Dr. Anil Mokashi

लहानग्या मॉन्टीचे मोठे स्वप्न

LMG–001. लहानग्या मॉन्टीचे मोठे स्वप्न लहान मुलांना मोठे करणाऱ्या गोष्टी – समंजस, जबाबदार आणि कामाचा माणूस. १. लहानग्या मॉन्टीचे मोठे स्वप्न चौथीत शिकणारा छोटासा मॉन्टी रॉबर्ट. एकदा शिक्षिकेनी वर्गात निबंध लिहायला विषय दिला, “मोठेपणी तुम्ही कोण होणार?”कोणी लिहिलं – डॉक्टर. कोणी – इंजिनिअर. कोणी – शिक्षक. कोणी – अधिकारी. मॉन्टीनी मात्र वेगळंच लिहिलं.“मी मोठेपणी २०० घोड्यांच्या तबेल्याचा मालक होणार. त्या घोड्यांसाठी ४०० एकर हिरवंगार कुरण असणार.” शिक्षिकेनी निबंधावर मोठ्ठं ‘नापास’ लिहिलं.त्या म्हणाल्या, “मॉन्टी, तुझे वडील साधे घोड्यांना प्रशिक्षण देतात. तुमची आर्थिक परिस्थितीही साधी आहे. एवढं मोठं स्वप्न खरं होणार नाही. निबंध पुन्हा लिही.” मॉन्टी शांतपणे म्हणाला,“मॅडम, निबंध मी बदलू शकतो… पण माझं स्वप्न सोडणार नाही.” वर्षे लोटली.एके दिवशी त्याच शिक्षिका विद्यार्थ्यांना घोड्यांचा मोठा स्टड फार्म दाखवायला घेऊन गेल्या. फाटकावर नाव होतं—“मॉन्टी रॉबर्ट स्टड फार्म” आत २०० घोडे होते. भोवताली शेकडो एकर हिरवंगार कुरण होतं.शिक्षिका हसल्या आणि म्हणाल्या,“मॉन्टी, बरं झालं… तू तुझं स्वप्न सोडलं नाहीस.” ───“स्वप्न पाहणारे अनेक असतात; स्वप्नासाठी झटणाऱ्यांचीच स्वप्नं पूर्ण होतात.” – विद्यावाचस्पति डॉ. अनिल मोकाशी (बालरोगतज्ञ)एमबीबीएस, एमडी, डीसीएच, एफआयएपी,पीएचडी (मुलांची वाढ व विकास)

लहानग्या मॉन्टीचे मोठे स्वप्न Read Post »

personal hygiene puberty

किशोरवयातील स्वच्छता : A Sign of Maturity

किशोरवयातील वैयक्तिक स्वच्छता : मोठं होण्याची एक खूण [ PERSONAL HYGIENE IN ADOLESCENCE: A SIGN OF GROWING UP] किशोरवयात शरीरात अनेक बदल घडू लागतात. उंची व वजन वाढते, हार्मोन्स सक्रिय होतात, घामाच्या ग्रंथी अधिक कार्य करू लागतात आणि शरीराला विशिष्ट वास येऊ लागतो. शरीराला वास येणे हा आजार नाही. तो मोठं होण्याच्या प्रक्रियेचा एक नैसर्गिक भाग आहे. मात्र वैयक्तिक स्वच्छतेकडे दुर्लक्ष झाल्यास हा वास इतरांना अप्रिय वाटू शकतो आणि आपल्या व्यक्तिमत्त्वाबद्दल नकारात्मक छाप निर्माण करू शकतो. घामाला स्वतःला फारसा वास नसतो. त्वचेवरील जंतू, मृत त्वचापेशी आणि शरीरावरील केस यांच्या संपर्कात घाम आल्यावर वास निर्माण होतो. काखा, जांघेचा भाग, पाय, टाळू आणि त्वचेच्या घड्या याठिकाणी हा वास अधिक जाणवतो. किशोरवयात शरीराचा वास वाढण्याची काही कारणे: यावर उपाय अगदी सोपे आहेत: लक्षात ठेवा, किशोरवय म्हणजे फक्त उंची वाढणे किंवा आवाज बदलणे नाही. स्वतःच्या शरीराची जबाबदारी स्वीकारण्याची सुरुवातही याच वयात होते. लोक आपल्या दिसण्याकडे, बोलण्याकडे, वागण्याकडे लक्ष देतात; पण आपल्या वैयक्तिक स्वच्छतेकडेही तेवढेच लक्ष देतात. स्वच्छता आपल्याला फक्त नीटनेटके बनवत नाही, तर इतरांचा विचार करणारी व्यक्ती बनवते. मोठं होणं म्हणजे फक्त शरीराने वाढणं नाही; तर स्वतःबद्दल जागरूक होणं, इतरांचा विचार करणं आणि स्वतःची जबाबदारी स्वीकारणं होय. किशोरावस्था तुमच्या शरीरात बदल आपोआप घडवते;पण त्या शरीराची जबाबदारी स्वतः स्वीकारता,तेव्हा खरी परिपक्वता सुरू होते. PERSONAL HYGIENE IN ADOLESCENCE: A SIGN OF GROWING UP As children enter adolescence, many physical changes begin to occur. The body grows rapidly, hormones become active, and sweat glands start working more vigorously. One common consequence is increased body odour. Body odour is not a disease. It is a normal part of growing up. However, if personal hygiene is neglected, it can become unpleasant and affect how others perceive us. Sweat itself is almost odourless. The smell develops when sweat mixes with bacteria naturally present on the skin, particularly in areas such as the armpits, groin, feet, scalp, and skin folds. Dead skin cells, body hair, and poor hygiene can further contribute to the problem. Several factors make body odour more noticeable during adolescence: Good personal hygiene is simple: As you grow from a child into a young man or woman, personal hygiene becomes your own responsibility. Parents can remind you, but ultimately self-care must come from within. People notice our appearance, our behaviour, our speech—and yes, even our personal hygiene. Cleanliness does not make a person great, but it makes a person pleasant, presentable, and respectful of those around them. Growing up is not only about becoming taller and stronger. It is also about becoming more aware of yourself, more considerate of others, and more responsible for your own well-being. PUBERTY CHANGES YOUR BODY AUTOMATICALLY.MATURITY BEGINS WHEN YOU LEARN TO TAKE CARE OF THAT BODY YOURSELF. – Dr. Anil Mokashi (Pediatrician)MBBS, MD, DCH, FIAP, PhD(Child Growth and Development)

किशोरवयातील स्वच्छता : A Sign of Maturity Read Post »

Mother and daughter bonding through yoga outdoors in a serene grassy field.

सशक्त आई, सशक्त बालक

माझ्या प्रिय आयांनो, फक्त मुलांना मोठं करण्यासाठी तुमचा जन्म झालेला नाही. मुलांना वाढवणं हा तुमच्या जीवनातील अतिशय महत्त्वाचा आणि अर्थपूर्ण भाग आहे, हे नक्की. पण म्हणून तुमचं संपूर्ण अस्तित्वच मातृत्वाच्या कर्तव्यावर ओवाळून टाकण्याची गरज नाही. ताई, स्वतःकडे दुर्लक्ष करू नका बरं! आधुनिक विज्ञान आपल्याला एक महत्त्वाची गोष्ट सांगते. मुलांचा विकास केवळ अन्न, औषधे, लसीकरण किंवा शिक्षणावर अवलंबून नसतो. मुलांच्या विकासावर त्यांच्या caregiver च्या शारीरिक आणि मानसिक आरोग्याचा देखील खोल परिणाम होत असतो. चांगली आई होण्यासाठी, सुरक्षित मातृत्वासाठी, तिचे वय 20 ते 35 हवे, वजन 45 किलो हवे, उंची 145 सेमी (4 फूट 9 इंच) हवी. किडकिडीत आईची मुलं किडकिडीत होतात. दणदणीत आईची मुलं दणदणीत होतात. घाबरट आईची मुलं भितृट होतात. खंबीर आईची मुलं आत्मविश्वासू होतात. एका वेळी एक मूल बोटाला, एक मूल कडेला आणि एक मूल पोटात असलेल्या आईचे हालच असतात. चार जिवांवर अन्याय. दोन मुलात कमीत कमी तीन वर्षाचे अंतर हवे. शिक्षणामुळे आयांना आरोग्य, पोषण, लसीकरण आणि बालविकास याबाबत अधिक माहिती मिळते. त्यामुळे त्या मुलांची वैज्ञानिक पद्धतीने काळजी घेऊ शकतात. त्या प्रथा आणि अंधश्रद्धांच्या आहारी जात नाहीत. सतत थकलेली, झोपेअभावी त्रस्त, तणावाखाली असलेली किंवा स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करणारी आई कितीही प्रेमळ असली तरी तिच्यावरचा भार वाढत जातो. उलट सशक्त, आत्मविश्वासू, आनंदी आईच आपल्या मुलाला सुरक्षित, स्थिर आणि पोषक वातावरण देऊ शकते. म्हणूनच आईची काळजी घेणे हा बालसंगोपनाचाच एक महत्त्वाचा भाग आहे. योग्य आहार, पुरेशी झोप, नियमित आरोग्य तपासणी, थोडा विरंगुळा, स्वतःसाठी थोडा वेळ, भावनिक आधार आणि सन्मान — या गोष्टी आईच्या गरजा नाहीत, तर मुलांच्या विकासासाठीची गुंतवणूक आहेत. म्हणूनच आता कुटुंब, आजी-आजोबा, वडील, समाज आणि मुलांच्या विश्वातील सर्व मोठ्या माणसांनी एक गोष्ट समजून घ्यायला हवी: मुलं सशक्त हवी असतील तर आया सशक्त हव्या ना! आईला सशक्त करणे हे सुद्धा एक प्रकारचे बालसंगोपनच आहे. – विद्यावाचस्पति डॉ. अनिल मोकाशी (बालरोगतज्ञ)एमबीबीएस, एमडी, डीसीएच, एफआयएपी,पीएचडी (मुलांची वाढ व विकास)

सशक्त आई, सशक्त बालक Read Post »

Vitamin A

अ जीवनसत्व: मुलांच्या निरोगी भविष्यासाठी

तोंडाने अ जीवनसत्वाचा डोस मुलांना आजारांपासून संरक्षण देतो आणि निरोगी ठेवतो.भारतात सरकारी आरोग्य सेवा सहा महिन्यांनंतर पाच वर्षांपर्यंतच्या सर्व मुलांना दर सहा महिन्यांनी अ जीवनसत्वाचा डोस मोफत देते.ही अत्यंत महत्त्वाची आणि दूरदृष्टीची सार्वजनिक आरोग्य सेवा आहे.पण अनेक मुले खासगी डॉक्टरांकडून लसी घेतात. अशा मुलांना अ जीवनसत्वाचा डोस मिळत नाही.खरं तर:• खासगी बालरोग तज्ञांनी सरकारी यंत्रणेकडून अ जीवनसत्वाचा डोस मिळवून मुलांना द्यायला हरकत नाही.• किंवा बाजारात मिळणाऱ्या अ जीवनसत्वाचा डोस:o BLUE Capsule — 100000 IUo RED Capsule — 200000 IUवापरता येऊ शकतात.मुलांचे कुटुंब, आणि आरोग्य सेवा देणाऱ्यांनी अ जीवनसत्वाचा डोसचे महत्त्व समजून घेतले पाहिजे.ही फक्त “व्हिटॅमिन देणे” इतकी साधी गोष्ट नाही.ही एक preventive health practice आहे.ती समाजात सवय आणि संस्कार बनायला हवी. अ जीवनसत्व म्हणजे “साधं व्हिटॅमिन” नाही. आहे मायक्रोन्यूट्रिअंट, पण बालपणात त्याचे काम फार मोठे आहे.मूल बाहेरून निरोगी दिसू शकते, पण शरीरात शांतपणे अ जीवनसत्वाची कमतरता वाढत असू शकते. अ जीवनसत्व कशासाठी आवश्यक आहे?• दृष्टीसाठी• रातांधळेपणा टाळण्यासाठी• रोगप्रतिकारशक्तीसाठी• वाढीसाठी• त्वचा व शरीराच्या आतील आवरणांच्या आरोग्यासाठी• संसर्गातून बरे होण्यासाठीविशेषतः महत्त्वाचे:• लहान बाळांसाठी• वेगाने वाढणाऱ्या मुलांसाठी• कुपोषित मुलांसाठी• वारंवार आजारी पडणाऱ्या मुलांसाठी अ जीवनसत्व कुठून मिळते.प्राणिजन्य पदार्थ:• यकृत (liver)• दूध• चीज• इतर प्राणिजन्य अन्नवनस्पतीजन्य पदार्थ:• गाजर• भोपळा• रताळे• शेवग्याची पाने• कढीपत्ता• हिरव्या पालेभाज्या• पिवळी-केशरी फळे एक महत्त्वाची गोष्ट:अ जीवनसत्व शोषण्यासाठी अन्नात थोडे fat आवश्यक असते.म्हणून:• फक्त गाजर खाऊन उपयोग नाही• भाजीत थोडे तेल/तूप असणे उपयोगी ठरतेआपला पारंपरिक भारतीय आहार यासाठी उत्तम आहे:• डाळ• भाजी• थोडे तेल/तूप• दूध• पोळी/भातसाधा. व्यावहारिक. वैज्ञानिक. काही मुलांना Vitamin A deficiency चा धोका जास्त असतो:• अकाली जन्मलेली बाळे• कमी वजनाची बाळे• कुपोषित मुले Protein malnutrition आणि अ जीवनसत्व यांचा एक लपलेला संबंध आहे.अ जीवनसत्व रक्तात एकटे फिरत नाही.तिला “Retinol Binding Protein (RBP)” नावाच्या protein ची मदत लागते.शरीरात protein कमी असेल तर:• RBP कमी बनते• अ जीवनसत्व नीट वाहून नेता येत नाही• कमतरता निर्माण होतेम्हणजे:मूल अ जीवनसत्व खात असते,पण शरीराला ते योग्य प्रकारे वापरता येत नाही.Nutrition हे एक टीमवर्क आहे — एकट्या nutrient चे काम नाही. संसर्गाच्या, इन्फेक्शनच्या वेळी अ जीवनसत्व तात्पुरते कमी दिसू शकते.जसे:• गोवर• कांजिण्या• गालगुंड• डांग्या खोकला• Hand Foot Mouth Diseaseअशा वेळी शरीरात inflammation वाढते आणि अ जीवनसत्व पातळी खाली जाते. WHO च्या शिफारसी:६ ते ११ महिने:• 100000 IU — BLUE Capsule — एकदा१ वर्ष ते ५ वर्ष:• 200000 IU — RED Capsule — दर ६ महिन्यांनीVitamin A यकृतात साठवले जाते आणि शरीर ते हळूहळू वापरते. Vitamin A supplementation मुळे:• गंभीर आजार कमी होऊ शकतात• रोगप्रतिकारशक्ती सुधारते• बालमृत्यू कमी होण्यास मदत होतेएक छोटीशी capsule,मुलाच्या भविष्यासाठी शांतपणे संरक्षण देत असते. – विद्यावाचस्पति डॉ. अनिल मोकाशी (बालरोगतज्ञ)एमबीबीएस, एमडी, डीसीएच, एफआयएपी,पीएचडी (मुलांची वाढ व विकास)

अ जीवनसत्व: मुलांच्या निरोगी भविष्यासाठी Read Post »

झोपवून पाणी किंवा औषधे का देऊ नयेत?

बाळाला पूर्ण आडवे झोपवून पाणी किंवा औषधे का देऊ नयेत? लहान बाळ मोठ्या माणसासारखे सुरक्षितपणे पिऊ शकत नाही. बाळ जेव्हा दूध, पाणी किंवा औषध गिळते,तेव्हा शरीराला एका क्षणात अनेक गोष्टी एकाच वेळी कराव्या लागतात. म्हणजेचशोषणे + गिळणे + श्वास घेणेयांचा अचूक समन्वय आवश्यक असतो. बाळ पूर्ण सपाट झोपलेले असेल,तर हा समन्वय अधिक कठीण होऊ शकतो. त्यामुळे द्रव: म्हणून:लहान बाळाला पूर्ण आडवे झोपवूनपाणी, दूध किंवा औषधे देणे टाळावे. सुरक्षित पद्धत: लक्षात ठेवा:बाळाला पाजणे म्हणजे फक्त द्रव पोटात ओतणे नाही. ती शरीराची अत्यंत सूक्ष्म आणि संरक्षक जैविक प्रक्रिया आहे. योग्य स्थिती, योग्य गती आणि योग्य काळजी —यामुळेच बाळ सुरक्षितपणे पिते. WHY INFANTS SHOULD NOT BE GIVEN WATER OR MEDICINES IN A FULLY HORIZONTAL POSITION An infant cannot safely drink like an older child or adult. While swallowing,the baby’s body has to do many things together within a fraction of a second. This requires proper coordination of:sucking + swallowing + breathing. If a baby is lying completely flat,this coordination may become more difficult. Liquid may: Therefore:Avoid giving water, milk, or medicines to infants in a fully horizontal position. Safer method: Remember:Feeding is not “pouring liquid into the stomach.”It is a highly coordinated protective reflex. A baby drinks safely only when the body gets time and position to protect the airway. – Dr. Anil Mokashi (Pediatrician)MBBS, MD, DCH, FIAP, PhD(Child Growth and Development)

झोपवून पाणी किंवा औषधे का देऊ नयेत? Read Post »

गुड बॉय सूर्य आणि बॅड बॉय सूर्य.

ऊन तापत चाललय. उकाडा वाढत चाललाय. दिवस मोठा मोठा होऊ लागलाय. बाहेर खेळायला, धमाल मस्ती करायला जास्त वेळ मिळू लागलाय. पण जरा जपून. ऊन बाधण्यापासून स्वतःचा बचाव केला पाहिजे. सूर्य बॅड बॉय कि गुड बॉय ? तसा सूर्य हा गुड बॉयच आहे. सूर्य जरी तोंट, आग ओकत असला तरी तो फार छान छान कूल गोष्टी करत असतो. तो आपल्याला ऊब देतो. तो झाडांना ,फुलांना वाढवतो. तो आपल्या कातडीखाली ‘ड’ जीवनसत्व निर्माण करतो. ड जीवनसत्वाच्या मदतीने अन्नातले कॅल्शियम आतडयातून रक्तात शोषलं जातं. आणि हाडं बळकट होतात. म्हणजे तसा सूर्य हा गुड बॉयच आहे. पण आपण काळजी घेतली नाही तर तो बॅड बॉय होऊ शकतो. सूर्यकिरणांमध्ये काही अदृश्य डोळयांना न दिसणारे अतिनील अल्ट्राव्हायोलेट (आपण यू.व्ही. म्हणू) किरण असतात. ते सूर्यदाह, सनबर्न करतात. सूर्यांची उष्णता शरीराला सहन न झाल्याने उष्माघात होतो. आपण काळजी घेतली नाही, शिस्त लावली नाही तर सूर्य बॅड बॉय होऊ शकतो. सूर्यदाह : कातडीची आग होऊ देऊ नका. यू.व्ही.किरण ढगांतून, हवेतून प्रवास करत आपल्या कातडीवर पडतात. यू.व्ही. किरणांमुळे कातडी भाजल्यासारखी, करपल्यासारखी होते.कातडी गोरी असेल तर सूर्यदाह लवकर होतो. काळी असेल तर उशीर होतो. काळ्या कातडीतील मेलेनिन हे रंगद्रव्य कातडीचे यू.व्ही. किरणांपासून संरक्षण करते. सूर्यदाह झाल्यावर कातडीची आग होते, जळजळ करते. कातडीवर पाणी भरलेले फोड येतात. अशा कातडीवर मोठेपणी सुरकुत्या पडण्याची शक्यता जास्त असते. क्वचित मोठेपणी कॅन्सरसुद्धा होऊ शकतो. काळजी घेतलेली बरी. सकाळी १० ते ४ सूर्यप्रकाश प्रखर असतो. तेंव्हा अघुतन मधून सावलीत जावे. सनस्क्रीन लोशन लावावे. सनस्क्रीन लोशन ३० किंवा जास्त एस पी एफ चे असावे. एस पी एफ. म्हणजे सन प्रोटेक्टींग फॅक्टर. उन्हात जाण्याच्या १५, २० मिनिट आधी लावावे. शरीराच्या ज्या ज्या भागावर ऊन पडणार त्या त्या भागावर लावावे. दर २ तासांनी लावावे. पोहतांना पाण्यावर पडणारे सूर्यकिरण परावर्तीत होऊन दुप्पट प्रमाणात कातडीवर पडतात.त्यामुळे पोहतांना व घाम येत असेल तर सनस्क्रीन लोशन जास्त वेळा लावावे. चेहऱ्यावर सावली पडेल अशी टोपी घालावी. हात पाय दिसणार नाहीत असे अपारदर्शक ढिले कपडे घालावे. प्रखर उन्हात यू.व्ही किरण अडवणारे गॉगल घालावे. उष्माघात : पाणी प्या, ओल्या फडक्याने पुसून घ्या. शरीराचं तापमान नियंत्रण करणारा एक थर्मोस्टॅट नावाचं केंद्र मेंदूमध्ये असतं. हवेंचं तापमान वाढलं कि घाम येऊन शरीर थंड केलं जातं. लहान मुलांचं तापमान नियंत्रण केंद्र अपरिपक्व असल्याने ते व्यवस्थित काम करत नाही. पत्ता तापतो, भांडी तापतात तशी मुले तापतात. त्यांना थंड करावं लागतं. उन्हाळ्यात दिवसातून ३,४ वेळा ओल्या फडक्याने पुसून घ्यावे. शर्ट ओला करून पिळून अंगात घालावा. वाळलेल्या कोरडया माठाले पाणी गार होत नाही. वाळलेल्या ओल्या माठाले पाणी गार होते. शरीराला पाणी कमी पडले तरच उन्हाळा बाधतो. पाणी कमी पडले तर उकडून सुद्धा घाम येत नाही. शरीर तापतच जाते. तापाची औषधे (क्रोसिन) शरीर थंड करत नाहीत, घाम आणतात. शुष्कता स्थिती (डीहायड्रेशन) असेल तर तापाच्या औषधांचा गुण येत नाही. म्हणून भरपूर पाणी प्यावे. दिवसातून (चोवीस तासातून) ६ पेक्षा जास्त वेळा लघवी व्हावी. उन्हाळयामुळे, उलटी-जुलाबामुळे, आजारात अन्न पाणी कमी गेल्यामुळेसुद्धा शुष्कता स्थिती येते. उष्माघातामुळे शरीराचं तापमान वाढते. कातडी लाल होते, डोकं दुखतं, चक्कर येते. डोळे खोल जातात. लघवी कमी होते. नाडीचे ठोके वाढतात. दम लागतो. असंबद्ध बडबडणे, बेशुद्ध होणे अशी लक्षणं दिसतात. असं काही जाणवलं तर शाळेत किंवा घरात मोठ्या माणसांना सांगायला हवे. उष्माघाताचे निदान योग्य झाले नाही तर टॉयफॉईड, मलेरिया, न्यूमोनिया असे चुकीचे निदान ठोकून औषधांचा मारा होतो. मूळ उष्माघात बाळावतोच राहतो. उष्माघाताच्या मुलाला ओ.आर.एस.(जलसंजीवनी) भरपूर पाजावे. कपडे कमी घालावे. पंखा चालू करावा. ओल्या कपडयाने पुसून घ्यावे. तर मुलांनो, ज्यांना सूर्यदाह आणि उष्माघातापासून स्वतःला वाचवायचे आहे त्यांनी सनस्क्रीन लावावे, पाणी प्यावे, ओल्या फडक्याने पुसावे आणि कूल रहावे. – विद्यावाचस्पति डॉ. अनिल मोकाशी (बालरोगतज्ञ)एमबीबीएस, एमडी, डीसीएच, एफआयएपी,पीएचडी (मुलांची वाढ व विकास)

गुड बॉय सूर्य आणि बॅड बॉय सूर्य. Read Post »

Gestational Diabetes & Autism

Gestational Diabetes & Autism

Perinatal Hypoxia & Cerebral Palsy Why this comparison matters Both these pairs connect an early-life exposure to later neurodevelopmental outcomes.They share common downstream biology—oxidative stress and inflammation—yet differ significantly in: Understanding this distinction is essential for both clinical thinking and parental guidance. 1) Nature of Exposure Gestational Diabetes Mellitus (GDM)A chronic intrauterine metabolic environment Perinatal Hypoxia / Hypoxic-Ischemic Encephalopathy (HIE)An acute event 2) Primary Pathophysiology GDM → “Metabolic programming” Net effect:Subtle alterations in Hypoxia/HIE → “Energy failure and injury” Net effect: 3) Pattern of Brain Involvement GDM HIE 4) Clinical Outcomes GDM exposure Phenotype: Hypoxia/HIE Phenotype: 5) Strength of Evidence GDM ↔ Neurodevelopmental outcomes Key point: Good glycemic control reduces risk Hypoxia/HIE ↔ Cerebral palsy 6) Prevention & Clinical Levers GDM pathway Hypoxia pathway 7) A Unifying Teaching Frame “Acute injury vs. chronic programming.” Clinical One-liner “Hypoxia injures the brain; hyperglycemia shapes the brain.” 8) Practical Takeaways – Dr. Anil Mokashi (Pediatrician)MBBS, MD, DCH, FIAP, PhD(Child Growth and Development)

Gestational Diabetes & Autism Read Post »

Chandrayan 3

चंद्रयान-३ ची गोष्ट

चंद्रावर पोचलेला भारत : Chandrayaan-3 ची गोष्ट भारताचे चंद्रयान-३ चंद्रावर पोचलं — हे तुम्हाला माहीतच असेल. पण काही मूळ प्रश्न पडतात… मानवाने चंद्रावर जायचं तरी कशाला?उत्तर — नवीन गोष्टी समजून घेण्यासाठी आणि विज्ञान पुढे नेण्यासाठी. काय गरज आहे चंद्रावर जायची?उत्तर — पृथ्वी, अवकाश आणि विज्ञान या भविष्यातील महत्त्वाच्या ज्ञानशाखा आहेत. त्या अधिक चांगल्या प्रकारे समजण्यासाठी. भारताने एवढा खटाटोप, एवढा खर्च का करायचा?उत्तर — अवकाश विज्ञानाच्या स्पर्धेत भारत आघाडीवर राहावा म्हणून. स्वतःच्या बळावर विज्ञानात प्रगती करण्यासाठी आणि देशाची उंची वाढवण्यासाठी. आता ऐका चांद्रयान-३ ची रोमांचक गोष्ट… एक छोटं रॉकेट उभं होतं.त्यात भारताची मोठी स्वप्नं होती. स्थान — श्रीहरिकोटा, आंध्र प्रदेश.Satish Dhawan Space Centre मधून. तारीख — १४ जुलै २०२३.सगळे श्वास रोखून पाहत होते… ३… २… १…प्रक्षेपण झालं! रॉकेट आकाशात झेपावलं.वैज्ञानिकांच्या चेहऱ्यावर आनंद होता. पण प्रवास सोपा नव्हता…हळूहळू ते चंद्राजवळ पोहोचत होतं.सगळ्यांचे डोळे स्क्रीनवर खिळले होते. तारीख — २३ ऑगस्ट २०२३.इतिहास घडला. चांद्रयान-३ चंद्रावर उतरलं.तेही दक्षिण ध्रुवाजवळ! भारताने नवा विक्रम केला.सगळे आनंदाने ओरडले —“आपल्या भारताने करून दाखवलं!” We did it… We did it! संपूर्ण जग आश्चर्यचकित झालं.भारताची विज्ञानातील झेप सर्वांना दिसली.परंपरा आणि आधुनिक विज्ञान यांचा सुंदर संगम घडला.भारताची मान उंचावली. या यशामागे अनेक शास्त्रज्ञ होते. S. SomanathP. VeeramuthuvelS. Mohana Kumar त्यांनी रात्रंदिवस मेहनत केली. भारताचे पंतप्रधानNarendra Modiयांनी शास्त्रज्ञांचे अभिनंदन केले. ते म्हणाले —“हे नवीन भारताचे पाऊल आहे.” सगळ्यांच्या डोळ्यांत आनंद होता. भारत माता की जय!वंदे मातरम!जय हिंद! – विद्यावाचस्पति डॉ. अनिल मोकाशी (बालरोगतज्ञ)एमबीबीएस, एमडी, डीसीएच, एफआयएपी,पीएचडी (मुलांची वाढ व विकास)

चंद्रयान-३ ची गोष्ट Read Post »

Article 370

काश्मीर चे कलम ३७०

काश्मीर चे कलम ३७०. भारत स्वतंत्र झाला. इंग्रजांचं राज्य गेलं. भारतातले लोक आनंदात होते. पाकिस्तानने काश्मीर राज्य पाकिस्तानात सामील करून घेण्याचा घाट घातला. निम्मा काश्मीर घेऊन पाकिस्तानी फौजा काश्मीरची राजधानी श्रीनगर पर्यंत आल्या.भारताचे सैनिक सज्ज झाले. त्यांनी धैर्याने लढा दिला. काश्मीरचा काही भाग वाचला. काही भाग पाकिस्तानकडे राहिला. त्या भागाला आज“पाकव्याप्त काश्मीर” म्हणतात. उरलेला काश्मीर भारतात राहिला. पण एक विशेष नियम होता. त्याला म्हणत कलम ३७०.या नियमामुळे काश्मीरला विशेष दर्जा होता.इतर राज्यांपेक्षा वेगळे नियम होते. काही भारतीय कायदे तिथे लागू होत नव्हते.वर्षानुवर्षे तसेच चालले. लोकांच्या मनात प्रश्न होते. “सगळ्यांसाठी एकच नियम का नाही ?”काश्मीरला वेगळा कायदा का. २०१९ साल आले. मोठा निर्णय झाला. भारत सरकारने संसदेत बहुमताने कलम ३७० काढून टाकले. आता काश्मीर पूर्ण भारताचा भाग झाला. सगळे कायदे लागू झाले. श्रीनगरमधील लाल चौक. इथे एके काळी तिरंगा फडकवणे कठीण होते. त्याच लाल चौकात आता अभिमानाने तिरंगा फडकतो. हळूहळू बदल दिसू लागले. शाळा, रस्ते, विकास वाढला. पर्यटक येऊ लागले. लोक आनंदाने फिरू लागले. “एक देश, एक नियम.” “सर्वांना समान अधिकार.” काश्मीर चे कलम ३७० काढून टाकल्याने भारतभर एकता आणि समानतेची भावना वाढली. ठाम आणि निर्णायक निर्णय घेणारा, कायद्याने चालणारा, लोकशाही देश म्हणून भारताने जगात आपली ओळख मजबूत केली. भारत माता की जयवंदे मातरमजय हिंद – विद्यावाचस्पति डॉ. अनिल मोकाशी (बालरोगतज्ञ)एमबीबीएस, एमडी, डीसीएच, एफआयएपी,पीएचडी (मुलांची वाढ व विकास)

काश्मीर चे कलम ३७० Read Post »

Ayodhya Ram mandir

अयोध्येचे श्री राम मंदिर : श्रद्धा, इतिहास आणि एकतेची गोष्ट

अयोध्येचे श्री राम मंदिर : श्रद्धा, इतिहास आणि एकतेची गोष्ट एक शहर होते — प्राचीन.नाव होते — अयोध्या.इथे श्री रामाचा जन्म झाला.रामायणात त्याचे वर्णन आहे. लोक तिथे दर्शन घेत असत.काळ बदलत गेला.राजे बदलत गेले.अनेक घटना घडल्या.इतिहास गुंतागुंतीचा झाला. लोकांच्या मनात श्रद्धा होती.पण मतभेदही होते. प्रश्न कोर्टात गेला.दीर्घकाळ चालला.शेवटी पाचशे वर्षांनी निर्णय झाला —देशाच्या सर्वोच्च न्यायालयात. त्या जागी मंदिर बांधायचे.इतर ठिकाणी मशीद बांधायची.सर्वांनी निर्णय मान्य केला.शांतता राखली. भव्य मंदिर उभे राहिले. रामलल्ला आता तंबूत नाहीत.ते भव्य मंदिरात विराजमान झाले. सगळ्यांनी आनंद साजरा केला.रामलल्लांची प्रतिष्ठापना झाली.मंदिरात आरती झाली.देशभर दिवे लागले. लोक आनंदात होते. “राम म्हणजे मर्यादा.”आपल्या मर्यादा, लक्ष्मणरेषा ओलांडू नका.कंट्रोल मॅन कंट्रोल. “राम म्हणजे सत्य.”चुकीचं बोलायचं नाही.चुकीचं वागायचं नाही. “राम म्हणजे कर्तव्य.”आपली जबाबदारी, आपलं कर्तव्य नीट पाळायचं. “आपण असे वागलो,तर रामराज्य येईल.” आपला भारत देश मजबूत होईल. प्रभू श्री रामचंद्र की जयभारत माता की जयवंदे मातरमजय हिंद – विद्यावाचस्पति डॉ. अनिल मोकाशी (बालरोगतज्ञ)एमबीबीएस, एमडी, डीसीएच, एफआयएपी,पीएचडी (मुलांची वाढ व विकास)

अयोध्येचे श्री राम मंदिर : श्रद्धा, इतिहास आणि एकतेची गोष्ट Read Post »

Double Burden of Malnutrition

First 1000 Days & Double Burden of Malnutrition

First 1000 Days & Double Burden of MalnutritionWhat I learnt in workshop (UNICEF, IAP) at Mumbai.In OPD and in the community, we often see: 1) large mother with small child, 2) small mother with large child, 3) a small infant becoming overweight in school age, 4) one small child and another large child of the same mother. We notice this. We wonder… and then we leave it at that. We rarely ask — why has this disparity occurred? We should, in fact, find out why and institute remedial measures. That is our job. Same house. Same kitchen. Same mother. But different nutritional outcomes.Children: undernutrition, overnutrition.Mother: undernutrition, overnutrition. This is not a food quantity problem. It is a nutrition quality problem. A behaviour problem. Acaregiver ecosystem problem. It is not enough to say, “Child is underweight, give more food…”or “Child is overweight, give less food…” Instead, we need to understand how the family eats.Because this family is not suffering from lack of food. They are suffering from lack of direction.This is the double burden of malnutrition (DBM) — right in front of us. We already knew a great deal. Malnutrition, undernutrition, overnutrition, marasmus,kwashiorkor, PCM, PEM, PJM (joules), SAM, MAM, ecology of malnutrition, growth, growthcurves, growth monitoring, anthropometry, anthropometric indices, percentile charts, ICMR,IAP, NCHS, WHO, hidden hunger, micronutrient deficiencies. Our understanding has beenevolving over decades. The Mumbai workshop gave a newer and better point of view. Nutritional assessment througha life-course approach — from intrauterine life to adulthood. A standardized, easy to understand and easy to use tool, the Double Burden Index (DBI), forassessing and classifying nutritional status across ages, situations, and purposes. DBI is forseeing today’s nutrition, understanding the past, and anticipating the future. Because nutritionis not a moment. It is a journey. Double burden of malnutrition (DBM) refers to the coexistence of undernutrition andovernutrition within the same individual, household, or community. One person can experienceboth undernutrition and overnutrition in the same life. One family can have both at the sametime. One community can have both at the same time. We learnt the importance of time in nutrition. Undernutrition during the foetal period and earlychildhood is common. It leads to biological adaptations — metabolic programming, anadjustment to scarcity. This is followed by excess or imbalanced nutrition later in life. The resultis a metabolic mismatch. It increases the risk of non-communicable diseases. What protects thefoetus in scarcity may harm the adult in abundance. The Double Burden Index (DBI) is a visual tool. Children cannot be only either undernourishedor overnourished. Multiple forms of malnutrition may coexist within the same child across time.This shifts clinical thinking from a static to a dynamic, longitudinal perspective. We have to think beyond nutritional interventions. Addressing only undernutrition or onlyobesity is insufficient. We have to consider the life cycle — from maternal health to earlychildhood and beyond. From a clinical and public health point of view, DBI encourages pediatricians to look beyondsymptoms and signs and assess the nutritional history and context of the child. It suggestsstrengthening the caregiver ecosystem. Families and communities need to be informed in alanguage they understand. We must understand the DBI chart and how to use it — to see the problem, not just understandit. This chart shows that the child is not just undernourished or overnourished. The same child canbe both. On this graph, we are not plotting numbers. We are plotting real children we see everyday in OPD. The horizontal axis represents BMI, from thin to obese. The vertical axis represents height forage, from stunted to normal or tall. Every point on this graph is a child with a story. At the center is the child we all want — normal height and normal weight. In the lower right arewasted children, thin for height, representing acute undernutrition. In the lower left arestunted children, short for age, representing chronic undernutrition. In the upper right areoverweight children, who may appear healthy but are metabolically at risk. In the upper left isthe double burden child — short but overweight. Undernourished in early life, overnourishedlater. Biology confused, metabolism strained. We have all seen this. A large mother with a small child, a small mother with a large child, ortwo siblings — one thin and one obese. But we rarely stop to ask why. This framework providesthe answer. Double burden is not two separate problems. It is one life-course problem. Early undernutritionleads to stunting. Later excess leads to obesity. The result is a high-risk phenotype. The body isprogrammed for scarcity but is forced to live in abundance. This reflects Barker’s hypothesis. Earlier we used to ask — is the child undernourished or overnourished? Now we must ask —how many forms of malnutrition exist in this same child? So when we see a child, we are not seeing today’s nutrition. We are seeing the history ofnutrition. Malnutrition is not only a medical problem. It is also a social problem. The pediatrician’s rolemust expand from clinical care to community engagement, caregiver education, and knowledgetransfer. In summary, the most important shift is from viewing malnutrition as a single condition tounderstanding it as a continuum shaped by time, environment, and biology. This perspectivehas significant implications for both clinical practice and program design. – Dr. Anil Mokashi (Pediatrician)MBBS, MD, DCH, FIAP, PhD(Child Growth and Development)

First 1000 Days & Double Burden of Malnutrition Read Post »

Close-up of a cheerful toddler in a high chair, playfully engaged indoors.

Behaviour Problems: What Are They Telling Us?

Behaviour Problems: What Are They Telling Us? When we talk about behaviour problems in children, we often feel that something is “wrong” with the child. But if we observe carefully, we notice a pattern. Children who are developing normally today often show more stubbornness, arguing, and disobedience.At the same time, many children with intellectual challenges appear more attached, respectful, and emotionally connected to their parents and teachers. This looks surprising. We usually expect the opposite. So what is happening here? The answer may not be in intelligence.The answer may be in relationship. Let us first understand what we mean by a “problem child.” A problem child is a child who is difficult to raise and educate.The difficulty may be due to intellectual disability, learning disability, autism, hearing impairment, or some other condition. In such situations, many parents slowly come to an acceptance:“जैसा है, वैसा है… मेरा है, प्यारा है.” This acceptance changes the way they deal with the child.They become more patient, more connected, more involved. Because of this, the child’s behaviour often remains within an acceptable range. Now look at the other side. With typically developing children, we often expect everything to be perfect by default.When they show anger, resistance, or disobedience, we react quickly. We correct. We scold. Sometimes we label. But we forget one important thing. Even in typically developing children, some behaviour will be imperfect.That is part of growing up. If we only react to “wrong behaviour” without accepting the child,a distance slowly develops. And behaviour starts reflecting that distance. A child who feels connected listens more easily.A child who feels distant resists more. This is where the caregiver ecosystem becomes important. Parents, grandparents, teachers, and everyone around the child together create this ecosystem.If this ecosystem is supportive, patient, and emotionally connected, behaviour improves naturally.If it is stressful, critical, or distant, behaviour problems increase. So the question is not:“How do we control behaviour?” The better question is:“How do we strengthen the caregiver ecosystem and stay connected while guiding behaviour?” It is always better to tell what is expected than to keep reacting to what is wrong. Speak clearly. Stay calm. Stay close. Children do not first learn from what we say.They learn from how they feel with us. Accept the child. Guide the behaviour.Connection first—correction later. मुलाची चुकीची वागणूक आपल्याला काय सांगते आहे? मुलाचं काही चुकलं, की आपल्याला वाटतं — याचं काहीतरी बिघडलं आहे.“कुछ तो गड़बड़ है…” पण जरा विचार केला, तर एक वेगळंच चित्र दिसतं. नॉर्मल मुलं अनेकदा हट्टीपणा करतात. उलट बोलतात, विनाकारण वाद घालतात. ऐकत नाहीत. तर बौद्धिक अडचणी असलेली (मतिमंद ) मुलं पालकांशी आणि शिक्षकांशी जास्त जोडलेली, आदर करणारी, आणि भावनिकदृष्ट्या जवळची दिसतात. जरा आश्चर्य वाटेल, पण हे खरं आहे.या क्षेत्रात काम करणाऱ्यांना हा अनुभव वारंवार येतो. आपली अपेक्षा मात्र याच्या अगदी उलट असते. आपल्याला नॉर्मल मुलं शहाण्यासारखी आणि मतिमंद, मूकबधिर मुलं वेड्यासारखी वागत असतील असं वाटतं. मग असं का होतं? उत्तर बुद्धीत नाही.उत्तर नात्यात आहे.रक्ताचं नातं नाही — भावनिक नातं. “प्रॉब्लेम चाइल्ड” म्हणजे काय?ज्याला वाढवणं आणि शिकवणं कठीण जातं, ते मूल “प्रॉब्लेम चाइल्ड” असते. ही अडचण बौद्धिक, शैक्षणिक, स्वमग्नता (ऑटिझम), मूकबधिर किंवा इतर कारणांमुळे असू शकते. अशा मुलांचे पालक अनुभवाने — कधी नाईलाजाने — एक गोष्ट शिकतात:“जैसा है, वैसा है, मेरा है, प्यारा है.” हा स्वीकार पालकांच्या, घरच्यांच्या, शिक्षकांच्या वागण्यात बदल घडवतो.ते अधिक संयमी होतात. जास्त लक्ष देतात. समंजसपणे वागतात. मग मूलही मर्यादेत राहून चांगलं वागायला लागतं. आणि दुसरीकडे… नॉर्मल मुलांकडून मात्र आपण अगदी आदर्श वागणुकीची अपेक्षा करतो.जणू काही चांदोबा मासिकातला गुणी गोपाळ… किंवा साने गुरुजींच्या “श्यामच्या आई”तला श्याम. तो रागावला, चिडला, उलट बोलला, की आपण लगेच तयार —ओरडायला, दुरुस्ती करायला, नावं ठेवायला. पण आपण एक गोष्ट विसरतो. प्रत्येक मूल कधी ना कधी चुकीचं वागणारच.तो वाढीचाच एक भाग आहे.मानसिक, भावनिक विकासाचा भाग आहे.तो “learning licence” वर आहे. आपण सतत चुका दाखवत राहिलो, आणि त्याला आहे तसा स्वीकारला नाही,तर हळूहळू तो आपल्यापासून मनाने दूर जाऊ लागतो. बोलणं कमी होतं.मनाने अंतर वाढतं. आणि ते अंतर वर्तनातून दिसू लागतं.नंतर चार हात लांबच राहणं पसंत करतो. अतीच झालं, त्याच्या सहनशक्ती पलीकडे प्रकरण गेलं तर दृष्टीआड राहू लागतो. आईवडिलांशी मोकळेपणाने बोलणारं मूल सहज ऐकतं.मनाने दूर गेलेलं मूल विरोध करतं. इथे “बालपणाचे सहकारी” (Partners in Childhood) महत्त्वाचे ठरतात. पालक, आजी-आजोबा, काका-काकू, आत्या-मावश्या, मित्र-मैत्रिणी, शिक्षक —हेच खरे बालपणाचे सहकारी असतात. हे सगळे मिळून मुलाभोवतीचं वातावरण तयार करतात. हे वातावरण जर आधार देणारं, संयमी आणि भावनिकदृष्ट्या जवळचं असेल,तर वर्तन आपोआप सुधारतं. आणि जर ते तणावपूर्ण, टीकात्मक आणि दूर ठेवणारं असेल,तर समस्या वाढतात. म्हणून प्रश्न हा नाही —“वर्तन कसं आटोक्यात ठेवायचं?” खरा प्रश्न आहे —“नातं जपत वर्तन कसं घडवायचं?” चुकीवर रागावण्यापेक्षा,काय अपेक्षित आहे ते स्पष्ट सांगणं अधिक उपयोगी. सरळ बोला. शांत रहा. जवळ बसा. आधार द्या. मुलं आपल्या शब्दांमधून नाही,तर आपल्या नात्यातून शिकतात. मुलाला स्वीकारा. वर्तनाला दिशा द्या.आधी नातं जपा — मग सुधारणा करा.बेस्ट लक – विद्यावाचस्पति डॉ. अनिल मोकाशी (बालरोगतज्ञ)एमबीबीएस, एमडी, डीसीएच, एफआयएपी,पीएचडी (मुलांची वाढ व विकास)

Behaviour Problems: What Are They Telling Us? Read Post »

Scroll to Top