Dr. Anil Mokashi

Two young boys energetically competing in a soccer match on a grassy field.

उन्हाळ्याचा ताप आणि शाळेतली मुले

ज्या मुलांची इच्छा आहे ताप यावा. त्यांनी उन्हात खेळावे. ज्या मुलांची इच्छा आहे ताप येऊ नये. त्यांनी सावलीत खेळावे. ज्या मुलांची इच्छा आहे ताप यावा, त्यांनी टोपी न घालता बाहेर हुंदडायला जावे. म्हणजे मस्त डोकं तापतं. फणफणून ताप येतो. हॉस्पिटल मधे इंजेक्शन सलाईन मिळतात. ज्या मुलांची इच्छा आहे ताप येऊ नये, त्यांनी टोपी घालून बाहेर जावे. ज्या मुलांची इच्छा आहे ताप यावा, त्यांनी चपला न घालता तापलेल्या फरशीवर पाय ठेवावे. ज्या मुलांची इच्छा आहे ताप येऊ नये, त्यांनी चपला घालून घराबाहेर पडावे. ज्या मुलांची इच्छा आहे ताप यावा, त्यांनी अज्जीबात पाणी पिऊ नये. आणि खुशाल रणरणीत उन्हात भर दुपारी सायकल दामटावी. पाणी कमी पिले तरच उन्हाळा बाधतो. ज्या मुलांची इच्छा आहे ताप येऊ नये, त्यांनी भरपूर पाणी प्यावे. चोवीस तासात सहापेक्षा जास्त वेळा सू व्हायला हवी. अगदी आकडा मोजा. भरपूर पाणी पिणाऱ्याला उन्हाळा बाधत नाही. तर बच्चमजी, तुम्हीच ठरवा, उन्हाळ्यात काय करायचे. काय नाही करायचे. शाळेतल्या मोठ्या मुलांना एवढं तरी आपलं आपल्यालाच समजायला हवे. ते सांगायला आई कशाला लागते! एवढे बोलून “उन्हाळ्याचा ताप आणि शाळेतली मुले” या विषयावरचं माझं भाषण मी समाप्त करतो. – विद्यावाचस्पति डॉ. अनिल मोकाशी (बालरोगतज्ञ)एमबीबीएस, एमडी, डीसीएच, एफआयएपी,पीएचडी (मुलांची वाढ व विकास)

उन्हाळ्याचा ताप आणि शाळेतली मुले Read Post »

Dr. Anil Mokashi telling stories to children

रामायणाच्या गोष्टी 33 – रामसेतू

श्रीराम श्रीराम श्रीराम ! रामसेतू : सागरी पूल. सेतू बांधा रे सागरी. सेतू बांधा रे सागरी, सेतू बांधा रे सागरी! वानर सेना आली रे लंकेसाठी निघाली रे. श्रीरामांनी मुहूर्त पाहिला शिवलिंगाची स्थापना केली. रामेश्वर हे स्थान पवित्र तीर्थ म्हणून प्रसिद्ध झाली! नल-नील दोघे भाऊ पूल बांधती चातुर्याने. शिळा-वृक्ष गोळा करती सागरात टाकती युक्तीने! पण ते दगड बुडाले सर्व जण चिंतेत पडाले. हनुमानाने युक्ती सांगितली श्रीराम नाव कोरू लागले! शिळा सगळ्या तरंगू लागल्या रामाचा सेतू वाढू लागला. लंकेकडे वाट निघाली सारी वानरसेना आनंदली! आजही सेतू दिसतो इतिहास-विज्ञान सांगतो. प्रवाळ-वाळूची निसर्ग निर्मिती सागरात पूल दिसतो ! तामिळनाडूच्या रामेश्वरमला जोडी श्रीलंकेच्या मन्नारला ४८ किलोमीटर अंतराला सिता मातेच्या मुक्तीला. रामसेतू उभारतांना हनुमानाची वानर सेना गर्जे बांधा रे सागरी सेतू बांधा रे सागरी पवनपुत्र हनुमानकी जय सियावर रामचंद्र की जय प्रभू श्री रामचंद्र की जय प्रभू श्री रामचंद्र की जय – विद्यावाचस्पति डॉ. अनिल मोकाशी (बालरोगतज्ञ)एमबीबीएस, एमडी, डीसीएच, एफआयएपी,पीएचडी (मुलांची वाढ व विकास)

रामायणाच्या गोष्टी 33 – रामसेतू Read Post »

doctor and girl doing health check up

बालपणाचे विज्ञान 2

7) लसीकरण 8) औषधे 9) ताप 10) नवजात बाळ 11) प्रथा आणि अंधश्रद्धा 12) डॉक्टर आनंदी बालपण = यशस्वी मोठेपण – विद्यावाचस्पति डॉ. अनिल मोकाशी (बालरोगतज्ञ)एमबीबीएस, एमडी, डीसीएच, एफआयएपी,पीएचडी (मुलांची वाढ व विकास)

बालपणाचे विज्ञान 2 Read Post »

Children & Stories

रामायणाच्या गोष्टी 32 – वानरसेना स्वारीला, निघाली लंकेला!

श्रीराम श्रीराम श्रीराम ! श्रीरामानी हनुमानाला लंकेची बित्तमबातमी विचारली. स्वारी करायला कोणता मार्ग कमी धोक्याचा आहे. रक्षणासाठी किती सैन्यबळ आहे. लंके भोवती किती कोट आहेत. हल्ला करायला, कोणता मार्ग सोयीचा आहे. राक्षस नागरिकांचे रावणाविषयी काय मत आहे. हनुमानानी हेराच्या नजरेनी लंकेतील अनेक बारकावे टिपले होते. श्रीरामानी सुग्रीवाला विचारले. एवढा मोठा समुद्र ओलांडून आपले वानर सैन्य लंकेपर्यंत कसे पोचेल. सुग्रीव म्हणाला. काळजी करू नका. आपण सागरावर सेतू उभारू, पूल उभारू त्याचं नाव रामसेतू ठेवू. आणि या रामसेतूवरून आपले कोट्यावधी वानर सैन्य लंकेत घुसवू. वानर सेनापतींनीभराभर हुकूम सोडले. विस्कळीत वानर सैन्य दाही दिशातून गोळा झाले. पाहता पाहता ते सैन्य एखाद्या सागराप्रमाणे पसरले. लाटांप्रमाणे उसळणाऱ्या वानर सेनेच्या समोर महाप्रतापी श्रीराम आपल्या तेजस्वी पावलांनी चालत होते. वानर सैन्यात विलक्षण उत्साह संचारला होता. जय श्रीराम जय श्रीराम असे नारे दिले जात होते. दुष्ट राक्षस शक्तींना हरवून रामराज्य उभारण्यासाठी विशाल वानर सेना लंके कडे निघाली होती. जय श्रीराम, या एका ना-याने अनेक राक्षस भयभीत झाले. पण चारी दिशातून जय श्रीराम नाऱ्यानी आकाश दणाणले. वाटेत काही राक्षसांची राज्ये होती. जय श्रीराम या नाऱ्याचा अनेकांना, राग येऊ लागला. जय श्रीराम हा नारा ऐकून त्यांच्या तळपायाची आग मस्तकाला जाई. एवढी प्रचंड मोठी वानर सेना अंगावर येतांना पाहून काही चोरांना वाटले की ही कुठल्या तरी भयंकर आजाराची साथ आहे. पण सीतामातेचे कपटाने अपहरण केल्याचा राग संपूर्ण भारतवर्षात होता. जनतेचे श्रीरामांना समर्थन होते. सारे वानरसैन्य, अतिशय शिस्तीत सागर तीरावर आले. समोरचा अथांग सागर ओलांडून सगळ्यांना पलीकडे जायचे होते. रामसेतू कोण व कसा बांधणार हाच यक्ष प्रश्न होता. म्हणजे खूप मोठा प्रश्न होता. वानर सेना स्वारीला, निघाली लंकेला! प्रभू श्री रामचंद्र की जयप्रभू श्री रामचंद्र की जयप्रभू श्री रामचंद्र की जय – विद्यावाचस्पति डॉ. अनिल मोकाशी (बालरोगतज्ञ)एमबीबीएस, एमडी, डीसीएच, एफआयएपी,पीएचडी (मुलांची वाढ व विकास)

रामायणाच्या गोष्टी 32 – वानरसेना स्वारीला, निघाली लंकेला! Read Post »

Children & Stories

रामायणाच्या गोष्टी 31- लंका दहन करून हनुमानाची रामभेट

श्रीराम श्रीराम श्रीराम ! लंकेत सीतेला भेटून, रावणाला धडा शिकवून, लंका दहन करून हनुमान आकाश मार्गे उडत उडत परत आला. तो जसा वानर सेनेसमोर आला, तसे सगळे वानर आनंदाने उड्या मारू लागले. “जय हनुमान! जय श्रीराम!” असा जयघोष झाला. हनुमान लगेच रामाकडे गेला आणि त्याला सगळी कहाणी सांगितली—सीतेच्या धैर्याची, रावणाच्या क्रूरतेची आणि लंकेच्या विध्वंसाची. रावणाच्या राज्याची. त्याच्या सामर्थ्याची. त्याच्या सैन्याची. सगळ्या गुप्त बातम्या हनुमानाने श्रीरामांना सांगितल्या. सीतेने हनुमानाला दिलेले सोन्याचे कंगण बघून श्रीरामाला धीर आला. सीता सुखरूप असल्याची ती खूण होती. हनुमानाने रामाला एक विनंती केली, “मला सदैव तुमच्या सेवेत राहायचं आहे!” राम प्रसन्न झाले आणि त्यांनी हनुमानाला प्रेमाने आशीर्वाद दिला. आणि तथास्तु म्हटले. आता वेळ आली होती मोठ्या निर्णयाची! राम, लक्ष्मण, सुग्रीव आणि हनुमानाने ठरवलं—संपूर्ण वानरसेनेसह लंकेवर चढाई करायची, सीतेला परत आणायचं! ते वानर सेनेची जमवाजमव करायच्या तयारीला लागले. प्रभू श्री रामचंद्र की जयप्रभू श्री रामचंद्र की जयप्रभू श्री रामचंद्र की जय – विद्यावाचस्पति डॉ. अनिल मोकाशी (बालरोगतज्ञ)एमबीबीएस, एमडी, डीसीएच, एफआयएपी,पीएचडी (मुलांची वाढ व विकास)

रामायणाच्या गोष्टी 31- लंका दहन करून हनुमानाची रामभेट Read Post »

Stages of Child growth illustration

बालपणाचे विज्ञान 1

#31 1) बाळाच्या वाढीवर लक्ष ठेवा. २). जुलाब, डीहायड्रेशन, पाणी १) अंगावर पाजा २) गोवर लस द्या. ३) संडासचा वापर करा. ४) अन्न व पाणी स्वच्छ ठेवा. ५) हात धुवून अन्नाला स्पर्श करा. ६) माशांचा नायनाट करा. 3) फक्त स्तनपान काही आयांना मदतीचा हात लागतो. अंगावरचे दूध नैसर्गिकपणे सुटते. दुध वाढवण॒यासाठी नैसर्गिक मार्ग वापरा.अंगावरचे दुध वाढवणा-या गोष्टी १) वारंवार चोखणे२) वारंवार रिकामे करणे३) चांगला आहार४) कमी काळजी. १.पान्हा फुटतो.२.वजन वाढते ३.बाळ छान झोपते.४.सात आठ वेळा संडास होते.५.दिवसातून सहापेक्षा जास्त वेळा लघवी होते. 4) बाटली पुतनामावशी आहे. 5) वरचे दूध नको. 6) मुलांना अन्न लागते. १)  दोन वर्ष अंगावर पाजा.२) सहाव्या महिन्याला कांजी द्या.३) कांजित प्रथिने घाला.४) कांजित फळे किंवा भाजी घाला.५) दिवसातून चार वेळा कांजी द्या.६) आजारी बाळाला अन्न द्या. – विद्यावाचस्पति डॉ. अनिल मोकाशी (बालरोगतज्ञ)एमबीबीएस, एमडी, डीसीएच, एफआयएपी,पीएचडी (मुलांची वाढ व विकास)

बालपणाचे विज्ञान 1 Read Post »

Dr. Anil Mokashi telling stories to children

रामायणाच्या गोष्टी 30 – हनुमानाने, लंका पेटवली.

श्रीराम श्रीराम श्रीराम ! रावणाने राक्षसांना, मारुतीच्या शेपटीला, कपडे चिंध्या बांधून, त्यावर तेल ओतून, पेटवून देण्याची, आज्ञा दिली. जसजसे राक्षस, शेपटी भोवती, कपडे गुंडाळत होते, तसतशी शेपटी, मोठी मोठी, होत जात होती. रावण म्हणाला, लंकेतील सगळे, कपडे आणा. एकही कापड दुकान, सोडू नका. हजारो सेवक, पळत सुटले. लंकेतील सगळी, कापड दुकाने लुटली. लंकेच्या एकाही घरात, कापड म्हणून, शिल्लक उरले नाही. सगळे कपडे, हनुमानाच्या शेपटी भोवती, गुंडाळून देखील, थोडेसे शेपूट, शिल्लकच राहिले. सेवकांनी भराभर, त्याच्यावर तेल ओतले. शेपटाला, आग लावून दिली. शेपूट काही पेटेना. रावण स्वतः, पुढे आला, आणि जोरात, फुंकर मारली. त्याबरोबर आग भडकून, रावणाच्या दाढी मिशा, जळून गेल्या. आग भडकल्यानंतर, हनुमान एका, उंच प्रासादावर, उडी मारू बसला. जळत्या शेपटीने, तो प्रासाद, धडाधडा पेटू लागला. भराभर उड्या मारत, या घरावरून, त्या घरावर. या गावातून, त्या गावात. या राज्यातून, त्या राज्यात. संपूर्ण देश, हनुमानाने, काही क्षणात, पेटवून दिला. हनुमानाची, टिंगल टवाळी करत, खदाखदा हसणारे राक्षस, जीवाच्या भीतीने, सैरावैरा पळत सुटले. एकच, हलकल्लोळ, उडाला. आगीच्या ज्वाळा, आकाशाला भिडल्या. जमिनीवर, राखेचे पर्वत, उभे राहिले. राक्षस म्हणाले, रावणाने सीतेला, पळवून आणल्यामुळे, आमच्यावर हा, प्रसंग आला. बिभीषण म्हणाला, करावे तसे, भरावे, पापाचे फळ नेहमीच, कडू असते. संपूर्ण लंका, पेटल्याची, खात्री झाल्यावर, हनुमानाने, समुद्रकिनाऱ्यावर येऊन, समुद्राच्या पाण्यात, आपली शेपटी, विझवली. आणि भराभर, उड्या मारत तो, सीतेजवळ आला. सीता सुखरूप होती. हनुमान सीतेला, भक्ती भावाने, नमस्कार करीत म्हणाला. सीतामाते, तू सुरक्षित असल्याची, खूण म्हणून, तुझ्या हातातील, सोन्याचे कंगण, मला दे. मी ते, श्रीरामांना दाखवीन. तू निश्चिंत रहा. तुझे दुःख, लवकरच, दूर होईल. प्रभू श्रीरामचंद्र की जयप्रभू श्री रामचंद्र की जयप्रभू श्री रामचंद्र की जय – विद्यावाचस्पति डॉ. अनिल मोकाशी (बालरोगतज्ञ)एमबीबीएस, एमडी, डीसीएच, एफआयएपी,पीएचडी (मुलांची वाढ व विकास)

रामायणाच्या गोष्टी 30 – हनुमानाने, लंका पेटवली. Read Post »

Dr. Anil Mokashi telling stories to children

रामायणाच्या गोष्टी 29 – रावणाच्या दरबारात रामाचा हेर-हनुमान!

श्रीराम श्रीराम श्रीराम ! अशोकवनात हनुमानाची सीतेशी भेट झाली. अनेक दिवस त्यानी काही खाल्लंच नव्हतं. त्याच्या पोटात कावळे कोकलत होते. समोर हजारो झाडे आणि त्यांना लगडलेली लाखो फळे! मग काय—हनुमान संपूर्ण अशोकवनावरच तुटून पडला! रसाळ फळे तोंडात बकाबका कोंबली. झाडे उखडली फांद्या मोडल्या जमिनीवर फळांचा चिखलच झाला! पहाऱ्याच्या राक्षसिणी, घाबरून मागे सरकल्या. “कोण हा माकड?” त्यांना कळेना. रावणापर्यंत ही बातमी पोचलीच! “एका माकडाने संपूर्ण अशोकवन उद्ध्वस्त केले आहे!” रावणाचा राग अनावर झाला. “त्याला ठेचून टाका!” रावणानी राक्षस सैन्य पाठवले. पण शक्तीमान, बुद्धिमान, हनुमानापुढे, काही ते टिकले नाही. एका क्षणात सगळे गडाबडा लोळत पडले! शेवटी रावणाने स्वतःच्या बलाढ्य मुलाला पाठवले—अंगदला! हनुमानाच्या मनात एक योजना होती. हनुमानाला तर रावणाच्या दरबारात जायचे होते. सगळ्या गुप्त बातम्या रामापर्यंत, पोचवायच्या होत्या. मग काय? त्याने हुशारीने नाटकच रचले! लढता लढता तो अचानक जोरात ओरडला आणि बेशुद्ध पडला. मूर्च्छित झाला. राक्षसांनी त्याला दोरखंडानी घट्ट बांधले. आणि उचलून रावणाच्या दरबारात आणले. रावण ऐटीत उंच सिंहासनावर बसला होता. पण हनुमानाने आपली शेपटी लांबवली गुंडाळली आणि मोठ्ठं उंच आसन पूच्छासनच तयार केलं आणि रावणापेक्षा फूटभर उंच बसला! “तुच्छ माकडा “अशोकवन उध्वस्त केल्याची शिक्षा तुला मिळेल—मृत्युदंड!” इतक्यात विभीषण उठला. “राजन् हा राजदूत आहे! तोही रामाचा. राजदूताला मारायचे नसते. त्याला दुसरी काहीही शिक्षा द्या” रावण विचारात पडला. त्याच्या डोक्यात कल्पना चमकली. “शेपूट पेटवा याची. शेपटीला चिंध्या बांधा. त्यावर तेल टाका! पेटलेल्या शेपटासह याला गावभर फिरवा. धिंड काढा त्याची! मग समजेल याला राक्षसशक्ती काय असते ते!” दरबारी राक्षस पेटलेल्या शेपटाकडे पाहून खदाखदा हसू लागले. हनुमानाची टिंगल टवाळी करू लागले. आणि हनुमान? तो तर पेटलेल्या शेपटाकडे पाहून मनातल्या मनात गालातल्या गालात खुदुखुदू हसत होता! त्याच्या सुपिक डोसक्यात एक भन्नाट आयडियाची कल्पना शिजत होती… प्रभू श्री रामचंद्र की जयप्रभू श्री रामचंद्र की जयप्रभू श्री रामचंद्र की जय – विद्यावाचस्पति डॉ. अनिल मोकाशी (बालरोगतज्ञ)एमबीबीएस, एमडी, डीसीएच, एफआयएपी,पीएचडी (मुलांची वाढ व विकास)

रामायणाच्या गोष्टी 29 – रावणाच्या दरबारात रामाचा हेर-हनुमान! Read Post »

Dr. Anil Mokashi telling stories to children

रामायणाच्या गोष्टी 28 – हनुमानाला सीता भेटली.

श्रीराम श्रीराम श्रीराम ! जगात चांगली माणसे जास्त वाईट माणसे कमी असतात. पण राक्षसांच्या राज्यात दुष्ट राक्षस जास्त. आणि एखादाच चांगला बिभीषण असतो. बिभीषणाने सांगितल्यावरून हनुमान सीतेला शोधायला अशोक वनात गेला. अशोक वन अतिशय सुंदर होते. हजारो फळांच्या फुलांच्या झाडांनी बहरलेले होते. शेकडो राक्षसिणी तिथे पहाऱ्यावर होत्या. एका अशोक वृक्षाच्या झाडाखाली पारावर बसलेली सीतामाता हनुमानाला दिसली. हनुमान शांतपणे त्या झाडावरून खालील दृश्य पहात होता. राक्षसिणी सीतेला छळत होत्या. सीता, दुःखी, कष्टी, हताश दिसत होती. कुणीही समोर नाही हे बघून संधी साधून हनुमानाने खाली उडी मारली आणि सीतेसमोर उभा राहिला. सीता घाबरली. तिला वाटले कुणी तरी मायावी राक्षस माकडाचे रूप घेऊन आपल्याला छळायला आलेला आहे. श्रीरामाने दिलेली खुणेची अंगठी सीतेसमोर टाकून हनुमान म्हणाला. मी श्रीरामांचा दूत आहे त्यांनी मला पाठवले आहे. माझी ओळख पटवायला ही अंगठी दिली आहे. अंगठी पाहून सीतेला हायसे वाटले. श्रीराम व लक्ष्मण आपल्याला सोडवायला येत आहेत हे ऐकून तिला आधार वाटला. पण साध्या माकडांचे सैन्य या बलाढ्य राक्षसांना कसे हरवणार. सीतेला चिंता वाटू लागली. हनुमानाने हळूहळू मोठे होत आपल्या प्रचंड स्वरूपाचे दर्शन सीता मातेला घडवले. आणि तिचा हनुमानावर विश्वास बसला. प्रभू श्री रामचंद्र की जयप्रभू श्री रामचंद्र की जयप्रभू श्री रामचंद्र की जय – विद्यावाचस्पति डॉ. अनिल मोकाशी (बालरोगतज्ञ)एमबीबीएस, एमडी, डीसीएच, एफआयएपी,पीएचडी (मुलांची वाढ व विकास)

रामायणाच्या गोष्टी 28 – हनुमानाला सीता भेटली. Read Post »

Dr. Anil Mokashi telling stories to children

रामायणाच्या गोष्टी 27 – राक्षस राज्यात रामभक्त बिभीषण सापडला

श्रीराम श्रीराम श्रीराम ! डासाच्या, सूक्ष्म रूपात, हनुमान, सीतेला शोधत होता. रावणाच्या महालात, सीता दिसली नाही. पण एका महालासमोर त्याला, तुळशीचं, पवित्र वृंदावन दिसलं. राक्षसांच्या राज्यात, तुळशीवृंदावन! त्याला आश्चर्य वाटलं. आत रावणाचा भाऊ बिभीषण मनोभावे श्रीरामाची पूजा करत होता. तो शांत दिसत होता. त्याच्या चेहऱ्यावर, भक्तीचं तेज होतं. हनुमानाने स्वतःचे मूळ रूप धारण केलं. मी प्रभू श्रीरामाचा दूत हनुमान आहे. अशी स्वतःची ओळख करून दिली. राक्षस असला तरी बिभीषणानी सत्य, धर्म आणि भक्तीचा मार्ग सोडला नव्हता. जाणीवपूर्वक स्वतःच्या इच्छेने ठरवून त्यानी तो मार्ग स्वीकारला होता. राक्षसांच्या राज्यात अधर्माचे वाळवंट असले तरी बिभीषणाच्या रूपानी एक निवडुंग शिल्लक होता. त्याच्या मनात भक्तीचा ओलावा होता. रामावरती श्रद्धा होती. हनुमानाने सीतेला सन्मानाने अयोध्येला परत नेण्यासाठी बिभीषणाची मदत मागितली. मदत करायला बिभीषण आनंदानी तयार झाला. त्यानी सांगितलं, मी नेहमी, सत्याच्या बाजूनी, उभा राहीन. बिभीषणाने सांगितलं, की रावणानी सीतादेवींना अशोक वनात राक्षसींच्या पहाऱ्यात कडे कोट बंदोबस्तात कैद करून ठेवले आहे. सीतामाता, अशोकवनात आहे. हे आता, हनुमानाला समजले होते. प्रभू श्रीरामचंद्र की जयप्रभू श्रीरामचंद्र की जयप्रभू श्रीरामचंद्र की जय – विद्यावाचस्पति डॉ. अनिल मोकाशी (बालरोगतज्ञ)एमबीबीएस, एमडी, डीसीएच, एफआयएपी,पीएचडी (मुलांची वाढ व विकास)

रामायणाच्या गोष्टी 27 – राक्षस राज्यात रामभक्त बिभीषण सापडला Read Post »

Dr. Anil Mokashi telling stories to children

रामायणाची गोष्ट 26 – राक्षसांच्या राज्यात, रामदूत हनुमान

श्रीराम श्रीराम श्रीराम ! सर्व संकटांवर मात करत हनुमान लंकेत पोचला. सगळीकडे राक्षसांचा कडेकोट बंदोबस्त होता. कडक पहारा होता. काळे कुळकुळीत राक्षस हातात तळपत्या तलवारी घेऊन रस्त्यांवरून फिरत होते. दिवसाढवळ्या रावणाच्या राज्यात जाणे धोक्याचे होते. हनुमानानी रात्र होण्याची वाट पाहीली. आपले अजस्त्र शरीर सूक्ष्म करून अतिशय लहान करून एका डासाचे रूप घेतले. पण ही घटना नेमकी पहाऱ्यावर असलेल्या लंका नावाच्या राक्षसीणिनी पाहिली. तिला शंका आली. तिनी अडवलं. हनुमानानी आपलं खरं रूप प्रकट केलं. आणि आपली एक कठोर वज्रमूठ तिच्या हनुवटीवर जोरात मारली. ती गप्प खालीच बसली. ज्या दिवशी, एका माकडा कडून तुझा पराभव होईल त्या दिवशी लंका नगरीचे वाईट दिवस सुरू होतील. हे भविष्य तिला माहित होते. तो दिवस आज आला आहे हे तिला समजले. रावणानी सीतेला पळवून आणलेय पण कुठे ठेवलेय हे माहित नाही असं तिनी सांगितलं. डासाच्या रूपातला हनुमान, रावणाच्या महालात पोचला. पण त्याला सीता कुठेच दिसली नाही. तो सगळीकडे शोधतच राहिला. प्रभू श्रीरामचंद्र की जयप्रभू श्रीरामचंद्र की जयप्रभू श्रीरामचंद्र की जय – विद्यावाचस्पति डॉ. अनिल मोकाशी (बालरोगतज्ञ)एमबीबीएस, एमडी, डीसीएच, एफआयएपी,पीएचडी (मुलांची वाढ व विकास)

रामायणाची गोष्ट 26 – राक्षसांच्या राज्यात, रामदूत हनुमान Read Post »

Scroll to Top