Dr. Anil Mokashi

Dr. Anil Mokashi telling stories to children

रामायणाच्या गोष्टी 23 – हनुमानाची वानरसेना जमली.

श्रीराम श्रीराम श्रीराम ! मारुती/हनुमान हा, वानरराज सुग्रीव याचा, सेनापती होता. त्यानी एक हाक देताच दाही दिशातून, वानर सैन्य धावत आले. त्यानी आपली वानरसेना जमवली. ते वानर सैन्य पाहता पाहता समुद्रासारखे पसरले. नर आणि वानर एकसाथ झाले. सीतेला शोधायची मोहीमच त्यांनी काढली. सुग्रीवानी सांगितले राजाची आज्ञा म्हणून, हे काम, करू नका. हे रामकार्य आहे, अशा भावनेने करा. सीता ही, सापडलीच पाहिजे. सीता सापडल्या शिवाय कोणीही परत येऊ नका. दक्षिण दिशेकडे निघालेल्या हनुमानाला श्रीरामांनी आपल्या बोटातील अंगठी, काढून दिली. सीता भेटल्यावर ही अंगठी तिला दाखव. म्हणजे तुझी ओळख तिला पटेल असे सांगितले. हनुमानाचे सैन्य सीतेला शोधत शोधत जिथे जमीन संपते. आणि समुद्र सुरू होतो. तिथपर्यंत आले. समोर अथांग समुद्र पसरला होता. आणि त्यापुढे रावणाची लंका होती. सीतेला शोधण्यात अजून एक गंभीर संकट पुढे उभे होते. हा समुद्र पार करून आपले सैन्य पलीकडे कसे न्यायचे हा प्रश्नच होता. प्रभू श्री रामचंद्र की जयप्रभू श्री रामचंद्र की जयप्रभू श्री रामचंद्र की जय – विद्यावाचस्पति डॉ. अनिल मोकाशी (बालरोगतज्ञ)एमबीबीएस, एमडी, डीसीएच, एफआयएपी,पीएचडी (मुलांची वाढ व विकास)

रामायणाच्या गोष्टी 23 – हनुमानाची वानरसेना जमली. Read Post »

बालकल्याण केंद्राच्या मूकबधिर मुलींचा प्रेरणादायी प्रवास

आत्मविश्वासाचा उत्सव: मूकबधिर मुलींचा प्रेरणादायी प्रवास

स्टेजवर नृत्यात रमलेल्या त्या मुली पाहून एक क्षणभर थांबलो. पहिल्या-दुसऱ्या वर्षाच्या कॉलेजमधल्या मुली वाटाव्यात, इतकं आत्मविश्वासानं नाचत होत्या. चेहऱ्यावर तेज, ड्रेस छान, नृत्यात कमालीची ग्रेस! पण या मुली कोण होत्या? त्या आमच्या बालकल्याण केंद्रातील सहावी-सातवीच्या मूकबधिर मुली होत्या. त्यांच्याकडे पाहिल्यावर लक्षात आलं—या एका नृत्यामुळे त्यांची स्वतःविषयीची प्रतिमा कशी बदलली आहे! कदाचित, त्यांच्या मनात किंवा त्यांच्या आई-वडिलांच्या कल्पनेतही कधी आलं नसेल की त्या एवढ्या स्मार्ट, मॉडर्न आणि आत्मविश्वासानं भरलेल्या दिसू शकतात. पण आज त्या स्टेजवर होत्या, संपूर्ण आत्मविश्वासाने नृत्य सादर करत होत्या. ही आहे खरी ‘नर्चरिंग’ची जादू! हे सहजसाध्य नव्हतं. त्यांच्या कर्तृत्ववान, दूरदर्शी शिक्षकांनीच ही कल्पना सुचवली, त्यांना स्टेजवर आणलं. त्यांना ऐकू येत नाही, तरीही त्यांनी संगीत समजून घेतलं, ताल धरला, नृत्यातून भाव व्यक्त केले. हे काही साधं काम नाही! हे नुसतं नृत्य नव्हतं; हा आत्मविश्वासाचा उत्सव होता, हा स्वत्वाचा शोध होता! आज या मुली स्वतःला कधीच ‘डॅमेजड पीस’ किंवा ‘डिसेबल्ड’ मानणार नाहीत. त्यांची स्वतःविषयीची ओळख बदलली आहे. हाच खरा विजय आहे! यश म्हणजे अजून काय असतं? हे शक्य केलं शिक्षकांनी, कर्मचाऱ्यांनी! या मुलींच्या आयुष्यात हा बदल घडवून आणणाऱ्या शिक्षक-शिक्षिका, प्रशिक्षक आणि कर्मचाऱ्यांचे मनःपूर्वक आभार. त्यांनी या मुलींमध्ये आत्मविश्वास, कौशल्य आणि आत्मसन्मान रुजवला. माझ्या टीमने, माझ्या स्टाफने आणि शिक्षकांनी माझी स्वप्नं प्रत्यक्षात आणली आहेत. याचसाठी केला होता अट्टाहास! मूल केवळ शिकावं एवढ्यावरच माझा विश्वास नाही. त्यांचं व्यक्तिमत्त्व खुलावं, त्यांना स्वतःची ताकद उमगावी, ते आत्मनिर्भर बनावेत—यासाठीच हा प्रयत्न! आणि आज, या स्टेजवरच्या मुली पाहिल्यावर वाटतं—होय, हे स्वप्न पूर्ण होतंय! – विद्यावाचस्पति डॉ. अनिल मोकाशी (बालरोगतज्ञ)एमबीबीएस, एमडी, डीसीएच, एफआयएपी,पीएचडी (मुलांची वाढ व विकास)

आत्मविश्वासाचा उत्सव: मूकबधिर मुलींचा प्रेरणादायी प्रवास Read Post »

Dr. Anil Mokashi telling stories to children

रामायणाच्या गोष्टी 22 – सरळ सुग्रीवाशी मैत्री आणि वाकड्या वालीचा वध

श्रीराम श्रीराम श्रीराम ! राम लक्ष्मण सीतेला जंगलात शोधत होते. त्यांना वानरराज सुग्रीव भेटला. वानर म्हणजे वनात रहाणारे नर. वानर. आपल्यासारखी माणसेच होती ती जंगलात जगण्यासाठी झाडांवरील फळे कंदमुळे खात. त्यांना माकडां सारखे झाडांच्या फांद्यांना झोके देत लांबच्या लांब अंतरे पार करावी लागत. म्हणून ते तशी वेशभूषा करत. तोल सांभाळण्यासाठी लांब जाड शेपटी लावत. तर असा हा वानरराज सुग्रीव. श्रीरामांना भेटला. सुग्रीव दु:खी होता. कष्टी होता. त्याचा दुष्ट, गुंड, पुंड, भाऊ वाली यानी त्याला राज्यातून हाकलून स्वतः राजा बनला. राजा होण्यासाठी न्याय आणि धर्म पाळायला हवा होता. सुग्रीव जंगलात जिवाच्या भीतीने लपून बसला होता. राम आणि सुग्रीवाने एकमेकांशी मैत्री केली. चांगल्या मित्रासोबत संकटांचा सामना करणं सोपं होतं. त्यांचं ठरलं. श्रीराम सुग्रीवाला वालीपासून वाचवणार आणि सुग्रीव सीतेला शोधायला रामाची मदत करणार. सुग्रीवाचं मन स्वच्छ होतं. म्हणून श्रीरामांनी वालीचा वध करण्याचं वचन दिलं. सुग्रीवानी वालीला लढाईसाठी आव्हान दिलं. त्यांचं भयंकर युद्ध झालं. दुष्टपणा आणि अन्याय करणाऱ्याला शिक्षा होणं गरजेचं असतं. रामानी बाणाने दुष्ट वालीचा वध केला. वालीनी शेवटी आपली चूक मान्य केली. सुग्रीव पुन्हा वानरांचा राजा बनला. आपला सेनापती हनुमान याच्या मदतीने त्यानी आपली वानरसेना जमवली. नर आणि वानर एकसाथ झाले. सीतामातेला रावणाच्या तावडीतून सोडवायला सज्ज झाले. प्रभू श्री रामचंद्र की जयप्रभू श्री रामचंद्र की जयप्रभू श्री रामचंद्र की जय – विद्यावाचस्पति डॉ. अनिल मोकाशी (बालरोगतज्ञ)एमबीबीएस, एमडी, डीसीएच, एफआयएपी,पीएचडी (मुलांची वाढ व विकास)

रामायणाच्या गोष्टी 22 – सरळ सुग्रीवाशी मैत्री आणि वाकड्या वालीचा वध Read Post »

Dr. Anil Mokashi telling stories to children

रामायणाच्या गोष्टी 21 – रामभक्त शबरीची उष्टी बोरे

श्रीराम श्रीराम श्रीराम ! राम लक्ष्मण सीतेच्या शोधात जंगलातून जात होते. त्यांना एका लहानशा झोपडीमधे शबरी नावाची आदिवासी स्त्री भेटली. ती फुलांच्या माळा बनवत असे. शबरी खूप साधी होती, पण मनाने खूप मोठी होती. ती रामभक्त होती. एक ना एक दिवस आपल्याला रामाचे दर्शन होईल अशी तिला आशा होती. हातात फुले आणि मुखात राम. अचानक श्रीराम आणि लक्ष्मण आलेले पाहून शबरी खूष झाली. तिनी श्रीरामांसाठी जंगलातून बोरं आणली. एकेक बोर चाखून गोड बोरं रामासाठी ठेवली. ती साधी आणि शुद्ध मनाची होती. तिनी आपली श्रद्धा आणि प्रेम दिलं. श्रीरामांनी ती उष्टी बोरं मोठ्या आनंदानी खाल्ली. आणि शबरीचा निरोप घेऊन सीतेला शोधायला निघाले. प्रभू श्री रामचंद्र की जय.प्रभू श्री रामचंद्र की जय.प्रभू श्री रामचंद्र की जय. – विद्यावाचस्पति डॉ. अनिल मोकाशी (बालरोगतज्ञ)एमबीबीएस, एमडी, डीसीएच, एफआयएपी,पीएचडी (मुलांची वाढ व विकास)

रामायणाच्या गोष्टी 21 – रामभक्त शबरीची उष्टी बोरे Read Post »

Dr. Anil Mokashi telling stories to children

रामायणाच्या गोष्टी 20 – जटायूच्या बलिदानाने सीतेच्या शोधाला दिशा मिळाली.

श्रीराम श्रीराम श्रीराम ! सीतेने लक्ष्मण रेषा ओलांडली म्हणून रावणाला सीतेला पळवून नेण्याची संधी मिळाली. अतिशय दुःखात असलेले राम, लक्ष्मण घनदाट जंगलात सीतेला शोधू लागले. एका झुडपामागून त्यांना कुणाचा तरी कण्हण्याचा आवाज ऐकू आला. तो गरुडांचा राजा, जटायू याचा आवाज होता. जटायू रामभक्त, शूर, पराक्रमी, आणि सद्वर्तनी होता. जटायूने रावण सीतेला आकाश रथातून पळवून नेत आहे हे बघितले. सीता आक्रोश करत होती. संकटात सापडलेल्या स्त्रीला मदत करणे हे आपले कर्तव्य आहे हे जटायूला माहीत होते. जटायूने, रावणावर, हल्ला केला. तुंबळ युद्ध झाले. त्याने आपल्या चोचीने रावणाला हजारो जखमा केल्या. रावणाचा आकाश रथ मोडण्याचा प्रयत्न केला. पण रावणाने तलवार काढली आणि जटायूचे दोन्ही पंख छाटून टाकले. जटायूचे प्राण त्याच्या पंखात होते. पंख छाटले गेल्याने जटायू निष्प्रभ झाला. शक्तीहीन झाला. व जमिनीवर कोसळला. तो वेदनेने तळमळत होता. विव्हळत होता. कण्हत होता. जखमांमधून रक्ताच्या धारा वाहत होत्या. पण श्रीराम सीतेला शोधत येतील याची त्याला खात्री होती. श्रीरामांची भेट झाल्या झाल्या रावण सीतेला घेऊन आकाश मार्गे दक्षिण दिशेला गेल्याचे सांगितले. आणि मगच त्यानी श्रीरामांच्या हातात आपला प्राण सोडला. जटायूच्या बलिदानाने सीतेच्या शोधाला दिशा मिळाली आणि राम-लक्ष्मण सीतेला शोधायला दक्षिण दिशेला निघाले. – विद्यावाचस्पति डॉ. अनिल मोकाशी (बालरोगतज्ञ)एमबीबीएस, एमडी, डीसीएच, एफआयएपी,पीएचडी (मुलांची वाढ व विकास)

रामायणाच्या गोष्टी 20 – जटायूच्या बलिदानाने सीतेच्या शोधाला दिशा मिळाली. Read Post »

Dr. Anil Mokashi telling stories to children

रामायणाच्या गोष्टी 19 – सीतेने लक्ष्मण रेषा ओलांडली

श्रीराम श्रीराम श्रीराम ! श्रीराम दिव्य धनुष्य घेऊन सोनेरी हरणाचा पाठलाग करू लागले. ते मायावी हरीण श्रीरामांना हुलकावणी देत खोलवर जंगलात लांब निघून जाई. श्रीरामांनी एकच तीक्ष्ण बाण त्या हरणावर सोडला. हरणाचे रूप घेतलेला मारीच राक्षस धाडकन जमिनीवर पडला. मारीच राक्षसाने पडता पडता श्रीरामाचा आवाज काढून लक्ष्मणा धाव रे मी मेलो. लक्ष्मणा धाव रे मी मेलो. लक्ष्मणा धाव रे मी मेलो. अशी आरोळी ठोकली. श्रीराम संकटात आहे हे ऐकून सीता घाबरली. भेदरली. तिने लक्ष्मणाला आज्ञा दिली. आत्ताच्या आत्ता श्रीरामांच्या मदतीला जा. लक्ष्मणाची सीतेला जंगलात एकटे सोडून जाण्याची अजिबात इच्छा नव्हती. पण कधी कधी स्वतःच्या इच्छेविरुद्ध वागावे लागते. लक्ष्मणाने जंगलात श्रीरामांच्या मदतीसाठी जाण्याचे ठरवले. लक्ष्मणाने श्रीरामांचे नाव घेऊन एका बाणाने पर्णकुटीच्या सभोवताली जमिनीवर एक रेषा काढली. आणि सीतेला सांगितले. ही लक्ष्मण रेषा आहे. तिच्या आत कोणी येऊ शकणार नाही. पण सीतेने ही लक्ष्मण रेषा ओलांडून जाऊ नये. बाहेर धोका आहे.लक्ष्मण रेषा म्हणजे नियम. सुरक्षेचे नियम कधीही मोडायचे नसतात. लहानपणी आई वडील नियम बनवतात. ते मुलांनी पाळायचे असतात. मोठेपणी आपले आपणच नियम पाळायचे असतात. ट्रॅफिक सिग्नल लाल झाल्यावर भर चौकातून गाडी दामटली तर ॲक्सीडेंट होणारच. लक्ष्मण रेषा म्हणजे मर्यादा. ती कधीही ओलांडायची नसते. लक्ष्मण दूर गेलेला पाहून रावण एका साधूचे रूप घेऊन पर्णकुटी बाहेर भिक्षापात्र घेऊन आला. सीता भिक्षा द्यायला आली. पण ती काही लक्ष्मण रेषा ओलांडेना. तिथे लक्ष्मण रेषा आहे हे रावणाच्या लक्षात आले. त्यानी चक्कर येऊन पडल्याचे नाटक केले. मी भुकेने तळमळत आहे. माझ्या अंगात एकही पाऊल पुढे टाकायची शक्ती नाही. तूच माझ्यापर्यंत येऊन मला भिक्षा दे. असे रावणाने सीतेला सांगितले. भुकेने होणारी त्याची तडफड पाहून सीतेला त्याची दया आली. आणि ती साधूच्या रूपात आलेल्या रावणाला अन्न द्यायला पुढे आली. रावणाने तिचा हात एका झटक्यात पकडला. जबरदस्तीने आपल्या रथात ओढले. आणि आकाश मार्गाने लंकेकडे निघाला. घाबरून सीता आरडाओरडा करू लागली. तिची दयनीय अवस्था पाहून जंगलातले पशुपक्षीही ओरडू लागले. सीतेने लक्ष्मण रेषा ओलांडली आणि तिचा घात झाला. दुष्ट राक्षस रावणाने डाव साधला, सीतेला पळवून नेले. सीतेचे अपहरण झाले. प्रभू श्री रामचंद्र की जयप्रभू श्री रामचंद्र की जयप्रभू श्री रामचंद्र की जय – विद्यावाचस्पति डॉ. अनिल मोकाशी (बालरोगतज्ञ)एमबीबीएस, एमडी, डीसीएच, एफआयएपी,पीएचडी (मुलांची वाढ व विकास)

रामायणाच्या गोष्टी 19 – सीतेने लक्ष्मण रेषा ओलांडली Read Post »

Dr. Anil Mokashi telling stories to children

रामायणाच्या गोष्टी 18 – सोनेरी हरणाचा मोह

श्रीराम श्रीराम श्रीराम ! नाक कान कापलेली रक्तबंबाळ शूर्पणखा राक्षसीण रडत ओरडत आपला सख्खा भाऊ रावण याच्याकडे गेली. बहिणीची विद्रूप आणि केविलवाणी अवस्था बघून रावण संतापाने लाल लाल झाला. शूर्पणखेने रावणाला सीतेच्या सौंदर्याचे रसभरीत वर्णन ऐकवले. रामाचा वध करून सीतेला पट्टराणी करण्याची प्रतिज्ञा रावणाने घेतली. शूर्पणखेने रावणाला सांगितले. राम महापराक्रमी आहे. त्यावर कपटी, बेसूर, हास्य करत रावण म्हणाला. जिथे, शक्तीचा उपयोग होत नाही तिथे कपट नीती वापरावी. छळ कपट करावे. सरळ साध्या माणसांची फसवणूक करावी. आणि आपला दुष्ट हेतू साध्य करून घ्यावा. रावणाला तर सीताच हवी होती. रावण मारीच राक्षसाला भेटला. मारीच राक्षसाला मायावी शक्तीने कोणतेही रूप घेता येत होते. रावणानी मारीचाला सांगितले. तू कांचन मृगाचे म्हणजे सोनेरी हरणाचे रूप घेऊन रामाच्या पर्णकुटीकडे जा. सोनेरी हरणाच्या मोहात पडून सीता रामाजवळ हट्ट करेल. राम तुझ्या मागे पळत येईल. आणि मी माझा डाव साधेन. मारीच राक्षसाला ते मान्य करणे भाग पडले. आणि तसेच झाले. सीतेला आपल्या पर्णकुटी जवळ एक सोनेरी हरीण फिरताना दिसले. त्या हरणाच्या सौंदर्याने सीतेला मोहित केले. सीतेला, ते हरिण खूपच आवडले. सीतेने रामाजवळ हट्ट केला. असे अद्वितीय सुंदर हरिण आपल्या अंगणात बागडत हवे. रामाने तिची समजूत काढायचा प्रयत्न केला. श्रीरामाला शंका आली. एखाद्या मायावी राक्षसाने सोनेरी हरणाचे रूप घेतले असावे. असे, सोनेरी हरीण पृथ्वीवर असूच शकत नाही. मृगजळाच्या मागे धावण्यात काही अर्थ नाही. रखरखीत वाळवंटात दूरवर पाणी असल्याचा भास होणे म्हणजे मृगजळ. ते खरे नसते. त्याच्यामागे धावायचे नसते. पण सीता काही आपला हट्ट सोडेना. शेवटी श्रीरामांचा नाईलाज झाला. लक्ष्मणाला सीतेचे रक्षण करायला सांगून श्रीराम आपले दिव्य धनुष्यबाण घेऊन सोनेरी हरणाचा जंगलात पाठलाग करू लागले. राम लक्ष्मण सीता सोनेरी हरणाच्या मोहाच्या सापळ्यात पूर्णपणे अडकले. प्रभू श्री रामचंद्र की जयप्रभू श्री रामचंद्र की जयप्रभू श्री रामचंद्र की जय – विद्यावाचस्पति डॉ. अनिल मोकाशी (बालरोगतज्ञ)एमबीबीएस, एमडी, डीसीएच, एफआयएपी,पीएचडी (मुलांची वाढ व विकास)

रामायणाच्या गोष्टी 18 – सोनेरी हरणाचा मोह Read Post »

Dr. Anil Mokashi telling stories to children

रामायणाच्या गोष्टी 17 – लक्ष्मणानी शुर्पणखेचे नाक कापले

श्रीराम श्रीराम श्रीराम ! चित्रकूट पर्वतावरील पर्णकुटीत राम लक्ष्मण सीता राहतात हे अयोध्येच्या लोकांना कळले होते. वनवासाची प्रतिज्ञा पाळण्यासाठी, तिघेही चित्रकूट पर्वतावरून निबिड जंगलात निघाले. वाटेत त्यांना अत्री ऋषींचा आश्रम लागला. जवळच त्यांना एक मानवी हाडांचा म्हणजे माणसांच्या हाडांचा प्रचंड मोठा डोंगर दिसला. तो हाडांचा डोंगर अवाढव्य विराघ राक्षसाने मारलेल्या लोकांच्या हाडांचा निघाला. श्री रामाने एकाच बाणात त्याला यमसदनास पाठवले. म्हणजे मारून टाकले. जंगलातून मजल दरमजल करत राम लक्ष्मण सीता अगस्ती ऋषींच्या आश्रमात पोचले. तो आश्रम दंडकारण्यात होता. अगस्ती ऋषींनी भयाण उजाड आणि रुक्ष असा दंडकारण्याचा भूभाग पर्जन्यवृष्टी करून म्हणजे पाऊस पाडून झाडा फुलांनी बहरून टाकला. आणि दंडकारण्याचा प्रदेश सुपीक केला होता. अगस्ती ऋषींनी श्रीरामाला आत्ताच्या नाशिक जवळील पंचवटीचा मार्ग दाखवला. तिथे वास्तव्य करावे असे सुचवले. पण तो प्रदेश शुर्पणखा नावाच्या लांब लांब नखे असलेल्या एका राक्षसीचा होता. तिचे शरीर बेढब आणि रूप, अक्राळ विक्राळ होते. ती लंकेचा राजा रावण याची बहीण होती. श्रीराम व लक्ष्मणाचे, मोहक रूप बघून ती वेडीच झाली. तिने एक रामायणातील सुप्रसिद्ध असुरी हास्य केले. हॅ हॅ हॅ हॅ. हॅ हॅ हॅ हॅ. तिने एका सुंदर तरुण मुलीचे मायावी रूप घेतले. आणि रामाला लग्नासाठी मागणी घातली. पण रामानी सीतेकडे बोट दाखवून सांगितले ही माझी पत्नी आहे. मी तुझ्याशी लग्न करू शकत नाही. मग तिने, लक्ष्मणाला मागणी घातली. लक्ष्मणानी सांगितले मी रामाचा आजन्म सेवक आहे. माझ्याशी लग्न केले तर तुला जन्मभर रामाची दासी बनून राहावे लागेल. राम लक्ष्मण यांनी नकार दिल्याने शुर्पणखेला राग आला. तिनी आपल्या अजस्त्र हातानी एखादे फूल उचलतात तसे सीतेला उचलले. ते दृश्य बघून रामानी लक्ष्मणाला आज्ञा केली. लक्ष्मणा या दुष्ट शुर्पणखेचे नाक काप. लक्ष्मणानी तत्काळ आपली तलवार काढून एका झटक्यात शुर्पणखेचे नाक आकाशात उडवून लावले. रक्तबंबाळ शुर्पणखा रडत रडत आपला भाऊ रावण याच्याकडे राम-लक्ष्मण यांची तक्रार घेऊन गेली. प्रभू श्री रामचंद्र की जयप्रभू श्री रामचंद्र की जयप्रभू श्री रामचंद्र की जय – विद्यावाचस्पति डॉ. अनिल मोकाशी (बालरोगतज्ञ)एमबीबीएस, एमडी, डीसीएच, एफआयएपी,पीएचडी (मुलांची वाढ व विकास)

रामायणाच्या गोष्टी 17 – लक्ष्मणानी शुर्पणखेचे नाक कापले Read Post »

Dr. Anil Mokashi telling stories to children

रामायणाच्या गोष्टी 16 – भरत भेटीची गोष्ट 

श्रीराम श्रीराम श्रीराम ! श्रीराम लक्ष्मण आणि सीता चित्रकूट पर्वतावर पर्णकुटीत राहत होते. श्रीराम वनवासात आहेत हे ऐकून. भरताला राग आला. वाईट वाटले. भरताचा आक्रोश ऐकून पाषाणालाही पाझर फुटला असता. भरत म्हणाला. “मला राजा होण्याची इच्छा नाही. मी आत्ताच वनात जाऊन माझ्या लाडक्या श्रीरामाला परत घेऊन येतो. सर्व ऋषींनी भरताचे कौतुक केले. ते म्हणाले “भरता तुझी कीर्ती जगभर पसरेल. श्रीरामाबरोबरच लोक तुझेही गुणगान करतील. तुझं भावावरील प्रेम भारतीय संस्कृतीचा मानबिंदू ठरेल. भरताने सर्व आचार्यांना नम्र भावाने वंदन केले. संपूर्ण कुटुंब मंत्रिमंडळ अयोध्या वासी आणि प्रचंड सैन्यासह चित्रकुटाच्या दिशेने निघाला. वाटेत अनेक अडथळे आले. पण तो थांबला नाही. चित्रकूट पर्वतावर श्रीरामांच्या पर्णकुटीत पोचला. धावत रामाच्या पाया पडला. रामाची भेट झाल्यामुळे त्याच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहत होते. तो म्हणाला “ श्रीरामा, अयोध्या तुझी वाट पाहतेय. तू परत ये राज्य सांभाळ.” रामाने भरताला प्रेमाने घट्ट आलिंगन दिले. मिठी मारली. आणि सांगितले वडिलांनी दिलेल्या आज्ञेचे पालन करणे हे माझं कर्तव्य आहे. मी परत येऊ शकत नाही. अयोध्येचा राज्यकारभार बघणे. हा तुझा राजधर्म आहे. मी माझे कर्तव्य पाळतो. तू तुझा राजधर्म पाळ. भरताने चंदनाच्या लाकडी पादुका म्हणजे चपला श्रीरामांसमोर ठेवल्या. आपल्या पायाचा स्पर्श या पादुकांना करा. त्यांचा मी राज्याभिषेक करीन. व आपला प्रतिनिधी म्हणून राज्यकारभार सांभाळेन. असे भरताने श्रीरामांना सांगितले. भरताने त्या पादुका डोक्यावर घेतल्या. आणि तो अयोध्येला परत गेला. त्याने आयुष्यभर साधेपणा ठेवला. आपले आपल्या भावावरील निस्वार्थ प्रेम. कर्तव्य आणि प्रामाणिकपणा या गुणांमुळे भरत आणि राम यांचं आदर्श भावंडांचं नातं 14 हजार वर्षानंतर सुद्धा आजही भारतीय संस्कृतीमधे रुजलेलं आहे. प्रभू श्री रामचंद्र की जयप्रभू श्री रामचंद्र की जयप्रभू श्री रामचंद्र की जय – विद्यावाचस्पति डॉ. अनिल मोकाशी (बालरोगतज्ञ)एमबीबीएस, एमडी, डीसीएच, एफआयएपी,पीएचडी (मुलांची वाढ व विकास)

रामायणाच्या गोष्टी 16 – भरत भेटीची गोष्ट  Read Post »

Dr. Anil Mokashi telling stories to children

रामायणाच्या गोष्टी 15 – श्रावण बाळाचा आणि राजा दशरथाचा मृत्यू.

श्रीराम श्रीराम श्रीराम ! श्रीरामाच्या वनवासाने राजा दशरथाची परिस्थिती दयनीय झाली होती. श्री रामाच्या आठवणीने राजा दशरथ तळमळत होता. मंत्री सुमंत धीर देत होते. आधार देत होते. राजा, तू धार्मिक आहेस. चांगला शिकलेला विद्वान आहेस. धैर्यवान आणि शूरवीर आहेस. आयुष्यात चढ उतार येत असतात. अंधार आणि उजेड येत असतात. चांगल्या घटना, वाईट घटना, घडत असतात. सुख आणि दुःख येत असते. जात असते. तुझ्यासारख्या तपस्वी व्यक्तीने या परिस्थितीचा शांतपणे, सामना करायला हवा. राजा दशरथाला आठवले. श्रावण बाळाच्या अंध आई-वडिलांच्या शापामुळेच हे सगळे घडते आहे. एकदा राजा दशरथ जंगलात शिकारीला गेला होता. अंधार पडू लागला होता. राजाला नदीकाठाच्या दिशेने झुडपाच्या आड कुणीतरी जनावर पाणी पीत असल्याचा आवाज आला. राजाने मारलेला धनुष्याचा बाण लागून, “अगं आई ग, मेलो” असा आवाज ऐकू आला. धावत जाऊन राजाने पाहिले तर एका तरुणाच्या छातीत तो बाण घुसला होता. तरुण वेदनेने तळमळत होता. त्यानी सांगितले माझे नाव श्रावण आहे. माझे आई-वडील वृद्ध आणि अंध आहेत. मी त्यांना खांद्यावर कावडीत घेऊन चालत तीर्थयात्रेला निघालो आहे. ते तहानलेले आहेत. त्यांना हे पाणी प्यायला नेऊन दे. असे म्हणून तो गतप्राण झाला. राजा दशरथ श्रावण बाळाच्या वृद्ध आई-वडिलां जवळ आला. श्रावणाच्या मृत्यूची हृदय द्रावक हकीकत सांगितली. श्रावणाच्या आई-वडिलांनी दुःखानी टाहो फोडला. आणि मृत्यूशयेवर असतानाच राजा दशरथाला शाप दिला. “आमच्यासारखाच तुलाही मुलाच्या विरहानेच मृत्यू येईल”. राजा दशरथ म्हणाला, तो भयानक शाप आज खरा होणार आहे. राम… राम… राम… दशरथाच्या घशाला घरघर लागली. श्रीरामाच्या चैतन्यमयी मूर्तीचे ध्यान करत त्याने प्राण सोडला. त्याचे निधन झाले. तो स्वर्गवासी झाला. प्रभू श्री रामचंद्र की जय.प्रभू श्री रामचंद्र की जयप्रभू श्री रामचंद्र की जय. – विद्यावाचस्पति डॉ. अनिल मोकाशी (बालरोगतज्ञ)एमबीबीएस, एमडी, डीसीएच, एफआयएपी,पीएचडी (मुलांची वाढ व विकास)

रामायणाच्या गोष्टी 15 – श्रावण बाळाचा आणि राजा दशरथाचा मृत्यू. Read Post »

Poster Set For Parents

Poster Set for Parents

– विद्यावाचस्पति डॉ. अनिल मोकाशी (बालरोगतज्ञ)एमबीबीएस, एमडी, डीसीएच, एफआयएपी,पीएचडी (मुलांची वाढ व विकास)

Poster Set for Parents Read Post »

Dr. Anil Mokashi telling stories to children

रामायणाच्या गोष्टी 14 – श्रीराम चित्रकूट पर्वताकडे निघाले.

श्रीराम श्रीराम श्रीराम ! अयोध्येतील नागरिक नदीच्या तीरावर गाढ झोपले असतांना राम-लक्ष्मण सीता रथात बसून निघाले. सकाळ झाल्यावर लोकांच्या लक्षात आलं. आपल्या नशिबाला दोष देत सगळेजण आपापल्या घरी परतले. रथ गंगा नदीच्या तीरावर आला. श्रीराम लक्ष्मण सीता यांनी रथातून उतरून पवित्र गंगा नदीला नमन केले आणि गंगास्नान केले. आदिवासी राजा निषाद राज याला श्रीराम त्यांच्या राज्यात आला आहे हे कळले. राजा निषाद श्रीरामांचा निस्सीम भक्त होता. त्याने श्रीरामांना आपल्या राजवाड्यात राहण्याची विनंती केली. पण श्रीरामांनी नम्रपणे नकार दिला. माझे वडील राजा दशरथ यांनी मला, 14 वर्षे तपस्वी जीवन जगण्याची आज्ञा दिली आहे. आणि वडिलांच्या आज्ञेचे पालन मला करायचे आहे. असे सांगितले. श्रीरामांनी मंत्री सुमंत यांनासुद्धा परत जाऊन राजा दशरथ यांच्या मंत्र्याचे काम करावे. अशी विनंती केली. अत्यंत दुःखी अंतकरणाने मंत्री सुमंत परत गेले. राम लक्ष्मण सीता एखाद्या यात्रीकरू सारखे घनदाट जंगलातून प्रयाग गावी पोचले. गंगास्नान केल्यानंतर ते भारद्वाज ऋषींच्या आश्रमात गेले. श्रीरामांना पाहून भारद्वाज ऋषींना खूप आनंद झाला. त्यांनी त्यांचे स्वागत केले. भारद्वाज ऋषी म्हणाले श्रीरामा तुझ्या येण्याने माझी तपश्चर्या ध्यानधारणा उपास आणि तीर्थयात्रा यांचे सार्थक झाले. माझी सर्व स्वप्ने पूर्ण झाली आहेत. भारद्वाज ऋषींच्या सूचनेवरून सुंदर आणि नीरव शांतता असलेल्या चित्रकूट पर्वतावर राहण्यासाठी राम लक्ष्मण आणि सीता प्रवासाला निघाले. प्रभू श्री रामचंद्र की जयप्रभू श्री रामचंद्र की जयप्रभू श्री रामचंद्र की जय – विद्यावाचस्पति डॉ. अनिल मोकाशी (बालरोगतज्ञ)एमबीबीएस, एमडी, डीसीएच, एफआयएपी,पीएचडी (मुलांची वाढ व विकास)

रामायणाच्या गोष्टी 14 – श्रीराम चित्रकूट पर्वताकडे निघाले. Read Post »

Scroll to Top