लागले. हा किताब जनतेने दिलेला होता — त्यांच्या त्यागामुळे, शौर्यामुळे आणि नेतृत्वामुळे. नेताजींनी स्वतःच्या सुख-सोयींपेक्षा देशाला नेहमीच मोठं मानलं. त्यांनी आयुष्यभर “मी” पेक्षा “भारत” निवडला. स्वातंत्र्यलढ्याच्या सुरुवातीला सुभाषचंद्र बोस महात्मा गांधींच्या नेतृत्वाखालील चळवळीत सक्रिय होते. ते काँग्रेसचे अध्यक्षही झाले. विशेष म्हणजे, महात्मा गांधींना “राष्ट्रपिता” असे संबोधणारे ते पहिले नेते होते. पण पुढे विचारांमध्ये मतभेद निर्माण झाले.सुभाषबाबूंना वाटत होतं की स्वातंत्र्य सशस्त्र क्रांतीशिवाय शक्य नाही,तर गांधीजी निशस्त्र, अहिंसक मार्गावर ठाम होते. हे मतभेद असूनही नेताजींच्या मनात गांधीजींबद्दल नेहमीच आदर होता. यानंतर नेताजींनी भारताबाहेर जाऊन, जपानच्या मदतीने आझाद हिंद सेनेची पुनर्रचना केली आणि ब्रिटिश सत्तेविरुद्ध थेट लढा उभारला. १९४३ साली नेताजींनी अंदमान–निकोबार बेटांवरील पोर्ट ब्लेअर येथेभारताचा तिरंगा झेंडा फडकवलाआणि त्या बेटांना “शहीद” आणि “स्वराज” अशी नावे दिली.हा भारताच्या स्वातंत्र्यलढ्यातील एक ऐतिहासिक क्षण होता. दुर्दैवाने, १९४५ साली एका विमान अपघातात नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे निधन झाल्याचे अधिकृत मत आहे. मात्र त्यांच्या मृत्यूबाबत आजही अनेक प्रश्न आणि चर्चा आहेत. नेताजी गेले,पण त्यांचा विचार, त्याग आणि देशप्रेम अमर आहे.ते आजही प्रत्येक भारतीयाला धैर्य, आत्मसन्मान आणि स्वातंत्र्याची किंमत शिकवतात. नेताजी सुभाषचंद्र बोस की जय!भारत माता की जय!जय हिंद! – विद्यावाचस्पति डॉ. अनिल मोकाशी (बालरोगतज्ञ)एमबीबीएस, एमडी, डीसीएच, एफआयएपी,पीएचडी (मुलांची वाढ व विकास)

नेताजी सुभाषचंद्र बोस : धगधगती ज्वाला, अमर विचार Read Post »

B.R. Ambedkar

डॉ. बाबासाहेब आंबेडकर : विचार, कार्य आणि योगदान

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना भारत रत्न या भारताच्या सर्वोच्च राष्ट्रीय पुरस्काराने गौरवण्यात आले आहे.हा पुरस्कार देशासाठी अत्यंत महत्त्वाचं आणि दूरगामी योगदान देणाऱ्या व्यक्तींनाच दिला जातो. म्हणजेच, देशाकडून मिळणारा सर्वात मोठा सन्मान. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भारताच्या जडणघडणीत मोलाची भूमिका बजावली. त्यांनी भारताचं संविधान लिहिलं, म्हणजेच भारत देश कसा चालेल, नागरिकांचे हक्क आणि कर्तव्ये काय असतील, याचं नियमपुस्तक तयार केलं.या संविधानामधून त्यांनी समानतेचा पाया मजबूत केला आणि कायद्याच्या दृष्टीने सर्व नागरिक समान आहेत, हे ठामपणे मांडलं. त्यांचं काम केवळ कायद्यापुरतं मर्यादित नव्हतं. समाजात जे दुर्बल, वंचित आणि उपेक्षित होते, त्यांना न्याय आणि सन्मानाचं स्थान मिळावं, यासाठी त्यांनी आयुष्यभर प्रयत्न केले. म्हणूनच संपूर्ण भारताने त्यांना एक महान राष्ट्रपुरुष म्हणून सन्मान दिला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मुलांना आणि तरुणांना नेहमी शिक्षणाचं महत्त्व सांगायचे.ते म्हणायचे —“शिका.”कारण शिक्षणामुळे माणूस आत्मनिर्भर बनतो आणि कुणीही त्याला कमी लेखू शकत नाही. त्यांचा ठाम विश्वास होता की —“सगळी माणसं समान आहेत.”कोणी जन्माने मोठा नसतो, कोणी लहान नसतो. ते हेही सांगायचे —“अन्याय सहन करू नका.”पण त्याचबरोबर स्वतःकडूनही कुणावर अन्याय होऊ देऊ नका. त्यांच्या मते —“एकत्र राहिलात तर ताकद वाढते.”संघटित समाज अन्यायाविरुद्ध उभा राहू शकतो. आणि शेवटी ते नेहमी अधोरेखित करायचे —“ज्ञान माणसाला माणूस बनवतं.”ज्ञानाशिवाय व्यक्ती अपुरी राहते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतातील अन्यायकारक जातीव्यवस्थेविरुद्ध संघर्ष केला. मागास आणि वंचित समाजघटकांना मिळवून देण्यासाठी त्यांनी कायदेशीर आणि सामाजिक पातळीवर प्रयत्न केले. मुलांनो,आज तुम्ही शाळेत मोकळेपणाने शिक्षण घेत असाल,पाणी प्यायला कुणाची परवानगी लागत नसेल,आणि सन्मानाने जगण्याचा अधिकार उपभोगत असाल —तर त्यामागे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा आणि कार्याचा मोठा वाटा आहे. म्हणूनच भारतीय इतिहासातडॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचं योगदानअत्यंत महत्त्वाचं आणि प्रेरणादायी मानलं जातं. – विद्यावाचस्पति डॉ. अनिल मोकाशी (बालरोगतज्ञ)एमबीबीएस, एमडी, डीसीएच, एफआयएपी,पीएचडी (मुलांची वाढ व विकास)

डॉ. बाबासाहेब आंबेडकर : विचार, कार्य आणि योगदान Read Post »

Sardar Vallabhbhai Patel

भारत जोडणारे सरदार वल्लभभाई पटेल

भारतीय इतिहासाच्या गोष्टी – भारत जोडणारे सरदार वल्लभभाई पटेल. इंग्रजांच्या राज्यात भारतात ५६० पेक्षा जास्त छोटी-छोटी संस्थाने होती. प्रत्येकाचा वेगळा राजा, वेगळा नियम. कुणाचा पायपोस कुणात नव्हता. एकी नव्हती, सगळे एकमेकांचे वैरी होते.इंग्रज राज्यकर्त्यांनी याचाच फायदा घेतला. भारत स्वतंत्र झाल्यावर, एक मजबूत देश घडवायचा होता. तेव्हा वल्लभभाई पटेल कणखरपणे उभे राहिले. “सगळे एकत्र झाले, तरच भारत मजबूत होईल,” हे त्यांनी ओळखलं. कधी प्रेमाने, कधी समजावून, त्यांनी सगळी संस्थाने भारतामध्ये विलीन केली.म्हणूनच आज आपण म्हणतो— एक भारत, एक देश! लोक त्यांना “लोह पुरुष” म्हणायचे,कारण त्यांचं मन खूप मजबूत होतं. त्यांचा भव्य लोखंडाचा पुतळा—Statue of Unity, वडोदरा (पूर्वीचं बडोदा) इथे उभा आहे. बारडोलीच्या सत्याग्रहात शेतकऱ्यांचे ठाम नेतृत्व केल्यामुळे वल्लभभाई पटेलांना लोकांनी प्रेमाने “सरदार” ही उपाधी दिली. हा ठामपणा त्यांच्यात लहानपणापासूनच होता. शाळेत असताना, काही दांडगट मुलं किडमिडीत मुलांना छळत होते. ते बिचारे घाबरून सहन करत होते. तर काही जण अन्याय दिसून सुद्धा दुर्लक्ष करत होते. वल्लभभाई पुढे आले आणि ठामपणे म्हणाले, “हे चुकीचं आहे. हे चालणार नाही.” त्या एका वाक्याने सगळे वठणीवर आले —छळणारे, छळ सहन करणारे आणि दुर्लक्ष करणारे सगळेच चुकीचे असतात. हा कणखरपणा पुढे भारताला एकत्र ठेवणाऱ्यासरदार वल्लभभाई पटेलांमध्ये त्यांच्या लहानपणीच दिसला. ते म्हणायचे “एकीमध्येच देशाची शक्ती असते.” सरदार वल्लभभाई पटेल की जयभारत माता की जयजय हिंद – विद्यावाचस्पति डॉ. अनिल मोकाशी (बालरोगतज्ञ)एमबीबीएस, एमडी, डीसीएच, एफआयएपी,पीएचडी (मुलांची वाढ व विकास)

भारत जोडणारे सरदार वल्लभभाई पटेल Read Post »

A father encourages his baby to take first steps on a sunny day in a park, barefoot on green grass.

Walking Is Biology and Physics, Not a Calendar

मुलं चालायला शिकतात वयानुसार नाही, तर शरीर तयार झाल्यावर. “चालायचं वय आलं” म्हणून मुलं चालायला लागत नाहीत.मुलांचं शरीर स्वतःचं वजन पेलायला तयार झालं,की मुलं चालायला लागतात. चालण्यासाठी मुलांच्या शरीराला लागते: हे सगळे घटक सहसा ठराविक वजनावर एकत्र येतात,वयावर नाही.अनेक मुलं सुमारे ८ किलो वजन झाल्यावर चालायला लागतात. ही जादू नाही.हे भौतिकशास्त्र + जीवशास्त्र यांचं गणित जुळणं आहे. म्हणूनच: विकसनात्मक टप्पे (developmental milestones)हे मार्गदर्शक आहेत, आदेश नाहीत.ते लोकसंख्येसाठी उपयुक्त असतात,पण प्रत्येक मूल चालतंते शरीर तयार झाल्यावर —डेव्हलपमेंटल चार्ट पाहून नाही. Children learn to walk not according to age, but when the body is ready. Children do not start walking because the “walking age” has arrived.They start walking when their body becomes ready to carry its own weight. For walking, the child’s body needs: All these factors usually come together at a certain body weight, not at a certain age.Many children start walking when they reach around 8 kg body weight. This is not magic.This is the matching of physics and biology. That is why: Developmental milestones are guidelines, not rules.They are useful for population-level assessment,but each child walks when the body is ready,not when a developmental chart says so. – विद्यावाचस्पति डॉ. अनिल मोकाशी (बालरोगतज्ञ)एमबीबीएस, एमडी, डीसीएच, एफआयएपी,पीएचडी (मुलांची वाढ व विकास)

Walking Is Biology and Physics, Not a Calendar Read Post »

Scroll to Top