Child & Parental Guide

Group of kids bullying another child at school, signaling peer pressure and harassment.

शालेय जीवनात “छळवादी दांडगाई” – एक गंभीर समस्या

शालेय जीवनात “छळवादी दांडगाई” ही एक गंभीर समस्या आहे. लक्ष ठेवा बरं का! मुलांच्या भोवतीचं सामाजिक वातावरण त्यांच्या वाढीसाठी पोषक आहे की हानीकारक आहे हे कुणी तरी जबाबदारीनी बघावं लागतं. मुलांसंबंधी एखाद्या गोष्टीसाठी बरेच लोक जबाबदार असल्यावर, कुणीच जबाबदारीने वागत नाही. सगळे एकमेकांकडे बोट दाखवतात. नुकसान मुलांचे होते. कधी कधी कायमस्वरूपी होते. गंभीर होते. दुर्दैवी देखील होऊ शकते. मोठी समंजस मुले, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, व्यवस्थापन, पालक, संबंधित डॉक्टर यांना समस्येबद्दल परिपूर्ण माहिती व जागरूकता असायला हवी. ‘छळवादी दांडगाई’ दिसत नाही, पण टोचते. ‘छळवादी दांडगाई’ दिसत नाही, पण खोलवर टोचते. मुलांचं मन दुखावते. आत्मविश्वास खचवते. त्यांचं हसणं, खेळणं, शिकणं सगळंच बिघडते. छळवादी दांडगाई’ चे शिकार आणि शिकारी दोन्ही मुलेच असतात. दोघांच्याही कडे लक्ष देण्याची गरज आहे. छळ म्हणजे साधं भांडण नाही, साधी चिडवाचिडवीही नाही.तो मुद्दाम, सहेतुक, वारंवार, आणि एखाद्यालाच लक्ष्य करून केला जातो — त्याला त्रास द्यायचाच हेतू असतो. `छळवादी दांडगाई’ चे प्रकार. १) शारीरिक छळ. मारहाण, ढकलणे, वस्तू फेकणे, शारीरिक इजा. २) शाब्दिक छळ. नावं ठेवणे, उपहास, चिडवणे, टोमणे, धमक्या, शिव्या, छेडखानी, अश्लील बोलणे. ३) मानसिक सामाजिक छळ. चिडवणे, दुर्लक्ष करणे, एकटा पाडणे, सामूहिक बहिष्कार, अफवा पसरवणे, इतरांना भडकवणे. ४) सायबर छळ (सायबरबुलिंग) मोबाईल, सोशल मीडिया, मेसेजेस, ई-मेल अपमान, धमकावणे, फोटो, व्हिडिओ दुरुपयोग. ५) गंभीर गुन्हे. रॅगिंग, लैंगिक, गटाने, शस्त्राने हल्ला, ॲसिड हल्ला. हुंडा यांच्यात मुलांचा सहभाग. मुलं अशी का वागतात कारण त्यांना चांगले वागावे चुकीचे वागू नये हे कुणी कधी शिकवलेच नसते. ना घरी ना शाळेत. त्यांनी अशी वागणूक पाहिलेली असते. अनुभवलेली असते. “हे चुकीचं आहे” असं त्यांना कुणी सांगितलेलंच नसतं. ‘छळवादी दांडगाई’ बाबत शंकेखोरच असायला हवे” दर तीन मुलांपैकी एकाला छळवादी दांडगाईचा अनुभव आलेला असतो. मुलींना सुद्धा. इतकी या समस्येची व्याप्ती मोठी आहे. एक सडका आंबा अख्खी अढी नासवतो. दोनचार गुंड पुंड एकत्र येऊन लांडगे झाले, की ते दहा बारा कोकरांपैकी कुणाला तरी एकटे पाडून लक्ष्य करू शकतात. बाकीचे प्रेक्षक होतात. किंवा सहभागी होतात. मूल`छळवादी दांडगाई’ चा शिकार असल्याचा संशय यायला हवा. मुलांचं जेवण, वजन, झोप, बोलणं, वागणं अचानक बदलतं. डोकं दुखतं, पोट दुखतं, उलट येते अशी वारंवार तक्रार येते. पण तपासण्यात काहीच आजार सापडला नाही तर समजावं, कारण मानसिक आहे. दडपण आहे. ताण तणाव आहे. छळवादी दांडगाईची डॉक्टरांना शंका यायला हवी. High index of suspicion. संशयाचे तीक्ष्ण भान. वर्गात गटबाजी, टोमणे, सामाजिक सुसंवाद यावर शिक्षकांचे लक्ष द्यायला हवे. High index of suspicion. संशयाचे तीक्ष्ण भान. मूल जर वारंवार शाळेत जायचं नाही, तो मला त्रास देतो. असं म्हणत असेल. गप्प गप्प, एकटा रहात असेल. घाबरलेला, भेदरलेला वाटत असेल तर पालकांनी त्याची गंभीर दखल घ्यायला हवी. मुलांशी बोला. बोलतं करा. मित्र, खेळ, वर्गातील, दिवसभरातील घटनांबाबत गप्पा मारा. काहीतरी सूचक सापडतेच. High index of suspicion. संशयाचे तीक्ष्ण भान. छळवादी दांडगाई थांबवली पाहिजे. दुष्परिणाम टाळायला पाहिजे. छळ सहन करणारी मुलं स्वतःला कमी लेखतात. स्वतःमध्ये गुरफटून जातात. त्याला शाळा, माणसं नकोशी वाटतात. बालपण हरवतं. ते एकटे पडतात. कधी कधी आत्महत्येपर्यंतही विचार जातात. आणि छळ करणाऱ्या मुलांना वाटतं की तेच स्ट्राँग, गटनायक हिरो आहेत. त्यांना गुंडगिरी करण्याचा निसर्गदत्त हक्क आहे. दुर्लक्ष झाले तर पुढे जाऊन ते गुन्हेगारीकडेही वळू शकतात. ग्रुपचा गट. गटाची गँग. गँगची कंपनी होऊ शकते. उशीर झाल्यावर चुकीची संगत लागली म्हणून चालत नाही. जागरूकता, सतर्कता, हा एकमेव मार्ग आहे. जागरूकता आणि संशयाचं तीक्ष्ण भान — हाच एकमेव उपाय! छळवादी दांडगाई थांबवा. बालपण वाचवा. – विद्यावाचस्पति डॉ. अनिल मोकाशी (बालरोगतज्ञ)एमबीबीएस, एमडी, डीसीएच, एफआयएपी,पीएचडी (मुलांची वाढ व विकास)

शालेय जीवनात “छळवादी दांडगाई” – एक गंभीर समस्या Read Post »

Happy Family

मी, माझे कुटुंब आणि दुनियादारी

मी एक ‘चांगला माणूस’ बनेन.माझा मीच ठरवून चांगला बनेन.हाताला काम असेल, डोक्यात ज्ञान असेल — तोच खरा माणूस. नसेल, तर तो फक्त सजीव. चांगलं व्हायला शिकावं लागतं. चांगलं वागायलाही शिकावं लागतं. रोज थोडं थोडं ठरवून चांगलं वागत गेलो, तर आयुष्य सुंदर होतं. हे अजिबात कठीण नाही — अगदी सोपं आहे! कुटुंब हीच आपली खरी ताकद असते.कुटुंब म्हणजे आपल्या माणसांचं बंध, आपुलकी आणि आधार. फक्त रक्ताचं नातं म्हणजे कुटुंब नाही. जसे आहेत तसे एकमेकांना आपलं मानणं,जुळवून घेणं, हेच खरं कुटुंब.कुटुंबासाठी जगावं. कौटुंबिक जीवन समाधान आणि शांती देतं. कुटुंबाशिवाय जीवन म्हणजे मुळापासून अलग झालेलं झाड — उखडलेलं रोप. रोजच्या साध्या साध्या गोष्टींनी आपण चांगले होतो.घरात सगळ्यांनी एकत्र गप्पा मारत जेवणं. जेवण तयार करणाऱ्याला “वा, मस्त!” अशी दिलेली दाद. घरातल्या स्त्रियांशी सन्मानाने वागणं,सर्वांशी आपुलकीने बोलणं.तिरकस, कुजकट बोलणं टाळणं. भांडणं न करता — समजूतदारपणानं वागणं.घरातली कामं आनंदानं करणं.या साध्याच साध्या गोष्टी चांगला माणूस बनवतात. त्यासाठी ना मोठं तत्वज्ञान लागतं, ना अध्यात्म. संवाद, सन्मान आणि संयम समृद्ध कौटुंबिक जीवनाची त्रिसूत्री.कुटुंब म्हणजे संवाद. घरातल्या माणसांशी नम्रतेने बोलावं.खेकसून बोलल्याने शब्द संपतात, पण मन ओरखडून जातं. योग्य वेळ, योग्य शब्द, योग्य प्रमाण — हाच संवादाचा मंत्र. मनातला राग, स्वार्थ, मत्सर, अहंकार — हे संसार उध्वस्त करतात. त्यामुळे कुणाला ओरबाडून काही मिळवण्याचा हव्यास नको. मी, कुटुंब आणि मग दुनियादारीप्रथम मी स्वतःची जबाबदारी ओळखावी. मग कुटुंबाची. आणि मग समाजाची. दुनियादारी म्हणजे दुसऱ्यांच्या भावना समजून घेणं, नातेसंबंध टिकवण्यासाठी प्रसंगी त्याग करणं. स्वतःच्या वागणुकीवर लक्ष देणं. सज्जन माणसांच्या सहवासात राहणं. घरात प्रेम, संयम आणि समंजसपणा असेल, तर बाहेरच्या जगात वागणं सोपं आणि सहजसाध्य होतं. “मी, माझं, मला” करत राहिलो, तर दुसऱ्याला आपलं कसं म्हणणार?कुटुंबसंस्था हे आपल्या भारतीय संस्कृतीचं सर्वात मोठं बलस्थान आहे. ती पूर्वापार लाभलेली अमूल्य देणगी आहे.ती समजा, आणि जीवापाड जपा. हेच खरं — मी, माझे कुटुंब आणि दुनियादारी! – विद्यावाचस्पति डॉ. अनिल मोकाशी (बालरोगतज्ञ)एमबीबीएस, एमडी, डीसीएच, एफआयएपी,पीएचडी (मुलांची वाढ व विकास)

मी, माझे कुटुंब आणि दुनियादारी Read Post »

Silhouette of a mother lifting her child at a sunset beach, capturing warmth and love.

मोठी होतात मुलं, तशी आई मोठी व्हावी

“मोठी होतात मुलं, तशी आई मोठी व्हावी”.आईनी मोठं व्हावं ? आईनी कसं मोठं व्हावं ? आज मातृदिना निमित्त सांगताहेत. डॉ. अनिल मोकाशी. “एकटी एकटी घाबरलीस ना” गाण्यात चिंटू म्हणतो, ‘मोठी होतात मुलं, आई मोठी होत नाही’. ते गाण्यात गोड वाटतं. पण प्रत्यक्षात मुलांबरोबर आईलाही मोठं व्हावंच लागतं. “मोठी होतात मुलं, तशी आई मोठी व्हावी”. हे त्रिकालाबाधित सत्य आहे. लहान बाळाची, शाळेतल्या मुलाची, वयात येणा-या मुलांची, तरुण मुलांची, मोठा माणूस झाल्यानंतर, आईला वयाप्रमाणे वेगळे वागावेच लागते. ही बदलाची प्रक्रिया सुरळीत ठेवणे, यात तर खरं आईचं कौशल्य आहे. बाळाच्या पहिल्या श्वासापासून आईच्या  शेवटच्या श्वासापर्यंत हे ‘आईपण’ अव्याहत अबाधित रहातं. आईचं दूध, बाल संगोपन, याही पलीकडे, त्याला घडवणं हे आईच्या जन्मभराच्या साथीनेच होतं. जिजाउंनी छत्रपती शिवाजी घडवले, हीराबेन यांनी साधेपणात, शिस्तीत नरेंद्र मोदी घडवले. काळ कुठलाही असो, ‘संस्कार’ देणे, जीवनाला उद्दिष्ट देणे, क्षमता देणे, हे आईचेच कर्तव्य असते. आई होणं नैसर्गिक असलं तरी ‘बालपणाचे विज्ञान’  आणी ‘आईपणाची कला’ शिकायलाच हवी. मूल वाढतं, परिस्थितीही सतत बदलते. आजच्या आईला ‘श्यामची आई’ होऊन कसे चालेल? १. नवजात बाळ १०० % पूर्ण आईवर अवलंबून असतं. आई किंवा आईसारखी दुसरी कुणीतरी, २४ तास, ड्युटीवर हवीच. तिच्या नुसत्या असण्याने, दिसण्याने, नजरेने, स्पर्शाने, आवाजाने, वासाने, हाताळण्याने बाळाला जग सापडतं. आईची सोबत बाळाला भावना शिकवते. आईच्या हातात आपण सुरक्षित आहोत हे त्याला समजते. हे काम तिला शिकूनच घ्यावे लागते. २. दुडू दुडू चालण्याच्या वयात बाळाचं कुतूहल जागं होतं. घरातले शिक्षण चालू होते. मुलं चालतात, बोलतात, ऐकतात, पहातात, अनुकरण करतात. प्रश्न विचारतात. आई मुलाचा आरसा बनते. त्याला चालू द्यावे, पळू द्यावे, चढू द्यावे, बोलू द्यावे. स्वतःच्या हाताने खाऊ द्यावे. भरवू नये. लहान बाळ मोठं करण्याची हौस भागली नाही म्हणून त्याला मोठं होऊच द्यायचं नाही. असं करून कसं चालेल. त्याचं त्याला समजू दे, ‘आता आपण मोठं झालो आहे’. आणि आता आपल्याला मोठ्या मुलांसारखं वागायला हवे. लहान बाळासारखं वागून चालणार नाही. दुस-या वाढदिवसाला बाळ आईपासून सुटं व्हायला हवं. लळालोंबा नको. हे काम तिला शिकून घ्यावेच लागते. ३. शालेय वयात घराबाहेरील जगात प्रवेश होतो. घराबाहेरचे शिक्षण चालू होते. शाळा, मित्र, शिक्षक, पुस्तकं, बाहेरचं, त्याचं स्वतःचं, जग निर्माण होतं. आणि तो त्याच्या स्वतःच्या जगात शिकू लागतो. शिवाजी रायगडावर, द-याखो-यात घडतो. पु. लं. देशपांडे बटाटयाच्या चाळीत घडतो. आर.के. नारायणन मालगुडीतच घडतो. पण या सगळ्या घडण्याला आईची साथ आवश्यक असते. साथ. आधार. मार्गदर्शन. हे चांगल्या सवयी लावण्याचं वय आहे. सवयी काय, लावाल तशा लागतात. चांगल्या लावल्या, चांगल्या लागतात. वाईट लावल्या वाईट लागतात. वेळेचं भान शिकवावं लागतं. वेळापत्रक फक्त शाळेचंच नसतं. घरचंही वेळापत्रक असतं. आणि आईने ते पाळायची सवय लावावी लागते. ‘मेरी मर्जी’ नही चलेगी. हे कधीतरी स्पष्टपणे सांगावं लागतं. मुलांची वाढ, मानसिक, भावनिक, बौद्धिक, शैक्षणिक विकास, आहार, लसीकरण, आजारात काळजी या गोष्टी तिला शिकून घ्याव्याच लागतात. ४. किशोरवयात मुलाची स्वतःची ओळख निर्माण व्हायला लागते. आयुष्याचा हा टप्पा सगळ्यात खडतर, सगळ्यात महत्त्वाचा असतो. शरीर, भावना, विचार, मैत्री — सारं काही ढवळून निघतं. या काळात आईनी हुकूमशहा बनून कसे चालेल? तिला संवाद साधण्याची कला आत्मसात करावी लागेल. मुलाच्या कलाकलाने घेऊन, त्याला बोलते करणे महत्वाचे असते. तुम्ही त्याला बोलायला शिकवलत, आता त्याचं ऐकायला शिका. सूर तक्रारीचा, हटकायचा नको, समजावण्याचा हवा. मोठं होणं म्हणजे जबाबदार होणं. स्वतःची स्वतः, कुटुंबाची, शेजार पाजारची, समाजाची, टप्प्या टप्प्याने वाढती जबाबदारी शिकवायला हवी. त्याच्यावर जबाबदारी टाकायला हवी. त्याच्यावर विश्वास आहे हे दाखवायला हवे. थोडं मोकळंही सोडायला हवं. पतंगाच्या मांजाला किती ढील द्यायची आणी किती ओढ द्यायची याचं तारतम्य शिकायला हवं. कला आहे ती. ५. तरुणपणाचे पंख फुटल्यावर. तो आपली वाट चालणारच ना? लक्ष ठेवावे. गरज असेल तेंव्हा साथ द्यावी. आधार द्यावा. धीर द्यावा. व्यसने, वाईट संगत अशा धोक्यांची जाणीव करून द्यावी. दिवस पाळीचे मित्र मैत्रिणी त्याचे त्यानी निवडावे. मात्र रात्रपाळीचे मित्र मैत्रिणी चालणार नाहीत. या कौटुंबिक मर्यादा, लक्ष॒मणरेषा आखून द्यायला हव्या. त्या निक्षून पाळायला लावाव्या. आपले मत मांडावे. पण हस्तक्षेप टाळावा. तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार. मी आहे तुझ्या पाठीशी. असा पवित्रा असावा. हे सगळे या वयाच्या आईला शिकून घ्यावे लागेल. ६. मध्यमवय आणि वृद्धावस्थेतील  मुलाच्या आईला जरा लवचिक भूमिका घ्यावी लागणार. मुलाला मुलं असतील. तरी त्याच्या आईचाही रोल असतोच ना?  मूक निरीक्षक व्हावे. संयम बाळगावा. अनुभव अवश्य सांगावा. पण अंमलाचा आग्रह नसावा. हेही शिकून घ्यायला हवे. असा असतो आईचा रोल, काळाच्या ओघात बदलणारा. फुलपाखराच्या जशा अंडी, अळी, कोष आणी फुलपाखरू अशा अवस्था असतात, तशा मानवी जीवनाच्या देखील वयानुसार अवस्था असतात. कोणत्याही अवस्थेत प्रेम असतं तसंच राहतं, पण त्याची अभिव्यक्ती मात्र बदलायला हवी. आई कोणतीच परिपूर्ण नसते. पण नेहमीच साथीला असते. प्रत्येक युगात, प्रत्येक घरात, आणि प्रत्येक मुलाच्या मनात, आईसारखं दुसरं कोणीच नसतं. म्हणून तर मी म्हणतो, मोठी होतात मुलं, तशी आई मोठी व्हावी. बेस्ट लक. मदर्स डे च्या शुभेच्छा. – विद्यावाचस्पति डॉ. अनिल मोकाशी (बालरोगतज्ञ)एमबीबीएस, एमडी, डीसीएच, एफआयएपी,पीएचडी (मुलांची वाढ व विकास)

मोठी होतात मुलं, तशी आई मोठी व्हावी Read Post »

School report card

School Progress Card – शाळेच्या प्रगती पुस्तकाचा अर्थ

It’s school result season. Annual progress cards are coming home. Both parents and teachers must learn to interpret them correctly. This is not just about marks — it’s about understanding the child. Scientific evaluation helps families take timely, appropriate action. शाळांचे निकाल लागण्याचे दिवस आहेत. प्रगती पुस्तके घरी येऊ लागली आहेत. पालक आणि शिक्षकांनी या प्रगती पुस्तकांचा योग्य अर्थ समजावून घ्यायला हवा. हे फक्त मिळालेल्या गुणांचेच नाही, तर मुलाच्या सर्वांगीण विकासाचे परीक्षण आहे. असे वैज्ञानिक मूल्यांकन केल्याने योग्य वेळी योग्य उपाययोजना करता येतात. Always above 80% in all subjects. Indicates Cognitive excellence. Indicates strong memory, attention span, and a well-rounded cognitive profile. He will learn anyway. He will learn well. He will learn independently. सर्वच विषयांमध्ये सातत्याने उच्च गुण मिळणे. नेहमीच सर्व विषयात ८० % वर.बौद्धिक क्षमता दाखवते. स्मरणशक्ती, लक्ष केंद्रित करण्याची क्षमता आणि समतोल बौद्धिक विकास होतो आहे असे दाखवते. कसाही शिकेल. छान शिकेल. स्वतःहून शिकेल. Indicates Language Skills. Shows verbal intelligence, reading strength, and creativity. Difficulty in abstract reasoning or numerical logic. He needs further understanding efforts and study. भाषिक क्षमता चांगली आहे. कल्पकता आहे. पण अमूर्त, अस्तित्वात नसलेल्या संकल्पना व गणितामध्ये अडचणी आहेत. या क्षेत्रात अभ्यास, प्रयत्नाची व समज येण्याची गरज आहे. वाचून लिहून शिकेल. Sensory-Motor (five senses and movements) are good. & Spatial Skills are good. Reflects strengths in coordination, visual intelligence, and fine motor skills. he understands picture language better. Bring books with lot of pictures. Bring audio books. He will learn better by hearing and seeing. संवेदी-मोटर (पंचेंद्रिये व हालचाली) छान आहेत. जागा, अवकाश याची समज चांगली आहे. सुक्ष्म हालचाली, सौंदर्यदृष्टी व दृश्य समज छान आहेत. याला चित्रांची भाषा जास्त चांगली समजते. सचित्र पुस्तके वापरा.ओडीओ पुस्तके वापरा. तो ऐकून शिकेल. बघून शिकेल. Indicates emotional status. His behavior and discipline needs attention. May suggest emotional ups and downs, home stress, or variable motivation.The child may prefer doing nothing, rather than risk being scolded for mistakes. भावनिक स्थिती जरा अस्थिर असेल. वर्तणूक, शिस्त याकडे लक्ष द्यायला हवे. भावनिक उलथापालथ, घरचा, शाळेचा, बाहेरचा ताणतणाव. काहीही कृती करायची इच्छाच नसणे. काहीतरी करून बोलणी खाण्यापेक्षा काहीच करायचे नाही. म्हणजे कुणी बारीक सारीक चुकांसाठी रागावण्याचा प्रश्नच उरत नाही. The difficulty may lie within the child.Learning difficulties. Reading, writing difficulties. Indicates learning disability, attention deficit, or a mismatch in teaching style. If I can not learn the way you teach, teach me the way I learn. समस्या मुलात असण्याची शक्यता जास्त. शिकण्यात अडचणी. वाचन दोष. लेखन दोष. शिक्षण शैलीतील विसंगती, विचलित होणे. तुम्ही शिकवता, ते मला समजत नसेल, तर मला समजेल, असं तुम्ही शिकवा ना. He may have Practical Intelligence. Shows real-world understanding and communication skills. May struggle with rote memory or time pressure. A tortoise is not expected to run with a hare. He will learn better by doing things. Vocational education suits him. त्याला प्रात्यक्षिक बुध्दी चांगली असेल. व्यवहारज्ञान व संवादकौशल्य चांगले, पण पाठांतर व वेळेचे गणित जुळवण्यात अडचण असू शकते. कासवाने सशाच्या गतीने कसे पळावे? तो “करून शिकणारा”” मुलगा असेल. त्याला “व्यवसाय शिक्षण” जास्त उपयुक्त ठरेल. He may have good Social & Emotional Intelligence. Indicates leadership, empathy, and peer acceptance. Watch for future team-based strengths. Team games suit him. He may have many friends. His company needs to be observed. त्याची सामाजिक कौशल्ये व भावनिक बुद्धिमत्ता चांगली असू शकते. नेतृत्व, सहवेदना (empathy) आणि मित्रांशी, सहकार्यांशी जुळवून घेणार. सांघिक खेळ जास्त उपयुक्त ठरतील. भरपूर मित्र असणार. संगत चांगली असण्याकडे लक्ष ठेवायला हवे. Problem may be with “Executive Functioning”. That means “Thoughtful action skills”.Indicates difficulty in task planning, sequencing, or self-monitoring. May need structured support. “विचारपूर्वक वागण्याची क्षमता” (कार्यकारी कौशल्ये) कमी असू शकते. कामाचे नियोजन, कामाचे टप्पे, पायर्या, क्रम ठरवता न येणे. कामाचे स्वतःचे मूल्यमापन यामध्ये अडचण असू शकते. That means he has “Growth Potential”. Shows brain adaptability, new motivation, or successful teaching match, good teacher, good friend. Something good is happening in his life. That is helping him learn better. Find it out. It is important. त्याच्यात पुढे जाण्याची क्षमता आहे. मेंदूची लवचिकता, नवीन प्रेरणा किंवा योग्य अध्यापन शैली, चांगला शिक्षक, चांगला मित्र. त्याच्या आयुष्यात काहीतरी चांगले घडते आहे. त्यामुळे तो चांगला शिकत आहे. शोधून काढा. महत्वाचे आहे ते. He has a problem of Under stimulation. So he has Missed Potential. Boring, educational environment. Problem may be in school, family or society. Could indicate lack of challenge, low expectations, or hidden giftedness. चेतनारहित, निर्जीव, कंटाळवाणे शैक्षणिक वातावरण. शाळेत, घरात, समाजात काहीतरी गडबड आहे. त्याच्या क्षमतेला संधीच मिळाली नाही. आव्हानाची कमतरता, स्व-अपेक्षा कमी किंवा दडलेली हुशारी सुचवते. A child’s progress card is not just a report — it’s a window into his learning journey. Let’s read it with care, compassion, and curiosity. Best luck. प्रगती पुस्तक म्हणजे फक्त गुणांचे तक्ते नाहीत — ते मुलाच्या शैक्षणिक प्रवासाची झलक आहेत. त्यामुळे त्याचा अर्थ समजून, प्रेमाने व विचारपूर्वक मार्ग काढू या. शुभेच्छा. – Dr. Anil Mokashi (Pediatrician)MBBS, MD, DCH, FIAP, PhD(Child Growth and Development)

School Progress Card – शाळेच्या प्रगती पुस्तकाचा अर्थ Read Post »

Vaccination

Is the Vaccine Safe? लस सुरक्षित आहे का?

Ask only those who truly know. Vaccines prevent serious infectious diseases. Vaccination is the best, scientific way to build immunity. Some people worry about side effects. Some resist or refuse vaccines. Many trust government vaccines but doubt optional ones.Remember: Optional does not mean unimportant or unnecessary. Decide based on: What protects your child best, and What you can afford. Parents need up-to-date, accurate information. Trust your pediatrician and scientific bodies like the Indian Academy of Pediatrics. Do not rely on rumors, neighborhood advice, or half-knowledge. Vaccines undergo strict testing for safety and effectiveness. Vaccines are life-saving gifts of science. They create a strong shield against dangerous microbes. Protect your child.Trust science. Choose vaccination. हा प्रश्न फक्त माहीतगारालाच विचारा. सध्या अनेक आया शाळेमध्ये जेई लस देऊन घेऊ का असा प्रश्न विचारतात. जरूर देऊन घ्या असे स्पष्ट सांगितले तरी काही लोकांच्या मनात शंका राहतातच. त्याची उत्तर असे आहे. आजार परवडला कि लस ? खर तर लस परवडते. टाळता येण्याजोगा प्रत्येक आजार टाळायलाच हवा. लसी गंभीर संसर्गजन्य रोग टाळतात. लसीकरण हा प्रतिकारक शक्ती वाढवण्याचा सर्वोत्तम, वैज्ञानिक पुराव्यानिशी सिद्ध झालेला मार्ग आहे. काही लोकांना लसींच्या दुष्परिणामांची काळजी वाटते. काहीजण घाबरून, किंवा विनाकारणही, हट्टीपणाने विरोध करतात. लस घ्यायला स्पष्ट नकार देतात. बरेच जण सरकारी लसींवर विश्वास ठेवतात. पण सरकार न देणाऱ्या ऐच्छिक लसींवर शंका घेतात. ऐच्छिक लसी अनावश्यक नाहीत. आपल्या बाळाच्या हिताचा निर्णय घ्यावा. आपल्याला परवडते की नाही हे बघावे. परवडत असूनही पटले नाही म्हणून टाळू नये. तो मुलावर अन्याय आहे. सरकार पूर्ण देशाला फुकट द्यायला परवडेल एवढ्याच लसी देते. सगळ्या लसी देत नाही. सरकारचे निर्णय देशहिताच्या दृष्टीने घेतलेले असतात. एकेका बाळाच्या हिताच्या दृष्टीने नाही. सरकार देत नसेल त्या लसी खाजगीतून घ्या. मूल तुमचे खाजगी आहे. सरकारी नाही. माहितगाराच्या सल्ल्याने लसिकरणाचा निर्णय घ्या. सरकारी आरोग्य कर्मचारी माहितगार नसतात. सर्व नर्सेस, सर्व डॉक्टर माहितगार नसतात. सर्व आज्या, शेजारिणी माहितगार नसतात. पालकांना अद्ययावत, अचूक माहिती असणे गरजेचे आहे. तुमच्या बालरोगतज्ञांवर आणि इंडियन अकादमी ऑफ पेडियाट्रिक्स सारख्या वैज्ञानिक संस्थांवर विश्वास ठेवा. अफवा, ऐकीव बातम्यावर विश्वास ठेवू नका. शेजारीण, वडीलधारे प्रेमाचे असतील पण माहितगार नसतात. लसी सुरक्षित आहेत की नाही, परिणामकारक आहेत की नाही हे तपासण्यासाठी लसींच्या कठोर चाचण्या घेतल्या जातात. लस ही विज्ञानाची जीवरक्षक देणगी आहे. आधुनिक लसी ही विज्ञानाची फळे आहेत. लसी म्हणजे धोकादायक सूक्ष्म जंतूंविरुद्ध लढाईसाठी एक मजबूत संरक्षक ढाल आहे. विश्वास विज्ञानावर ठेवा. लसीकरण निवडा. – Dr. Anil Mokashi (Pediatrician)MBBS, MD, DCH, FIAP, PhD(Child Growth and Development)

Is the Vaccine Safe? लस सुरक्षित आहे का? Read Post »

Indian Thali

The Power of a Pinch: Micronutrients and Child’s Immunity

Micronutrients and Immunity. We eat macronutrients with our hands—rice, chapati, dal, curry.We eat micronutrients with a pinch—chutneys, koshimbir, pickles.Our body needs only small amounts of micronutrients, so they are called “micro” nutrients. But their impact is not small—especially when it comes to immunity. Understanding the link between micronutrients and immunity makes a big difference. Parents who know this have healthy children. Those who don’t, often have sick ones.That’s why the right knowledge matters. If you want the right information, go to someone who knows. But the expert can’t visit every home—you must seek the knowledge yourself. The expert isn’t in need. You are. Your child’s health and nutrition are your responsibility. Good nutrition leads to good immunity. Malnourished children fall sick often—cough, cold, fever again and again. Each viral infection triggers the body to build new immunity, specific to that virus.As children grow older, they fall sick less often because their immune system gets stronger. But with every infection, immunity temporarily drops. If the child falls sick too often, their overall immunity stays low. This creates a vicious cycle:Malnutrition causes infection, infection worsens malnutrition.Fever, cough, cold, vomiting, diarrhoea—once these symptoms are gone, we say the illness is over.But that doesn’t mean the child has fully recovered. Only when the child gains back the weight lost during illness can we say the child is well. Parents and doctors must understand the difference between illness recovery and child’s recovery.The convalescence phase—the recovery period—is often ignored.During recovery: Feed small meals more often – hunger is low, but the body’s needs are high. Add more oil, ghee, butter – these give more calories in less volume. Keep one extra meal daily until the lost weight is regained. The most scientific and effective way to boost immunity is vaccination. Vaccines help the body produce measurable immunity (antibodies). Every vaccine-preventable disease must be prevented. Which is cheaper—getting the disease or taking the vaccine? Obviously, the vaccine is cheaper and safer. Vaccines exist for measles, mumps, rubella, chickenpox, rotavirus, polio, DPT, pneumococcal, Japanese encephalitis, hepatitis A & B, typhoid, meningococcal, and flu.Take the flu vaccine every year—it protects against that year’s strain, as decided by WHO. COVID-19 taught us to trust vaccines and science. Even children from well-fed families can be micronutrient deficient.They may not look undernourished but may still be stunted or frequently ill. This happens because their diet is not balanced. A balanced meal includes: Rice + Dal + Chapati + Vegetables + Sprouted Pulses + Fruits + Curd. Farmers buy micronutrients for their crops to grow better, but forget their own children need them too. They often just don’t know! Micronutrient deficiency is a silent but major health issue. Fruits and vegetables are the body’s natural disease-fighting foods. They are protective foods. They are rich in vitamins and minerals. Choose varied vegetables and fruits—different types, different colors—this ensures a mix of all micronutrients. For strong immunity, Vitamin A, Vitamin C and Zinc are especially important.Taking extra vitamins doesn’t give more immunity. But a deficiency definitely reduces immunity! Cooking and Nutrient Loss Cooking reduces the availability of nutrients in vegetables:Whole & raw: 100%Chopped: 80%Stir-fried: 60%Boiled: 40%Deep-fried: 20% Fruits:Whole fruit: First-class (fiber-rich)Fruit juice: Second-class (no fiber)Packaged fruit drink: Third-class (just sugar, water, flavor, color)Bring Back the Tradition of Chutneys and Koshimbiris. Chutneys made from sesame, peanuts, flaxseeds, karale, dry fruits are rich in micronutrients. Just like iodized salt or fluoridated toothpaste, chutneys too can be fortified with micronutrients.Koshimbir, raitas were once a part of daily meals. That was our tradition.Now, they’re only served during festivals or for guests. We must bring back these traditions—for the sake of our children’s health and immunity. Time for a Movement Mothers, wake up! Be Micronutrient Aware. Teach your children healthy food habits. It’s your responsibility—and yours alone. Best wishes. – Dr. Anil Mokashi (Pediatrician)MBBS, MD, DCH, FIAP, PhD(Child Growth and Development)

The Power of a Pinch: Micronutrients and Child’s Immunity Read Post »

heat stroke child almost fainting under sun

बाल उष्माघात : गंभीर परिणाम व सोपा उपाय

मार्च महिना आला की तापानी फणफणलेली मुलं दवाखान्यात यायला सुरुवात होते. या तापाचं कारण लक्षात आलं नाही तर आग रामेश्वरी बंब सागेश्वरी अशी स्थिती निर्माण होते. ही उन्हाळयाची आग बाळांना फार त्रास देते. उष्माघात हा एक वर्षाखालील मुलांचा विशेषतः नवजात बालकांचा खास आजार आहे. कच्चे तपमान नियंत्रण :-शरिराच्या तपमानाचे नियंत्रन करणारे एक केंद्र मेंदुमध्ये असते हवेचं तपमान वाढलं की घाम येवून शरिर थंड होतं. लहान बाळांच तपमान नियत्रंण केंद्र अपरिपक्व असल्याने व्यवस्थित काम करत नाही. पत्रा तापतो, भांडी तापतात तशी मुलंही तापतात. बाल उष्माघाताची कारणे व उपाय :- उष्ण न खेळणारी हवा :पत्र्याचे छप्पर, कमी उंचीच्या छताची खोली, खेळती हवा नसलेली कोंदट खोली असेल तर उष्माघाताची शक्यता खूप जास्त असते. बालउष्माघात व्हायलाउन्हातच जायला हवे असे नाही. 15 दिवसाच्या बाळाला सुध्दा बालउष्माघात होऊ शकतो. त्यासाठी खोली थंड हवी. नसेल तर करायला हवी. कुलर लावणे पंखा लावणे, दारं खिडक्यांवर ओल्या चादरी टॉवेल टाकणे इ. उपाय करता येतात. खेडयातील आयांनी दुपारच्या वेळी बाळाला घेऊन दाट सावली असलेल्या झाडाखाली बसावे. लिंबाची सावली छान गारवा देते. बाळाला ताप आला असता दारं खिडक्या बंद, पंखे बंद करुन बाळाला जास्त त्रास होतो. अंगावरचे कपडे : मोठया माणसांना उकडायला लागलं तर ते हलके, पातळ, सुती कपडे घालतात. पण तापलेल्या बाळाला टोपी, स्वेटर, ब्लॅकेटमधे दडपून ठेवतात. हे उपाय ताप वाढवणारे आहेत. वारं लागू नये “बाधेल” अशा गैरसमजुतीपायी बाळाचे नुकसान होते. बाळाला कमीतकमी, हलके, सुती कपडे घालावे तापलेल्या बाळाला उघडे ठेवणे सर्वात उत्तम. शरिरातील पाण्याचे प्रमाण :वाढलेले तपमान कमी करण्यासाठी देवाने फक्त एकच यंत्रणा आपल्या शरिरात बसवली आहे. तपमान वाढले कि घाम येतो. त्याचे बाष्पीभवन होण्यासाठी शरिरातील उष्णता वापरुन शरिर थंड होते. बाहेरुन कोरडया माठातले पाणी गार होत नाही. त्याचप्रमाणे घाम न आलेल्या बाळाचे तपमान वाढतच जाते. अशा बाळाला दिवसातून तीन चार वेळा गार पाण्याने पुसून घ्यायला हवे. उन्हाळयामुळे, उलटी जुलाबामुळे किंवा आजारपणात अन्नपाणी, अंगावरचे दूध न घेतल्यामुळे शुष्कता स्थिती निर्माण होते. शरिरात पाणी कमी असेल तर ताप येवून सुध्दा शरिर घामावाट पाणी बाहेर सोडू शकत नाही. पॅरासिटॅमॉल क्रोसीन हे औषध घाम आणण्याचे काम करते. शुष्कता स्थिती असेल तर पॅरासिटॅमॉलचा गुण येत नाही. तेव्हा शुष्कता स्थितीचे निदान करुन पाणी पाजले तरच ताप उतरतो अन्यथा नाही. बालउष्माघाताने अनेक मत्यू होतात. खुप रडणा-या व बेफाम तापलेल्या बाळाला योग्य निदान न झाल्याने अॅटिबायोटिक व झोपेच्या औषधांचा मारा केला जातो. पण मूळ कारण दूर न झाल्याने मुल तापतच राहते व रडतच राहते. त्यासाठी लहान बाळांच्या कुटुंबानी व फॅमिली डॉक्टरांनी बालउष्माघाताची शक्यता मनात ठेवली पाहिजे. तो होऊ नये म्हणून काळजी घेतली पाहिजे, झाल्यास वेळेवर निदान करुन उपचार केले पाहिजे, नाहीतर ही सुंदर नाजूक फुलं रणरणत्या उन्हाळयात नाहक कोमेजून जातील. बालउष्माघाताची लक्षणे व उपाय : कडक उन्हाळा, बंद खोली, भरपुर कपडे, शुष्कता स्थिती अशी परिस्थिती निर्माण झाली म्हणजे बालउष्माघाताची सर्व तयारी पुर्ण झाली असे समजावे. या परिस्थितीत योग्य ते बदल केले नाही तर आजाराच्या गांभीर्याप्रमाणे बालउष्माघाताच्या तीन पाय-या ओळखता येतात. पायरी तापमान (फॅ.) हृदयाचे ठोके डोळे तोंड व जीभ लघवी इतर लक्षणे उपाय पायरी 1 99 ते 101 150 खाली थोडे खोल सुकलेली कमी खूप रडणे, आतडी, चेहरा लाल मीठ-साखर पाणी, जलसंजीवनी, ओल्या फडक्याने पुसणे पायरी 2 101 ते 104 150 ते 200 खूप खोल थोडा ओलावा 8 तास नाही रडणे, दम लागणे अॅडमीट, सलाईन पायरी 3 104 वर 200 वर खोल व मऊ पूर्ण कोरडे 12 तास नाही दम लागणे, झटका येणे, बेशुद्ध होणे अॅडमीट, थंड करणे, थंड खोली, थंड पाण्याने उपचार, तातडीचा औषधोपचार – विद्यावाचस्पति डॉ. अनिल मोकाशी (बालरोगतज्ञ)एमबीबीएस, एमडी, डीसीएच, एफआयएपी,पीएचडी (मुलांची वाढ व विकास) #

बाल उष्माघात : गंभीर परिणाम व सोपा उपाय Read Post »

Two young boys energetically competing in a soccer match on a grassy field.

उन्हाळ्याचा ताप आणि शाळेतली मुले

ज्या मुलांची इच्छा आहे ताप यावा. त्यांनी उन्हात खेळावे. ज्या मुलांची इच्छा आहे ताप येऊ नये. त्यांनी सावलीत खेळावे. ज्या मुलांची इच्छा आहे ताप यावा, त्यांनी टोपी न घालता बाहेर हुंदडायला जावे. म्हणजे मस्त डोकं तापतं. फणफणून ताप येतो. हॉस्पिटल मधे इंजेक्शन सलाईन मिळतात. ज्या मुलांची इच्छा आहे ताप येऊ नये, त्यांनी टोपी घालून बाहेर जावे. ज्या मुलांची इच्छा आहे ताप यावा, त्यांनी चपला न घालता तापलेल्या फरशीवर पाय ठेवावे. ज्या मुलांची इच्छा आहे ताप येऊ नये, त्यांनी चपला घालून घराबाहेर पडावे. ज्या मुलांची इच्छा आहे ताप यावा, त्यांनी अज्जीबात पाणी पिऊ नये. आणि खुशाल रणरणीत उन्हात भर दुपारी सायकल दामटावी. पाणी कमी पिले तरच उन्हाळा बाधतो. ज्या मुलांची इच्छा आहे ताप येऊ नये, त्यांनी भरपूर पाणी प्यावे. चोवीस तासात सहापेक्षा जास्त वेळा सू व्हायला हवी. अगदी आकडा मोजा. भरपूर पाणी पिणाऱ्याला उन्हाळा बाधत नाही. तर बच्चमजी, तुम्हीच ठरवा, उन्हाळ्यात काय करायचे. काय नाही करायचे. शाळेतल्या मोठ्या मुलांना एवढं तरी आपलं आपल्यालाच समजायला हवे. ते सांगायला आई कशाला लागते! एवढे बोलून “उन्हाळ्याचा ताप आणि शाळेतली मुले” या विषयावरचं माझं भाषण मी समाप्त करतो. – विद्यावाचस्पति डॉ. अनिल मोकाशी (बालरोगतज्ञ)एमबीबीएस, एमडी, डीसीएच, एफआयएपी,पीएचडी (मुलांची वाढ व विकास)

उन्हाळ्याचा ताप आणि शाळेतली मुले Read Post »

doctor and girl doing health check up

बालपणाचे विज्ञान 2

7) लसीकरण 8) औषधे 9) ताप 10) नवजात बाळ 11) प्रथा आणि अंधश्रद्धा 12) डॉक्टर आनंदी बालपण = यशस्वी मोठेपण – विद्यावाचस्पति डॉ. अनिल मोकाशी (बालरोगतज्ञ)एमबीबीएस, एमडी, डीसीएच, एफआयएपी,पीएचडी (मुलांची वाढ व विकास)

बालपणाचे विज्ञान 2 Read Post »

Stages of Child growth illustration

बालपणाचे विज्ञान 1

#31 1) बाळाच्या वाढीवर लक्ष ठेवा. २). जुलाब, डीहायड्रेशन, पाणी १) अंगावर पाजा २) गोवर लस द्या. ३) संडासचा वापर करा. ४) अन्न व पाणी स्वच्छ ठेवा. ५) हात धुवून अन्नाला स्पर्श करा. ६) माशांचा नायनाट करा. 3) फक्त स्तनपान काही आयांना मदतीचा हात लागतो. अंगावरचे दूध नैसर्गिकपणे सुटते. दुध वाढवण॒यासाठी नैसर्गिक मार्ग वापरा.अंगावरचे दुध वाढवणा-या गोष्टी १) वारंवार चोखणे२) वारंवार रिकामे करणे३) चांगला आहार४) कमी काळजी. १.पान्हा फुटतो.२.वजन वाढते ३.बाळ छान झोपते.४.सात आठ वेळा संडास होते.५.दिवसातून सहापेक्षा जास्त वेळा लघवी होते. 4) बाटली पुतनामावशी आहे. 5) वरचे दूध नको. 6) मुलांना अन्न लागते. १)  दोन वर्ष अंगावर पाजा.२) सहाव्या महिन्याला कांजी द्या.३) कांजित प्रथिने घाला.४) कांजित फळे किंवा भाजी घाला.५) दिवसातून चार वेळा कांजी द्या.६) आजारी बाळाला अन्न द्या. – विद्यावाचस्पति डॉ. अनिल मोकाशी (बालरोगतज्ञ)एमबीबीएस, एमडी, डीसीएच, एफआयएपी,पीएचडी (मुलांची वाढ व विकास)

बालपणाचे विज्ञान 1 Read Post »

child-adoption

मूल नाही म्हणून कुढत का बसता, दत्तक घ्या ना

होईल हो. आत्ता तर जेमतेम दोन अडीच वर्ष होताहेत लग्नाला. इथून होते सुरुवात एका दुष्टचकाची. मागून लग्न झालेल्या भावंडांना पहिले मूल झाले की पहिल्यांदा मनात पाल चुकचुकते. आपल्याला कधीच मूल होणार नाही काय ? डॉक्टरी उपाय सुरु होतात. येणारीप्रत्येक मासिक पाळी नैराश्याचे झटके देअून जाते. उध्वस्त जीवनाचा अर्थ समजता. चिडचिडहोते. भांडणे वाढतात. निष्कारण एकमेकांना दुखावले जाते. समंजस कुटुंबातल्या समंजस जोडप्यांना ‘दोष कुणाचा’ यात रस नसला तरी “गिल्टी फीलिंग” काढून टाकावे लागते. प्रयत्नांची पराकाष्ठा सुरु होते. मिळेल तो सल्ला ऐकण्याची प्रवृत्ती वाढते. न जाणो या मार्गानेयश आले तर ! आशा मरत नाही. मन हार मानायला तयार होत नाही. पण हळूहळू मूल कधीच होणार नाही हे मनाला समजायला लागतं. अनेक वर्ष ज्या डॉक्टरांवर देवासारखी श्रध्दा ठेवली असते, जो डॉक्टर सुप्रसिध्द, यशस्वी, तज्ञ, बुध्दिमान वाटला असतो तोच डॉक्टर अचानक वेळ खाअू, पैसेखाअू, कच्चा वाटू लागतो. कशाला फुकट चकरा मारायच्या असे वाटू लागते. आपण उगीच या डॉक्टरच्या नादी लागलो असे वाटले म्हणजे समजावे प्रयत्नांचा अंत आला आहे. पाच, दहा, पंधरा वर्षांनी मूल झालेली माणसे दिसायला लागली म्हणजे समजावे, आता पुरे ! वाईट दोघांनाही वाटत असतं. कुचंबणा तर होतेच. पण वाईट वाटतं हे स्पष्टपणे बोलायला मन नकार देतं. मूल नाही म्हणून आमचं काही बिघडत नाही. आम्ही आनंदी आहोत. असं चारचौघात आवर्जून सांगण्यात माणूस धन्यता मानतो. समाजात न मिसळण्याची प्रवृत्ती वाढते. मनातून कुढत असतांनाच चेहरा मात्र आनंदी, सुखी माणसाचा चढवला जातो. आमच्या आयुष्यात काही त्रुटी नाही, भावंडांची मुले आपलीच आहेत की, असं आवर्जून इतरांना सांगितले जाते. पण या वाक्यांतला फोलपणा लवकरच लक्षात येवू लागतो. चेह-यावर वय दिसू लागते. अकाली प्रौढत्वाच्या खुणा ओळखायला येतात. या परिस्थितीत काही नशिबवान जोडप्यांना दत्तकाची माहिती मिळते. समोरासमोर कुणी सांगितलं तर पटकंन पटत नाही. पण ही दत्तकाची सुचना योग्यवेळी जोडप्यांच्या मनात रुजायला लागते. पहिली प्रतिक्रिया विचार बाजूला सारायची असते. नाही. आपल्या ‘टॅडिशनल फॅमिली” मधे इतका मॉडर्न विचार चालायचा नाही असे वाटते. पण ते खोटे असते. कारण आजकाल कोणच्याच ‘फॅमिली’ तितक्या ‘टॅडिशनल’ नसतात. आणि दत्तक हा सुध्दा इतका काही ‘मॉडर्न’ विचार राहिलेला नाही. कुणाचे तरी प्रोत्साहन, वाचन, किंवा उदाहरण पाहून दत्तकाची कल्पना जोडप्यापैंकी कुणाच्यातरी एकाच्या मनात रुजायला लागते. दोघांनीही चर्चा केली तर ती लवकर रुजते. दोघांच्याही मनात प्रश्न असतो. दुस-याला काय वाटेल. माझे विचार तुझ्यावर लादले तर जाणार नाही ना, असे निष्कारणच म्हटले जाते. दोघांनी एकदा हा विचार मान्य केला की एकदम आयुष्य बदलते. अचानक डोक्यात लख्ख उजेड पडतो. जीवनातला आनंदाचा मार्ग स्पष्ट दिसायला लागतो. मग प्रश्न येतो ‘जग काय म्हणेल याचा नातेवाईक, कुटुंबिय समाज यांच मत विचारत बसणे हा मूर्खपणा असतो. कुटुंबियांना विश्वासात घ्यावेच लागते. पण निर्णय स्वतःचा स्वतःच घ्यायचा असतो. मूल दत्तक घेण्याचा निर्णय कुटुंबियांना सांगितला तर सगळयांनाच तो आवडतो. मत विचारलं तर मात्र फाटे फुटू शकतात. कोणी म्हणतं नात्यातलं घेवू, नात्यातलं मूल हे नातेवाइकाचंच राहतं. “जन्मभरं मूल कसं हवं”? संपूर्णपणे आपलं. त्याला आपल्याशिवाय दुसरे आईवडिल नको. तरच ते कुटुंब बनतं. नाहीतर ‘यांच मूल त्यांनी संभाळलं हे बीरुद जन्मभर राहतं. आणि अशी मुलं असतात. त्या मुलाला आई वडिल नसतात आणि अशा मुलांना आई वडिल मिळवून देण्याचं कार्य करणा-या समाजसेवी संस्था असतात. संस्थेकडे जाणे ही सुध्दा एक महत्वाची पायरी असते. संस्थांकडे कुमारीमातांची, आईला सामाजिक कारणांनी सांभाळ करणं अशक्य असलेली मुले येतात ही मुले कायदेशीररित्या त्यांच्या जन्मदात्या आयांनी संस्थेकडे सुपूर्द केलेली असतात. संस्था त्या मुलांचे पालनपोषण करत असते. संस्थेकडे जावून मूल कायदेशीरित्या दत्तक घेणं श्रेयस्कर असतं. संस्थेचे नियम, कागदपत्रांची पूर्तता व लागणारा वेळ परवडला, पण खाजगीरित्या डॉक्टरांकडून आणून संभाळलेलं मूल परवडत नाही. त्यात धोका असतो. जन्मदात्याचा नाव पत्ता व मूल नेलेल्याचा नाव पत्ता कुणालाही मिळू शकतो. पुढेमागे कायदेशीर कटकटी निर्माण होवू शकतात. तेकुठल्याही परिस्थितीत टाळायलाच हवे. संस्थांकडून दत्तक मिळण्याची पध्दत पूर्ण देशात एकच अशी कायद्याने मान्यता दिलेली पध्दत असते. ती मुलांच्या व आईवडिलांच्या दोघांच्याही दृष्टीने फायद्याची असते. संस्थेमधे पहिली भेट होते ती समाजसेविकेची किंवा सोशलवर्करची. या उच्चशिक्षित, प्रशिक्षित, अनुभवी व सह्दयी असतात. त्यांना संपूर्ण सहकार्य देणा-या जोडप्यांची दत्तकमूल घेण्याची प्रक्रिया सुरळीत व आनंददायी ठरते. त्या इंटरव्हयू घेतात, घरी भेट देतात, तुमचं घर त्यातली माणसं दिलेल्या मुलाला योग्य राहतील कि नाही हे बघतात. काही कागदपत्रांची पूर्तता करावी लागते. मग तुमचा अर्ज दाखल होतो. यात 2-4 महिने जाउ शकतात. मूल निवडण्याआधी किंवा दाखवण्याआधी सोशलवर्कर तुमच्याशी चर्चा करतात तुमची तयारी करुन घेतात. मुलगा की मुलगी हा प्रश्न प्रत्येकाला सोडवावा लागतो. तुमच्या, तुमच्या कुटुंबाच्या रंग रुपाशी मिळते जुळते शोधून 1 किंवा 2 मुले दाखवली जातात. बहुतेक “होणा-या आयांना” दाखवलेले पहिलेच मूल आवडते. “प्रथमदर्शनी प्रेम” म्हणतात तसलीच ही भवनात्मक भानगड असते. मूल घरी यायला साधारणपणे 3 ते 9 महिने एखाद्या वेळेस वर्षसुध्दा लागू शकते. तशी गर्भारपणातसुध्दा बाळ यायला नउ महिने वाट पहावीच लागते की. फार उताविळपणा करुन चालत नाही! मूल आल्यावरची परिस्थिती म्या पामराने काय वर्णावी! अहो आनंदसोहळाच तो! सर्व मळभ निघून जाते. सुखाचा पेला काठोकाठ भरल्याची जाणीव होते. हा निर्णय घ्यायला इतकी वर्ष वाया घालवली याची प्रकर्षाने जाणीव होते. ‘बेटर लेट वॅन नेव्हर’ म्हणून स्वतःची समजूत घालणंच आपल्या हातात असतं. शेवट गोड ते सगळं गोड म्हणतात तसं. पण इथं तर एका नव्या आयुष्याची, एका नव्या कुटुंबाची सुरुवात असते. नवा संसार म्हणजे नव्या अडचणी विवंचना आल्याच की. त्याशिवाय त्याला संसार कसं म्हणणार. मधून मधून याचे जन्मदाते कोण असतील. कोणत्या जातीचे असतील असले उत्तर नसलेले प्रश्न मनात उद्भवतात. एखादी बाई ‘दत्त’ म्हणून समोर येवून उभी राहिली आणि “हे माझं मूल आहे” अस म्हणू लागल्याची दिवास्वन्प्नसुध्दा पडू शकतात. पण ते सगळे मनाचे खेळ असतात. ‘कूठून आलं आणि कुठे गेलं’ हे गुपित असतं. ते कुणालाही माहित नसतं. म्हणूनच संस्थेमार्फत कायदेशीर दत्तक यशस्वी ठरतं. आपण आपल्या मुलावर व भविष्यावर नजर ठेवावी. भूतकाळाच्या जोखडीतून मुक्त व्हावं हेच बरं. मूल आल्यावर सगळयांना बिनधास्तपणे आम्ही मूल दत्तक घेतलयं म्हणून सांगावं. अजिबात लाजू नये. ते एक आयुष्यातल यश आहे. ते तसंच समाजाला सांगितलं तर समाजाला आपलं कौतुक करण्याशिवाय पर्यायच राहत नाही. तुम्ही जर खोटं बोलला किंवा लपवाछपवी केली तर उघडे पडतं. लोक निश्तिच टिंगल करतात. दत्तकाचं तसं संपूर्ण प्रकरणच “आहे ते आनंदाने मान्य करणे व कौटुंबिक जीवन सुखी करणे.” यावर अवलंबून असतं. हे तत्व ज्याला समजलं त्याचा दत्तक यशस्वी झाला. मुलाची वाढ व प्रगति ही जास्त करुन त्याच्या आजूबाजूच्या लोकांवर आणिवातावरणावर अवलंबून असते. अनुवांशिकता व त्याच्या जन्मदात्या मातापित्यांच्या आर्थिक – सामाजिक परिस्थितीचा त्यावर काहीच परिणाम नसतो हे समजून घ्यायला हवे. कोणत्याही मुलाला विकासासाठी प्रेम, शिस्त व सुरक्षितता या तीन गोष्टींचा योग्य समन्वय साधावा लागतो. तसाच व तितकाच तो दत्तक मुलासाठीही साधावा लागतो. मुलाच्या वागणुकीचा बुध्दिमत्तेचा व यशाचा संबंध त्याच्या जन्मदात्यांशी न लावता पालनकर्त्या आई-वडिलांशी लावला तर यश निश्चित मिळते. तू दत्तक आहे असं एका दिवशी

मूल नाही म्हणून कुढत का बसता, दत्तक घ्या ना Read Post »

Scroll to Top