Dr. Anil Mokashi

Care of the disabled abstract concept vector illustration. Disability care, downs syndrome, senior on wheelchair, help for old people, professional home nursing services abstract metaphor.

माझ्या स्वप्नातले अपंग शिक्षण

मित्रांनो, आपण सगळे मिळून एक विशेष शाळा चालवत आहोत. आपल्याकडे अपंग विद्यार्थी आहेत, तज्ञ शिक्षक आहेत, भक्कम इमारती आणि शैक्षणिक साधने आहेत. हे सर्व मिळून आपली शाळा आदर्श ठरते. केवळ महाराष्ट्रातच नव्हे, तर संपूर्ण देशातसुद्धा आपल्या शाळेचा उल्लेख सन्मानाने होतो. तरीही, माझ्या मनात एक वेगळेच स्वप्न आहे – एक अशी शाळा, जिथे केवळ शरीर नाही तर त्याला आत्माही आहे. आजची आपली शाळा जशी आहे, तिला शरीर आहे; पण मला जसा आत्मा अपेक्षित आहे, तो अजून येणे बाकी आहे. तो आत्मा कुठे आहे? तो आहे उपचारात्मक, अनुभवात्मक आणि भावनिक शिक्षण या गोष्टींमध्ये. माझ्या स्वप्नातील शाळेत काय असावे? माझ्या दृष्टीने एक संपूर्ण, आत्म्याने भरलेली अपंग शाळा ही खालील गोष्टींनी समृद्ध असावी: या सगळ्या बाबी शाळेच्या वेळापत्रकाचा भाग असाव्यात. दररोज १५–१५ मिनिटांचा वेळ या उपक्रमांसाठी राखून ठेवला गेला, तर ही शाळा माझ्या स्वप्नातली शाळा ठरेल. योगोपचार योग म्हणजे श्वासावर नियंत्रण ठेवून शरीराच्या हळुवार हालचालींचा अभ्यास.प्रशिक्षित योग शिक्षकाच्या मार्गदर्शनाखाली मुलांच्या गरजेनुसार योगासनांचा सराव शाळेत रोज १५ मिनिटे सहज करता येतो. “पुस्तक वाचून किंवा कॅसेट ऐकून योग शिकता येत नाही; त्यासाठी तज्ञ शिक्षक हवा.” योगामुळे: संगीत उपचार संगीत हे सर्वांनाच आवडते – विशेष मुलांनाही!त्यात सूर, लय, ताल, भावभावना, गायन, वादन, भेंड्या, आणि खेळ असतो. संगीत शिक्षणातून: नृत्य व नाट्य उपचार नृत्य हे केवळ एक कला नाही, तर ते उपचारही आहे.संगीताच्या तालावर नृत्य करताना: पाळीव प्राणी – पेट थेरपी पाळीव प्राणी म्हणजे मुलांचा विश्वासू मित्र.त्यांच्यासोबत खेळताना: बागकाम बागकाम म्हणजे सर्जनशील, शारीरिक आणि संवेदनात्मक अनुभवाचं एक माध्यम. त्यातून: बिया पेरणे, रोपे वाढवणे, झाडांना पाणी देणे, स्वच्छता राखणे, फळे-फुले तोडणे, आणि त्यावरून कलात्मक वस्तू बनवणे – हे सर्व बागकामाचे भाग असावेत. प्लेथेरपी, आर्ट अ‍ॅन्ड क्राफ्ट खेळ आणि कला हे केवळ मनोरंजन नाही, तर मुलांच्या संपूर्ण विकासासाठी महत्त्वाचे घटक आहेत. व्यवसायपूर्व शिक्षण (Pre-Vocational Training) कामासाठी मानसिक व शारीरिक तयारी शाळेतच सुरु व्हावी. यात शिकवायचे: व्यवसाय शिक्षण (Vocational Training) १६–१८ वयानंतर, विद्यार्थ्यांना त्याच्या आवडीच्या किंवा क्षमतेच्या व्यवसायात प्रशिक्षित करणे. सरकारी धोरणानुसार: या गोष्टी आपण सुरु करणार आहोत. निष्कर्ष माझ्या स्वप्नातली अपंग शाळा म्हणजे अशी शाळा – जिथे शिक्षणासोबत मुलांना जगण्याचे, स्वतःला व्यक्त करण्याचे, आणि आत्मनिर्भर होण्याचे बळ मिळते. आपण सर्व मिळून ही शाळा आत्म्यासह उभी करूया.हीच माझी भावना. हेच माझं स्वप्न. – विद्यावाचस्पति डॉ. अनिल मोकाशी (बालरोगतज्ञ)एमबीबीएस, एमडी, डीसीएच, एफआयएपी,पीएचडी (मुलांची वाढ व विकास)

माझ्या स्वप्नातले अपंग शिक्षण Read Post »

हर्षवर्धन, ह्युएनत्संग आणि बुद्ध सर्किट पर्यटन.

हर्षवर्धन, ह्युएनत्संग आणि बुद्ध सर्किट पर्यटन. एक होता राजा – हर्षवर्धन. विद्वान, शांत, उदार राजा.त्याचं साम्राज्य अफाट होतं. पण ते त्यानी तलवारीने नाही, तर ज्ञान, धर्म आणि प्रेमानी जिंकलं होतं. राजा कविता करायचा, विचारवंतांचा सल्ला ऐकायचा,तो शिवभक्त होता. तो गौतम बुद्धाचाही चाहता होता.सगळ्या धर्मांचा आदर करणारा – असा हा सम्राट! त्याच काळात चीनमधून ह्युएनत्संग नावाचा एक बौद्ध भिक्षू भारतात आला.पायात चप्पल नाही, खांद्यावर झोळी…वाळवंटं पार केली, डोंगर चढला – कारण त्याला पाहायचा होता बुद्धाचा देश! जिथे गौतम बुद्ध जन्मला. वावरला. त्याला समजलं, भारतामधला धर्म पुस्तकी नाही. धर्म लोकांच्या मनात, रोजच्या जीवनात आहे. इथले लोक धर्म जगतात. नम्रतेनं, प्रेमानं! ह्युएनत्संगने हर्षवर्धनला भेट दिली.राजाने प्रयाग आणि कनोज येथे मोठ्या धर्मसभा भरवल्या.हजारो बौद्ध, जैन, सनातन विचारवंत एकत्र बसले.“धर्म म्हणजे भांडण नाही, तो सहवास आहे!” – हे शिकवलं गेलं. ह्युएनत्संग भारावून गेला.भारताच्या विकसित संस्कृतीचं त्यानी “सी-यू-की” या त्याच्या पुस्तकात वर्णन केलं आहे.त्याच्यामुळे भारतीय संस्कृतीची ओळख जगभर पोचली. आजही तोच विचार पुढे चालतो आहे.भारत सरकारने ‘बुद्ध सर्किट’ नावाचा एक सुंदर पर्यटन मार्ग तयार केला आहे.गौतम बुद्धाच्या जीवनाशी संबंधित स्थळं एकमेकांशी जोडली आहेत –लुंबिनी, बोधगया, सारनाथ, कुशीनगर… हजारो लोक त्या पवित्र जागांवर जातात. नतमस्तक होतात.बुद्धाच्या पावलांवर पाऊल ठेवतात. भारताचा अनुभव घेतात. “इतिहासाची वाट चालणारे हे पाय… उद्याच्या पर्यटनामुळे संपन्न झालेल्या भारताचं रूपडं बदलत आहेत.” – विद्यावाचस्पति डॉ. अनिल मोकाशी (बालरोगतज्ञ)एमबीबीएस, एमडी, डीसीएच, एफआयएपी,पीएचडी (मुलांची वाढ व विकास)

हर्षवर्धन, ह्युएनत्संग आणि बुद्ध सर्किट पर्यटन. Read Post »

Vikram Vetal

विक्रम वेताळ गोष्टीतला आणि खरा राजा विक्रमादित्य

विक्रम वेताळ गोष्टीतला आणि खरा राजा विक्रमादित्य मुलांनो, मी आता काही प्रश्न विचारणार आहे. तुम्ही सगळ्यांनी मोठ्याने, एका शब्दात उत्तर द्यायचं आहे. तयार? तहान लागते तेव्हा काय पिता? – पाणी! विहिरीत काय असतं? – पाणी. समुद्रात काय असतं? – पाणी. नदीत काय असतं? – पाणी. पावसातून काय पडतं? – पाणी. बर्फ वितळला की त्याचं काय होतं? – पाणी. किती छान! कुठलाही प्रश्न विचारला, तर तुमचं उत्तर एकच – पाणी. आता मला सांगा. साखर चवीला कशी लागते? – गोडमीठ चवीला कसे लागते? – खारट. मिरची चवीला कशी लागते? – तिखट. लिंबू चवीला कसे लागते? – आंबट. आवळा चवीला कसा लागतो? – तुरटम्हणा – तुरट! चपाती कशाची करतात? गव्हाची. भाकरी कशाची करतात? ज्वारीची-बाजरीचीभात कशाचा करतात? तांदळाचा. वरण कशाचं करतात? डाळीचं. बघितलं का. प्रश्न विचारला, की विचार करावा लागतो. विचार केला की उत्तर मिळतं. उत्तर मिळालं की आपण हुशार, संशोधक होतो. विक्रम-वेताळाच्या गोष्टीतला विक्रम पौराणिक आहे. म्हणजे गोष्टीतला. एकदा राजा विक्रम, वेताळाला खांद्यावर घेऊन चालला होता. वेताळ रोज एक गोष्ट सांगायचा, आणि शेवटी एक प्रश्न विचारायचा. दोन राजे जंगलातून चालले होते. समोर एक आदिवासी मुलगी डोक्यावर लाकडांची मोळी घेऊन चालली होती.अचानक समोर आला एक उपाशी वाघ! पहिल्या राजाने तलवारीचे सपासप वार करून वाघ ठार मारला. दुसऱ्याने त्या मुलीला उचलून सुरक्षित ठिकाणी नेले.आणि तिला तिच्या घरी, आई वडिलांकडे पोचवले. ती निघाली एक हरवलेली राजकन्या! वेताळाने विचारलं. तिने लग्न कोणाशी करावं? वाघाशी लढणाऱ्या शूरवीराशी, की तिला सुरक्षित ठेवणाऱ्या आधारवडाशी? राजा विक्रम म्हणाला –“शौर्य महत्त्वाचं, पण माणुसकी त्याहून मोठी. आधार देणारा राजा श्रेष्ठ!” वेताळ हसला. उत्तर बरोबर होतं. आणि वेताळ नेहमीप्रमाणे पुन्हा वडाच्या झाडावर उलटा लोंबकळू लागला हे झालं गोष्टीतलं. पण इतिहासातही एक विक्रमादित्य होऊन गेला. सम्राट चंद्रगुप्त विक्रमादित्य! छत्रपती शिवरायांच्या १५०० वर्षे आधीचा राजा. त्याच्या दरबारात होती नवरत्ने. विद्वान, गायक, साहित्यिक, विचारवंत. त्याने सुराज्य दिलं. आणि आजच्या भारतीय संस्कृतीची मुहूर्तमेढ रोवली. एकदा एका गरीब शेतकऱ्याची गाय चोरीला गेली. शेजारी म्हणाला, “ही गाय माझी आहे. “प्रकरण गेलं राजाकडे. राजाने दोघांनाही गायीसमोर उभं केलं आणि गायीला हाक मारून बोलवायला सांगितलं. गाय सरळ गेली शेतकऱ्याकडे. त्याच्या अंगाला डोकं घासू लागली. प्रेम दाखवू लागली. राजा म्हणाला –”गायीला फसवता येत नाही. तिला सत्य कळतं.” राजानी गाय दिली शेतकऱ्याला. आणि दंड केला शेजाऱ्याला. हेच खरं न्यायाचे राज्य! राजा विक्रमादित्याने भारतीय संस्कृतीची पायाभरणी केली. जय हिंद!जय महाराष्ट्र! भारतमाताकी जय! – विद्यावाचस्पति डॉ. अनिल मोकाशी (बालरोगतज्ञ)एमबीबीएस, एमडी, डीसीएच, एफआयएपी,पीएचडी (मुलांची वाढ व विकास)

विक्रम वेताळ गोष्टीतला आणि खरा राजा विक्रमादित्य Read Post »

Chakradhar Swami

जात ही मनात असते, रक्तात नसते

जात ही मनात असते, रक्तात नसते” – श्रीचक्रधर स्वामी भारतात सगळीकडे सुलतानी राजवटी होत्या. समाजात जातीपातीचं विष जाणूनबुजून पेरलेलं होतं. समाज पिचलेला होता आणि शासक मस्तवाल झाले होते. अशा काळया कालखंडात शिवाजी महाराजांच्या सुमारे ३५० वर्षे आधी श्रीचक्रधर स्वामी, गुजरातहून महाराष्ट्रात आले. त्यांनी विखुरलेला समाज एकसंघ करण्यासाठी महाराष्ट्रभर भ्रमंती केली.‘सर्व जीव समान’ असा संदेश देऊन प्रत्येक माणसात असलेल्या देवाची जाणीव करून दिली. एका गावात, एका सकाळी, मंदिराच्या पायऱ्यांवर श्रीचक्रधर स्वामी शांत बसले होते. ते बसले की सकाळही शांत होत असते. तेवढ्यात काही लहान मुले धावत आली. स्वामींच्या भोवताली गोल रिंगण करून बसली. कुणी टिवल्या बावल्या करत होतं. कुणी खोड्या करत होतं. कुणी गोळ्या चघळत होतं. त्यातला एक धिटूकला मुलगा पुढे आला. आणि म्हणाला. “स्वामी तुम्ही कोणत्या जातीचे?” स्वामी थोडं हसले. म्हणाले, “माझी जात? अहो मलाच माहित नाही! मी फक्त माणूस आहे. आणि तू? तू कोण आहेस?” मुलगा थोडा गोंधळला… पण मग त्याचा चेहरा उजळला. “मी पण माणूस! तुम्ही पण माणूस, मी पण माणूस! ” तो म्हणाला. स्वामी हसले, म्हणाले –“जात ही मनात असते, रक्तात नाही. मन स्वच्छ ठेवलं, तर देव आपल्या जवळ येतो!” मुलांना पटलं. मुलांच्या मनातली जात गेली. त्यांच्यातली माणुसकी जागी झाली. त्यांनी आपापल्या घरी जाऊन सांगितलं. “जात ही मनात असते, रक्तात नसते”. सगळ्या गावाला ते पटलं. शाळेच्या फळ्यावर दुसऱ्या दिवशी सुविचार लिहिला गेला. “जात ही मनात असते, रक्तात नसते. मुलांना जातीद्वेष शिकवू नका!” ही गोष्ट सगळीकडे पसरली,ती शाळा आदर्श शाळा झाली. ते गाव आदर्श गाव झालं. श्रीचक्रधर स्वामींवरील‘लीळाचरित्र’ हे पहिलं मराठी पुस्तक ठरलं. त्यांनी उच्च –नीच, जाती–पातीच्या भिंती पाडल्या. माणूसकीचं राज्य महाराष्ट्रात आणलं. जात मनात असते, रक्तात नाही. मुलांना जातीद्वेष शिकवू नाही. सर्व जीव एक समान,नसावा द्वेष, नसावा मान!प्रत्येकात देव पाहावा,महानुभाव पंथ घडवावा श्रीचक्रधरस्वामींचा सांगावा! जय श्रीचक्रधरस्वामी.जय शिवाजी.जय महाराष्ट्र.जय हिंद.भारत माता की जय – विद्यावाचस्पति डॉ. अनिल मोकाशी (बालरोगतज्ञ)एमबीबीएस, एमडी, डीसीएच, एफआयएपी,पीएचडी (मुलांची वाढ व विकास)

जात ही मनात असते, रक्तात नसते Read Post »

Samrat Ashoka

सम्राट अशोक : युद्धाकडून बुध्दाकडे नेणारा धर्मराज.

सम्राट अशोक : युद्धाकडून बुध्दाकडे नेणारा धर्मराज. २३०० वर्षांपूर्वी मौर्य घराण्यात एक राजा झाला. अशोक. लहानपणी अशोक खूप हट्टी, चिडखोर, आक्रस्ताळा, धटिंगट, दांडगट आणि रागीट होता. त्याचे खेळ म्हणजे युद्ध, तलवार. सम्राटाचा मुलगा असल्यामुळे मोठा झाल्यावर तो वंशपरंपरागत, आपोआप, सम्राट झाला. संपूर्ण भारतावर त्याचं राज्य होतं. पण एक राज्य उरलं होतं – कलिंग. मोठा समुद्रकिनारा, सुजलाम सुफलाम जमीन. कष्टाळू माणसे. कलिंग म्हणजे आजच्या भारताचा ओरिसा. अशोकाने ठरवलं – “कलिंग जिंकलंच पाहिजे! “त्यानी एक भीषण युद्ध छेडलं. कलिंग युद्ध. तलवारी, कापाकापी, धनुष्यबाण, रक्त, मृत्यू… सर्वत्र हाहाकार! लाखो लोक मारले गेले, घरं जळाली, कुटुंबं उध्वस्त झाली. वाताहात झाली. राजा अशोक विजय साजरा करायला वाजत गाजत युद्धभूमीवर गेला… पण तिथे फटाके नव्हते. तिथे होते रक्ताचे थारोळे. आणि रडणारे लोक. सगळीकडे मृतदेह, आरडाओरडा, रडारड, आक्रोश आणि दुःखाचे डोंगर. युद्ध जिंकलं… पण अशोकाला समाधान नव्हतं. मनात आनंद नव्हता. काहीतरी चुकतंय असं त्याला आतून वाटत होतं. तेवढ्यात एक लहानगी मुलगी, रक्ताने माखलेल्या आपल्या मरण पावलेल्या वडिलांच्याकलेवराला घट्ट मिठी मारून हमसून हमसून रडत होती. ते हृदय द्रावक दृश्य बघून अशोकाचं काळीज हेलावून गेलं. त्याला प्रश्न पडला. “मी हे काय केलं? का केलं? कशासाठी केलं? या युद्धातून मला काय मिळालं?” त्या क्षणी अशोकाच्या मनात मोठ्ठा बदल झाला. चूक काय आणि बरोबर काय, हे त्याला बरोबर उमगलं. त्याला बोध झाला. अशोकाला उपरती झाली. अचानक त्याच्या मनात गौतम बुद्धांच्या बोधिसत्वाची आणि त्यांना झालेल्या बोधाची आठवण आली. त्याला मार्ग सापडला. बौद्ध धर्माचा. गौतम बुद्धांचा शांतीमार्ग, करुणा आणि नीतीने भरलेला.” त्यानी ठरवलं. ही वेळ युद्धाची नाही… बुद्धाची आहे! त्याने तलवार बाजूला ठेवली. बौद्ध धर्म, माणुसकी, सहिष्णुता – हे त्याचं नवं शस्त्र झालं. आधी तो स्वतःला देशाचा आणि जनतेचा मालक समजत होता. आता त्यानी देशाचा आणि जनतेचा सेवक बनायचे ठरवले. त्याने सर्व लोकांना प्रेमाने वागवायला सुरुवात केली. गरीब, आजारी, वृद्ध – सगळ्यांची तो काळजी घेत असे. प्रजेसाठी रस्ते, विहिरी, रुग्णालयं, धर्मशाळा बांधली. शिलालेखांमधून त्याने सांगितलं दयेमधेच खरी ताकद असते. त्याने गौतम बुद्धांचा संदेश श्रीलंका, भूतान, नेपाळ, म्यानमार, अफगाणिस्तान, जगभर पोचवला. आणि तो झाला भारतीय इतिहासातला पहिला धर्मराज. धर्माचे रक्षण करणारा. आपले शिवाजी महाराज देखील म्हणायचे “देव धर्म आणि देशासाठी, प्राण वेचलं आम्ही”. सम्राट अशोक म्हणायचा “लोकांना तलवारीच्या जोरावर नाही प्रेमाच्या जोरावर जिंकायचे असते” उत्तर प्रदेश राज्यात, वाराणसी जिल्ह्यात, वाराणसी म्हणजे पूर्वीचे “काशी”. सारनाथ या गावात गौतम बुद्धांनी पहिलं धर्मचक्र प्रवर्तन (धम्मचक्र प्रवर्तन) केलं होतं. प्रवर्तन केलं. म्हणजे त्यांनी धर्मशिक्षण सुरू केलं. गौतम बुद्धांच्या उपदेशामुळे समाजात परिवर्तन घडलं. परिवर्तन घडलं म्हणजे लोकांच्या विचारात आणि जीवनशैलीत बदल झाला. सम्राट अशोकाने तिथे एक मोठा सिंहस्तंभ बांधला. आजही तो उभा आहे. त्या सिंहस्तंभावरचं अशोक चक्र आपल्या राष्ट्रध्वजावर, तिरंग्यावर आहे. ते आपल्या भारतीय संस्कृतीचं प्रतीक आहे. आपल्या परंपरेचं प्रतीक आहे. म्हणूनच “सम्राट अशोक: युद्धाकडून बुद्धाकडे नेणारा धर्मराज” ठरला. जय महाराष्ट्रजय हिंदभारत माता की जय – विद्यावाचस्पति डॉ. अनिल मोकाशी (बालरोगतज्ञ)एमबीबीएस, एमडी, डीसीएच, एफआयएपी,पीएचडी (मुलांची वाढ व विकास)

सम्राट अशोक : युद्धाकडून बुध्दाकडे नेणारा धर्मराज. Read Post »

sinhagad-fort-pune

कोंढाणा – शूरवीरांचा डोंगर ( गोष्ट सिंहगडाची )

कोंढाणा – शूरवीरांचा डोंगर – गोष्ट भारतीय इतिहासाच्या मालिकेतली छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याच्या आधी चार-पाचशे वर्षे महाराष्ट्रात सुलतानांची जुलमी राजवट होती. ते माणसांना माणसांसारखे वागवत नव्हते. जनावरांसारखे वागवत होते. सुलतानांनी नेमलेले वतनदार जनतेला छळत होते. त्याकाळची ही गोष्ट आहे. सिंहगडाची. खूप उंच डोंगर. त्यावर गड. सिंहासारखा. म्हणून त्याचं नाव – सिंहगड! पूर्वी याचं नाव कोंढाणा होतं! कोंढाणा म्हणजे शूरवीरांचा डोंगर. कोंढाणा डोंगर दिवसात झोपलेला असायचा – शांत, निवांत, गडावरच्या पक्ष्यांसारखा. पण शत्रू जवळ आला की, तो जागा व्हायचा – सिंहासारखा गुरगुरणारा, वाऱ्यासारखा झेपावणारा! कोंढाण्याच्या पायथ्याला शूर लोक राहत होते – धाडसी, रक्षण करणारे! कोणी शेतकरी, कोणी लढवय्ये, कोणी गड राखणारे. एका रात्री, गावात बातमी आली “शत्रू येत आहेत! किल्ला घ्यायला!” पण लोक घाबरले नाहीत. एक धाडसी तरुण पुढे आला. त्याचं नाव होतं भिला. भिला म्हणाला: “आपण गडावर राहतो. तो आपला आहे.गड राखणं हे आपलं काम आहे. कोण कोण येणार माझ्याबरोबर. सगळे धावत आले – मुलं, मोठे, बायका, आजी-आजोबा सर्वांनी मिळून कोंढाण्याच्या मुख्य दरवाजाला लोखंडाची जाड मोठ्ठी साखळी बांधली. शत्रू आले, पण त्यांना आत येता आलं नाही. सामान्य लोकांच्या धाडसामुळे गड टिकला. शत्रू हरला. कोंढाणा हसला. म्हणाला: “माझे लोक जागे आहेत. मी झोपणार नाही!” हे डोंगर, हे किल्ले, हे आपलं इतिहासाचं धन आहे! म्हणा सगळ्यांनी: कोंढाणा उंच होता!कोंढाणा शूर होता!कोंढाणा आपला होता!कोंढाणा झुकला नाही!कोंढाणा हरला नाही!आपणही शूर वीर बनूआपल्या देशाचा गड राखू! छत्रपती शिवाजी महाराज की जय.भारतमाता की जय.जय हिंद. – विद्यावाचस्पति डॉ. अनिल मोकाशी (बालरोगतज्ञ)एमबीबीएस, एमडी, डीसीएच, एफआयएपी,पीएचडी (मुलांची वाढ व विकास)

कोंढाणा – शूरवीरांचा डोंगर ( गोष्ट सिंहगडाची ) Read Post »

Joyful family moment in park with kids playing among colorful autumn leaves.

समजून घ्या बालविकासाचे टप्पे

“लहान मूल” ही “मोठ्या माणसा”ची छोटी प्रतिकृती नसते! हे बालपणाच्या विज्ञानाचं मूलभूत तत्व आहे.गर्भधारणेच्या पहिल्या दिवसापासून ते मुलगा “पुरुष” आणि मुलगी “स्त्री” होईपर्यंत, हा विचार लागू राहतो.बालपणाच्या प्रत्येक टप्प्यात हे समजून घेणं फार महत्त्वाचं असतं.बालरोगतज्ज्ञांना हे चांगलंच माहीत असतं. पण त्यातील काही गोष्टी पालकांना आणि कुटुंबालाही समजायला हव्यात.मुलांची जबाबदारी घेताना, प्रत्येक टप्प्यात त्यांच्या गरजा, शरीर, मन आणि विकास समजून घेणं आवश्यक असतं. १. शरीररचना आणि कार्यातील फरक (Anatomy and Physiology) २. औषधोपचारातील फरक (Pharmacology) ३. विकासाचे टप्पे (Developmental Stages)जसं फुलपाखराला अंड्यापासून फुलपाखरूपर्यंत टप्पे असतात,तसं माणसाच्या जीवनातही विकासाचे टप्पे असतात: गर्भावस्था०-९ महिनेशरीर व मेंदूची प्राथमिक घडण नवजात०–२८ दिवसश्वसन, तापमान नियंत्रण, स्तनपानशैशव१ महिना – २ वर्षेवेगाने शारीरिक वाढ, भाषा विकास शालेयपूर्व२ – ५ वर्षेहालचाली, सवयी, भावबंध शालेय वय६ – १२ वर्षेबौद्धिक, सामाजिक वाढ किशोरावस्था१२ – १८ वर्षेलैंगिक परिपक्वता, स्व-ओळख तारुण्य व वृद्धावस्थापुढे…जबाबदाऱ्या, मानसिक समतोल ४. मानसिक आणि सामाजिक गरजा निष्कर्ष:बालक म्हणजे फक्त छोटा माणूस नव्हे – तो स्वतंत्र टप्प्यावर असलेला, सतत बदलत जाणारा, संवेदनशील जीव आहे.त्याचा विकास समजून घेणं हेच खऱ्या अर्थानं जागरूक पालकत्व ठरतं. जागरूक पालकत्वासाठी टिप: “आजारी पडलं की डॉक्टर” हे जुने धोरण आता पुरेसं नाही.“मुलासाठी डॉक्टर” हेच नव्या काळाचं योग्य धोरण! शुभेच्छा – जागरूक पालकत्व, निरोगी बालपण! – विद्यावाचस्पति डॉ. अनिल मोकाशी (बालरोगतज्ञ)एमबीबीएस, एमडी, डीसीएच, एफआयएपी,पीएचडी (मुलांची वाढ व विकास)

समजून घ्या बालविकासाचे टप्पे Read Post »

An attentive girl helps her younger brother concentrate on homework in a cozy home setting.

गृहपाठाचा “फंडा”

गृहपाठात पालकांनी लक्ष घातले तर मुलांना शिक्षणात निश्चितपणे यश मिळते. गृहपाठ किती महत्वाचा आहे हे त्यामुळे मुलांना कळते. गृहपाठात मदत करण्याचे अनेक फायदे असतात. शिवाय पालकांनाही एखादी नविन गोष्ट शिकायला मिळते. मदत कशी करायची. गृहपाठाचा हा ‘फंडा’ लक्षात घेतला तर ‘अतिच गृहपाठ देतात ‘म्हणून शाळेला दोष देण्याची पाळी येणार नाही आणि गृहपाठ म्हणजे एक ‘शिक्षा किंवा कटकट’ न वाटता शिक्षणाचे एक माध्यम म्हणून त्याच्याकडे बघता येईल. – विद्यावाचस्पति डॉ. अनिल मोकाशी (बालरोगतज्ञ)एमबीबीएस, एमडी, डीसीएच, एफआयएपी,पीएचडी (मुलांची वाढ व विकास)

गृहपाठाचा “फंडा” Read Post »

Joyful boy celebrating a soccer win outdoors in Portugal.

प्रेरणा ही चांगल्या कामामागची शक्ती

#45 प्रेरणा ही चांगल्या कामामागची शक्ती आहे मित्रांनो, तुम्ही दैदिप्यमान, यशवंत, कर्तृत्ववान, आहातच. ते तर तुम्ही पुराव्यानिशी सिद्ध केले आहेच. आता लक्ष घालावे, स्वतः सज्जन होण्यावर.जागरुक, विश्वासार्ह, कामाचा माणूस बनण्यावर. ॥ १ ॥ नवीन काहीही, निर्माण करायचे असेलतर नव निर्मात्याला, कष्ट, त्रास हे होणारचनिर्मितीला अचानक, अडकाठी आली तरमुकाट्याने ती, सहनही करावी लागणारजन्माच्या आधी, फुलपाखरू तयार होणारअंड्याच्या कठीण कवचाच्या, कोंडवड्यातचअशा कठीण परिस्थितीत, परीक्षेच्या काळीजाणीवपूर्वक, विनयाने वागा, अशा वेळी ॥ २ ॥ ज्याच्या जे मनात,तसे प्रत्यक्षात घडणारनैराश्यग्रस्त मनात,आनंद कसा येणारउत्साही माणसाला,जग रंगीत दिसणारउदासीन माणसात,उत्साह कुठून येणार ॥ ३ ॥ आधी स्वतःची, स्वतःवर, जबाबदारी घ्यावीनंतर इतरांची, समाजाची, जगाची घ्यावीआपले यश कष्टाने, आपणच मिळवावेदुस-या कुणी, का, आयते पदरात टाकावेआत्मविश्वासाने भीड, हाती घेतल्या कामाला‘हे तर मी सहज करेन’, ध्येय असायला ॥ ४ ॥ ध्येयाच्या आड येतात, अनेक मोह मायावीवेळीच ‘नाही’ म्हणायची, धमक मात्र हवीज्ञानाच्या प्रकाशात, जो उजळून तळपतोअज्ञानाचा अंधार, तो मनात कुठे उरतोअशा स्वयंप्रकाशी व प्रेरित व्यक्तिमत्त्वालाकोण येणार नाही, आदराने सुस्वागताला ॥ ५ ॥ तरुणाईच्या उर्मी, उर्जेत, जोशाच्या काळात,सर्वांना अपार कष्टच, करावे लागतातनुसती रिकामी, दिवास्वप्नंच जे बघणार,अशांचा कधी, कुणाचा, झाला आहे बेडा पारज्याचा स्वतःवर अटळ असा विश्वास आहे,त्यालाच ठरवेल ते करता येणार आहे ॥ ६ ॥ शिकायचेच आहे, त्याला अडचण नसतेइच्छा व प्रयत्नांना हमखास यश मिळतेकष्टाने, नेमलेला अभ्यास, संपूर्ण करावाएकचित्ताने समर्पित होऊन तो करावाहाती काम आणि डोकी ज्ञान, अभाग्या मिळेनामाणूस का म्हणावे, त्याला जनावर म्हणाना ॥ ७ ॥ जगात संस्कारी, आदर्श माणसे असतातत्यांच्या संपर्कात राहून, जपा आपले हितगुणी लोकांकडे शिका, त्यांना आनंद होईलत्यांचे आचार विचार, सर्वांचे भले करेलतन, मन, धन, सर्वस्व, कामात झोकून द्याआपल्या कर्तृत्वाचा फायदा, सर्वांना होऊ द्या ॥ ८ ॥ लहानपणी, कौशल्य व ज्ञान, कसे असेलवडिलांच्या जबाबदा–या, कशा पेलवतीलशिस्तबद्ध, अभ्यास करा, काम करा, कष्टानेवेळीच, गुरु येई, मार्ग दाखवाया नेटानेमनापासून, निष्ठेने,धरा शिक्षणाची, आसकधी येणार नाही, अपयश ते, आसपास ॥ ९ ॥ आवडते काम, जो मन लावून करणारआयुष्यभर यशस्वी, सुखी व धन्य होणारजितकं सखोल ज्ञान, आणि प्राविण्य, मिळालंस्थळ, काळ, वेळ, भानच सगळं हरपलंतहान भूक हरपून, विसरा राग लोभामन तरंगायला लागेल आनंदाचे डोहा ॥ १० ॥ पंचेंद्रिये, जगाची ओळख, मेंदूला देतातचूक काय, बरोबर काय, माहिती देतातज्ञानाची, जिज्ञासा, निर्माणच, करावी लागतेआजची, गरज बघून, मिळवावी लागतेधैर्याचे पुढचे पाऊल, यशो शिखरी पोचेचणे खावे लोखंडाचे, तेंव्हा ब्रम्हपदी नाचे ॥ ११ ॥ चौकसपणाने, कणाकणाने, ज्ञान वेचावेमौल्यवान आयुष्य, ज्ञानाविना, वाया, न जावेमनाला, हळूहळू, योग्य वळण, लागणारउजळणीने, दडलेला अर्थ, उमजणारसज्जनांच्या, संगतीतच, खरी, समज येतेलोखंडाचेही, परिसाच्या स्पर्शाने, सोने होते ॥ १२ ॥ पुस्तकी ज्ञानाने, जगाची ओळख, होत नाहीकेल्याने, जे होत आहे, ज्ञानाने ते, होत नाहीगाईड वाचून, शिकण्याचा मार्ग, खरा नाही‘दहा दिसात, फाडफाड इंग्लिश,’ खरे नाहीशिकायचे असेल, तर, पाठ्य पुस्तक हवेशिक्षकाचे, बोट धरूनच, चालायला हवे ॥ १३ ॥ पळा, पळा, कोण पुढे पळे, तो धापा टाकेलयश मिळाल्यावर, त्याला, ‘ग’ ची, बाधा होईलस्वतःला कधी, ‘सर्वशक्तिमान’, समजू नयेसामाजिक जाणीवेने, व्यवहार करणारेहिंमत वाढवाया, साथीला, असलेले बरे ॥ १४ ॥ माहितीच्या शस्त्राने, लुबाडणूक बरी नाहीज्ञानाचा दुरूपयोग, शिक्षणाचे ध्येय नाहीखरे शिक्षण, हे, योग्य वागायला, शिकवतेचांगले शिक्षण, हे, स्वनियंत्रण शिकवतेमिळाल्या, शिक्षणाचा, सर्वांना, उपयोग व्हावाअसा उपक्रम, हाती घ्यावा, पूर्णत्वास न्यावा ॥ १५ ॥ आपल्या आवाक्या, बाहेरही, गोष्टी घडणारबना आपण, आपल्या जीवनाचा, शिल्पकारस्वतःची यशोगाथा, स्वतःच हवी, लिहायलादुस-यावर विसंबला, कार्यभाग बुडाला ॥ १६ ॥ धरतीवर, जमिनीखाली, आणि आकाशातज्ञानाची भांडारे, भरली आहेत, काठोकाठत्याची रहस्ये, गुरूशिवाय, कुणा समजेनापण आजकाल, गुरूला, कुणीच, विचारेनाशिक्षक प्रसन्न झाला, तरच ज्ञान मिळेलतो शिकण्याचे, अनेक, छान मार्ग, शिकवेल ॥ १७ ॥ जग चालवणारा, लाखोंचा पोशिंदा, तो कोणसृष्टी, सचेतन करणारा, आहे तरी, कोणमनाच्या आतली, प्रेरणा, ती कुणाला, दिसेनास्फूर्ती देणारी भावना, ओळखायला येईनाप्रेरणा, ही, चांगल्या कामामागची, शक्ती आहेतिची, जोपासना करणेही, गरजेचे आहेजग काय म्हणेल, याची, उगा चिंता, सोडावीमनातले ऐकून, आनंदाची, वाट धरावी ॥ १८ ॥ यशस्वी विद्यार्थ्यांना माझ्या शुभेच्छा. – विद्यावाचस्पति डॉ. अनिल मोकाशी (बालरोगतज्ञ)एमबीबीएस, एमडी, डीसीएच, एफआयएपी,पीएचडी (मुलांची वाढ व विकास)

प्रेरणा ही चांगल्या कामामागची शक्ती Read Post »

Child Doctor

आजारांसाठी नाही – बाळासाठी डॉक्टर हवेत!

आजारांसाठी नाही – बाळासाठी डॉक्टर हवेत! बहुतेक वेळा बाळ आजारी पडलं तरच आपण डॉक्टरांकडे जातो.पण खरंतर बाळासाठी, आणि ते आजारी पडू नये म्हणून डॉक्टरांकडे जावं लागतं. बाळ महत्वाचं आहे.बाळ निरोगी ठेवायचं असेल, तर “काय करायचं?” आणि “काय टाळायचं?” हे डॉक्टरांकडून शिकावं लागतं. माहितगाराशी अपूरा संपर्क ही एक गंभीर सामाजिक आरोग्य समस्या आहे. आई–डॉक्टर नातं कसं असावं? “विद्यार्थिनी – शिक्षक” असावं “ग्राहक – व्यापारी” नको डॉक्टर केवळ उपचार देत नाही – ते मार्गदर्शन करतात.डॉक्टरांचा पेशंटवर विश्वास असेल, तर ते जबाबदारीने निर्णय घेतात.विश्वास नसेल, तर फक्त तपासणी करून चिठ्ठी देतात. डॉक्टरची निवड करताना लक्षात ठेवा… आपल्या शिक्षणपद्धतीत बाल संगोपनाचं वैज्ञानिक शिक्षण नसतं.बाळाच्या गरजेनुसार आईला वेळीवेळी नव्याने शिकावं लागतं.हे काम डॉक्टर करू शकतो – आणि करायलाच हवं. डॉक्टर – आई – बाळ : एक सहजीवन आपुलकीचे संबंध हवे डॉक्टरच आदर्श माता घडवू शकतो. बाळासाठी डॉक्टर हवे – फक्त आजारासाठी नव्हे! बेस्ट लक! – विद्यावाचस्पति डॉ. अनिल मोकाशी (बालरोगतज्ञ)एमबीबीएस, एमडी, डीसीएच, एफआयएपी,पीएचडी (मुलांची वाढ व विकास)

आजारांसाठी नाही – बाळासाठी डॉक्टर हवेत! Read Post »

baby Playing

पाठीवर झोपवा, पोटावर खेळवा! – बालविकासाचा मंत्र

“पाठीवर झोपवा, पोटावर खेळवा!”हा बालविकासाचा नवा मंत्र आहे. बाळांनी झोपावं पाठीवर, खेळावं पोटावर. याला “पालथा खेळ वेळ”, Tummy Time म्हणतात. पालथा वेळ – कधी सुरू करावा? बाळ जन्मल्यापासून पहिल्या दिवसापासूनच पालथा वेळ सुरू करता येतो.आईच्या पोटावर, छातीवर – स्तनांच्या मध्ये बाळाला सुरक्षित व मायेने पालथं ठेवून सुरुवात करता येते.हे बाळाला आवडतं, कारण त्याला आईचा उबदार स्पर्श, नजरेचा संपर्क आणि आवाज मिळतो.ही जवळीक बाळात विश्वास, प्रेमाची जाणीव, आणि संवेदनशील परस्परसंवाद निर्माण करते. पालथा वेळ का महत्वाचा आहे? १. मेंदूला चालना मिळते २. स्नायू बळकट होतात ३. डोक्याचा सपाटपणा टाळतो ४. श्वसन सुधारते. ५. दृष्टी आणि समन्वय सुधारते. ६. शरीराबाबतची जाणीव वाढते ७. भावनिक विकासास हातभार ८. विकासातील अडथळ्यांपासून संरक्षण बाळ उशिरा उलटतं, बसतं, उभं राहतं डोकं चपटं होऊ शकतं हात-खांद्यांचा समन्वय कमी होतो ९. भविष्याच्या विकासाची पायाभरणी पालथा वेळ – किती आणि कसा द्यावा? दिवसातून काही मिनिटांचा हा पालथा खेळ वेळ,बाळाच्या आयुष्यात मोठा फरक घडवतो!हे खेळाच्या रूपात करा.बाळाच्या जवळ रहा, संवाद साधा, हसा, गा, प्रेम द्या!तुमचं बाळ हसतं, खेळतं, बळकट होतंय हे अनुभवणं हीच सर्वात मोठी भरभराट आहे! – विद्यावाचस्पति डॉ. अनिल मोकाशी (बालरोगतज्ञ)एमबीबीएस, एमडी, डीसीएच, एफआयएपी,पीएचडी (मुलांची वाढ व विकास)

पाठीवर झोपवा, पोटावर खेळवा! – बालविकासाचा मंत्र Read Post »

Group of kids bullying another child at school, signaling peer pressure and harassment.

शालेय जीवनात “छळवादी दांडगाई” – एक गंभीर समस्या

शालेय जीवनात “छळवादी दांडगाई” ही एक गंभीर समस्या आहे. लक्ष ठेवा बरं का! मुलांच्या भोवतीचं सामाजिक वातावरण त्यांच्या वाढीसाठी पोषक आहे की हानीकारक आहे हे कुणी तरी जबाबदारीनी बघावं लागतं. मुलांसंबंधी एखाद्या गोष्टीसाठी बरेच लोक जबाबदार असल्यावर, कुणीच जबाबदारीने वागत नाही. सगळे एकमेकांकडे बोट दाखवतात. नुकसान मुलांचे होते. कधी कधी कायमस्वरूपी होते. गंभीर होते. दुर्दैवी देखील होऊ शकते. मोठी समंजस मुले, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, व्यवस्थापन, पालक, संबंधित डॉक्टर यांना समस्येबद्दल परिपूर्ण माहिती व जागरूकता असायला हवी. ‘छळवादी दांडगाई’ दिसत नाही, पण टोचते. ‘छळवादी दांडगाई’ दिसत नाही, पण खोलवर टोचते. मुलांचं मन दुखावते. आत्मविश्वास खचवते. त्यांचं हसणं, खेळणं, शिकणं सगळंच बिघडते. छळवादी दांडगाई’ चे शिकार आणि शिकारी दोन्ही मुलेच असतात. दोघांच्याही कडे लक्ष देण्याची गरज आहे. छळ म्हणजे साधं भांडण नाही, साधी चिडवाचिडवीही नाही.तो मुद्दाम, सहेतुक, वारंवार, आणि एखाद्यालाच लक्ष्य करून केला जातो — त्याला त्रास द्यायचाच हेतू असतो. `छळवादी दांडगाई’ चे प्रकार. १) शारीरिक छळ. मारहाण, ढकलणे, वस्तू फेकणे, शारीरिक इजा. २) शाब्दिक छळ. नावं ठेवणे, उपहास, चिडवणे, टोमणे, धमक्या, शिव्या, छेडखानी, अश्लील बोलणे. ३) मानसिक सामाजिक छळ. चिडवणे, दुर्लक्ष करणे, एकटा पाडणे, सामूहिक बहिष्कार, अफवा पसरवणे, इतरांना भडकवणे. ४) सायबर छळ (सायबरबुलिंग) मोबाईल, सोशल मीडिया, मेसेजेस, ई-मेल अपमान, धमकावणे, फोटो, व्हिडिओ दुरुपयोग. ५) गंभीर गुन्हे. रॅगिंग, लैंगिक, गटाने, शस्त्राने हल्ला, ॲसिड हल्ला. हुंडा यांच्यात मुलांचा सहभाग. मुलं अशी का वागतात कारण त्यांना चांगले वागावे चुकीचे वागू नये हे कुणी कधी शिकवलेच नसते. ना घरी ना शाळेत. त्यांनी अशी वागणूक पाहिलेली असते. अनुभवलेली असते. “हे चुकीचं आहे” असं त्यांना कुणी सांगितलेलंच नसतं. ‘छळवादी दांडगाई’ बाबत शंकेखोरच असायला हवे” दर तीन मुलांपैकी एकाला छळवादी दांडगाईचा अनुभव आलेला असतो. मुलींना सुद्धा. इतकी या समस्येची व्याप्ती मोठी आहे. एक सडका आंबा अख्खी अढी नासवतो. दोनचार गुंड पुंड एकत्र येऊन लांडगे झाले, की ते दहा बारा कोकरांपैकी कुणाला तरी एकटे पाडून लक्ष्य करू शकतात. बाकीचे प्रेक्षक होतात. किंवा सहभागी होतात. मूल`छळवादी दांडगाई’ चा शिकार असल्याचा संशय यायला हवा. मुलांचं जेवण, वजन, झोप, बोलणं, वागणं अचानक बदलतं. डोकं दुखतं, पोट दुखतं, उलट येते अशी वारंवार तक्रार येते. पण तपासण्यात काहीच आजार सापडला नाही तर समजावं, कारण मानसिक आहे. दडपण आहे. ताण तणाव आहे. छळवादी दांडगाईची डॉक्टरांना शंका यायला हवी. High index of suspicion. संशयाचे तीक्ष्ण भान. वर्गात गटबाजी, टोमणे, सामाजिक सुसंवाद यावर शिक्षकांचे लक्ष द्यायला हवे. High index of suspicion. संशयाचे तीक्ष्ण भान. मूल जर वारंवार शाळेत जायचं नाही, तो मला त्रास देतो. असं म्हणत असेल. गप्प गप्प, एकटा रहात असेल. घाबरलेला, भेदरलेला वाटत असेल तर पालकांनी त्याची गंभीर दखल घ्यायला हवी. मुलांशी बोला. बोलतं करा. मित्र, खेळ, वर्गातील, दिवसभरातील घटनांबाबत गप्पा मारा. काहीतरी सूचक सापडतेच. High index of suspicion. संशयाचे तीक्ष्ण भान. छळवादी दांडगाई थांबवली पाहिजे. दुष्परिणाम टाळायला पाहिजे. छळ सहन करणारी मुलं स्वतःला कमी लेखतात. स्वतःमध्ये गुरफटून जातात. त्याला शाळा, माणसं नकोशी वाटतात. बालपण हरवतं. ते एकटे पडतात. कधी कधी आत्महत्येपर्यंतही विचार जातात. आणि छळ करणाऱ्या मुलांना वाटतं की तेच स्ट्राँग, गटनायक हिरो आहेत. त्यांना गुंडगिरी करण्याचा निसर्गदत्त हक्क आहे. दुर्लक्ष झाले तर पुढे जाऊन ते गुन्हेगारीकडेही वळू शकतात. ग्रुपचा गट. गटाची गँग. गँगची कंपनी होऊ शकते. उशीर झाल्यावर चुकीची संगत लागली म्हणून चालत नाही. जागरूकता, सतर्कता, हा एकमेव मार्ग आहे. जागरूकता आणि संशयाचं तीक्ष्ण भान — हाच एकमेव उपाय! छळवादी दांडगाई थांबवा. बालपण वाचवा. – विद्यावाचस्पति डॉ. अनिल मोकाशी (बालरोगतज्ञ)एमबीबीएस, एमडी, डीसीएच, एफआयएपी,पीएचडी (मुलांची वाढ व विकास)

शालेय जीवनात “छळवादी दांडगाई” – एक गंभीर समस्या Read Post »

Scroll to Top