Children’s Stories

Chakradhar Swami

जात ही मनात असते, रक्तात नसते

जात ही मनात असते, रक्तात नसते” – श्रीचक्रधर स्वामी भारतात सगळीकडे सुलतानी राजवटी होत्या. समाजात जातीपातीचं विष जाणूनबुजून पेरलेलं होतं. समाज पिचलेला होता आणि शासक मस्तवाल झाले होते. अशा काळया कालखंडात शिवाजी महाराजांच्या सुमारे ३५० वर्षे आधी श्रीचक्रधर स्वामी, गुजरातहून महाराष्ट्रात आले. त्यांनी विखुरलेला समाज एकसंघ करण्यासाठी महाराष्ट्रभर भ्रमंती केली.‘सर्व जीव समान’ असा संदेश देऊन प्रत्येक माणसात असलेल्या देवाची जाणीव करून दिली. एका गावात, एका सकाळी, मंदिराच्या पायऱ्यांवर श्रीचक्रधर स्वामी शांत बसले होते. ते बसले की सकाळही शांत होत असते. तेवढ्यात काही लहान मुले धावत आली. स्वामींच्या भोवताली गोल रिंगण करून बसली. कुणी टिवल्या बावल्या करत होतं. कुणी खोड्या करत होतं. कुणी गोळ्या चघळत होतं. त्यातला एक धिटूकला मुलगा पुढे आला. आणि म्हणाला. “स्वामी तुम्ही कोणत्या जातीचे?” स्वामी थोडं हसले. म्हणाले, “माझी जात? अहो मलाच माहित नाही! मी फक्त माणूस आहे. आणि तू? तू कोण आहेस?” मुलगा थोडा गोंधळला… पण मग त्याचा चेहरा उजळला. “मी पण माणूस! तुम्ही पण माणूस, मी पण माणूस! ” तो म्हणाला. स्वामी हसले, म्हणाले –“जात ही मनात असते, रक्तात नाही. मन स्वच्छ ठेवलं, तर देव आपल्या जवळ येतो!” मुलांना पटलं. मुलांच्या मनातली जात गेली. त्यांच्यातली माणुसकी जागी झाली. त्यांनी आपापल्या घरी जाऊन सांगितलं. “जात ही मनात असते, रक्तात नसते”. सगळ्या गावाला ते पटलं. शाळेच्या फळ्यावर दुसऱ्या दिवशी सुविचार लिहिला गेला. “जात ही मनात असते, रक्तात नसते. मुलांना जातीद्वेष शिकवू नका!” ही गोष्ट सगळीकडे पसरली,ती शाळा आदर्श शाळा झाली. ते गाव आदर्श गाव झालं. श्रीचक्रधर स्वामींवरील‘लीळाचरित्र’ हे पहिलं मराठी पुस्तक ठरलं. त्यांनी उच्च –नीच, जाती–पातीच्या भिंती पाडल्या. माणूसकीचं राज्य महाराष्ट्रात आणलं. जात मनात असते, रक्तात नाही. मुलांना जातीद्वेष शिकवू नाही. सर्व जीव एक समान,नसावा द्वेष, नसावा मान!प्रत्येकात देव पाहावा,महानुभाव पंथ घडवावा श्रीचक्रधरस्वामींचा सांगावा! जय श्रीचक्रधरस्वामी.जय शिवाजी.जय महाराष्ट्र.जय हिंद.भारत माता की जय – विद्यावाचस्पति डॉ. अनिल मोकाशी (बालरोगतज्ञ)एमबीबीएस, एमडी, डीसीएच, एफआयएपी,पीएचडी (मुलांची वाढ व विकास)

जात ही मनात असते, रक्तात नसते Read Post »

Samrat Ashoka

सम्राट अशोक : युद्धाकडून बुध्दाकडे नेणारा धर्मराज.

सम्राट अशोक : युद्धाकडून बुध्दाकडे नेणारा धर्मराज. २३०० वर्षांपूर्वी मौर्य घराण्यात एक राजा झाला. अशोक. लहानपणी अशोक खूप हट्टी, चिडखोर, आक्रस्ताळा, धटिंगट, दांडगट आणि रागीट होता. त्याचे खेळ म्हणजे युद्ध, तलवार. सम्राटाचा मुलगा असल्यामुळे मोठा झाल्यावर तो वंशपरंपरागत, आपोआप, सम्राट झाला. संपूर्ण भारतावर त्याचं राज्य होतं. पण एक राज्य उरलं होतं – कलिंग. मोठा समुद्रकिनारा, सुजलाम सुफलाम जमीन. कष्टाळू माणसे. कलिंग म्हणजे आजच्या भारताचा ओरिसा. अशोकाने ठरवलं – “कलिंग जिंकलंच पाहिजे! “त्यानी एक भीषण युद्ध छेडलं. कलिंग युद्ध. तलवारी, कापाकापी, धनुष्यबाण, रक्त, मृत्यू… सर्वत्र हाहाकार! लाखो लोक मारले गेले, घरं जळाली, कुटुंबं उध्वस्त झाली. वाताहात झाली. राजा अशोक विजय साजरा करायला वाजत गाजत युद्धभूमीवर गेला… पण तिथे फटाके नव्हते. तिथे होते रक्ताचे थारोळे. आणि रडणारे लोक. सगळीकडे मृतदेह, आरडाओरडा, रडारड, आक्रोश आणि दुःखाचे डोंगर. युद्ध जिंकलं… पण अशोकाला समाधान नव्हतं. मनात आनंद नव्हता. काहीतरी चुकतंय असं त्याला आतून वाटत होतं. तेवढ्यात एक लहानगी मुलगी, रक्ताने माखलेल्या आपल्या मरण पावलेल्या वडिलांच्याकलेवराला घट्ट मिठी मारून हमसून हमसून रडत होती. ते हृदय द्रावक दृश्य बघून अशोकाचं काळीज हेलावून गेलं. त्याला प्रश्न पडला. “मी हे काय केलं? का केलं? कशासाठी केलं? या युद्धातून मला काय मिळालं?” त्या क्षणी अशोकाच्या मनात मोठ्ठा बदल झाला. चूक काय आणि बरोबर काय, हे त्याला बरोबर उमगलं. त्याला बोध झाला. अशोकाला उपरती झाली. अचानक त्याच्या मनात गौतम बुद्धांच्या बोधिसत्वाची आणि त्यांना झालेल्या बोधाची आठवण आली. त्याला मार्ग सापडला. बौद्ध धर्माचा. गौतम बुद्धांचा शांतीमार्ग, करुणा आणि नीतीने भरलेला.” त्यानी ठरवलं. ही वेळ युद्धाची नाही… बुद्धाची आहे! त्याने तलवार बाजूला ठेवली. बौद्ध धर्म, माणुसकी, सहिष्णुता – हे त्याचं नवं शस्त्र झालं. आधी तो स्वतःला देशाचा आणि जनतेचा मालक समजत होता. आता त्यानी देशाचा आणि जनतेचा सेवक बनायचे ठरवले. त्याने सर्व लोकांना प्रेमाने वागवायला सुरुवात केली. गरीब, आजारी, वृद्ध – सगळ्यांची तो काळजी घेत असे. प्रजेसाठी रस्ते, विहिरी, रुग्णालयं, धर्मशाळा बांधली. शिलालेखांमधून त्याने सांगितलं दयेमधेच खरी ताकद असते. त्याने गौतम बुद्धांचा संदेश श्रीलंका, भूतान, नेपाळ, म्यानमार, अफगाणिस्तान, जगभर पोचवला. आणि तो झाला भारतीय इतिहासातला पहिला धर्मराज. धर्माचे रक्षण करणारा. आपले शिवाजी महाराज देखील म्हणायचे “देव धर्म आणि देशासाठी, प्राण वेचलं आम्ही”. सम्राट अशोक म्हणायचा “लोकांना तलवारीच्या जोरावर नाही प्रेमाच्या जोरावर जिंकायचे असते” उत्तर प्रदेश राज्यात, वाराणसी जिल्ह्यात, वाराणसी म्हणजे पूर्वीचे “काशी”. सारनाथ या गावात गौतम बुद्धांनी पहिलं धर्मचक्र प्रवर्तन (धम्मचक्र प्रवर्तन) केलं होतं. प्रवर्तन केलं. म्हणजे त्यांनी धर्मशिक्षण सुरू केलं. गौतम बुद्धांच्या उपदेशामुळे समाजात परिवर्तन घडलं. परिवर्तन घडलं म्हणजे लोकांच्या विचारात आणि जीवनशैलीत बदल झाला. सम्राट अशोकाने तिथे एक मोठा सिंहस्तंभ बांधला. आजही तो उभा आहे. त्या सिंहस्तंभावरचं अशोक चक्र आपल्या राष्ट्रध्वजावर, तिरंग्यावर आहे. ते आपल्या भारतीय संस्कृतीचं प्रतीक आहे. आपल्या परंपरेचं प्रतीक आहे. म्हणूनच “सम्राट अशोक: युद्धाकडून बुद्धाकडे नेणारा धर्मराज” ठरला. जय महाराष्ट्रजय हिंदभारत माता की जय – विद्यावाचस्पति डॉ. अनिल मोकाशी (बालरोगतज्ञ)एमबीबीएस, एमडी, डीसीएच, एफआयएपी,पीएचडी (मुलांची वाढ व विकास)

सम्राट अशोक : युद्धाकडून बुध्दाकडे नेणारा धर्मराज. Read Post »

sinhagad-fort-pune

कोंढाणा – शूरवीरांचा डोंगर ( गोष्ट सिंहगडाची )

कोंढाणा – शूरवीरांचा डोंगर – गोष्ट भारतीय इतिहासाच्या मालिकेतली छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याच्या आधी चार-पाचशे वर्षे महाराष्ट्रात सुलतानांची जुलमी राजवट होती. ते माणसांना माणसांसारखे वागवत नव्हते. जनावरांसारखे वागवत होते. सुलतानांनी नेमलेले वतनदार जनतेला छळत होते. त्याकाळची ही गोष्ट आहे. सिंहगडाची. खूप उंच डोंगर. त्यावर गड. सिंहासारखा. म्हणून त्याचं नाव – सिंहगड! पूर्वी याचं नाव कोंढाणा होतं! कोंढाणा म्हणजे शूरवीरांचा डोंगर. कोंढाणा डोंगर दिवसात झोपलेला असायचा – शांत, निवांत, गडावरच्या पक्ष्यांसारखा. पण शत्रू जवळ आला की, तो जागा व्हायचा – सिंहासारखा गुरगुरणारा, वाऱ्यासारखा झेपावणारा! कोंढाण्याच्या पायथ्याला शूर लोक राहत होते – धाडसी, रक्षण करणारे! कोणी शेतकरी, कोणी लढवय्ये, कोणी गड राखणारे. एका रात्री, गावात बातमी आली “शत्रू येत आहेत! किल्ला घ्यायला!” पण लोक घाबरले नाहीत. एक धाडसी तरुण पुढे आला. त्याचं नाव होतं भिला. भिला म्हणाला: “आपण गडावर राहतो. तो आपला आहे.गड राखणं हे आपलं काम आहे. कोण कोण येणार माझ्याबरोबर. सगळे धावत आले – मुलं, मोठे, बायका, आजी-आजोबा सर्वांनी मिळून कोंढाण्याच्या मुख्य दरवाजाला लोखंडाची जाड मोठ्ठी साखळी बांधली. शत्रू आले, पण त्यांना आत येता आलं नाही. सामान्य लोकांच्या धाडसामुळे गड टिकला. शत्रू हरला. कोंढाणा हसला. म्हणाला: “माझे लोक जागे आहेत. मी झोपणार नाही!” हे डोंगर, हे किल्ले, हे आपलं इतिहासाचं धन आहे! म्हणा सगळ्यांनी: कोंढाणा उंच होता!कोंढाणा शूर होता!कोंढाणा आपला होता!कोंढाणा झुकला नाही!कोंढाणा हरला नाही!आपणही शूर वीर बनूआपल्या देशाचा गड राखू! छत्रपती शिवाजी महाराज की जय.भारतमाता की जय.जय हिंद. – विद्यावाचस्पति डॉ. अनिल मोकाशी (बालरोगतज्ञ)एमबीबीएस, एमडी, डीसीएच, एफआयएपी,पीएचडी (मुलांची वाढ व विकास)

कोंढाणा – शूरवीरांचा डोंगर ( गोष्ट सिंहगडाची ) Read Post »

Dr. Anil Mokashi telling stories to children

रामायणाच्या गोष्टी 54 – सनातन चिरंतन

“रामायण सनातन चिरंतन” सीतेचे पुत्र कुशलव जुळे भाऊरामाचे चरित्र लागले गाऊवनात वाढले तरी ज्ञानी झालेत्यांनी रामकथेला घरोघरी नेले.. वाल्मिकी ऋषींनी शब्द दिलेचौसष्ट कला गायन वादन दिलेलव-कुशांच्या सुरात झंकारलेरामायण अखंड वाहत राहिले.. ग.दि.माडगूळकरांनी लिहिलेसुधीर फडके यांनी गायलेगीत रामायण अमर झालेसमाजमनावर कोरले गेले… मालिका झाल्या सिनेमे झालेकथा कीर्तन प्रवचन झालेभारतीय संस्कार जगभर गेलेमानवी जीवन समृद्ध झाले… राम राज्य कुटुंब न्याय-धर्मत्याग धैर्य नीतीनियम सत्कर्मश्रीरामांस लवकुशांनी ऐकवलेरामायण राष्ट्रीय वारसा बनले. अरबी फारसी तिबेटी बर्मी चीनीफ्रेंच इंग्रजी लॅटिन ग्रीक जपानीगुजराती तमिळ तेलुगू संस्कृतकानडी हिंदी बंगाली व मराठीत. चीन तिबेट म्यानमार कंबोडियालंका नेपाळ भूतान मलेशियारामायणाने जोडला धागा एकत्रदुसऱ्यासाठी जगणे राम-चरित्र.. मानवाचा कसा असावा आचाररामायणाने दिला दिव्य विचारनीतिमान रामाचा मार्गच भलाम्हणून अहंकारी रावण संपवला. सीतेच्या अथांग सोशिकतेलाहनुमानाच्या चिरंजीव भक्तीलाभरताच्या बंधुप्रेम व निष्ठेलालक्ष्मणाची सावली साथीलानाते संबंधांना उजाळा दिला.. रामायण घडले तो भू नकाशाउदयास आणी अखंड भारतवर्षाजनकपूर पंचवटी लंका अयोध्यादंडकारण्य मिथिला किष्किंधा.. लव-कुशांनी श्रीरामांच्या साठीकेले अमर संस्कार परंपरेसाठीरामकथा गेली लाखोंच्या ओठीश्रद्धेने गाईल त्याची किर्ती मोठी. रामायण कधी संपणार नाहीरामायण कधी थांबणार नाहीसत्य सरळ मार्गानी चालणारपुण्यवान रामायण पुढे नेणार.. प्रभू श्रीरामचंद्र की जयप्रभू श्री रामचंद्र की जयप्रभू श्री रामचंद्र की जय – विद्यावाचस्पति डॉ. अनिल मोकाशी (बालरोगतज्ञ)एमबीबीएस, एमडी, डीसीएच, एफआयएपी,पीएचडी (मुलांची वाढ व विकास)

रामायणाच्या गोष्टी 54 – सनातन चिरंतन Read Post »

Dr. Anil Mokashi telling stories to children

रामायणाच्या गोष्टी 53 – रामाचा अवतार संपला…

श्रीराम श्रीराम श्रीराम ! सीता पृथ्वीमातेच्या कुशीत गेली. श्रीरामांना खूप दुःख झालं. तरी त्यांनी कर्तव्य बुद्धीने रामराज्य चालवलं. लव आणि कुश यांना वेगवेगळी राज्यं दिली. दोघांचा राज्याभिषेक केला. पण त्यांचं मन कशातच रमेना. आता त्यांचं अवतार कार्य संपलं होतं. त्यांनी मनापासून प्रार्थना केली. ती ब्रह्मदेवापर्यंत पोचली. एक दिवस एक तपस्वी रामांना भेटायला आला. तो काळ होता! तपस्व्याच्या रूपात आला होता. त्याला रामाशी एकांतात बोलायचं होतं. तो म्हणाला –”आपलं बोलणं कोणीही ऐकू नये. जो ऐकेल त्याचा मृत्यू निश्चित!” रामाने लक्ष्मणाला आज्ञा दिली “कोणालाही आत येऊ देऊ नकोस!” इतक्यात दुर्वास मुनी आले. ते फार रागीट होते. ते ओरडले “रामाला भेटायचं आहे! मला आत सोड!” लक्ष्मण म्हणाला “तुम्ही थांबा! श्रीरामांची आज्ञा आहे” दुर्वास मुनी रागावले “मला आत सोडले नाहीस, तर अयोध्या भस्मसात करीन अयोध्या बेचिराख करीन अयोध्येची राखरांगोळी करीन!”लक्ष्मणाला प्रश्न पडला.” नियम पाळू? की अयोध्या वाचवू?” लक्ष्मणाला माहीत होतं. पुढे धोका आहे. नियम मोडला तर मृत्यू . “लक्ष्मणाचा हा निर्णय आयुष्याचा शेवटचा निर्णय ठरणार होता. पण अयोध्येला वाचवण्यासाठी तो स्वतःचा बळी द्यायला तयार झाला!” त्यानी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता दुर्वास मुनींना आत सोडलं. राम आणि तपस्वी यांचा एकांत भंग झाला! लक्ष्मण शांतपणे यमुनेच्या तीरावर गेला. आणि त्याने जलसमाधी घेतली. पवित्र यमुना नदीच्या विशाल पात्रात प्रवेश केला. “रामाच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले. अश्वमेध यज्ञ जिंकला, पण सावलीसारखी साथ देणारा निस्वार्थ भाऊ हरपला!” तपस्व्याच्या रूपात आलेल्या काळाने रामाला सांगितलं. ” तू भगवान विष्णूचा मानवी अवतार आहेस. पृथ्वीवर वाईट लोक जास्त प्रबळ झाले आहेत. चांगल्या लोकांना जगणे कठीण झाले आहे. रामाचा अवतार घे. आणि पृथ्वीवर मानवी जीवन सुलभ होईल, लोक सुखाने समाधानाने, सरळ मार्गाने जगू शकतील अशी व्यवस्था कर.” रामावतारातील रावण संहाराचं कार्य संपल होतं. पृथ्वी राक्षसमुक्त आणि भयमुक्त झाली होती. ब्रह्मदेवाने रामावतार संपवून वैकुंठात परत यायचा आदेश दिला होता!” श्रीरामांनी आपल्या अवतार कार्याची समाप्ती केली. शरयू नदीत प्रवेश केला. आणि इहलोकाची यात्रा संपवून वैकुंठाला गेले. श्रीरामांचा दिव्य अवतार संपला. श्री रामायणाची इतीश्री झाली.आकाशातून पुष्पवृष्टी झाली. देव, ऋषी, आणि चराचर सृष्टीने जयघोष केला! प्रभू श्री रामचंद्र की जय.प्रभू श्री रामचंद्र की जयप्रभू श्री रामचंद्र की जय. – विद्यावाचस्पति डॉ. अनिल मोकाशी (बालरोगतज्ञ)एमबीबीएस, एमडी, डीसीएच, एफआयएपी,पीएचडी (मुलांची वाढ व विकास)

रामायणाच्या गोष्टी 53 – रामाचा अवतार संपला… Read Post »

Dr. Anil Mokashi telling stories to children

रामायणाच्या गोष्टी 52 – सीता धरतीमातेच्या कुशीत

श्रीराम श्रीराम श्रीराम ! रामाने, सीतेला स्वीकारले. पण एक, अट टाकली. सीतेने परत, जनतेसमोर , अग्निपरीक्षा द्यावी. आपली पवित्रता, सिद्ध करावी. लंकेत तिने आधीच अग्निपरीक्षा दिली होती. पण अयोध्येच्या काही मूठभर लोकांचा त्यावर विश्वास नव्हता. ते म्हणत. वर्षभर रावणाच्या ताब्यात असलेली सीता शुद्ध कशी. या प्रश्नाचे उत्तर रामा जवळ नव्हते. राजाला उत्तर देणं आवश्यक होतं. राज्यात आणि आजू बाजूला दुष्ट राक्षसी प्रवृत्ती घातपाती कारवाया दंगली करत होत्या. राजावर प्रजेच्या रक्षणाची जबाबदारी होती. पत्नीला न्याय देण्यासाठी राज्य सोडता येणार नव्हते. त्यानी निर्णय घेतला. राष्ट्र प्रथम. रामाला दुःख झालं. पण कर्तव्याला प्राधान्य देत त्याने अग्निदिव्याची अट घातली.सीता त्यातून सुखरूप निष्कलंक बाहेर पडेल याची त्याला खात्री होती. पण नियतीच्या मनात वेगळेच होते. सीतेने पृथ्वीमातेला विनंती केली. ‘मी निःकलंक असेन तर मला आपल्या कुशीत घे’ त्या क्षणी पृथ्वी दुभंगली तेजस्वी प्रकाश पसरला आणि भूमातेने सीतेला आपल्या कुशीत घेतलं. लव-कुश आईला वाचवायला धावत गेले, पण तोपर्यंत सीता अदृश्य झाली होती. राम, दुःखाने कोसळला.जमिनीला पडलेल्या भेगा मिटल्या होत्या. सीता पृथ्वीमध्ये विलीन झाली होती. सीतेचा अध्याय संपला होता. आता आदर्श पत्नी आदर्श पतिव्रता आदर्श राणी आदर्श माता सीतामाता पृथ्वीवर कधीही कोणालाही दिसणार नव्हती. हे कटू सत्य स्वीकारून सर्वांना पुढचं आयुष्य जगावं लागलं. जगायला आधार एकच उरला होता. प्रभू श्री रामचंद्र की जयप्रभू श्री रामचंद्र की जयप्रभू श्री रामचंद्र की जय. – विद्यावाचस्पति डॉ. अनिल मोकाशी (बालरोगतज्ञ)एमबीबीएस, एमडी, डीसीएच, एफआयएपी,पीएचडी (मुलांची वाढ व विकास)

रामायणाच्या गोष्टी 52 – सीता धरतीमातेच्या कुशीत Read Post »

Dr. Anil Mokashi telling stories to children

रामायणाच्या गोष्टी 51 – लवकुश मोठे झाले

श्रीराम श्रीराम श्रीराम ! लवकुश रामाच्या सैन्याशी लढतच होते. श्रीरामांना प्रश्न पडला “इतकी शूर मुलं कोण आहेत?” वाल्मिकी ऋषींनी लवकुशांना आज्ञा दिली.“रामाशी युद्ध, थांबवा! आणि आता यापुढे रामाचं गुणगान करा. मी शिकवलेलं रामायण गा! श्री रामांचं चरित्र त्यांनाच ऐकवा. पण दान घेऊ नका इनाम घेऊ नका!” गुरुजींची आज्ञा ऐकून लवकुश नरमले. त्यांना कळलं – “आपल्याला गुरुजींचं ऐकावंच लागेल.” ते समंजसपणे आपले वागणे, बदलायला तयार झाले. सीता दोघांना बाजूला घेऊन म्हणाली “पती म्हणून त्यांचं प्रेम खरं होतं. राजा म्हणून त्यांनी कर्तव्य केलं. प्रजेच्या भल्यासाठी त्यांना मोठा त्याग करावा लागला.” आईचे ऐकून लवकुश बदलले. धनुष्यबाण खाली ठेवले. युद्धाचा वेष बदलला. आश्रमाचा भगवा वेष परिधान केला. रामायण गाण्यासाठी परत आले. रामायणाच्या गोष्टी सांगता-सांगताच ते स्वतः आतून आमूलाग्र बदलले. ते समंजस झाले. ते जबाबदार झाले. ते मोठे झाले. ते तरुण झाले. त्यांचे तेजस्वी रामायण गायन ऐकून सगळे मंत्रमुग्ध झाले.श्रीरामही अतिशय खुश झाले. वाल्मिकी ऋषींनी सांगितले “श्रीरामा, हे दोघे तुझेच पुत्र आहेत!” लवकुशांनी श्रीरामांची अनवधानानी म्हणजे अजाणते पणी युद्ध केले म्हणून क्षमा मागितली. त्यांचे पाय धरले.त्यांचे आशीर्वाद मागितले. श्रीरामांनी त्यांना कडकडून मिठी मारली. त्यांच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले. संपूर्ण आश्रम आनंदात न्हाऊन गेला. महर्षींनी सीतेलाही बोलावले आणि रामाला सांगितले “ही शुद्ध आहे पवित्र आहे. माझी आज्ञा म्हणून तू हिचा स्वीकार कर.” श्रीराम म्हणाले, “हो! मी संपूर्ण जनतेसमोर भर दरबारात हिचा स्वीकार करायला तयार आहे. लवकुशांनाही अयोध्येत घेऊन जाईन. पण… अजूनही पण होताच!” संपूर्ण आश्रमात आवाज घुमला. प्रभू श्रीरामचंद्र की जय!प्रभू श्रीरामचंद्र की जय!प्रभू श्रीरामचंद्र की जय! – विद्यावाचस्पति डॉ. अनिल मोकाशी (बालरोगतज्ञ)एमबीबीएस, एमडी, डीसीएच, एफआयएपी,पीएचडी (मुलांची वाढ व विकास)

रामायणाच्या गोष्टी 51 – लवकुश मोठे झाले Read Post »

Dr. Anil Mokashi telling stories to children

रामायणाच्या गोष्टी 50 – रामाचा अश्वमेध

श्रीराम श्रीराम श्रीराम ! सीता वनात गेली. अयोध्येवर सृष्टी रुसली. पावसाचा थेंब नाही. नदी-नाले सुकले. शेतं करपून गेली. धान्य पिकलं नाही. प्रजेची उपासमार झाली. तहानलेली जनावरं वणवण भटकत होती. पक्षी तडफडत होते. सगळीकडे दु:ख आणि हाहाकार माजला होता. हे बघून, राम अस्वस्थ झाले. प्रजेचं दु:ख त्यांना, सहन होईना.गुरु वशिष्ठांनी सांगितले. सृष्टीच्या कोपावर एकच उपाय.“अश्वमेध यज्ञ”. रामांनी तयारी सुरू केली. शुभ्र पांढरा घोडा निवडला. त्याच्या गळ्यात सोन्याची पाटी लटकवली —”जो या घोड्याला अडवेल त्याला रामाशी युद्ध करावं लागेल!”घोडा गावोगाव धावत सुटला. अनेक राजांनी रामाची सत्ता मान्य केली. घोडा वाल्मिकी आश्रमाजवळ पोचला. लव कुश खेळत होते. त्यांनी इतका उमदा इतका सुंदर इतका पांढरा शुभ्र घोडा कधीच पाहिला नव्हता. तो त्यांना खूप आवडला. घोड्याला पकडून त्यांनी एका झाडाला बांधून ठेवले. घोड्याच्या गळ्यातली पाटी वाचली. दोघंही थबकले. “हा तर रामाचा घोडा!” लव म्हणाला. “त्याच रामाचा ज्यांनी आपल्या निरपराध आईला जंगलात सोडलं!” “आपल्या आईवर अन्याय करणाऱ्या राजाचा अश्वमेध आपण अडवायचाच!” कुश ठामपणे म्हणाला. थोड्याच वेळात रामाची सेना आली. सेनापतीने हुकूम दिला, “घोडा सोडा!””नाही!” लव-कुश ठामपणे म्हणाले. युद्ध सुरू झालं. लव-कुश लहान असले तरी शूर आणि पराक्रमी होते. त्यांनी रामाची बलाढ्य सेना पराभूत केली. लक्ष्मण स्वतः युद्धासाठी आले. पण लव-कुशांनी त्यांनाही हरवलं.शेवटी राम स्वतः आश्रमात आले. त्यांनी या लहान मुलांचं धैर्य पाहिलं. त्यांना आश्चर्य वाटलं. पण इतक्यात गुरु वशिष्ठ पुढे आले. त्यांनी आपले शिष्य लव कुश यांना आदेश दिला “युद्ध थांबवा!” त्याक्षणी लव कुश थांबले. गुरूची आज्ञा पाळली. सगळीकडे शांतता पसरली. रामाच्या सेनेला घाबरून नाही. गुरूची आज्ञा म्हणून ते थांबले. राम त्या शूर मुलांकडे बघतच राहिले. त्यांना प्रश्न पडला. कुणाची असतील बरे इतकी तेजस्वी शहाणी आणि आज्ञाधारक मुले? प्रभू श्री रामचंद्र की जयप्रभू श्री रामचंद्र की जयप्रभू श्री रामचंद्र की जय – विद्यावाचस्पति डॉ. अनिल मोकाशी (बालरोगतज्ञ)एमबीबीएस, एमडी, डीसीएच, एफआयएपी,पीएचडी (मुलांची वाढ व विकास)

रामायणाच्या गोष्टी 50 – रामाचा अश्वमेध Read Post »

Dr. Anil Mokashi telling stories to children

रामायणाच्या गोष्टी 49 – लव-कुशांचे बालपण

श्रीराम श्रीराम श्रीराम ! श्रीरामांची आज्ञा. म्हणून लक्ष्मणाने सीतेला वनात सोडलं. सीतेनी त्याला सांगितलं” या वनात एकटी जाणं माझ्या नशिबात आहे, पण रामांचा वारसा माझ्या पोटात वाढतोय.” दुःख होऊ नये म्हणून ही बातमी कर्तव्यकठोर रामाला त्याने कधीच सांगितली नाही. भागीरथी नदीच्या तीरावर वाल्मिकी ऋषींना सीता एकटी सापडली. त्यांनी सन्मानाने तिला आश्रमात आसरा दिला. सुरक्षेच्या दृष्टीने तिचे नाव “वैदेही” ठेवले. तिला मायेचं पांघरूण मिळालं. गर्भारपणी, चांगला नैसर्गिक, आहार, विहार, विचार आणि, गर्भसंस्कार, मिळाले. नऊ महिन्यांनी दोन तेजस्वी बाळांचा जन्म झाला. लव आणि कुश! त्यांच्या बाल लीलांनी सगळे आनंदले. त्यांचं बालपण आनंदी होतं. म्हणून मोठेपणी ते यशस्वी झाले. वाल्मिकी ऋषींनी त्यांना प्रेम दिलं. संस्कार दिले. शिक्षण दिलं. भारतीय गुरुकुल शिक्षण परंपरे प्रमाणे 6 शास्त्रं आणि 64 कला, शिकवल्या. पारंगत केलं. कुणाशी कसं वागायचं. समाजाचे नितीनियम शिकवले. त्यांच्या जीवनाला एक शिस्त लावली. लव ला धनुर्विद्या आवडायची. दिवस संपला तरी सराव चालूच. कुश ला संगीत आवडे. त्याच्या स्वरांनी संध्याकाळी आश्रम भारून जायचा. लव आणि कुश ८-१० वर्षांचे झाले. त्यांची मुंज झाली. अल्लड बालपण संपून अनेक गोष्टी शिकण्याची विद्यार्थीदशा सुरू झाली. ते चौकस, हुशार, उत्साही, आनंदी, समंजस, तेजस्वी, आत्मविश्वासू आणि प्रेमळ झाले. त्यांना बघून कौतुकाने कुणीही म्हणायचे, “मुलं असावी तर अशी. आदर्श” वाल्मिकी ऋषींनी लिहिलेली रामकथा तर मुलांची तोंड पाठ होती. आवडती होती. आश्रमात त्यांची ओळख फक्त “वैदेही”चे, गुणी सुपुत्र अशीच होती. अजूनही रामकथेचं सत्य त्यांच्या आयुष्याशी जोडलं गेलं नव्हतं. ते क्षण लवकरच येणार होते. प्रभू श्री रामचंद्र की जयप्रभू श्री रामचंद्र की जयप्रभू श्री रामचंद्र की जय – विद्यावाचस्पति डॉ. अनिल मोकाशी (बालरोगतज्ञ)एमबीबीएस, एमडी, डीसीएच, एफआयएपी,पीएचडी (मुलांची वाढ व विकास)

रामायणाच्या गोष्टी 49 – लव-कुशांचे बालपण Read Post »

Dr. Anil Mokashi telling stories to children

रामायणाच्या गोष्टी 48 – सीतेचा त्याग , रामराज्याचा धर्म.

श्रीराम श्रीराम श्रीराम ! रामराज्य म्हणजे सुखाचं राज्य! सगळ्यांना पोटभर जेवायला. अन्याय नाही. सगळे आनंदात. राजा, राजाचा धर्म, म्हणजे कर्तव्य, पाळे. प्रजा प्रजेचा धर्म म्हणजे कर्तव्य पाळे. शिक्षक शिक्षकांचा धर्म म्हणजे कर्तव्य पाळत. विद्यार्थी विद्यार्थ्यांचा धर्म म्हणजे कर्तव्य पाळत. सगळं आल वेल छान सुरळीत चालू होतं. पण रामाच्या हेरानं, एक बातमी आणली. “रजक नावाचा एक माणूस सगळ्यांना सांगतोय ‘रावणाच्या ताब्यातली सीता पवित्र कशी?’” हे ऐकून रामांना खूप दुःख झालं. त्यांना सीतेच्या पवित्रतेवर तिळमात्र शंका नव्हती. पण राजा फक्त पती नसतो. तो प्रजेचा आधार असतो. प्रजेच्या मनात जर आपल्या राणीबद्दल शंका असेल तर ती शंका दूर करणंही राजाचंच कर्तव्य असतं. रामांनी आपल्या आयुष्यातला सर्वात कठीण निर्णय घेतला. रामांनी लक्ष्मणाला आज्ञा दिली “सीतेला वनात सोडून एकटाच परत ये!” लक्ष्मणाचा संताप उफाळला. “त्या रजकाची जीभच छाटून टाकतो!” तो म्हणाला. “नको!” राम म्हणाले. “लोक म्हणतील मी माझा दोष झाकण्यासाठी रजकाला शिक्षा केली. लोकांची तक्रार ऐकलीच पाहिजे. तोच राजधर्म आहे. राजा न्याय करतो भावना नाही. मी पती म्हणून सीतेचा त्याग करू इच्छित नाही पण राजा म्हणून कर्तव्य पाळतोय. हा माझा धर्म आहे.” दुसऱ्या दिवशी लक्ष्मण सीतेला रथात बसवून वनात निघाला. भागीरथी नदीच्या काठावर रथ थांबला. मोठ्या वटवृक्षाखाली सीता विसावली. लक्ष्मणाचे डोळे पाणावले. तो म्हणाला, “सीते, श्रीरामांना माहीत आहे की तुम्ही पवित्र आहात. पण खोट्या अफवांना थांबवण्यासाठी तुमचा त्याग करावा लागतोय. हा त्यांच्या मनाचा मोठा दु:खद निर्णय आहे.” हे ऐकून सीतेचं हृदय तुटलं. अश्रूंनी डोळे भरले. पण तिनं धीर धरला. “लक्ष्मण रामांना सांगा… माझ्या पोटात त्यांची दोन बाळं वाढतायत. त्यांच्या या बाळांसाठी तरी मला जगलंच पाहिजे!” लक्ष्मण जड पावलांनी अयोध्येला परतला. वनात सीता एकटी उरली. फळं कंदमुळे खाऊन दिवस काढू लागली. पण संकटाच्या अंधारात दोन आशेची किरणं दिसत होती. सीतेच्या पोटात वाढणारे श्रीरामांचे तेजस्वी जुळे पुत्र लव आणि कुश! श्रीरामांचे तेजस्वी जुळे पुत्र लव आणि कुश! “प्रभू श्रीरामचंद्र की जय!”“प्रभू श्रीरामचंद्र की जय!”“प्रभू श्रीरामचंद्र की जय!” – विद्यावाचस्पति डॉ. अनिल मोकाशी (बालरोगतज्ञ)एमबीबीएस, एमडी, डीसीएच, एफआयएपी,पीएचडी (मुलांची वाढ व विकास)

रामायणाच्या गोष्टी 48 – सीतेचा त्याग , रामराज्याचा धर्म. Read Post »

Dr. Anil Mokashi telling stories to children

रामायणाच्या गोष्टी 47 – रामराज्यात सुखास, समाधानाची साथ

श्रीराम श्रीराम श्रीराम ! सीता राम अयोध्येत परतले. सुंदर आणि आदर्श “रामराज्य” उभारलं. सगळीकडे आनंद होता शांतता होती. लोक सुखी होते सुरक्षित होते. कोणालाच उपासमार नव्हती अन्याय नव्हता रोगराई नव्हती. राम आणि सीता प्रजेवर प्रेम करत. लोकांचं भलं व्हावं म्हणून दिवसरात्र काम करत. धर्म संस्कृती यांना महत्त्व देत. लोक प्रामाणिक होते. अयोध्येत अपराध नव्हते भांडणं नव्हती. सगळेजण एकमेकांशी सन्मानाने वागत. ऋषींना देवासारखा मान मिळत होता. विद्वानांचं आदराने स्वागत होतं. संरक्षणासाठी भक्कम सैन्य होतं. खजिना पैशांनी भरला होता. लहान मुलं गुरुकुलात शिकत. विद्वान आचार्य त्यांना चांगले संस्कार देत. अयोध्येतील लोक श्रीरामांच्या उत्तम चारित्र्याचं अनुकरण करत. म्हणूनच सगळेजण सुखी आणि समाधानी होते. राम हे दीपस्तंभ होते. मार्ग दाखवणारे. प्रकाश देणारे. पण… या आनंदनगरीत कुणाला तरी हे सगळं बघवत नव्हतं! कुणाच्या तरी मनात मत्सराचा किडा वळवळत होता. आणि मग कुणीतरी खोडसाळपणे कुजबुज सुरू केली. “रावणाच्या ताब्यातली सीता पवित्र कशी?” अयोध्येवर संकटाचे काळे ढग येऊ लागले होते. प्रभू श्री रामचंद्र की जयप्रभू श्री रामचंद्र की जयप्रभू श्री रामचंद्र की जय – विद्यावाचस्पति डॉ. अनिल मोकाशी (बालरोगतज्ञ)एमबीबीएस, एमडी, डीसीएच, एफआयएपीपीएचडी (मुलांची वाढ व विकास)

रामायणाच्या गोष्टी 47 – रामराज्यात सुखास, समाधानाची साथ Read Post »

Dr. Anil Mokashi telling stories to children

रामायणाच्या गोष्टी 46 – रामराज्यात भव्य स्वागत

श्रीराम श्रीराम श्रीराम ! श्रीराम, लक्ष्मण, आणि सीता, अयोध्येत परत आले. शहर आनंदानं, फुलून गेलं! पुष्पक विमान, आकाशात दिसताच, प्रजाजनांनी, जल्लोष केला. “श्रीरामचंद्र की जय!” असा जयघोष, आसमंतात घुमला. रस्ते फुलांनी सजले. ढोल-ताशांच्या गजरानं, वातावरण दणाणलं. फटाक्यांची आतषबाजी, सुरू झाली, आणि आकाशात, रंगीबेरंगी पताका, फडकल्या! वानरसेना तर, वेड्यासारखी आनंदानं उड्या, मारत होती. साखर फुटाणे, आणि गोड फळं, खात होती. सगळ्या शहरात, सणासारखा, उत्साह होता. अयोध्येत, एक मोठ्ठा रोड शो, झाल्यासारखं, वाटत होतं! रामभरताची, भेट झाली. दोघंही एकमेकांना, घट्ट बिलगले. त्यांना बघून, सगळ्यांच्या डोळ्यात, आनंदाश्रू आले. माता कौसल्या, सुमित्रा आणि कैकेयी, यांनी श्रीराम, आणि सीतेचं, औक्षण केलं. आईच्या नजरेतलं, प्रेम आणि अभिमान दोन्ही, ओसंडून, वाहत होतं. मग आला, तो शुभ दिवस! श्रीरामांचा भव्य, राज्याभिषेक झाला. अयोध्येच्या राजसभेत, अयोध्येच्या सीमेलगत असलेल्या सर्व राज्यांचे राजे आणि मित्रमंडळी जमली होती – सुग्रीव, विभीषण, अंगद, जांबवंत, हनुमान… सगळे उपस्थित होते. पृथ्वीवर पहिल्यांदाच अभिमानाने भगवा झेंडा फडकला! श्रीरामांना युद्ध नको होतं. शांती हवी होती. दुःख नको होतं. सुख हवं होतं. द्वेष नको होता. प्रेम हवं होतं. हे रामराज्य खरंच स्वर्गासारखं होतं! रामराज्याचं स्वप्न असंच सुंदर आणि प्रेमानं भरलेलं होतं. “प्रभू श्रीरामचंद्र की जय!”“प्रभू श्रीरामचंद्र की जय!”“प्रभू श्रीरामचंद्र की जय!” – विद्यावाचस्पति डॉ. अनिल मोकाशी (बालरोगतज्ञ)एमबीबीएस, एमडी, डीसीएच, एफआयएपी,पीएचडी (मुलांची वाढ व विकास)

रामायणाच्या गोष्टी 46 – रामराज्यात भव्य स्वागत Read Post »

Scroll to Top